शहरं
Join us  
Trending Stories
1
Operation Sindoor : 'आधी जीव वाचवा, चौक्या नंतर बांधू'; भारतीय सैन्याच्या कारवाईला घाबरून पाकिस्तानी कमांडर मशिदीत लपला होता
2
“PM मोदींची प्रशंसा, शरद पवार आता भाजपामय होताना दिसत आहेत”; प्रकाश आंबेडकरांची टीका
3
Monsoon Update : हवामान विभागाने दिली खुशखबर! मान्सून या दिवशी केरळात दाखल होणार; महाराष्ट्रात कधी?
4
Astrology: राहू केतूचे संक्रमण होणार, कोरोना परत थैमान घालणार? काय सांगते ग्रहस्थिती?
5
हृदयद्रावक! लग्नात आक्रित घडलं, खेळताना कारमध्ये लॉक झाली ४ मुलं; झाला मृत्यू, ६ तासांनंतर....
6
लग्न नको म्हणून तमन्नाशी केलं ब्रेकअप, आता अभिनेत्याने मुंबईत घेतला सी फेसिंग फ्लॅट
7
ओलाच्या रोडस्टर मोटरसायकलची डिलिव्हरी केव्हापासून? मालकाने जाहीर केली तारीख...
8
नौदलाला आज असे जहाज मिळणार, जगात कोणत्याही नौदलाकडे नाही; पाचव्या शतकातील आरमाराची ताकद जगभ्रमंतीला निघणार...
9
IPL 2025: जोश हेझलवूडने RCB फॅनसोबत केलं 'असं' कृत्य; Video पाहून तुम्हालाही येईल राग
10
"झावळ्यांमधून पोरांनी आम्हाला कपडे बदलताना पाहिलं आणि.."; उषा नाडकर्णींनी सांगितला भयानक अनुभव
11
"मलाच धक्का बसलाय..." परेश रावल यांच्या 'हेरा फेरी ३' सोडण्यावर सुनील शेट्टीची प्रतिक्रिया
12
आणखी एक ज्योती? १२ वर्षांच्या मुलाला सोडून नागपूरची महिला कारगिलमधून गायब, पाकिस्तानी नंबरवर झालेली फोनाफोनी
13
Akhilesh Yadav : "भाजपाची चूक नेहमीच लोकांसाठी जीवघेणी"; कोरोनाबद्दल अखिलेश यादव यांचा गंभीर इशारा
14
६ तास कसून चौकशी, अनेक बँकांत खाती; काही प्रश्नांची उत्तरे ज्योतीला देताच आली नाहीत?
15
कोणीतरी आले अन् गोळ्या झाडून गेले! हाफिज सईदचा जवळचा सहकारी आमिर हमजा अखेरची घटका मोजू लागला
16
मंत्रिमंडळाचे जिल्हा असंतुलन; ५७ टक्के मंत्री ७ जिल्ह्यांतून, १५ जिल्हे मात्र मंत्र्यांविना वंचित
17
अनंत अंबानींपेक्षाही मोठं लग्न? 'या' शाही विवाहात प्रत्येक पाहुण्यावर ४२ लाख होणार खर्च, २०० VIP
18
हरल्यावरही बक्षीस मिळतं पहिल्यांदाच पाहिलं! पाकच्या लष्कर प्रमुखांची सोशल मीडियावर उडतेय खिल्ली
19
ब्रेकअप? 'या' अभिनेत्याला डेट करत होती सारा तेंडुलकर, कुटुंबाला भेटल्यानंतर नातं तुटल्याची चर्चा
20
पत्नी आजारी होती, बदली केली नाही; माजी सरन्यायाधीशांचे नाव न घेता न्यायमूर्तींची निरोप समारंभात नाराजी

जेएनयूमध्ये पोलिसांना बंदी

By admin | Updated: February 23, 2016 03:36 IST

देशविरोधी घोषणा दिल्याचा आरोप असलेले जेएनयूचे पाच विद्यार्थी रविवारी रात्री उशिरा विद्यापीठात परतले असून, उमर खालिदचाही त्यात समावेश आहे. जमावाकडून मारहाण

