शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

गोरक्षकांबाबत पंतप्रधानांना उशिरा जाग आली- राहुल गांधी

By admin | Updated: June 29, 2017 23:39 IST

गोरक्षणाच्या नावाखाली लोकांची हत्या करणे मंजूर नसल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदींनी स्पष्ट केल्यानंतर आता राहुल गांधींनी मोदींच्या या वक्तव्यावर आक्षेप घेतला

ऑनलाइन लोकमतनवी दिल्ली, दि. 29 - गोरक्षणाच्या नावाखाली लोकांची हत्या करणे मंजूर नसल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदींनी स्पष्ट केल्यानंतर आता राहुल गांधींनी मोदींच्या या वक्तव्यावर आक्षेप घेतला आहे. मोदींनी गोरक्षकांना दिलेला संदेश हे उशिरा सुचलेले शहाणपण असल्याची घणाघाती टीका काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केली. झारखंडच्या गिरिडीह जिल्ह्यात बैरिया गावात बुधवारी गोरक्षकांच्या बेदम मारहाणीत एक जण जखमी झाल्याची घटना ताजी असतानाच पंतप्रधानांनी गोरक्षकांबाबत केलेल्या वक्तव्याला महत्त्व प्राप्त झालंय. उस्मान अन्सारी नामक व्यक्तीच्या घराजवळ गाय मृतावस्थेत आढळल्यानंतर जवळपास 100 जणांच्या एका टोळक्यानं घरात घुसून अन्सारी यांना मारहाण करत घर पेटवून दिलं. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी या प्रकाराचा निषेध नोंदवला आहे. साबरमती आश्रमाच्या शताब्दी महोत्सवात बोलताना मोदींनी हे वक्तव्य केलं होतं. गोरक्षणाच्या नावाखाली लोकांची हत्या करणे मंजूर नाही. हे महात्मा गांधींनाही मान्य नव्हते", असं मोदी बोलले आहेत. आपण अहिंसेची शिकवण मिळालेल्या देशात आहोत. महात्मा गांधींच्या देशात आहोत, याचा का म्हणून विसर पडतो ? अशी खंतही मोदींनी यावेळी व्यक्त केली होती. तर मोदींच्या भूमिकेला विरोधकांनीही लक्ष्य केलं आहे. नरेंद्र मोदींनी नोंदवलेला निषेध फक्त शब्दांचा खेळ आहे. त्यापेक्षा जास्त काही नाही अशी टीका एमआयएमचे असदुद्दीन ओवैसी, ममता बॅनर्जी यांनी केली होती. मोदींनी फक्त शब्दांचा खेळ केला. ते जे बोलले तसे त्यांनी करून दाखवावे. त्यांच्या बोलण्यात आणि कृतीमध्ये फरक आहे, असं म्हणत असदुद्दीन ओवैसींनी मोदींवर निशाणा साधला होता.

मोदी या मुद्द्यावर दोनदा बोलले तरीही त्याचा काही परिणाम झाला नाही. गेल्या वर्षी दादरीमध्ये घरात बीफ ठेवल्याच्या संशयावरून मोहम्मद अखलाखची जमावाने हत्या केल्यानंतर मोदी या विषयावर बोलले होते. त्यावेळीही त्याचा काहीही परिणाम दिसला नाही. गोरक्षकांना भाजपा आणि संघाचा प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष पाठिंबा मिळतो, असे ट्विट ओवैसींनी केले होते. पहलू खानची हत्या करणा-या तिघांना अजून का अटक झालेली नाही ? याचे कारण राजस्थानमध्ये भाजपाची सत्ता आहे, असे ट्विट ओवैसींनी केले. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनीही ट्विट करून गोरक्षेच्या नावाखाली झालेल्या हत्येचा निषेध नोंदवला आहे.