शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड! आदित्य ठाकरे-देवेंद्र फडणवीस एकाच वेळी एकाच हॉटेलमध्ये, बंद दाराआड चर्चा?
2
लोकसभेत दारुण पराभव, मग विधानसभेत दमदार 'कमबॅक' कसा? महायुतीच्या नेत्याने सांगितलं गुपित
3
धक्कादायक बातमी! बुधवार पेठेतून ५ बांगलादेशी महिलांना पकडले; देशात होते अवैध वास्तव्य
4
रत्नागिरी: आरेवारे येथे लाटांचा अंदाज न आल्याने समुद्रात बुडून तीन बहिणींसह चौघांचा मृत्यू
5
बाबा ताजुद्दीन उरूस: नागपूर रेल्वे स्थानकावर कडेकोट बंदोबस्त; सुरक्षा यंत्रणा, प्रशासन सज्ज
6
महापालिका उमेदवारीची सर्वाधिक स्पर्धा भाजपमध्ये; आताच ५०० पेक्षा अधिक इच्छुकांची यादी तयार
7
पडळकरांना सभागृहात एक दिवस न बोलण्याची शिक्षा दिल्याने त्यांच्यात सुधारणा - नीलम गोऱ्हे
8
"असले राजकीय स्टंट सहन करणार नाही, माफी मागा"; राज ठाकरेंच्या वक्तव्याने गुजरातमध्ये संताप
9
आधी 'जिथं तू तिथं मी...' आता एकमेकांना अनफॉलो करत हार्दिक-जास्मिन यांच्यातील प्रेमाचा खेळ संपला!
10
वहिनीच्या अवतीभवती फिरायचा दीर, 'त्या' दिवशी हाताला धरून तिला घरी आणलं अन् कहरच केला...
11
Porsche Cayenne: पोर्शे केयेन ब्लॅक एडिशन भारतात लॉन्च; किंमत सर्वसामन्यांच्या आवाक्याबाहेर!
12
'बिहारमध्ये वीजच नाही तर बिल कुठून येणार'; नितीश कुमारांच्या घोषणेची भाजप मंत्र्याने उडवली खिल्ली
13
IND vs ENG : बुमराह 'ऑन ड्यूटी'; सिराजला मिळणार सुट्टी! टीम इंडियात शिजतोय हा प्लॅन
14
'कोल्डप्ले' कॉन्सर्टमध्ये CEO आणि HRचं अफेअर झालं उघड, आता कंपनीने केली 'ही' कारवाई
15
Electric Scooter: ओला, टीव्हीएस, बजाजसाठी धोक्याची घंटा, बाजारात येतेय रेट्रो स्टाईल इलेक्ट्रीक स्कूटर!
16
सुंदरा मनामध्ये भरली... फ्रान्समध्ये दिसला सारा तेंडुलकरचा नवा लूक, चाहतेही झाले फिदा
17
विनयभंगाच्या गुन्ह्याखाली तरुंगात गेला; सुटून आल्यानंतर पीडिताच्या घरासमोरच फोडले फटाके!
18
"...मग नितेश राणे सरकारमध्ये बसून फक्त पंखा हलवणार का?"; मनसे नेत्याचा खोचक सवाल
19
Rohini Khadse : "अरे कुणाला मूर्ख बनवता? पोलीस सत्ताधाऱ्यांच्या इशाऱ्यावर नाचताहेत...”, रोहिणी खडसेंचा संताप
20
सुनेवर होती वाकडी नजर, सतत मुलाशी भांडण अन् एके दिवशी सासऱ्याने टोकच गाठलं...

जेएनयूमध्ये पोलिसांना बंदी

By admin | Updated: February 23, 2016 03:36 IST

देशविरोधी घोषणा दिल्याचा आरोप असलेले जेएनयूचे पाच विद्यार्थी रविवारी रात्री उशिरा विद्यापीठात परतले असून, उमर खालिदचाही त्यात समावेश आहे. जमावाकडून मारहाण

