शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
यावेळी तीन तुकडेच करा! पीएम मोदींनी काल पाच उच्चस्तरीय बैठका घेतल्या
3
आजचे राशीभविष्य, १ मे २०२५: व्यापारात फायदा अन् नोकरीत बढतीची शक्यता
4
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
5
वाहत्या पाण्याला जेव्हा भाले फुटतात...
6
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
7
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
8
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
9
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
10
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
11
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
12
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
13
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
14
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
15
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
16
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
17
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
18
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
19
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
20
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला

कृपया ध्यान दे, मतदान जरुरी है

By admin | Updated: September 26, 2014 01:59 IST

निवडणूक आयोगाचे अधिकारी आणि पश्चिम तसेच मध्य रेल्वे प्रशासन यांच्यात गुरुवारी बैठक झाली

मुंबई : लोकसभा निवडणुकीत प्रत्येकाने मतदान करण्याची महत्त्वाची भूमिका बजावावी, असे आवाहन करणाऱ्या उद्घोषणा रेल्वे स्थानकांमधून झाल्यानंतर आता अशाच प्रकारे आवाहन यंदाच्या विधानसभा निवडणुकीच्या काळातही स्थानकांवर होणार आहेत. या आणि अनेक विषयांसदर्भात निवडणूक आयोगाचे अधिकारी आणि पश्चिम तसेच मध्य रेल्वे प्रशासन यांच्यात गुरुवारी बैठक झाली. त्या वेळी उद्घोषणेद्वारे मतदान करण्याचे आवाहन, निवडणुकीत रेल्वे कर्मचाऱ्यांचा आणि रेल्वे पोलिसांचा सहभाग यावर चर्चा करण्यात आली. लोकसभा असो वा विधानसभा प्रत्येक निवडणुकीत मतदान कमी होते. त्यामुळे जास्तीत जास्त मतदान व्हावे या उद्देशाने निवडणूक आयोगाकडून अनेक योजना केल्या जात आहेत. होर्डिंग्ज, बॅनर्स तसेच टीव्हीवरील जाहिरातीतून वेगवेगळ्या प्रकारे आवाहन करताना त्यातून मतदानाचे महत्त्व पटवून दिले जाते. त्याच प्रकारे सोशल नेटवर्किंगचाही यात मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. महत्त्वाची बाब म्हणजे मतदानाचे महत्त्व जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी रेल्वे स्थानकांचाही वापर केला जात आहे. मुंबई शहर आणि उपनगरातून धावणाऱ्या रेल्वेमधून जवळपास ७५ लाख प्रवासी प्रवास करतात. लोकसभा निवडणुकीत प्रत्येक स्थानकावर उद्घोषणेद्वारे आवाहन करण्यात आले होते. हाच फॉर्म्युला यंदाच्या विधानसभा निवडणुकीतही वापरण्याचा निर्णय निवडणूक आयोगाने घेतला आहे. गुरुवारी निवडणूक आयोगाचे अधिकारी आणि रेल्वे प्रशासन यांच्यात झालेल्या बैठकीत प्रत्येक स्थानकावर उद्घोषणेद्वारे मतदान करण्याचे आवाहन प्रवाशांना करण्यावर विचार करण्यात आला.अशा प्रकारच्या उद्घोषणा स्थानकांवर केल्या जाणार आहेत. मात्र त्याची तारीख अद्याप निश्चित नसून त्यावर नंतर निर्णय होणार असल्याचे पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी शरत चंद्रायन यांनी सांगितले. तर यावर चर्चा झाली असून मतदान करण्याची एक ध्वनिफीत रेल्वेला दिली जाईल आणि त्यानंतर त्याची सुरुवात केली जाईल, असे मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी नरेंद्र पाटील म्हणाले. (प्रतिनिधी)