नवी दिल्ली : देशविरोधी घोषणा दिल्याचा आरोप असलेले जेएनयूचे पाच विद्यार्थी रविवारी रात्री उशिरा विद्यापीठात परतले असून, उमर खालिदचाही त्यात समावेश आहे. जमावाकडून मारहाण होण्याच्या भीतीने हे विद्यार्थी गेल्या १० दिवसांपासून दडून बसले होते. विद्यापीठ परिसरात वातावरण सुरळीत होत असल्यामुळे ते परतले. पोलिसांना विद्यापीठात प्रवेश दिला जाणार नाही, असे आश्वासन कुलगुरूंनी विद्यापीठातील शिक्षक संघटनेला दिले आहे. पोलीस आतमध्ये गेलेले नाहीत. मात्र आरोपी विद्यार्थी निरपराध असतील तर त्यांनी चौकशीला सामोरे जावे, निरपराध असल्याचे पुरावे सादर करीत त्यांनी तपासात सहभागी व्हावे, असे आवाहन दिल्लीचे पोलीस आयुक्त बी. एस. बस्सी यांनी केले आहे. त्या पाचही जणांना अटक करण्यासाठी पोलीस काल विद्यापीठापर्यंत पोहोचले. मात्र विद्यापीठ प्रशासनाच्या परवानगीशिवाय प्रवेश मिळणार नाही, असे तेथील सुरक्षा अधिकाऱ्यांनी पोलिसांना सांगितले. त्यामुळे आज सकाळपर्यंत पोलीस तिथेच होते. कुलगुरूंशी चर्चा करून या विद्यार्थ्यांना अटक करण्याचा पोलिसांचा प्रयत्न सुरू असल्याचे सूत्रांनी सांगितले. मात्र आजही उशिरापर्यंत पोलीस विद्यापीठात गेले नव्हते.या विद्यार्थ्यांनी देशविरोधी घोषणा दिलेल्या नसल्यामुळे त्यांच्या बाजूने विद्यापीठाने भूमिका घ्यावी, पोलिसांना विद्यापीठाच्या आवारात घुसू देऊ नये, अशी मागणी विद्यार्थी संघटना आणि शिक्षकांनी सोमवारी सकाळी कुलगुरूंकडे केली होती.अतिरेकी नाही; पाकला गेलो नाहीकाल विद्यापीठात परतल्यानंतर उमर खालिदने म्हटले की, मी अतिरेकी नाही, गेल्या १० दिवसांत ज्या पद्धतीने माझी मीडिया ट्रायल झाली, त्यामुळे माझ्या कुटुंबावर काय बेतले, याची मला कल्पना आहे. माझ्याकडे पासपोर्ट नसल्याने मी पाकिस्तान वा अफगाणिस्तानात गेल्याचे वृत्त चुकीचे आहे. कार्यक्रमापूर्वी आखात वा काश्मीरमध्ये मी ८00 कॉल केल्याचा आरोपही खोटा आहे. अशी विधाने त्याने विद्यार्थ्यांसमोरील भाषणात केली. हे पाचही विद्यार्थी कालपासून प्रशासकीय कक्षात अन्य विद्यार्थ्यांच्या सुरक्षेत बसले आहेत.विद्यापीठाने भूमिका घ्यावीविद्यापीठाच्या अंतर्गत यंत्रणेने चौकशी समितीची पुनर्रचना केल्यानंतरच कामाला मुभा द्यावी. विद्यार्थ्यांनी या समितीसमक्ष हजर व्हावे यासाठी प्रशासनाने योग्य वातावरण तयार करावे, असे आवाहन आम्ही करीत आहोत, असे जेएनयूच्या शिक्षक संघटनेने (जेन्यूटा) तातडीने बोलाविलेल्या बैठकीत पारित केलेल्या ठरावात म्हटले आहे. विद्यार्थ्यांनी घोषणा दिल्या म्हणून त्यांच्यावर देशद्रोहाचे आरोप लावले जाऊ शकत नाहीत, असे मत कायदेतज्ज्ञांनीही व्यक्त केले आहे. विद्यार्थ्यांवरील हे आरोप वगळण्याची भूमिका विद्यापीठाने घ्यावी असे आम्हाला वाटते, असे जेन्यूटाचे अध्यक्ष अजय पटनाईक यांनी म्हटले.पतियाळा हाउस कोर्टाच्या परिसरात पत्रकार, विद्यार्थी आणि शिक्षकांवर झालेल्या हल्ल्यापुरती सुनावणी मर्यादित राहील. त्याबाबत १० मार्च रोजी सुनावणी केली जाईल, असे सुप्रीम कोर्टाने स्पष्ट केले. केवळ १५ फेब्रुवारी रोजी झालेल्या हिंसाचारापुरती सुनावणी सीमित असेल, असे जे. चेलमेश्वर आणि ए.एम. सप्रे या न्यायमूर्तीद्वयांच्या खंडपीठाने स्पष्ट केले. विद्यार्थी संघटनेची अध्यक्ष शेहला रशीद शोरा म्हणाली की, जादवपूर विद्यापीठ आणि एएमयूने पोलिसांना विद्यापीठाच्या आवारात प्रवेश करू दिला नव्हता; तशीच भूमिका जेएनयूच्या कुलगुरूंनी घ्यावी, अशी आमची मागणी आहे.