शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांचा हट्टीपणा, अतिरिक्त २५ टक्के टॅरिफ लागू; भारत 'चौफेर' पलटवार करणार?
2
'मी ते केले तर चीन उद्ध्वस्त होईल'; ड्रॅगनची भारताशी जवळीक वाढल्याने डोनाल्ड ट्रम्प यांची धमकी
3
Saurabh Bharadwaj: आप नेते सौरभ भारद्वाज यांच्या घरासह १३ ठिकाणी ईडीचे छापे, नेमकं प्रकरण काय?
4
सरकार उलथून टाकायला 'सलाईन वीर' जरांगेंकडे किती आमदार? लक्ष्मण हाकेंचा खोचक सवाल
5
Vikram Solar IPO: विक्रम सोलर शेअर बाजारात करणार धमाकेदार एंट्री! प्रीमियमसह लिस्टिंग होण्याची शक्यता; ग्रे मार्केटमध्ये काय स्थिती?
6
४ मुलांची आई बॉयफ्रेंडसोबत पळाली, सासरच्यांनी शोधून घरी आणलं; त्यानंतर असं काय घडलं, पतीने FB Live केले, मग...
7
Ganesh Chaturthi 2025:अपरिहार्य कारणाने गणपती आणता आला नाही, तर शास्त्रात काय असतो पर्याय?
8
सपा आमदाराच्या कारला अपघात, अचानक गाडीचे स्टेअरिंग तुटले अन्...
9
शेअर बाजाराचा धोका नको, पण परतावा बंपर हवा? मग 'या' ५ योजना आहेत बेस्ट, कमी जोखीमीत दुप्पट पैसे
10
"तिला घेऊ नको, ती काळी आहे...", मराठी अभिनेत्रीला करावा लागलेला वर्णभेदाचा सामना
11
गणपती २०२५: ६ मूलांकांना ८ राजयोग शुभ, दुपटीने चौफेर लाभ; धनलक्ष्मी-गणेश कृपेचा वरदहस्त!
12
पुराचा इशारा देत भारताची माणुसकी; मात्र, पाकिस्तानने काढली नवी कुरापत
13
८ शुभ योगात गणपती २०२५: ८ राशींना अष्टविनायक वरदान, समृद्धी-ऐश्वर्य; वैभव-सुबत्ता, मंगल-कल्याण!
14
सनातन धर्म आणि संस्कृतीच्या रक्षणासाठी शीख गुरूंनी बलिदान दिलं -CM योगी आदित्यनाथ 
15
अमेरिकेच्या टॅरिफचा फटका! सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी कोसळला, 'या' क्षेत्राला सर्वाधिक धक्का
16
२ दिवसांत निर्णय घ्या, अन्यथा मुंबईत धडकू, मनोज जरांगे यांचा इशारा; आरक्षण घेतल्याशिवाय आता माघार नाही, काठी उगारली तर सरकारच उलथवून टाकणार
17
Ganesh Chaturthi 2025: वडीलांच्या मृत्यूनंतर त्यांच्या मोठ्या मुलानेच गणपती आणायचा? पंचांगकर्ते सोमण सांगतात... 
18
लग्नानंतरही विवाहितेला भेटायला गेला बॉयफ्रेंड; सासरच्यांनी पकडल्यावर मुलीच्या बापाने दोघांनाही हात बांधून...,
19
बँकिंग-फायनान्स क्षेत्रात बंपर भरती! मिळणार तब्बल २.५० लाख नोकऱ्या, छोटी शहरे केंद्रस्थानी
20
‘सरकारने मागणीला गांभीर्याने घ्यावे, घराघरांतून मराठा समाज मुंबईला येणार’, मनोज जरांगे यांचा इशारा

तुरुंगांमधील कैदयांची गर्दी घटविण्याची योजना राबवा

By admin | Updated: October 4, 2016 03:42 IST

देशातील बहुसंख्य राज्यांच्या तुरुंगांमध्ये क्षमतेहून कितीतरी अधिक कैदी कोंबल्यामुळे निर्माण झालेल्या

नवी दिल्ली: देशातील बहुसंख्य राज्यांच्या तुरुंगांमध्ये क्षमतेहून कितीतरी अधिक कैदी कोंबल्यामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीवर सर्वोच्च न्यायालयाने गंभीर चिंता व्यक्त केली असून, सर्व राज्यांनी तुरुंगांमधील ही वारेमाप गर्दी कमी करण्याची कृती योजना येत्या ३१ मार्चपूर्वी तयार करावी, असा आदेश सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी दिला.या आधी असाच आदेश ६ मे रोजी देऊनही एकाही राज्य सरकारने त्या अनुषंगाने काहीही पावले उचललेली नाहीत, यावर तीव्र नाराजी व्यक्त करत, न्या. मदन बी. लोकूर आणि न्या. आर. के. अगरवाल यांच्या खंडपीठाने हा आदेश पुन्हा दिला.या आधी मेमध्ये झालेल्या सुनावणीत देशातील ११ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमधील एकूण १४९ तुरुंगांमध्ये क्षमतेहून दीडपट जास्त कैदी कोंबलेले आहेत, अशी माहिती राज्यांकडून मिळालेल्या आकडेवारीच्या आधारे अ‍ॅमायकस क्युरीने न्यायालयास दिली होती. त्यात महाराष्ट्रातील १६ कारागृहांचा समावेश होता. तुरुंगांमधील प्रमाणाबाहेर गर्दीच्या प्रश्नाकडे एककल्ली पद्धतीने पाहून चालणार नाही. हा विषय गंभीर असून, त्यामुळे सुरक्षेखेरीज आरोग्य, स्वच्छता व तुरुंग व्यवस्थापनाच्याही समस्या निर्माण होऊ शकतात, याकडे लक्ष वेधूनही राज्यांनी गेल्या सहा महिन्यांत काहीही न केल्याने, परिस्थिती सुधारण्याऐवजी ती अधिक शोचनीय बनली आहे, याबद्दल खंडपीठाने खेद व्यक्त केला.