शहरं
Join us  
Trending Stories
1
Supreme Court: मुंबईविषयी तुम्हाला काही तरी वाटू द्या, अन्यथा तिथे सर्वत्र अतिक्रमण होईल- सर्वोच्च न्यायालय
2
आजचे राशीभविष्य - १८ जून २०२५, खूप मोठा आर्थिक लाभ होईल, सामाजिक स्तरावर यश आणि कीर्ती वाढेल
3
ठाणे, रायगडमधील अनेक पूल बनले धोकादायक!
4
आजचा अग्रलेख: तेलाचा भडका निश्चित!
5
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
6
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
7
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
8
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
9
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
10
विशेष लेख: नायजेरियात पाण्यावरून वाद: १०,००० ठार!
11
लेख: शहरे 'एक्स्प्रेस' धावत सुटली, गावखेड्यांनी काय करायचे?
12
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
13
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
14
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
15
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
16
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
17
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
18
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
19
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
20
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना कर्जमाफ करा - चव्हाण

By admin | Updated: May 6, 2016 02:21 IST

दुष्काळाच्या वणव्याने होरपळत असलेल्या महाराष्ट्रासह दहा राज्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांचे कर्ज माफ करून त्यांना मोफत बियाणे आणि खतांचा पुरवठा करावा, अशी आग्रही मागणी

नवी दिल्ली : दुष्काळाच्या वणव्याने होरपळत असलेल्या महाराष्ट्रासह दहा राज्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांचे कर्ज माफ करून त्यांना मोफत बियाणे आणि खतांचा पुरवठा करावा, अशी आग्रही मागणी करीत विरोधकांनी लोकसभेत दुष्काळग्रस्तांच्या व्यथेला वाचा फोडली.दुष्काळ आणि पाणीटंचाईमुळे उद्भवलेली गंभीर स्थिती, या ज्वलंत मुद्यांवरील लोकसभेतील चर्चेत सहभागी होत खासदार अशोक चव्हाण म्हणाले की, केंद्र सरकारने वेळीच पावले उचलली असती तर, आज ही स्थिती उद्भवली नसती. नजीकच्या दिवसांत आणि महिन्यात पावसाने मेहरबानी केली नाही तर, १९७२ सारखी भीषण स्थिती निर्माण होऊ शकते. या संकटातून दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना बाहेर काढण्यासाठी कर्जाची फेररचना करुन काहीही साध्य होणार नाही. सलग तीन वर्षापासून दुष्काळाच्या झळा शेतकरी सोसत आहे. तेव्हा केंद्राने तात्काळ शेतकऱ्यांचे कर्ज माफी करण्याची गरज आहे. त्यासोबतच मोफत बियाणे आणि खतांचा पुरवठा करावा किंवा कमी दरात बियाणे आणि खते पुरवावीत.खरीप आणि रब्बी हंगामात शेतकऱ्यांचे २० हजार कोटींचे नुकसान झाले. त्याची पुरेशी भरपाई केली पाहिजे. दुष्काळावर केंद्राने श्वेतपत्रिका आणि सर्वंकष निवेदन जारी करावे, अशी मागणीही त्यांनी केली. महाराष्ट्रात ३ हजार लोकांनी आत्महत्या केल्या आहेत, याकडेही अशोक चव्हाण यांनी सभागृहाचे लक्ष वेधले. या चर्चेप्रसंगी गृह आणि वित्त मंत्र्यांनी सभागृहात उपस्थित राहणे जरुरी होते. केंद्र सरकारने दुष्काळग्रस्त भागातील शेतकऱ्यांच्या मुलांचे शैक्षणिक शुल्क माफ केले पाहिजे. आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना १ लाख रुपयांची आर्थिक मदत केली जाते. ही रक्कम पाच लाख करण्यात यावी. तसेच त्यांना पेन्शनही दिले पाहिजे अशी मागणी करत उसामुळे महाराष्ट्रात पाणी टंचाई निर्माण झाल्याचा दावाही चव्हाण यांनी फेटाळून लावला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी उत्तर प्रदेश, महाराष्ट्र व कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना दुष्काळ व पाणी टंचाईमुळे निर्माण झालेल्या स्थितीवरील चर्चेसाठी निमंत्रित केले. मुख्यमंत्री फडणवीस, अखिलेश यादव व सिद्धरामैय्या यांना पंतप्रधानांनी स्वतंत्रपणे चर्चेसाठी बोलावल्याचे सूत्रांनी सांगितले.