शहरं
Join us  
Trending Stories
1
घाबरायची गरज नाही! ट्रम्प यांच्या H-1B व्हिसा बॉम्बनंतर उडालेल्या गोंधळात, अमेरिकन अधिकाऱ्यानंच दिली आनंदाची बातमी; म्हणाले, फक्त...
2
ट्रम्प यांचा H-1B व्हिसाबाबत निर्णय, नियम बदलावर भारताची पहिली प्रतिक्रिया; सरकार म्हणते...
3
SL vs BAN : 'काठावर पास' झालेल्या बांगलादेशचा टॉपर श्रीलंकेला दणका; पराभवाचा हिशोबही केला चुकता
4
“२३८ नवीन रेक, नववर्षांत स्वयंचलित दरवाजे असलेली लोकल, ६० टक्के प्रवासी वाढ”: अश्विनी वैष्णव 
5
GST कपातीनंतर Amul ची मोठी घोषणा! दूध, तूप, लोणी, आइसक्रीम स्वस्त; ग्राहकांना मोठा दिलासा, जाणून घ्या नवे दर
6
Asia Cup 2025 :मॅच संपल्यावर वडिलांच्या निधनाची बातमी! घरी जाऊन तो परत आला अन् देशासाठी मैदानात उतरला
7
२ लाख भारतीयांवर परिणाम, IT सेक्टर-नोकरीत फटका; ट्रम्प H-1B व्हिसा नियम बदलाने मोठे नुकसान!
8
स्मृतीनं केली विक्रमांची 'बरसात'! ४१२ धावा करून ऑस्ट्रेलियाला भरलेली धडकी; एक इंज्युरी ब्रेक अन्...
9
उद्योगांना दिलेली अवाजवी एमआरपी सवलत तात्काळ मागे घ्यावी, मुंबई ग्राहक पंचायतीची केंद्रीय मंत्र्यांकडे मागणी
10
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
11
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
12
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
13
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
14
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
15
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
16
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
17
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
18
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
19
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
20
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...

15 ऑगस्टपासून भ्रष्ट अधिका-यांविरोधात पंतप्रधान मोदींचा सर्जिकल स्ट्राईक  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2017 10:07 IST

भ्रष्टाचाराविरोधात पुकारलेल्या लढाईमध्ये आता केंद्रातील मोदी सरकारच्या रडावर भ्रष्ट सरकारी अधिकारी-कर्मचारी आहेत. मोदी सरकारचं आता मोठं सर्जिकल स्ट्राईक भ्रष्ट सरकारी कर्मचा-यांविरोधात सुरू होणार आहे.

नवी दिल्ली, दि. 1 - भ्रष्टाचाराविरोधात पुकारलेल्या लढाईमध्ये आता केंद्रातील मोदी सरकारच्या रडावर भ्रष्ट सरकारी अधिकारी-कर्मचारी आहेत. मोदी सरकारचं आता मोठं सर्जिकल स्ट्राईक भ्रष्ट सरकारी कर्मचा-यांविरोधात सुरू होणार आहे. सरकारनं यासाठी मोठी योजनादेखील आखली आहे. या योजनेच्या सुरुवातीच्या टप्प्यात सर्व डागाळलेले अधिकारी व कर्मचा-यांच्या नावांची यादी बनवण्याची तयारी सरकारकडून सुरू करण्यात आली आहे. सर्व मंत्रालयं आणि विभागांतून डागाळलेल्या अधिकारी व कर्मचा-यांच्या नावांची यादी सरकारनं मागवली आहे. यानुसार कर्मचा-यांची नावं, त्यांच्याविरोधातील आरोप, तपासाची स्थिती आणि त्यासंदर्भातील अहवाल दिले जाणार आहेत. 

यानुसार, केंद्र सरकारमधील सर्व भ्रष्ट कर्मचा-यांसंबंधी पुरावे देणारे कागदपत्रं तयार करुन याद्वारे भ्रष्ट कर्मचा-यांची सर्व माहिती उपलब्ध राहावी, असा या योजनेमागील हेतू आहे. गृहमंत्रालयाकडून 23 जुलैला सर्व मंत्रालयं व विभागांना पाठवण्यात आलेल्या पत्रात 5 ऑगस्टपर्यंत ही कागदपत्रं तयार करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.  अंतिम मुदतीचं पालन करणे आवश्यक आहे, असा सक्तीचा आदेशही या पत्रामध्ये देण्यात आला आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निर्देशानुसार  भ्रष्ट कर्मचा-यांच्या माहितीचे कागदपत्रं बनवले जात आहेत. यामध्ये भ्रष्टाचाराच्या आरोपांनंतर संबंधितांविरोधात कोणत्या प्रकारची कारवाई करण्यात आली, याचा उल्लेख करावा लागणार आहे. या प्रक्रियेत भ्रष्ट कर्मचा-यांना वाचवणा-यांचीही नावं समोर येणार आहेत.  दरम्यान, 15 ऑगस्ट रोजी पंतप्रधान मोदी सरकारी कार्यालयांतील भ्रष्टाचार दूर करण्याच्या मोहीमेसंदर्भात बातचित करण्याची शक्यता आहे. 

भ्रष्ट कर्मचा-यांनी माहिती उपलब्ध झाल्यानंतर ही माहिती सीबीआय आणि अंमलबजावणी संचलनालयाला पाठवण्यात येणार आहे. त्या आधारे संबंधित यंत्रणा स्वतंत्रपणे कारवाई करू शकतात. त्यामुळे एकाचवेळी हजारो कर्मचाऱ्यांवर कारवाई होण्याची शक्यता आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.  अलिकडेच मोदी सरकारनं खराब कामगिरी करणाऱ्या अनेक आयएएस आणि आयपीएस अधिकाऱ्यांवर बडतर्फीची कारवाई करण्यात आली होती. यानंतर आगामी काही दिवसांत  पुन्हा एकदा भ्रष्ट अधिकाऱ्यांवर सर्जिकल स्ट्राईक होण्याची शक्यता आहे. पंतप्रधान कार्यालयातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, जवळपास 110 आयएएस आणि आयपीएस अधिकारी रडारवर आहेत.