नवी दिल्ली : देशविरोधी घोषणा दिल्याचा आरोप असलेले जेएनयूचे पाच विद्यार्थी रविवारी रात्री उशिरा विद्यापीठात परतले असून, उमर खालिदचाही त्यात समावेश आहे. जमावाकडून मारहाण होण्याच्या भीतीने हे विद्यार्थी गेल्या १० दिवसांपासून दडून बसले होते. विद्यापीठ परिसरात वातावरण सुरळीत होत असल्यामुळे ते परतले. पोलिसांना विद्यापीठात प्रवेश दिला जाणार नाही, असे आश्वासन कुलगुरूंनी विद्यापीठातील शिक्षक संघटनेला दिले आहे. पोलीस आतमध्ये गेलेले नाहीत. मात्र आरोपी विद्यार्थी निरपराध असतील तर त्यांनी चौकशीला सामोरे जावे, निरपराध असल्याचे पुरावे सादर करीत त्यांनी तपासात सहभागी व्हावे, असे आवाहन दिल्लीचे पोलीस आयुक्त बी. एस. बस्सी यांनी केले आहे. त्या पाचही जणांना अटक करण्यासाठी पोलीस काल विद्यापीठापर्यंत पोहोचले. मात्र विद्यापीठ प्रशासनाच्या परवानगीशिवाय प्रवेश मिळणार नाही, असे तेथील सुरक्षा अधिकाऱ्यांनी पोलिसांना सांगितले. त्यामुळे आज सकाळपर्यंत पोलीस तिथेच होते. कुलगुरूंशी चर्चा करून या विद्यार्थ्यांना अटक करण्याचा पोलिसांचा प्रयत्न सुरू असल्याचे सूत्रांनी सांगितले. मात्र आजही उशिरापर्यंत पोलीस विद्यापीठात गेले नव्हते.या विद्यार्थ्यांनी देशविरोधी घोषणा दिलेल्या नसल्यामुळे त्यांच्या बाजूने विद्यापीठाने भूमिका घ्यावी, पोलिसांना विद्यापीठाच्या आवारात घुसू देऊ नये, अशी मागणी विद्यार्थी संघटना आणि शिक्षकांनी सोमवारी सकाळी कुलगुरूंकडे केली होती.अतिरेकी नाही; पाकला गेलो नाहीकाल विद्यापीठात परतल्यानंतर उमर खालिदने म्हटले की, मी अतिरेकी नाही, गेल्या १० दिवसांत ज्या पद्धतीने माझी मीडिया ट्रायल झाली, त्यामुळे माझ्या कुटुंबावर काय बेतले, याची मला कल्पना आहे. माझ्याकडे पासपोर्ट नसल्याने मी पाकिस्तान वा अफगाणिस्तानात गेल्याचे वृत्त चुकीचे आहे. कार्यक्रमापूर्वी आखात वा काश्मीरमध्ये मी ८00 कॉल केल्याचा आरोपही खोटा आहे. अशी विधाने त्याने विद्यार्थ्यांसमोरील भाषणात केली. हे पाचही विद्यार्थी कालपासून प्रशासकीय कक्षात अन्य विद्यार्थ्यांच्या सुरक्षेत बसले आहेत.विद्यापीठाने भूमिका घ्यावीविद्यापीठाच्या अंतर्गत यंत्रणेने चौकशी समितीची पुनर्रचना केल्यानंतरच कामाला मुभा द्यावी. विद्यार्थ्यांनी या समितीसमक्ष हजर व्हावे यासाठी प्रशासनाने योग्य वातावरण तयार करावे, असे आवाहन आम्ही करीत आहोत, असे जेएनयूच्या शिक्षक संघटनेने (जेन्यूटा) तातडीने बोलाविलेल्या बैठकीत पारित केलेल्या ठरावात म्हटले आहे. विद्यार्थ्यांनी घोषणा दिल्या म्हणून त्यांच्यावर देशद्रोहाचे आरोप लावले जाऊ शकत नाहीत, असे मत कायदेतज्ज्ञांनीही व्यक्त केले आहे. विद्यार्थ्यांवरील हे आरोप वगळण्याची भूमिका विद्यापीठाने घ्यावी असे आम्हाला वाटते, असे जेन्यूटाचे अध्यक्ष अजय पटनाईक यांनी म्हटले.पतियाळा हाउस कोर्टाच्या परिसरात पत्रकार, विद्यार्थी आणि शिक्षकांवर झालेल्या हल्ल्यापुरती सुनावणी मर्यादित राहील. त्याबाबत १० मार्च रोजी सुनावणी केली जाईल, असे सुप्रीम कोर्टाने स्पष्ट केले. केवळ १५ फेब्रुवारी रोजी झालेल्या हिंसाचारापुरती सुनावणी सीमित असेल, असे जे. चेलमेश्वर आणि ए.एम. सप्रे या न्यायमूर्तीद्वयांच्या खंडपीठाने स्पष्ट केले. विद्यार्थी संघटनेची अध्यक्ष शेहला रशीद शोरा म्हणाली की, जादवपूर विद्यापीठ आणि एएमयूने पोलिसांना विद्यापीठाच्या आवारात प्रवेश करू दिला नव्हता; तशीच भूमिका जेएनयूच्या कुलगुरूंनी घ्यावी, अशी आमची मागणी आहे.