शहरं
Join us  
Trending Stories
1
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
2
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
3
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
4
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
5
राज्यातील महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचे ४० स्टार प्रचारक जाहीर; पाहा, संपूर्ण यादी
6
Palmistry: तुमच्या हातावरील 'शुक्र पर्वत' सांगतो विवाहसौख्याचे गुपित; खडतर जीवन की श्रीमंती?
7
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
8
DJ वाजवण्यापासून रोखलं, लग्नाची मिरवणूक निघण्यापूर्वीच नवरदेवानं उचललं टोकाचं पाऊल
9
ईशनिंदा नव्हे...! वाद प्रमोशनचा होता अन् धर्माच्या नावानं मारून टाकलं; दीपूचंद्र दासच्या कुटुंबाचा धक्कादायक खुलासा
10
संघर्षाचं सोनं झालं अन् 'आशा' बनली नगराध्यक्ष, नीलडोहच्या भूमिका मंडपेंची प्रेरणादायी वाटचाल 
11
Amravati Crime: प्रेमजाळं, ती २६ वर्षांची, तो २१ वर्षांचा! अनेकवेळा अत्याचार, दोनदा गर्भपात अन् तरीही धनंजयचा लग्नास नकार!
12
Vijay Hazare Trophy : किंग कोहली मैदानात उतरणार; पण स्टेडियममध्ये चाहत्यांना नो एन्ट्री; कारण...
13
“मुंबईत २०० जागांवर तयारी, ५० टक्के फॉर्म्युलाचा आग्रह, काँग्रेस…”; प्रकाश आंबेडकर थेट बोलले
14
MNS Shiv Sena UBT Alliance: ऐनवेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा टळली, संजय राऊतांनी सांगितली नवी वेळ
15
Chanakya Niti: रातोरात श्रीमंत व्हाल, जर चाणक्यनीतीच्या 'या' ५ सवयी आजच लावून घ्याल
16
प्रसिद्ध व्हिस्की कंपनीने अचानक उत्पादन केले बंद! तब्बल १ हजार कर्मचाऱ्यांचे भविष्य टांगणीला
17
Dhurandhar: पाकिस्तानातील कराचीमध्ये राहायचे रणवीर सिंगचे आजोबा, पण घडलं असं काही की...
18
“कुणीही एकत्र येऊ शकते, पण मराठी माणूस हा पूर्णपणे भाजपाच्या पाठीशी उभा आहे”; कुणाचा दावा?
19
"...तर मग ऑपरेशन सिंदूर तरी कुठे चुकीचे होते?" मुनीर यांच्यावर पाकिस्तानी मौलानांचा कडाडून हल्ला
20
घसरत्या रुपयाला सावरण्यासाठी आरबीआयची धडपड; बाजारात विकले तब्बल....अब्ज डॉलर
Daily Top 2Weekly Top 5

पोलिसांची नक्षल्यांकडून हत्या

By admin | Updated: July 16, 2015 03:51 IST

छत्तीसगडच्या नक्षलप्रभावित बीजापूर जिल्ह्णातून सोमवारी अपहरण करण्यात आलेल्या चार पोलीस जवानांचे बुधवारी अखेर गोळ्यांनी चाळणी झालेल्या अवस्थेतील मृतदेहच आढळून आले.

रायपूर : छत्तीसगडच्या नक्षलप्रभावित बीजापूर जिल्ह्णातून सोमवारी अपहरण करण्यात आलेल्या चार पोलीस जवानांचे बुधवारी अखेर गोळ्यांनी चाळणी झालेल्या अवस्थेतील मृतदेहच आढळून आले. नक्षल्यांनी या चारही जवानांची क्रूर हत्या करून त्यांचे मृतदेह रस्त्यांवर फेकून दिले होते. मृतदेहांजवळ नक्षल्यांची काही पत्रके आढळली आहेत. पोलिसांकडून गरीब व उपेक्षित आदिवासींचा छळ होत असल्याचा आरोप यात करण्यात आला आहे. या दरम्यान अन्य दोन अपहृत जवान अद्यापही नक्षल्यांच्या तावडीत असून त्यांचा शोध सुरूआहे.बीजापूर जिल्ह्णाचे पोलीस अधीक्षक के.एल. धु्रव यांनी ही माहिती दिली. जिल्ह्णाच्या कुटरू ठाण्याअंतर्गत गुदमा गावानजीकच्या रस्त्यावर या चारही पोलीस जवानांचे मृतदेह सापडले. सहायक आरक्षक राजूराम केलम, मंगल सोढी, जयदेव यादव आणि रामा भज्जी अशी मृत्युमुखी पडलेल्या जवानांची नावे आहेत. गत सोमवारी बीजापूरवरून कुटरूला परतत असताना कुटरू-सकनापल्लीदरम्यान नक्षल्यांनी या पोलिसांची बस रोखत तिची झडती घेतली होती. यानंतर बसमधील चार पोलिसांना खाली उतरवून नक्षली आपल्यासोबत घेऊन गेले होते. धु्रव यांनी दिलेल्या माहितीनुसार, हे पोलीस जवान काही खासगी कामासाठी बीजापूरला गेले होते व तेथून कुटरूकडे परत निघाले होते. यावेळी ते पोशाखात नव्हते. यापाठोपाठ दोन अन्य पोलीस जवान मोटरसायकलवरून कुटरूकडे येत असताना नक्षल्यांनी त्यांचेही अपहरण केले होते. मिच्चा हुंगा आणि जयलाल अशी या दोघांची नावे आहेत. त्यांचा अद्यापही शोध सुरू आहे. हे सर्व जवान अधिकाऱ्यांना माहिती न देता गेले होते शिवाय त्यांनी पुरेशी सुरक्षाही घेतली नव्हती, असा दावाही अतिरिक्त पोलीस अधीक्षक इंदिरा कल्याण एलेसेला यांनी केला.