शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपामध्ये जाणार का? एकनाथ खडसे म्हणाले, “मी आजही RSSचा स्वयंसेवक आहे, गिरीश महाजन...”
2
ENG vs IND : आता अनुभवी KL राहुलसह कॅप्टन शुबमन गिलवर मोठी जबाबदारी
3
अमेरिकेच्या हल्ल्याला इराण कसे देणार प्रत्युत्तर? आताच्या घडीला खामेनी यांच्याकडे ३ पर्याय
4
अमेरिकेच्या इराणवरील हल्ल्यावर फारूक अब्दुल्लांचे विधान; म्हणाले, “आज जागे झाले नाही तर...”
5
ENG vs IND : जसप्रीत बुमराहचा 'पंजा'! या ३ चुकांमुळे लीड्स कसोटीत टीम इंडियानं गमावली मोठ्या आघाडीची संधी
6
साप्ताहिक राशीभविष्य: ५ राशींना सर्वोत्तम, पदोन्नती योग; बंपर लाभास अनुकूल काळ, शुभ तेच घडेल!
7
पावसाळ्यातही सुरू राहणार नक्षलविरोधी मोहीम; आत्मसमर्पण करा, अन्यथा...शाहांचा अल्टिमेटम
8
अमेरिकेनं इराणवर ज्या B-२ स्टिल्थ बॉम्बर्सनं हल्ला केला त्याची किंमत माहित्येय? तासाला किती खर्च येतो? जाणून थक्क व्हाल
9
Ashadhi Wari : दिवे घाटाची अवघड वाट पार करीत माउलींचा पालखी सोहळा कऱ्हेकाठी विसावला
10
CM देवेंद्र फडणवीसांना पाठवली कायदेशीर नोटीस, असीम सरोदे यांनी दिली माहिती; नेमके प्रकरण काय?
11
"...इराणला आपली अण्वस्त्रे देण्यास तयार!"; रशियाच्या माजी राष्ट्रपतींचा मोठा दावा; उद्या पुतीन यांची खास बैठक
12
अमेरिकेनं इराणवर चालवलं 'मिडनाइट हॅमर', केला ऑपरेशनच्या नावाचा खुलास; म्हणाले, ट्रम्प बोलें तो...!
13
१२५ लढाऊ विमाने, त्यात ७ बी२ बॉम्बर...! इराणला फसविले, पेंटागॉनने सांगितले अणुकेंद्रांवर कसा हल्ला चढविला...
14
ENG vs IND : कायद्यात राहून फायद्यात! जड्डू-साई सुदर्शन जोडीनं रिले कॅचसह लुटली मैफिल (VIDEO)
15
“८ वेळा निवडणुका जिंकलो, आता थांबण्याचा विचार करावासा वाटतो”; भास्कर जाधवांचे सूचक विधान
16
इराण तीन आठवड्यांत ९ अणुबॉम्ब बनवू शकला असता; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर फोर्डोचा सॅटेलाईट फोटो आला...
17
“वारीमुळे रस्ता जाम होतो, आम्ही तक्रार केली नाही”; अबू आझमींचे विधान, CM फडणवीसांचे उत्तर
18
रोहित-विराट वनडे वर्ल्ड कप खेळणं 'मुश्किल'; गांगुलीनं बोलून दाखवली मनातली गोष्ट
19
इस्रायल-इराण युद्धात आता अमेरिकेनंतर होणार रशियाची एन्ट्री? अराघची घेणार पुतिन यांची भेट, म्हणाले...
20
शिंदेंनंतर आता भाजपाने डाव टाकला; शेकडो पदाधिकारी, माजी नगरसेवकांचा ठाकरे गटाला जय महाराष्ट्र

वाकड्या नजरेने पाहणाऱ्यांना चोख प्रत्युत्तर - पंतप्रधान मोदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 25, 2022 08:13 IST

मोदी यांनी सोमवारी कारगिल येथे जाऊन लष्करी जवानांसोबत दिवाळी साजरी करून त्यांचा आनंद द्विगुणित केला.

कारगिल : भारताने नेहमीच युद्धाकडे पहिला नव्हे तर अंतिम उपाय म्हणून पाहिले आहे. मात्र देशाकडे वाकड्या नजरेने पाहणाऱ्या कोणालाही चोख प्रत्युत्तर देण्याचे सामर्थ्य आमच्या संरक्षण दलांकडे आहे. सामर्थ्य असेल तरच शांतता प्रस्थापित करता येते, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले. ते म्हणाले की, सीमा सुरक्षित असतील. अर्थव्यवस्था मजबूत असेल व समाजात आत्मविश्वासाची कमतरता नसेल तर देशाला कोणताही धोका निर्माण होणार नाही.

मोदी यांनी सोमवारी कारगिल येथे जाऊन लष्करी जवानांसोबत दिवाळी साजरी करून त्यांचा आनंद द्विगुणित केला. त्यावेळी केलेल्या भाषणात ते म्हणाले की, १९९९ साली भारतीय जवानांनी कारगिल युद्धात विजय मिळविला होता. त्यांनी दहशतवादी कारवायांचा नायनाट केला होता. त्या युद्धानंतर मी कारगिलला भेट दिली होती. पाकिस्तानबरोबरच्या सर्व युद्धांमध्ये भारतीय लष्कराने विजय मिळविला आहे. कारगिल युद्धानंतरची सर्व स्थिती मी जवळून पाहिली आहे. त्याच आठवणी मनात जागवून कारगिलमध्ये जवानांबरोबर दिवाळी साजरी करण्यासाठी पुन्हा मी या ठिकाणी आलो. (वृत्तसंस्था)

'सुरक्षेसाठी आत्मनिर्भर झाले पाहिजे'पंतप्रधान मोदी यांनी सांगितले की, आपला देश अंतर्गत व बाह्य शत्रूंचा अत्यंत कठोरपणे मुकाबला करत आहे. दहशतवाद, नक्षलवाद, घातपाती कारवायांचा समूळ नाश करण्यासाठी आम्ही योग्य पावले उचलली आहेत.देशाच्या सुरक्षेसाठी आत्मनिर्भर होणे अतिशय आवश्यक आहे. विदेशी शस्त्रे तसेच शस्त्रप्रणालीवरील अवलंबित्व खूप कमी होण्याची आवश्यकता आहे.

लष्कर अधिक बलशाली करणारगेल्या आठ वर्षांपासून आमच्या सरकारने लष्कर अधिक बलशाली होण्यासाठी अनेक उपाययोजना केल्या. नवे तंत्रज्ञान, सीमाभागात पायाभूत सुविधांचा विकास, संरक्षण दलांमध्ये महिला उमेदवारांची भरती अशा गोष्टींना प्राधान्य देण्यात आले. महिलांच्या भरतीमुळे लष्कराचे सामर्थ्य आणखी वाढणार आहे.- पंतप्रधान नरेंद्र मोदी

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीDiwaliदिवाळी 2022