शहरं
Join us  
Trending Stories
1
मदतीच्या आड आता निकषांचा डोंगर! हातातोंडाशी आलेल्या पिकांचा चिखल, शेतीचे वाळवंट अन् हताश शेतकरी
2
आजचे राशीभविष्य- २६ सप्टेंबर २०२५, मान- सन्मान व प्राप्तीत वाढ होईल;वाद होण्याच्या शक्यतेमुळे वाणी संयमित ठेवा
3
मदत करा...मदत करा...! आपत्तीग्रस्तांचा नेत्यांसमोर टाहो, बांधावर फुटले अश्रूंचे बांध
4
का होतेय ढगफुटी..? दिवसा बाष्पीभवन वेगाने होतेय; ढग जमतात अन् रात्रीतून सुरू होतो कहर
5
मुंबई महानगरातील विकास कामांना ९५४ कोटींचा ‘बुस्टर’; MMRDA ला राज्य सरकारची मदत
6
PAK vs BAN: Live मॅचमध्ये कॉमेडी! दोन्हीं बॅटर स्ट्राइक एन्डला; तरी Run Out करायला नाही जमलं (VIDEO)
7
‘शक्ती’रूप! धावत्या रेल्वेतून मिसाइल लॉन्च; अशी कामगिरी करणारा भारत ठरला जगातील चौथा देश
8
पावसाने गावे खरडली, नेत्यांची धुंदी कधी उतरेल?; निदान पंधरा दिवस राजकारणाला फुलस्टॉप द्या
9
केवळ मुंबईच नव्हे, तर राज्यभर सर्वच शहरांमध्ये जाहिरात फलक (पुन्हा) कोसळण्याच्या आत जागे व्हा
10
भैरप्पा गेले, पण हे लेखनपर्व कधीच काळाच्या पडद्याआड जाणार नाही
11
एलएलबी ३ वर्षे अभ्यासक्रमासाठी यंदा विक्रमी प्रवेश; आतापर्यंत २२ हजार जणांनी प्रवेश घेतले
12
पिके पाण्यात, स्वप्न वाहून गेले; कर्जाचा फास कसा सोडवायचा, पुढे शेती करायला पैसा कुठून आणायचा?
13
एससी उपवर्गीकरणाचा निर्णय तीन महिन्यांत घेऊ; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
14
अवैध बांधकामांवर कारवाई न करणाऱ्या अधिकाऱ्यांची चौकशी का नाही केली?; हायकोर्टाचा एसआयटीला सवाल
15
Maharashtra Flood: “महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांना पूर्ण मदत करावी, मदतकार्याला गती द्यावी”; राहुल गांधींचे आवाहन
16
Asia Cup 2025 Final: सूर्यकुमार यादवच्या विरोधात पाकची तक्रार; टीम इंडियाचा कर्णधार फायनलला मुकणार? जाणून घ्या प्रकरण
17
लालबागचा राजा संकटात धावून आला; शेतकरी बांधव, पूरग्रस्तांना मंडळाकडून ५० लाखांची मदत घोषित
18
17 पैकी 12 जणांची मंत्रिमंडळातून होणार 'सुट्टी'! या राज्यात भाजप करणार मोठी 'सर्जरी'? मंत्रीपदासाठी या नव्या नावांची चर्चा!
19
VIDEO: दिसण्यावर जाऊ नका... काकांनी गायलेलं रोमँटिंक गाणं ऐका, नक्कीच त्यांचे 'फॅन' व्हाल
20
Video - बदल्याची आग! लिव्ह-इन पार्टनर झाला हैवान; Ex गर्लफ्रेंडला एक्टिव्हाने दिली धडक

पोलिसांची नक्षल्यांकडून हत्या

By admin | Updated: July 16, 2015 03:51 IST

छत्तीसगडच्या नक्षलप्रभावित बीजापूर जिल्ह्णातून सोमवारी अपहरण करण्यात आलेल्या चार पोलीस जवानांचे बुधवारी अखेर गोळ्यांनी चाळणी झालेल्या अवस्थेतील मृतदेहच आढळून आले.

रायपूर : छत्तीसगडच्या नक्षलप्रभावित बीजापूर जिल्ह्णातून सोमवारी अपहरण करण्यात आलेल्या चार पोलीस जवानांचे बुधवारी अखेर गोळ्यांनी चाळणी झालेल्या अवस्थेतील मृतदेहच आढळून आले. नक्षल्यांनी या चारही जवानांची क्रूर हत्या करून त्यांचे मृतदेह रस्त्यांवर फेकून दिले होते. मृतदेहांजवळ नक्षल्यांची काही पत्रके आढळली आहेत. पोलिसांकडून गरीब व उपेक्षित आदिवासींचा छळ होत असल्याचा आरोप यात करण्यात आला आहे. या दरम्यान अन्य दोन अपहृत जवान अद्यापही नक्षल्यांच्या तावडीत असून त्यांचा शोध सुरूआहे.बीजापूर जिल्ह्णाचे पोलीस अधीक्षक के.एल. धु्रव यांनी ही माहिती दिली. जिल्ह्णाच्या कुटरू ठाण्याअंतर्गत गुदमा गावानजीकच्या रस्त्यावर या चारही पोलीस जवानांचे मृतदेह सापडले. सहायक आरक्षक राजूराम केलम, मंगल सोढी, जयदेव यादव आणि रामा भज्जी अशी मृत्युमुखी पडलेल्या जवानांची नावे आहेत. गत सोमवारी बीजापूरवरून कुटरूला परतत असताना कुटरू-सकनापल्लीदरम्यान नक्षल्यांनी या पोलिसांची बस रोखत तिची झडती घेतली होती. यानंतर बसमधील चार पोलिसांना खाली उतरवून नक्षली आपल्यासोबत घेऊन गेले होते. धु्रव यांनी दिलेल्या माहितीनुसार, हे पोलीस जवान काही खासगी कामासाठी बीजापूरला गेले होते व तेथून कुटरूकडे परत निघाले होते. यावेळी ते पोशाखात नव्हते. यापाठोपाठ दोन अन्य पोलीस जवान मोटरसायकलवरून कुटरूकडे येत असताना नक्षल्यांनी त्यांचेही अपहरण केले होते. मिच्चा हुंगा आणि जयलाल अशी या दोघांची नावे आहेत. त्यांचा अद्यापही शोध सुरू आहे. हे सर्व जवान अधिकाऱ्यांना माहिती न देता गेले होते शिवाय त्यांनी पुरेशी सुरक्षाही घेतली नव्हती, असा दावाही अतिरिक्त पोलीस अधीक्षक इंदिरा कल्याण एलेसेला यांनी केला.