शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीयांनी घाम गाळून ज्या वस्तू बनवल्या, त्याच तुम्ही खरेदी करा; व्यापाऱ्यांनीही पुढाकार घ्यावा; पंतप्रधान मोदींचं आवाहन
2
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
3
IND vs ENG : "मी रोहित भाईला पाहिलं अन्..." शतकी खेळीनंतर यशस्वीनं शेअर केली ती खास गोष्ट (VIDEO)
4
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
5
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
6
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
7
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
8
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
9
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
10
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
11
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
12
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
13
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
14
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
15
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
16
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
17
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
18
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
19
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
20
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना

गोरक्षकांबाबत पंतप्रधानांना उशिरा जाग आली- राहुल गांधी

By admin | Updated: June 29, 2017 23:39 IST

गोरक्षणाच्या नावाखाली लोकांची हत्या करणे मंजूर नसल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदींनी स्पष्ट केल्यानंतर आता राहुल गांधींनी मोदींच्या या वक्तव्यावर आक्षेप घेतला

ऑनलाइन लोकमतनवी दिल्ली, दि. 29 - गोरक्षणाच्या नावाखाली लोकांची हत्या करणे मंजूर नसल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदींनी स्पष्ट केल्यानंतर आता राहुल गांधींनी मोदींच्या या वक्तव्यावर आक्षेप घेतला आहे. मोदींनी गोरक्षकांना दिलेला संदेश हे उशिरा सुचलेले शहाणपण असल्याची घणाघाती टीका काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केली. झारखंडच्या गिरिडीह जिल्ह्यात बैरिया गावात बुधवारी गोरक्षकांच्या बेदम मारहाणीत एक जण जखमी झाल्याची घटना ताजी असतानाच पंतप्रधानांनी गोरक्षकांबाबत केलेल्या वक्तव्याला महत्त्व प्राप्त झालंय. उस्मान अन्सारी नामक व्यक्तीच्या घराजवळ गाय मृतावस्थेत आढळल्यानंतर जवळपास 100 जणांच्या एका टोळक्यानं घरात घुसून अन्सारी यांना मारहाण करत घर पेटवून दिलं. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी या प्रकाराचा निषेध नोंदवला आहे. साबरमती आश्रमाच्या शताब्दी महोत्सवात बोलताना मोदींनी हे वक्तव्य केलं होतं. गोरक्षणाच्या नावाखाली लोकांची हत्या करणे मंजूर नाही. हे महात्मा गांधींनाही मान्य नव्हते", असं मोदी बोलले आहेत. आपण अहिंसेची शिकवण मिळालेल्या देशात आहोत. महात्मा गांधींच्या देशात आहोत, याचा का म्हणून विसर पडतो ? अशी खंतही मोदींनी यावेळी व्यक्त केली होती. तर मोदींच्या भूमिकेला विरोधकांनीही लक्ष्य केलं आहे. नरेंद्र मोदींनी नोंदवलेला निषेध फक्त शब्दांचा खेळ आहे. त्यापेक्षा जास्त काही नाही अशी टीका एमआयएमचे असदुद्दीन ओवैसी, ममता बॅनर्जी यांनी केली होती. मोदींनी फक्त शब्दांचा खेळ केला. ते जे बोलले तसे त्यांनी करून दाखवावे. त्यांच्या बोलण्यात आणि कृतीमध्ये फरक आहे, असं म्हणत असदुद्दीन ओवैसींनी मोदींवर निशाणा साधला होता.

मोदी या मुद्द्यावर दोनदा बोलले तरीही त्याचा काही परिणाम झाला नाही. गेल्या वर्षी दादरीमध्ये घरात बीफ ठेवल्याच्या संशयावरून मोहम्मद अखलाखची जमावाने हत्या केल्यानंतर मोदी या विषयावर बोलले होते. त्यावेळीही त्याचा काहीही परिणाम दिसला नाही. गोरक्षकांना भाजपा आणि संघाचा प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष पाठिंबा मिळतो, असे ट्विट ओवैसींनी केले होते. पहलू खानची हत्या करणा-या तिघांना अजून का अटक झालेली नाही ? याचे कारण राजस्थानमध्ये भाजपाची सत्ता आहे, असे ट्विट ओवैसींनी केले. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनीही ट्विट करून गोरक्षेच्या नावाखाली झालेल्या हत्येचा निषेध नोंदवला आहे.