शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
2
मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
3
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
4
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
5
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
6
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
7
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
8
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
9
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
10
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
11
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
12
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
13
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
14
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
15
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
16
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
17
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
18
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
19
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
20
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
Daily Top 2Weekly Top 5

वाकड्या नजरेने पाहणाऱ्यांना चोख प्रत्युत्तर - पंतप्रधान मोदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 25, 2022 08:13 IST

मोदी यांनी सोमवारी कारगिल येथे जाऊन लष्करी जवानांसोबत दिवाळी साजरी करून त्यांचा आनंद द्विगुणित केला.

कारगिल : भारताने नेहमीच युद्धाकडे पहिला नव्हे तर अंतिम उपाय म्हणून पाहिले आहे. मात्र देशाकडे वाकड्या नजरेने पाहणाऱ्या कोणालाही चोख प्रत्युत्तर देण्याचे सामर्थ्य आमच्या संरक्षण दलांकडे आहे. सामर्थ्य असेल तरच शांतता प्रस्थापित करता येते, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले. ते म्हणाले की, सीमा सुरक्षित असतील. अर्थव्यवस्था मजबूत असेल व समाजात आत्मविश्वासाची कमतरता नसेल तर देशाला कोणताही धोका निर्माण होणार नाही.

मोदी यांनी सोमवारी कारगिल येथे जाऊन लष्करी जवानांसोबत दिवाळी साजरी करून त्यांचा आनंद द्विगुणित केला. त्यावेळी केलेल्या भाषणात ते म्हणाले की, १९९९ साली भारतीय जवानांनी कारगिल युद्धात विजय मिळविला होता. त्यांनी दहशतवादी कारवायांचा नायनाट केला होता. त्या युद्धानंतर मी कारगिलला भेट दिली होती. पाकिस्तानबरोबरच्या सर्व युद्धांमध्ये भारतीय लष्कराने विजय मिळविला आहे. कारगिल युद्धानंतरची सर्व स्थिती मी जवळून पाहिली आहे. त्याच आठवणी मनात जागवून कारगिलमध्ये जवानांबरोबर दिवाळी साजरी करण्यासाठी पुन्हा मी या ठिकाणी आलो. (वृत्तसंस्था)

'सुरक्षेसाठी आत्मनिर्भर झाले पाहिजे'पंतप्रधान मोदी यांनी सांगितले की, आपला देश अंतर्गत व बाह्य शत्रूंचा अत्यंत कठोरपणे मुकाबला करत आहे. दहशतवाद, नक्षलवाद, घातपाती कारवायांचा समूळ नाश करण्यासाठी आम्ही योग्य पावले उचलली आहेत.देशाच्या सुरक्षेसाठी आत्मनिर्भर होणे अतिशय आवश्यक आहे. विदेशी शस्त्रे तसेच शस्त्रप्रणालीवरील अवलंबित्व खूप कमी होण्याची आवश्यकता आहे.

लष्कर अधिक बलशाली करणारगेल्या आठ वर्षांपासून आमच्या सरकारने लष्कर अधिक बलशाली होण्यासाठी अनेक उपाययोजना केल्या. नवे तंत्रज्ञान, सीमाभागात पायाभूत सुविधांचा विकास, संरक्षण दलांमध्ये महिला उमेदवारांची भरती अशा गोष्टींना प्राधान्य देण्यात आले. महिलांच्या भरतीमुळे लष्कराचे सामर्थ्य आणखी वाढणार आहे.- पंतप्रधान नरेंद्र मोदी

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीDiwaliदिवाळी 2022