शहरं
Join us  
Trending Stories
1
Air India Plane Crash : अहमदाबाद विमान अपघातावर मोठी अपडेट; सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारला नोटीस पाठवली, AAIB अहवालाबाबत सांगितली ही बाब
2
डीमार्टने जीएसटी दर कमी केले नाहीत? पहिल्याच दिवशी ८,८५७ रुपयांचे बिल, किती लावला GST?
3
Lamborghini Accident: भरधाव लॅम्बोर्गिनी दुभाजकावर धडकली; कोस्टल रोडवरील अपघातात, कोण चालवत होतं कार?
4
चिमुकली आई... आई... करत राहिली, लिव्ह इन पार्टनरने गर्लफ्रेंडच्या मुलीची हत्या केली  
5
Asia Cup 2025: भारत-पाकिस्तानचे संघ पुन्हा एकदा भिडणार? समजून घ्या IND vs PAKचे गणित
6
मनसे-शिवसेना युतीत जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरला; कोण किती जागा लढवणार? समोर आली माहिती
7
VIRAL VIDEO: चीनमधली खूप रील्स पाहिली असतील, पण भारतातील एअरपोर्टवर फूड डिलिव्हरी करणारा रोबो पाहिलात का?
8
Mumbai: सचिन तेंडुलकरच्या हस्ते दादरच्या शिवाजी पार्क जिमखान्याचे लोकार्पण!
9
Navratri 2025: नवरात्रीच्या पहिल्या दिवशी करूया स्मरण आणि मानसपूजन देवी शैलपुत्रीचे!
10
दुर्दैवी अंत! ज्याच्या इशाऱ्यावर 'वाघ' उठबस करायचा, त्याच मालकाला वाघाने टेन्शनमध्ये शिकार बनवलं
11
पाकिस्तानी सैन्याने त्यांच्याच देशात हवाई हल्ला केला, महिला मुलांसह ३० नागरिकांचा मृत्यू
12
ओबीसी आंदोलक नवनाथ वाघमारे यांची गाडी अज्ञात व्यक्तीने पेटवली; जालन्यातील घटना
13
"हो आम्ही पालक झालो आहोत", अखेर भूषणने उलगडलं केतकीसोबतच्या 'त्या' फोटोचं गुपित
14
पराभव दिसू लागताच पाकिस्तानी प्रेक्षक पळू लागले, भारतीय तरुणीने भर स्टेडियममध्ये डिवचले, म्हणाली...  
15
GST 2.0 Price List : स्कूटर ते होंडा ३५०... हॅचबॅकपासून लक्झरी SUV पर्यंत, GST कपातीमुळे कार-बाईक स्वस्त; पाहा संपूर्ण यादी
16
तुम्हाला फावल्या वेळेत नखं खाण्याची सवय असेल तर आताच सोडा; डॉक्टरांचा धोक्याचा इशारा
17
एका महिलेचा कॉल अन् करोडपती बँकरला २३ कोटींचा गंडा; एक महिन्यासाठी केले डिजिटल अरेस्ट
18
Tata ची मोठी घोषणा; चार वर्षांपूर्वीच्या किमतीवर मिळणार कार, जाणून घ्या नवीन दर...
19
Monsoon update: यंदाची दिवाळी पावसातच जाणार का? मान्सून भारतातून कधी परत जाणार?
20
Video - हायव्होल्टेज ड्रामा! लग्नाचं वेड, जीवाशी खेळ; गर्लफ्रेंड न भेटल्याने 'तो' टॉवरवर चढला

तमिळनाडूच्या राजकारणात ‘पीएमके’चा भाव वधारला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2019 06:19 IST

लढती होणार दुरंगी; कमल हासन यांच्याकडे आता सर्वांचे लक्ष, १५ पेक्षा जास्त जागांवर वणीयार समाजाचा प्रभाव

मिळनाडूमध्ये लोकसभेसाठी दुरंगी लढतीचे चिन्ह स्पष्ट झाले आहे. सुपरस्टार रजनीकांत यांचा पक्ष निवडणुकांत उतरणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे आणि कमल हासन यांची भूमिका अद्याप जाहीर झालेली नाही. त्यामुळे सध्या तरी अण्णाद्रमुक, पीएमके, भाजपा अशी युती आणि विरोधात द्रमुक, काँग्रेस, एमडीएमके, डावे पक्ष व इतर असा सामना रंगणार आहे.

