शहरं
Join us  
Trending Stories
1
15 दिवसांत गाझा युद्ध संपणार! आता हमासच्या जागेवर कोण राज्य करणार? नेतान्याहू-ट्रम्प यांनी घेतला मोठा निर्णय
2
चीन-पाकिस्तानसोबतच्या 'तिकडी'ला बांगलादेशचा नकार! युनूस सरकारची भारताला मोठी ऑफर
3
आणीबाणीच्या काळात संविधानाच्या प्रस्तावनेत 'धर्मनिरपेक्ष', 'समाजवादी' शब्द जोडले गेले, समीक्षा  व्हावी; संघाची मागणी
4
"जय हिंद, जय भारत..."; आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातून शुभांशू शुक्ला यांचं पहिलं भाषण, काय म्हणाले...?
5
“इंदिरा गांधींनी आणीबाणी उठवली, पण मतचोरी करुन निवडणुका घेतल्या नाहीत”; काँग्रेसची टीका
6
अमेरिका, रशिया,यूएई, सौदी...; 'या' यादीत लवकरच भारतही येईल, सर्व काही 'सेट'
7
“मी कधीच विरोधासाठी विरोध करणार नाही”; शक्तिपीठ महामार्गावरून शरद पवारांचे मोठे विधान
8
“मराठी भाषा अनिवार्य, हिंदीसह इतर भारतीय भाषा ऐच्छिक”: शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे
9
शुभांशू शुक्ला यांचं आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात जबरदस्त स्वागत, ठरले अशी कामगिरी करणारे दुसरे भारतीय; बघा VIDEO
10
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
11
“राज्यात हिंदी सक्ती धोरण उद्धव ठाकरेंनी स्वीकारले, आदित्य ठाकरेंकडून पाठराखण”; कुणाचा दावा?
12
ENG vs IND : जसप्रीत बुमराहला दुसऱ्याच सामन्यात दिली जाणार विश्रांती; त्याच्या जागी कुणाची लागणार वर्णी?
13
राज ठाकरेंच्या मोर्चात जाणार का? शरद पवारांचे सूचक विधान; म्हणाले, “दोन्ही ठाकरे बंधू...”
14
इंडियन एअर फोर्समध्ये अग्निवीर होण्याची सुवर्णसंधी...! 11 जुलैपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया; जाणून घ्या सविस्तर
15
भारताच्या 'ध्वनि'मुळे शत्रू हादरेल, पाकिस्तान अन् चीनमध्येही उडेल खळबळ! कसं आहे नवं क्षेपणास्त्र?
16
“दिल्लीतील आकाच्या इशाऱ्याने शक्तिपीठ महामार्गाचा घाट, हिंदी सक्तीला विरोधच”; काँग्रेस ठाम
17
आषाढ गुप्त नवरात्र प्रारंभ, वराही देवीची पूजा आणि लवकर विवाह ठरण्यासाठी उपयुक्त मंत्र
18
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
19
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
20
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत

पंतप्रधान मोदींच्या बचावाचे प्रयत्न !

By admin | Updated: February 11, 2015 02:04 IST

मे महिन्यातील लोकसभा निवडणुकीतील अभूतपूर्व यशानंतर महाराष्ट्र, हरियाणा आणि झारखंड येथील सत्तास्थापनेचे आणि जम्मू-काश्मीरमधील

