शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
2
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
3
ख्रिसमस धमाका! अवघ्या १ रुपयात महिनाभर 'अनलिमिटेड' कॉलिंग आणि डेटा; BSNL ची खास ऑफर
4
४ दिवसांपासून सातत्यानं 'या' शेअरला अपर सर्किट; ७४% नं वाढला स्टॉक, तुमच्याकडे आहे का?
5
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
6
Flashback 2025: वर्षभरात ८ लढती! टीम इंडियाचा 'षटकार' अन् पाकिस्तानला 'ट्रॉफी चोर'चा टॅग
7
बापाचं काळीज! "मॅडम, माझ्या मुलीला मारू नका, हिला आई नाही"; Video पाहून पाणावतील डोळे
8
स्टेट बँक ऑफ इंडियाचं जुनं नाव माहीत आहे? ३४० वर्षांपूर्वी एका ब्रिटीश बँकेपासून झाली होती सुरुवात
9
'भाभीजी घर पर है' मालिकेत परतली शिल्पा शिंदे, भावुक प्रतिक्रिया देत म्हणाली, "मी कधीच चुकीचं..."
10
Staff Gift: कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्यांना दितेय मोठे मोठे फ्लॅट, किंमतही कोट्यवधींमध्ये
11
Travel : ठंडा-ठंडा, कूल-कूल! भारतातील सर्वात गारेगार ठिकाणं, तापमान इतकं कमी की तलावही गोठतो
12
'जर तरची गोष्ट' नाटकाचा तरुण दिग्दर्शक काळाच्या पडद्याआड; ४२व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन
13
बांगलादेशात उस्मान हादीनंतर आता NCP नेत्याची हत्या; अज्ञात हल्लेखोराने डोक्यात झाडली गोळी
14
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेला सुप्रीम कोर्टाकडून स्थगिती; आमदारकीही जाणार नाही, आज काय घडलं?
15
आयटी ते शेती... भारत-न्यूझीलंड मुक्त व्यापार कराराचे नेमके फायदे काय? 'या' गोष्टी होणार स्वस्त
16
"कुटुंबाच्या प्रतिमेसाठी गप्प होतो, पण आता..."; नितेश राणेंच्या पोस्टने महायुतीत धडकी, कणकवलीतील धक्का जिव्हारी?
17
हातावर मेहेंदी, हिरवा चुडा अन् मुंडावळ्या; प्रियदर्शिनी इंदलकरची लगीनघाई? 'तो' फोटो व्हायरल
18
नको असलेला पसारा २०२५ मध्येच सोडा, नवीन वर्षात 'मिनिमलायझेशन'ची सवय लावा
19
ऐन निवडणुकीत महायुती सरकारनं निवडणूक कायद्यात केला महत्त्वाचा बदल; काय परिणाम होणार?
20
YouTube वर १ बिलियन व्ह्यूज आले तर किती पैसे मिळतात? आकडा ऐकून हैराण व्हाल!
Daily Top 2Weekly Top 5

...तर पीओके भारताचा भाग झाला असता !

By admin | Updated: September 2, 2016 11:53 IST

भारताने नैतिकतेऐवजी लष्करी पर्याय वापरला असता तर पाकव्याप्त काश्मीर भारताचा झाला असता, असे हवाईदल प्रमुख एअर चीफ मार्शल अरूप

नवी दिल्ली : भारताने नैतिकतेऐवजी लष्करी पर्याय वापरला असता तर पाकव्याप्त काश्मीर भारताचा झाला असता, असे हवाईदल प्रमुख एअर चीफ मार्शल अरूप राहा यांनी गुरुवारी येथे सूचित केले. अरूप राहा एअरोस्पेस चर्चासत्रात बोलत होते. देशाच्या हवाई दलाचे सामर्थ्य १९७१ च्या भारत-पाकिस्तान युद्धात भारत सरकारकडून पूर्णपणे वापरले गेले नाही अशी हळहळही त्यांनी व्यक्त केली. अरूप राहा म्हणाले, पाकव्याप्त काश्मीर हा आमच्या शरीरात रुतलेला काटा आहे. भारताने सुरक्षेच्या गरजांकडे व्यावहारिक दृष्टीने बघितले नाही. आमच्या संरक्षणाच्या गरजांबाबत आमच्यावर आदर्शांनी राज्य केले. त्यामुळे आम्ही व्यावहारिक भूमिका घेतली नाही. सौहार्दाचे वातावरण राखण्यासाठी लष्करी शक्तीकडे दुर्लक्ष केले. भूतकाळात शत्रुंना अटकाव करताना लष्करी शक्ती विशेषत: हवाई दलाचे सामर्थ्य वापरण्यात भारत नाखुष होता, असे राहा म्हणाले.अरूप राहा म्हणाले की, १९४७ मध्ये जम्मू आणि काश्मीरमध्ये टोळ््यांनी हल्ला केला त्यावेळी भारतीय हवाई दलाच्या वाहतूक विमानांनी भारतीय सैनिक आणि उपकरणे प्रत्यक्ष युद्धाच्या स्थळी पोहोचविण्यास मदत केली होती. आणि ज्यावेळी लष्करी उपाय नजरेच्या टप्प्यात होता, तेव्हा आपण नैतिकतेच्या गप्पा मारल्या. प्रश्न शांततेच्या मार्गांनी सुटावा म्हणून आम्ही संयुक्त राष्ट्रांत धाव घेतली. १९६२ मध्ये चकमक होईल या भीतीतून हवाई दलाचे सामर्थ्य पूर्णपणे वापरले गेले नसल्याचे राहा म्हणाले. १९६५ च्या युद्धात पाकिस्तानचे हवाई दल आमचे हवाईतळ, पायाभूत सुविधा, जमिनीवर असलेल्या विमानांवर पूर्व पाकिस्तानकडून हल्ले करीत असतानाही आम्ही राजकीय कारणांमुळे हवाई दलाचा वापर केला नाही. आम्हाला गंभीर स्वरुपाची माघार घ्यावी लागली परंतु आम्ही कधीही प्रत्युत्तर दिले नाही. फक्त १९७१ च्या युद्धातच हवाई दलाची शक्ती पूर्णपणे वापरण्यात आली. तिन्ही दलांनी एकजीव होऊन काम केले व त्याचा परिणाम म्हणून बांगलादेशची स्थापना झाली, असे त्यांनी नमूद केले. (लोकमत न्यूज नेटवर्क)संपूर्ण काश्मीर भारताचेचपाकिस्तानने संयुक्त राष्ट्र संघास कितीही पत्रे लिहिली तरी संपूर्ण जम्मू आणि काश्मीर भारताचेच आहे व त्याचा काही भाग पाकिस्तानने बेकायदेशीरपणे बळकावला आहे, ही वस्तुस्थिती बदलत नाही, असे भारताने गुरुवारी ठामपणे सांगितले. पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांनी काश्मीरसंबंधी संयुक्त राष्ट्र संघाच्या सरचिटणीसांना एका आठवड्यात दुसरे पत्र पाठविले. त्यावर प्रतिक्रिया देताना परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते विकास स्वरूप म्हणाले की, त्यांना अशी हवी तेवढी पत्रे लिहू देत, त्याने संपूर्ण जम्मू-काश्मीर भारताचा अविभाज्य भाग आहे ही वस्तुस्थिती बदलणार नाही.