दिवंगत मुख्यमंत्री जे. जयललिता यांच्या निधनानंतर अण्णा द्रमुक पक्ष विस्कळीत झाल्यामुळे द्रमुक आघाडी एकतर्फी निवडणूक जिंकेल, असे वातावरण होते. पण गेल्या दोन महिन्यांत अण्णा द्रमुक, पीएमके, भाजपा यांनी सामंजस्य ठेवून युती केली. तामिळनाडूतील जागावाटपाचे चित्र पाहिल्यास राष्ट्रीय पक्षांपेक्षा एस. रामदास यांच्या पीएमके पक्षाचा भाव वधारल्याचे चित्र दिसते. द्रविडीयन राजकारणाला विरोध करणाऱ्या पीएमकेने एनडीएच्या युतीतील सात मतदारसंघ मिळवल्याने राजकीय विश्लेषकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

एस. रामदास यांच्या पीएमके पक्षाची २०१४ मध्येही भाजपासोबत युती होती. त्यावेळी स्थानिक राजकीय घडामोडींचा फायदा भाजपा, पीएमके यांना झाला. या दोन्ही पक्षांचा प्रत्येकी एक उमेदवार विजयी झाला. तामिळनाडूतील वणीयार समाजाच्या मतांवर प्रभाव असणाऱ्या पीएमकेचा फायदा एनडीए आघाडीला होण्याची संधी आहे. गेल्या लोकसभा निवडणुकीत पीएमकेला ४.४४ टक्के मते मिळाली होती, तर २०१६च्या विधानसभा निवडणुकीत सहा टक्के मते मिळवली. त्या पक्षाला एकाही विधानसभा मतदारसंघात विजय मिळाला नाही, पण राज्यात पीएमकेचे ७५ उमेदवार दुसºया क्रमांकावर होते. केडरबेस्ड आणि वणीयार समाजाची गठ्ठा मते यामुळे धर्मपुरी, चिदंबरम, अर्कोणम, कुड्डलूर या भागांत पीएमकेची बाजू भक्कम मानली जाते. मागासवर्गीयांत येणारा वणीयार समाज हा शेतीप्रधान मानला जातो.तामिळी राजकारणात सध्या पीएमकेचे प्रस्थ वाढत असून, राज्यातील एकूण ३९ जागांपैकी १५ पेक्षा जास्त जागांवर वणीयार समाजाचा मोठा प्रभाव आहे. उत्तर आणि पश्चिमी तामिळनाडूच्या पट्ट्यात पीएमके-अण्णाद्रमुक ही युती विजयाचे समीकरण यशस्वी ठरू शकते. पीएमकेने एनडीएशी हातमिळवणी केली नसती तर द्रमुकने या पट्ट्यात एकतर्फी आघाडी घेतली असती. पण त्याला आता या नव्या समीकरणामुळे खो बसणार आहे.

तामिळनाडूतील सुपरस्टार रजनीकांत यांनी आपला पक्ष निवडणुका लढवणार नाही, असे जाहीर केले आहे. मात्र ते निवडणुकीच्या तोंडावर काय भूमिका घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. त्यांनी काहीच भूमिका न घेतल्यास त्यांचे समर्थक अर्थातच नाराज होतील. पण त्यांचा पक्ष रिंगणात उतरणार नसल्याचा फायदा आपणास होईल, असे भाजपा नेते सांगू लागले आहेत. रजनीकांत यांनी भाजपाला पाठिंबा द्यावा वा समझोता करावा, यासाठी त्यांनी मनधरणी करण्याचा खूप प्रयत्न भाजपा नेत्यांनी केला होता. त्यात यश आले नाही. पण रजनीकांत नसल्याने त्यांच्या अनुयायांची मते आपणास मिळतील, असे भाजपाला वाटत आहे.दुसरीकडे आणखी एक सुपरस्टार कमल हासन यांनी मात्र निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याचे ठरवल्याचे दिसत आहे. तुमचा पक्ष भाजपाची बी टीम आहे, असा आरोप त्यांच्यावर करण्यात आला, तेव्हा ते खूपच भडकले. माझा पक्ष भाजपाची बी टीम नव्हे, तर तामिळनाडूच्या राजकारणातील ए टीम आहे, असे त्यांनी सोमवारी बोलून दाखवले.त्यामुळे ते कोणाशीच समझोता न करता निवडणुका लढवणार, असे चित्र आहे. मध्यंतरी त्यांनी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांची घेतलेली भेट आणि त्यांची भाजपाविरोधी भूमिका याचा फायदा द्रमुक-काँग्रेस आघाडीला होईल, अशी आतापर्यंतची चर्चा होती. पण त्यांचा पक्ष निवडणुकीच्या रिंगणात उतरला, तर त्याचा फायदा कोणाला होईल, याकडे सर्वांचे लक्ष आहे.विधानसभेत फटका बसू नये म्हणून पीएमके सावधकेंद्रातील मोदी सरकार व राज्यातील अण्णा द्रमुक सरकार यांच्याविरोधात तामिळी जनतेत असंतोषाचे वातावरण दिसत आहे. या वातावरणाचा अंदाज घेत अंबुमणी रामदास यांनी आपली युती ही अण्णा द्रमुकशी असून, भाजपा त्या युतीचा एक घटक पक्ष असल्याचा प्रचार सुरू केला आहे. भाजपाच्या जवळीकीचा फटका बसू नये, याची काळजी पीएमके नेते घेताना दिसत आहेत. लोकसभेला भाजपाचा फायदा जरी झाला तरी विधानसभेला याचा आपल्याला फटका बसतो, याची प्रचिती पीएमके नेत्यांना २०१६च्या विधानसभा निवडणुकीत आली होती.

टॅग्स :Tamilnaduतामिळनाडू