शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaijapur Crime: वैजापुरात महिला कीर्तनकाराची आश्रमातच दगडाने ठेचून हत्या, छ. संभाजीनगरात खळबळ!
2
"हे मराठीचं प्रेम नाही, तर महापालिका निवडणुका..."; देवेंद्र फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर निशाणा
3
कोण आहे शेफालीचा पती? ५ वर्षांतच मोडलेला पहिला संसार, मग पराग त्यागीच्या प्रेमात पडली अन्...
4
'ही' महारत्न कंपनी देणार ३००% चा डिविडेंड; ५ वर्षांत शेअरमध्ये ११८४ टक्क्यांची तेजी, तुमच्याकडे आहे का?
5
"माझा मुलगा सरन्यायाधीश होईल, पण ते पाहायला मी नसेल"; वडिलांची आठवण येताच भावुक झाले CJI गवई
6
Local Train Mega Block: रविवारी मुंबईत फिरण्याचा प्लॅन; मग मेगाब्लॉक अपडेट जाणून घ्या
7
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
8
...तरी विभक्त पत्नीला देखभाल खर्च द्यावाच लागेल; मुंबई उच्च न्यायालयाने दिला महत्त्वाचा निकाल
9
Shefali Jariwala Death: शेफाली जरीवालाचा मृत्यू नेमका कशामुळे झाला? मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीमुळे संशय वाढला
10
Bigg Boss मधील आतापर्यंत तिसऱ्या स्पर्धकाचा अचानक मृत्यू; प्रत्येक घटनेमागे कारण एकच...
11
एखाद्याला खूश करण्यासाठी मुलांचे भविष्य खराब करू नका, हिंदी सक्तीवरून सुप्रिया सुळे भडकल्या!
12
Panvel Crime News: धक्कादायक! नऊ महिने पोटात वाढवलेल्या बाळाला जन्मताच रस्त्यावर फेकलं, पनवेल येथील घटना
13
मुले पुढे जातात, मुलींना लग्न करणेही होते कठीण; लिव्ह-इन रिलेशनशिपबद्दल न्यायालयाकडून गंभीर चिंता
14
‘तशा’ किती विकासकांना अटक केली? कल्याण-डोंबिवली पालिकेला मुंबई उच्च न्यायालयाचा सवाल
15
"मी हात जोडले, पाय धरले, पण त्या नराधमाने…’’, कोलकाता बलात्कार प्रकरणातील पीडितेचा धक्कादायक जबाब   
16
"मला फक्त ५ मिनिटे आधी कळालं..."; अमेरिकेचे उपराष्ट्रपती जेडी वेंसच्या पत्नी उषा यांचा खुलासा
17
मुंबई: अस्मी चव्हाणने ३० व्या मजल्यावरून उडी मारून का केली आत्महत्या? पोलिसांच्या तपासातून समोर आली माहिती
18
बांगलादेशींना नोकरी देणाऱ्यांवर होणार कारवाई; राज्य सरकारच्या आदेशात काय?
19
"तरुण दिसण्यासाठी ती गेली ५ वर्ष.."; शेफाली जरीवालाच्या मृत्यूनंतर डॉक्टरांनी केला मोठा खुलासा
20
खराब हवामानामुळे पिकाचे होणारे नुकसान टाळता येणार, नव्या टेक्नोलॉजीचा शेतकऱ्यांना फायदाच!

पिंपळगाव टोलनाका पुन्हा चर्चेत सोमवारपासून टोलवाढ : आंदोलनाचा इशारा

By admin | Updated: May 8, 2014 22:06 IST

नाशिक : गेल्या वर्षभरात दोन वेळा चर्चेचा ठरलेला राष्ट्रीय महामार्गावरील पिंपळगाव बसवंत येथील टोलनाका पुन्हा एकदा टोल दरवाढीने वादात सापडला असून, लोकसभेची रणधुमाळी संपताच टोल वसूल कंपनीने सोमवारपासून चौपटीने वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. महामार्गावर अद्यापही कामे अपूर्ण असताना आकारल्या जाणार्‍या टोलला विरोध करण्याचा इशारा आमदार अनिल कदम यांनी दिला आहे.

नाशिक : गेल्या वर्षभरात दोन वेळा चर्चेचा ठरलेला राष्ट्रीय महामार्गावरील पिंपळगाव बसवंत येथील टोलनाका पुन्हा एकदा टोल दरवाढीने वादात सापडला असून, लोकसभेची रणधुमाळी संपताच टोल वसूल कंपनीने सोमवारपासून चौपटीने वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. महामार्गावर अद्यापही कामे अपूर्ण असताना आकारल्या जाणार्‍या टोलला विरोध करण्याचा इशारा आमदार अनिल कदम यांनी दिला आहे.
निफाडचे आमदार अनिल कदम यांच्याशी झालेल्या वादानंतर पिंपळगाव बसवंत येथील टोलनाका राज्यात चर्चेत आला होता. त्यानंतर मार्च महिन्यात लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होताच टोल वसूल करणार्‍या पी.एन.जी. या कंपनीने टोलदरात वाढ करण्यासाठी वर्तमानपत्रांतून जाहिरात दिली होती. टोलवाढीमुळे निवडणुकीवर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त करतानाच, स्थानिक आमदार व जनतेने टोलवाढीविरुद्ध उठाव केला असता जिल्हाधिकार्‍यांनी मध्यस्थी करून स्थगिती देण्यात आली होती. आता पुन्हा कंपनीने सोमवारपासून टोलदरात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. यापूर्वी वाहनांवर आकारण्यात येणार्‍या टोलच्या चौपट हा दर असून, त्यामुळे वाहनधारकांचे कंबरडेच मोडणार आहे. लहान वाहनांसाठी १४० रुपये, हलके व व्यावसायिक वाहनांसाठी २२० रुपये, बस व ट्रकसाठी ४४५ व अवजड वाहनांसाठी ६७५ रुपये एकेरी टोल आकारण्यात येणार आहे.
चौकट===
उड्डाणपुलामुळे टोलवाढ
ओझर-पिंपळगाव बसवंत येथील कामे अपूर्ण असली तरी, गेल्या वर्षी जूनमध्ये खुला करण्यात आलेला नाशिकमधील सर्वात लांबीच्या उड्डाणपुलामुळे पिंपळगाव बसवंत येथील टोलमध्ये वाढ करण्यात आली आहे. शासनाने तसा करारच केला असल्यामुळे टोल वसुलीशिवाय पर्यायच नाही. सध्या वाढविला जाणारा टोल हा फक्त कंपनीने जितके काम केले त्यावरच आकारला आहे.
- खोडस्कर, कार्यकारी अभियंता, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण
चौकट====
...तर जनआंदोलन
पी.एन.जी. टोलवे कंपनीने अनेक कायद्यांचा भंग केला असल्यामुळे पंतप्रधान कार्यालयाकडून या कंपनीची चौकशी सुरू आहे. अनेक ठिकाणची कामे कंपनीने पूर्ण केलेली नाहीत. ओझर व पिंपळगाव येथे उड्डाणपुलाचा प्रस्ताव असून, त्याची पूर्तता कंपनी करीत नाही. जोपर्यंत या ठिकाणी उड्डाणपूल होत नाही तोपर्यंत टोल आकारणी करू नये असे ठरले आहे. लोकभावना व लोकप्रतिनिधींच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करून जर टोल आकारणी होणार असेल तर जनआंदोलन करण्यात येईल व त्यामुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास कंपनीच जबाबदार राहील.
- अनिल कदम, आमदार