शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईतील धक्कादायक प्रकार! चालत्या लोकलमधून मुलीला खाली फेकलं; Video व्हायरल, आरोपीला पकडलं
2
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
3
कोट्यधीश होण्याचे स्वप्न आता होणार पूर्ण! २१X१०X१२ हा फॉर्म्युला वापरा; ५१ व्या वर्षी व्हाल मालामाल
4
पैसा दुप्पट करणारी सरकारी स्कीम; विना जोखीम 'इतक्या' महिन्यांत तुमचे पैसे होतील दुप्पट
5
केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू अजमेर दर्ग्यावर चादर चढवणार; म्हणाले, "दुआ करने जा रहा हूं..."
6
मित्रपक्षांना चर्चेत गुंतवत स्वबळाचाच डाव टाकण्याची भाजपाची खेळी?; इच्छुकही करतायेत 'डबल गेम'
7
भाडं वाढणार; १००, २००, ५०० कोटी नाही तर, 'इतक्या' कोटींचा होणार रेल्वेला बंपर फायदा, जाणून घ्या
8
एस एस राजामौलींच्या 'वाराणसी'चं बजेट १३०० कोटी? प्रियंका चोप्रा म्हणाली, "अर्धे पैसे माझ्या..."
9
शरीफ उस्मान हादी यांचा मारेकरी देश सोडून पळाला? बांगलादेश पोलिसांनी सत्य परिस्थिती केली स्पष्ट
10
Stock Markets Today: शेअर बाजारात जोरदार तेजी, सेन्सेक्स ३४० अकांनी तर निफ्टी ११५ अंकांनी वधारला; IT Stocks सुस्साट
11
देशभक्तीला बॉक्स ऑफिसवरील यशाचा फॉर्म्युला समजणं हा अपमान..., विकी कौशलची स्पष्ट प्रतिक्रिया
12
भाजपाच्या नजरेने RSS कडे पाहणे चुकीचे; सरसंघचालक मोहन भागवत यांनी असं विधान का केले?
13
Post Office मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८९,९९० चं फिक्स व्याज, पैसेही सुरक्षित आणि मिळणार सरकारची गॅरेंटी
14
काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला
15
'धुरंधर'च्या 'शरारत' गाण्यातून तमन्ना भाटियाला दिग्दर्शकाने दाखवला बाहेरचा रस्ता, म्हणाला- "मला सिनेमात आयटम साँग..."
16
'बांगलादेशातील अराजकतेला युनूस जबाबदार, भारतासोबतचे संबंधही बिघडवले'; शेख हसीना यांचा जोरदार हल्लाबोल
17
नांदेडमधील लोह्यात एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव, ‘घराणेशाही संपवू’ म्हणणाऱ्या भाजपचा धुव्वा
18
आणखी एक मुस्कान! मेरठच्या 'सौरभ' हत्याकांडासारखा प्लॅन बनवला; पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीचे केले तुकडे
19
वंचित बहुजन आघाडी दुर्लक्षित राहिली, पण एक नगराध्यक्ष पदासह या ठिकाणांवर मारलीय बाजी
20
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
Daily Top 2Weekly Top 5

वाकड्या नजरेने पाहणाऱ्यांना चोख प्रत्युत्तर - पंतप्रधान मोदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 25, 2022 08:13 IST

मोदी यांनी सोमवारी कारगिल येथे जाऊन लष्करी जवानांसोबत दिवाळी साजरी करून त्यांचा आनंद द्विगुणित केला.

कारगिल : भारताने नेहमीच युद्धाकडे पहिला नव्हे तर अंतिम उपाय म्हणून पाहिले आहे. मात्र देशाकडे वाकड्या नजरेने पाहणाऱ्या कोणालाही चोख प्रत्युत्तर देण्याचे सामर्थ्य आमच्या संरक्षण दलांकडे आहे. सामर्थ्य असेल तरच शांतता प्रस्थापित करता येते, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले. ते म्हणाले की, सीमा सुरक्षित असतील. अर्थव्यवस्था मजबूत असेल व समाजात आत्मविश्वासाची कमतरता नसेल तर देशाला कोणताही धोका निर्माण होणार नाही.

मोदी यांनी सोमवारी कारगिल येथे जाऊन लष्करी जवानांसोबत दिवाळी साजरी करून त्यांचा आनंद द्विगुणित केला. त्यावेळी केलेल्या भाषणात ते म्हणाले की, १९९९ साली भारतीय जवानांनी कारगिल युद्धात विजय मिळविला होता. त्यांनी दहशतवादी कारवायांचा नायनाट केला होता. त्या युद्धानंतर मी कारगिलला भेट दिली होती. पाकिस्तानबरोबरच्या सर्व युद्धांमध्ये भारतीय लष्कराने विजय मिळविला आहे. कारगिल युद्धानंतरची सर्व स्थिती मी जवळून पाहिली आहे. त्याच आठवणी मनात जागवून कारगिलमध्ये जवानांबरोबर दिवाळी साजरी करण्यासाठी पुन्हा मी या ठिकाणी आलो. (वृत्तसंस्था)

'सुरक्षेसाठी आत्मनिर्भर झाले पाहिजे'पंतप्रधान मोदी यांनी सांगितले की, आपला देश अंतर्गत व बाह्य शत्रूंचा अत्यंत कठोरपणे मुकाबला करत आहे. दहशतवाद, नक्षलवाद, घातपाती कारवायांचा समूळ नाश करण्यासाठी आम्ही योग्य पावले उचलली आहेत.देशाच्या सुरक्षेसाठी आत्मनिर्भर होणे अतिशय आवश्यक आहे. विदेशी शस्त्रे तसेच शस्त्रप्रणालीवरील अवलंबित्व खूप कमी होण्याची आवश्यकता आहे.

लष्कर अधिक बलशाली करणारगेल्या आठ वर्षांपासून आमच्या सरकारने लष्कर अधिक बलशाली होण्यासाठी अनेक उपाययोजना केल्या. नवे तंत्रज्ञान, सीमाभागात पायाभूत सुविधांचा विकास, संरक्षण दलांमध्ये महिला उमेदवारांची भरती अशा गोष्टींना प्राधान्य देण्यात आले. महिलांच्या भरतीमुळे लष्कराचे सामर्थ्य आणखी वाढणार आहे.- पंतप्रधान नरेंद्र मोदी

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीDiwaliदिवाळी 2022