शहरं
Join us  
Trending Stories
1
"CRPF ने पाकिस्तानी महिलेशी लग्न करण्यासाठी परवानगी दिली होती"; बडतर्फ केल्यानंतर जवानाने सगळेच सांगितले
2
'त्यावेळी जे घडले, ते अत्यंत चुकीचे होते', 1984 च्या शीख दंगलींबाबत राहुल गांधींचे मोठे विधान
3
आधी गुंगीचं औषध दिलं मग डोक्यात दगड घातला; सांगलीत आई-बहिणीकडून तरुणाचा खून, मग...
4
अमृतसरमध्ये २ पाकिस्तानी गुप्तहेरांना अटक; भारतीय सैन्याची गोपनीय माहिती केली लीक
5
स्मरण दिन: शंकर महाराजांचे ‘मालक’ स्वामी समर्थ; गुरु-शिष्याचे नाते अद्भूत, कशी झाली भेट?
6
पाकिस्तानच्या मनात भारताची भीती; राष्ट्रपतींनी तातडीनं बोलावली संसदेची विशेष बैठक
7
डोक्यात कुऱ्हाडीचा दांडा घालून बापाने केला मुलाचा खून, माजलगावमधील धक्कादायक घटना
8
POK मध्ये लोकांना घरे खाली करण्याचे आदेश; पाकिस्तानी सैन्यानं बनवले बंकर, वॉर सायरन लावले
9
१५० वर्षांचे आयुष्य, चमत्कारिक वागण्यातील गूढ; धनकवडीचा अवलिया योगी सद्गुरु शंकर महाराज
10
योग गुरू स्वामी पद्मश्री शिवानंद बाबा यांनी वयाच्या १२८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
11
"PM मोदी काय माझ्या मावशीचा मुलगा आहे का जे लगेच..."; पाक खासदाराचे विधान चर्चेच
12
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लॉटरी, यशच यश; प्रगतीची संधी, नोकरीत पदोन्नती, पैसा मिळेल!
13
दुसरे लग्न करायचे तर दुसऱ्याच्या पत्नीला पळवून न्यावे लागते; या देशात आहे विचित्र परंपरा...
14
Raid 2: रितेश देशमुख-अजय देवगणच्या सिनेमाचं बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर, ३ दिवसांत किती कमावले?
15
संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात आढळले ५४ बिबटे; एक बिबट्या ९ किमी अंतर पार करून वसईत पोहचला
16
"पाकिस्तानच्या काही क्षेत्रावर भारत कधीही हल्ला करू शकतो, आमच्याकडे ठोस पुरावे"
17
"भारतात इतर पर्यटन स्थळं नाहीत का?" काश्मिरला जाण्याचं आवाहन करणाऱ्यांवर पल्लवी जोशीचं भाष्य
18
...तर सीमा हैदरला हा नियम लागू नाही का?; सपा नेते अबु आझमींनी केंद्र सरकारला घेरलं
19
WAVES 2025: नेटफ्लिक्स सह-सीईओंसोबत सैफची चर्चा, म्हणाला, "रामायण, महाभारत..."
20
भारत-पाक तणावावर मोठी अपडेट; देशभरातील आयुध निर्माणीतील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द

काश्मीरवर मध्यस्थी न करण्याचे धोरण १९५० मध्ये ठरले

By admin | Updated: August 29, 2015 00:46 IST

काश्मीर मुद्यात मध्यस्थी न करणे आणि आपसातील वाद चर्चेद्वारे मिटविण्याकरिता भारत व पाकिस्तानला प्रोत्साहित करण्याचे अमेरिकन धोरण १९५० च्या दशकात तयार झाले होते.

वॉशिंग्टन : काश्मीर मुद्यात मध्यस्थी न करणे आणि आपसातील वाद चर्चेद्वारे मिटविण्याकरिता भारत व पाकिस्तानला प्रोत्साहित करण्याचे अमेरिकन धोरण १९५० च्या दशकात तयार झाले होते. अमेरिकी गुप्तचर संघटना सीआयएने गेल्या जुलैत उघड केलेल्या गोपनीय अमेरिकन दस्तावेजातून ही बाब समोर आली. १९५४ च्या या अत्यंत गोपनीय दस्तावेजानुसार, केवळ भारत व पाकिस्तानच शांतता, तसेच चर्चेच्या माध्यमातून काश्मीर वाद सोडवू शकतात, या निष्कर्षावर अमेरिका पोहोचली. याचे प्रतिबिंब आॅपरेशन को-आॅर्डिनेशन बोर्डाच्या या दस्तावेजातील परिच्छेद क्रमांक ४२ मध्ये उमटलेले आहे. तत्कालीन अमेरिकी राष्ट्राध्यक्ष ड्वाईट आईजनहावर यांनी १९५४ मध्ये या बोर्डाची स्थापना केली होती. राष्ट्रीय सुरक्षा धोरणांच्या (एनएसए) अंमलबजावणीसाठी सरकारच्या विविध संस्था आणि संघटनांत समन्वय राखण्याची जबाबदारी या बोर्डाची होती. दस्तावेजाच्या ४२ व्या परिच्छेदात म्हटले आहे की, भारताला हे स्पष्ट करण्यात येते की, भारत व पाकदरम्यानच्या परस्पर तडजोडीतूनच काश्मीर समस्येचे निराकरण होऊ शकते. अमेरिका संयुक्त राष्ट्र आणि इतर माध्यमांतून यासाठी मदत करण्यास तयार आहे. कोणत्याही एका देशाची बाजू घ्यावी, असा अमेरिकेचा कोणताही वैयक्तिक अथवा गुप्त हेतू नाही.