नवी दिल्ली : मे महिन्यातील लोकसभा निवडणुकीतील अभूतपूर्व यशानंतर महाराष्ट्र, हरियाणा आणि झारखंड येथील सत्तास्थापनेचे आणि जम्मू-काश्मीरमधील आजवरच्या सर्वाधिक जनाधाराचे श्रेय मुक्तकंठाने नरेंद्र मोदींच्या झोळीत टाकून त्यांची ‘लार्जर दॅन लाइफ’ प्रतिमा निर्माण करणाऱ्या भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांनी दिल्ली निवडणुकीतील दारुण पराभवाचे अपश्रेय मोदींच्या अंगाला चिकटू न देण्यासाठी मंगळवारी दिवसभर केविलवाणा प्रयत्न केला.दिल्ली देशाची राजधानी असल्याने येथे काय होते यावर सर्व जगाचे लक्ष असते, असे म्हणत ‘कमनशिबी’ केजरीवाल यांच्या मागे न जाता ‘नशीबवान’ मोदींच्या मागे दिल्लीकर मतदारांनी जावे, असे आवाहन करत स्वत: मोदी या निवडणुकीच्या प्रचारात उतरले होते. पक्षाध्यक्ष अमित शहा यांनीही दिल्लीचा कल नंतर देशभर प्रतिबिंबित होईल, असे सांगत मोदी करिश्म्याच्या आधारे मतांचा जोगवा मागितला होता. एवढेच नव्हे, दिल्लीत जे काही होईल ते मोदींशी जोडले जाईल याची पक्की खूणगाठ भाजपाने बांधली होती व काहीही झाले तरी दिल्ली सर करायचीच या इराद्याने संपूर्ण केंद्रीय मंत्रिमंडळ, सर्व स्वशासित राज्यांचे मुख्यमंत्री व सर्व खासदारांची फौज प्रचारात उतरविली होती. किंबहुना काही विपरीत घडलेच तर मोदींवर ठप्पा येऊ नये यासाठी किरण बेदींना पक्षात घेऊन त्यांना मुख्यमंत्रिपदाच्या उमेदवार म्हणून ‘प्रोजेक्ट’ करण्याची खेळीही पक्षाने खेळली होती.मात्र हे सर्व सोयिस्करपणे विसरून, दिल्लीत तोंड लपवायलाही जागा राहिली नाही, हे स्पष्ट होताच भाजपाच्या नेत्या-प्रवक्त्यांमध्ये मोदींवर पांघरूण घालण्याची केविलवाणी चढाओढ सुरू झाली. विविध वाहिन्यांवरील पक्ष प्रवक्त्यांची वक्तव्ये डोळे मिटून ऐकली असता जणू सोनिया-राहुल गांधींवर अपयशाचे खापर न येऊ देण्यासाठी दडपडणारे काँग्रसचे प्रवक्तेच बोलत असल्याचे वाटावे, एवढी ही बतावणी बेमालूम आणि निर्लज्जपणाची होती. बहुधा काय होणार याची आधीच कल्पना असल्याने कोणत्या चेहऱ्याने छोट्या पडद्यावर जायचे याची रंगीत तालीम या भाजपावाल्यांनी आधीच करून ठेवली होती!स्वत:ही जिंकू न शकलेल्या किरण बेदी म्हणाल्या, हा सामना आमच्या दोघांमध्ये (स्वत: आणि केजरीवाल) होता. खेळात कोणीतरी एक जिंकत असतो, तसे ते जिंकले. पक्ष जिंकला असता तर ते सामूहिक यश ठरले असते, पण अपयश हे एकट्याचे असते. मी ती जबाबदारी पूर्णपणे माझ्यावर घेत आहे. पोलीस दलात होते तेव्हाही अपयश दुसऱ्यावर न टाकता ते मी स्वत:वरच घेत होते.दुपार व्हायच्या आतच पराभव स्पष्ट झाल्यावर, सदैव हसतमुख असणारे भाजपाचे नेते शाहनवाज हुसैन, तोच भाव कायम ठेवत म्हणाले, दिल्लीतील पराभवाची कारणे अनेक आहेत. वेगवेगळ्या भागांसाठी कारणे वेगळी आहेत. आम्ही निराश झालेलो नाही. आमचे लक्ष्य यापुढील निवडणुका आहे. बिहार आणि पश्चिम बंगालमध्ये जिंकण्याची आम्हाला खात्री आहे. पक्षाचे आणखी एक प्रवक्ते जीव्हीएल नरसिंह राव यांनी सांगितले, ही निवडणूक म्हणजे अरविंद केजरीवाल यांच्याविषयीचे सार्वमत होते. निदान दिल्लीच्या मतदारांचा तरी तसा दृष्टिकोन होता. ‘आप’चे आधीचे ४९ दिवसांचे सरकार आणि त्यांनी केलेले काम यावर हे मतदान होते. लोकांनी नक्कीच केजरीवाल यांच्या बाजूने कौल दिला आहे. त्यांना पुन्हा एकदा संधी द्यायला हवी, असे लोकांना वाटते व आम्हाला ते मान्य आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)