शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

आसामचा पूर आणि अहवालात फोटो बांगलादेशचा

By admin | Updated: August 1, 2016 06:34 IST

आसाममधील भयंकर पुरानंतर परिस्थितीची पाहणी करण्यासाठी केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह हे आसामच्या दौऱ्यावर गेले होते.

गुवाहाटी : सरकारी यंत्रणा कधी काय करील याचा नेम नाही. आता हेच पाहा ना, आसाममधील भयंकर पुरानंतर परिस्थितीची पाहणी करण्यासाठी केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह हे आसामच्या दौऱ्यावर गेले होते. मुख्यमंत्री सर्वानंद सोनोवाल यांनी या पुराचा अहवाल दिला आणि पुराची भीषणता दर्शविणारी काही छायाचित्रेही सोबत जोडली. त्यातीलच हे एक छायाचित्र. या तरुणाच्या डोळ्यापर्यंत पाणी पोहोचले आहे; पण हरिणाचा जीव वाचविण्यास हा आटापिटा चालला आहे. पण खरी गोम तर इथेच आहे. कारण, हे छायाचित्र आसामचे नसून बांगलादेशातील २०१४ च्या नोखालीतील पुराचे आहे. (वृत्तसंस्था)बांगलादेशातील पुराचे हे चित्र वन्यजीव छायाचित्रकार हसीबूल वहाब यांनी टिपलेले आहे. अगदी जगभरातून या छायाचित्राला खूप प्रतिक्रिया मिळाल्या. अर्थात, ही मोठी चूक असल्याचे येथील अधिकाऱ्यांनी मान्य केले आहे; पण काझीरंगा राष्ट्रीय उद्यानातही अशीच परिस्थिती होती. त्यामुळे ही गडबड झाली, असे या अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. दरम्यान, या प्रकरणात जबाबदार असणाऱ्या अधिकाऱ्याला निलंबित करण्यात आले आहे.>पुराचा २७.५० लाख लोकांना फटकाबिहारमधील पुराचा फटका २७.५० लाख लोकांना बसला असून, राज्याच्या १२ जिल्ह्यांत अजूनही पूरस्थिती गंभीरच आहे. उत्तर प्रदेशात अनेक नद्या धोक्याच्या पातळीवरून वाहत आहेत. बिहारमध्ये पुराने २६ जणांचा बळी घेतला.१२ जिल्ह्यांत नद्या धोक्याच्या पातळीवरून वाहत आहेत. २०० लाख हेक्टरवर २७.५० लाख लोकांना या पुराचा फटका बसला, असे आपत्ती व्यवस्थापन विभागाने निवेदनात सांगितले. वैद्यकीय मदतीची शिबिरेआसाम, बिहारसह देशाच्या पूरग्रस्त भागांतून दहा हजारांपेक्षा जास्त लोकांना वाचविण्यात आले, असे राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाने (एनडीआरएफ) रविवारी सांगितले. आसाम आणि बिहारमध्ये एनडीआरएफने वैद्यकीय शिबिरेही सुरू केली आहेत. >लखनौमध्ये पूरस्थितीउत्तर प्रदेशात सततधार पावसामुळे गंगेसह अनेक नद्या धोक्याच्या पातळीवरून वाहत असल्यामुळे अनेक खेड्यांत पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. केंद्रीय जल आयोगाने शारदा नदीचे पाणी सतत वाढत असून पालिया येथे ती धोक्याच्या पातळीवरून वाहात आहे, असे सांगितले. अयोध्येतील तुरतीपर आणि एल्जिन ब्रिज येथे घागरा नदी सतत धोक्याच्या पातळीवरून वाहत आहे. रापती नदी बलरामपूर, बन्सी, रिगाऊली, बिर्द घाट (गोरखपूर) येथे धोक्याच्या पातळीवरून वाहत आहे. गंगा नदीचे पाणी फतेहगढ, कनौज आणि कानपूर धोक्याच्या पातळीजवळ आले आहे.