शहरं
Join us  
Trending Stories
1
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
2
विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी । विठ्ठल तोंडीं उच्चारा ॥ पुण्यात मुठातीरी विसावला ज्ञानाेबा-तुकाेबांचा साेहळा
3
ENG vs IND : आधी संयम दाखवला! मग यशस्वीनं आपल्या तोऱ्यात साजरी केली विक्रमी सेंच्युरी
4
राजाला गोळीने उडवणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहाला दिलेले ५ लाख! कुठे फसला प्लॅन?
5
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
6
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना
7
बेपत्ता महिला स्वयंपाकी अन् तिच्या नातीचा विमान अपघातात मृत्यू; DNA चाचणीतून खुलासा
8
'शुभ आरंभ'...जिथं धावांसाठी संघर्ष केला तिथं पहिल्यांदा कॅप्टन्सी करताना ठोकली पहिली फिफ्टी
9
धनुष्यबाणासोबत स्वप्नांच्या दिशेने; जालन्याच्या तेजल साळवेचा आशिया कपमध्ये सुवर्णवेध!
10
नारिंग्रेत रिक्षा-एसटी अपघातात; आचरा येथील चार रिक्षा व्यावसायिकांचा जागीच मृत्यू
11
"डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केला आणि मला अमेरिकेत येण्याचे आमंत्रण दिले, मी नम्रपणे नाकारले"; पंतप्रधान मोदींनी सांगितलं कारण
12
"मरू तर एकत्रच"; वहिनीचा दीरावर जडला जीव, सासरच्यांनी फटकारताच दोघांनी खाल्लं विष
13
सोलर कंपनीच्या शेअर्समध्ये तुफानी तेजी, करतोय मालामाल; FTSE ग्लोबल इंडेक्समध्ये होऊ शकते कंपनीची एन्ट्री!
14
Operation Sindhu : इराणमध्ये अडकलेले १००० विद्यार्थी मायदेशी परतणार! भारतासाठी खुला केला हवाई मार्ग
15
माता न तू वैरिणी! बॉयफ्रेंडसोबत पळून जाण्यासाठी जन्मदात्या आईनेच २ मुलांना विष देऊन मारलं
16
जैस्वालचा आणखी एक 'यशस्वी' डाव! इंग्लंडमध्ये पहिल्याच टेस्टमध्ये भात्यातून आली बेस्ट खेळी
17
इराणच्या मदतीला चीन धावला; युद्ध साहित्य घेऊन ड्रॅगनची तीन विमाने तेहरानमध्ये दाखल...
18
कोयनेत साडेचार टीएमसी पाणीसाठा वाढला; धरणातून विसर्ग सुरू 
19
संतापजनक...! ब्रा नसेल तर परीक्षेला बसता येणार नाही, स्पर्शकरून होतेय तपासणी; विद्यापीठाचं अजब फर्मान, VIDEO व्हायरल 
20
फक्त ९९ पैशात जमीन! आधी TCS ला २१ एकरचा भूखंड, आता सरकारचा 'या' कंपनीसोबत करार

बँकांची सर्वोच्च न्यायालयात याचिका, मात्र विजय मल्ल्या अगोदरच देश सोडून रवाना

By admin | Updated: March 9, 2016 15:17 IST

उद्योगपती विजय मल्ल्या यांना देश सोडून जाण्यास मनाई करणारा आदेश द्यावा याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात याचिका करण्यात आली आहे

ऑनलाइन लोकमत - 
नवी दिल्ली, दि. ९ - उद्योगपती विजय मल्ल्या यांना देश सोडून जाण्यास मनाई करणारा आदेश द्यावा याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात याचिका करण्यात आली आहे. मात्र बँकांनी याचिका करण्यास उशीर केला आहे कारण विजय मल्ल्या काही दिवसांपूर्वीच देश सोडून गेले आहेत. 
 
१७ सार्वजनिक बँकांच्या कन्सोर्टियमने मंगळवारी सर्वोच्च न्यायालयात ही याचिका केली आहे. न्यायालयानेदेखील बुधवारी या याचिकेवर सुनावणीला सहमती दर्शविली आहे. मात्र विजय मल्ल्या देश सोडून गेल्याची कल्पनाच बँकांना नाही आहे. विजय मल्ल्या यांच्या प्रवक्त्याने मलाही ते कुठे आहेत याची माहिती नाही, मी फक्त मेलद्वारे त्यांच्या संपर्कात असल्याचं सांगितलं आहे.
 
सार्वजनिक बँकांच्यावतीने अटर्नी जनरल मुकुल रोहतगी यांनी याचिका सादर करताना तातडीने सुनावणीची विनंती केली होती. मल्ल्यांच्या विविध कंपन्यांनी कर्ज उचलले असल्यामुळे स्टेट बँक ऑफ इंडियासह १७ सार्वजनिक बँकांनी त्यांच्याविरुद्ध न्यायालयात धाव घेतली आहे. ही थकित रक्कम हजारो कोटी रुपयांच्या घरात असल्याचे रोहतगी यांनी सांगितले आहे. दियाजियोकडून ५१५ कोटींची डील झाल्यानंतर विजय माल्या यांनी लंडनमध्ये स्थायिक होण्याचे संकेत दिल्याने बँकांनी ही याचिका केली होती. या याचिकेत विजय मल्ल्या यांचा पासपोर्ट जप्त करण्याची तसंच त्यांची संपत्ती जाहीर करण्याची मागणीदेखील करण्यात आली आहे.
 
दरम्यान सर्वोच्च न्यायालयाने मल्ल्या यांना नोटीस बजावली असून येत्या दोन आठवड्यांत उत्तर देण्याचे आदेश दिले आहेत. लंडनमधील भारतीय दूतावासाकडून मल्ल्या यांना त्यांच्या अधिकृत ई-मेल आयडीवर नोटीस बाजवण्यात येणार आहे.