शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
3
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
4
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
5
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
6
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
7
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
8
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
9
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
10
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
11
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
12
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
13
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
14
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
15
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
16
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
17
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
18
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
19
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
20
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
Daily Top 2Weekly Top 5

जेएनयूमध्ये पोलिसांना बंदी

By admin | Updated: February 23, 2016 03:36 IST

देशविरोधी घोषणा दिल्याचा आरोप असलेले जेएनयूचे पाच विद्यार्थी रविवारी रात्री उशिरा विद्यापीठात परतले असून, उमर खालिदचाही त्यात समावेश आहे. जमावाकडून मारहाण

नवी दिल्ली : देशविरोधी घोषणा दिल्याचा आरोप असलेले जेएनयूचे पाच विद्यार्थी रविवारी रात्री उशिरा विद्यापीठात परतले असून, उमर खालिदचाही त्यात समावेश आहे. जमावाकडून मारहाण होण्याच्या भीतीने हे विद्यार्थी गेल्या १० दिवसांपासून दडून बसले होते. विद्यापीठ परिसरात वातावरण सुरळीत होत असल्यामुळे ते परतले. पोलिसांना विद्यापीठात प्रवेश दिला जाणार नाही, असे आश्वासन कुलगुरूंनी विद्यापीठातील शिक्षक संघटनेला दिले आहे. पोलीस आतमध्ये गेलेले नाहीत. मात्र आरोपी विद्यार्थी निरपराध असतील तर त्यांनी चौकशीला सामोरे जावे, निरपराध असल्याचे पुरावे सादर करीत त्यांनी तपासात सहभागी व्हावे, असे आवाहन दिल्लीचे पोलीस आयुक्त बी. एस. बस्सी यांनी केले आहे. त्या पाचही जणांना अटक करण्यासाठी पोलीस काल विद्यापीठापर्यंत पोहोचले. मात्र विद्यापीठ प्रशासनाच्या परवानगीशिवाय प्रवेश मिळणार नाही, असे तेथील सुरक्षा अधिकाऱ्यांनी पोलिसांना सांगितले. त्यामुळे आज सकाळपर्यंत पोलीस तिथेच होते. कुलगुरूंशी चर्चा करून या विद्यार्थ्यांना अटक करण्याचा पोलिसांचा प्रयत्न सुरू असल्याचे सूत्रांनी सांगितले. मात्र आजही उशिरापर्यंत पोलीस विद्यापीठात गेले नव्हते.या विद्यार्थ्यांनी देशविरोधी घोषणा दिलेल्या नसल्यामुळे त्यांच्या बाजूने विद्यापीठाने भूमिका घ्यावी, पोलिसांना विद्यापीठाच्या आवारात घुसू देऊ नये, अशी मागणी विद्यार्थी संघटना आणि शिक्षकांनी सोमवारी सकाळी कुलगुरूंकडे केली होती.अतिरेकी नाही; पाकला गेलो नाहीकाल विद्यापीठात परतल्यानंतर उमर खालिदने म्हटले की, मी अतिरेकी नाही, गेल्या १० दिवसांत ज्या पद्धतीने माझी मीडिया ट्रायल झाली, त्यामुळे माझ्या कुटुंबावर काय बेतले, याची मला कल्पना आहे. माझ्याकडे पासपोर्ट नसल्याने मी पाकिस्तान वा अफगाणिस्तानात गेल्याचे वृत्त चुकीचे आहे. कार्यक्रमापूर्वी आखात वा काश्मीरमध्ये मी ८00 कॉल केल्याचा आरोपही खोटा आहे. अशी विधाने त्याने विद्यार्थ्यांसमोरील भाषणात केली. हे पाचही विद्यार्थी कालपासून प्रशासकीय कक्षात अन्य विद्यार्थ्यांच्या सुरक्षेत बसले आहेत.विद्यापीठाने भूमिका घ्यावीविद्यापीठाच्या अंतर्गत यंत्रणेने चौकशी समितीची पुनर्रचना केल्यानंतरच कामाला मुभा द्यावी. विद्यार्थ्यांनी या समितीसमक्ष हजर व्हावे यासाठी प्रशासनाने योग्य वातावरण तयार करावे, असे आवाहन आम्ही करीत आहोत, असे जेएनयूच्या शिक्षक संघटनेने (जेन्यूटा) तातडीने बोलाविलेल्या बैठकीत पारित केलेल्या ठरावात म्हटले आहे. विद्यार्थ्यांनी घोषणा दिल्या म्हणून त्यांच्यावर देशद्रोहाचे आरोप लावले जाऊ शकत नाहीत, असे मत कायदेतज्ज्ञांनीही व्यक्त केले आहे. विद्यार्थ्यांवरील हे आरोप वगळण्याची भूमिका विद्यापीठाने घ्यावी असे आम्हाला वाटते, असे जेन्यूटाचे अध्यक्ष अजय पटनाईक यांनी म्हटले.पतियाळा हाउस कोर्टाच्या परिसरात पत्रकार, विद्यार्थी आणि शिक्षकांवर झालेल्या हल्ल्यापुरती सुनावणी मर्यादित राहील. त्याबाबत १० मार्च रोजी सुनावणी केली जाईल, असे सुप्रीम कोर्टाने स्पष्ट केले. केवळ १५ फेब्रुवारी रोजी झालेल्या हिंसाचारापुरती सुनावणी सीमित असेल, असे जे. चेलमेश्वर आणि ए.एम. सप्रे या न्यायमूर्तीद्वयांच्या खंडपीठाने स्पष्ट केले. विद्यार्थी संघटनेची अध्यक्ष शेहला रशीद शोरा म्हणाली की, जादवपूर विद्यापीठ आणि एएमयूने पोलिसांना विद्यापीठाच्या आवारात प्रवेश करू दिला नव्हता; तशीच भूमिका जेएनयूच्या कुलगुरूंनी घ्यावी, अशी आमची मागणी आहे.