शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेता विजयला पाहण्याचा नादात तमिळनाडूत चेंगराचेंगरी; ३६ जणांचा गेला जीव, मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता
2
'मी थरथर कापतोय कारण...'; चेंगराचेंगरीत ३६ जणांच्या मृत्यूनंतर अभिनेता विजयने सोडलं शहर
3
९ वर्षांच्या बेपत्ता मुलीला शोधायला लागले अन्... चेंगराचेंगरीचे कारण समोर, पाण्याच्या बाटल्या फेकत होता विजय
4
तामिळनाडूत सुपरस्टार विजयच्या रॅलीत चेंगराचेंगरी, महिला आणि मुलांसह 31 जणांचा मृत्यू, अनेक जखमी 
5
Mumbai Rain: मुंबईत उद्या अतिवृष्टीचा इशारा; कामाशिवाय घराबाहेर पडू नका, BMC च्या सूचना
6
'दारुल इस्लाम'वर विश्वास ठेवणाऱ्यांना आधी 'जहन्नुम'मध्ये जावे लागेल, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा इशारा
7
"ठाकरेंना हात जोडून विनंती की...!" उद्धव ठाकरे यांच्या शेतकऱ्यांसंदर्भातील 'त्या' विधानावर गुलाबराव पाटलांची एका वाक्यात प्रतिक्रिया
8
शेतकऱ्यांना मदत कधीपर्यंत मिळणार? DCM एकनाथ शिंदेंनी दिली आनंदाची बातमी; बळीराजाची दिवाळी गोड होणार!
9
पनवेलकडे जात असताना बाईक बेलापूर खाडीत कोसळली; एकाचा शोध लागला, दुसरा तरुण बेपत्ता
10
Asia Cup Final 2025: भारत की पाकिस्तान, कोण जिंकणार? ग्रहांची साथ कुणाला? मोठी भविष्यवाणी...
11
प्रेरणादायी! सामान्य भाजी विक्रेत्याचे असामान्य दान; पूरग्रस्तांसाठी दिले १ लाख, माणुसकी जपली
12
विदर्भात 'या' जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा फटका, पिकांचे अतोनात नुकसान ! अजून किती दिवस जोर राहणार कायम?
13
यावेळी बिहारमध्ये चार-चार दिवाळी उत्सव, किती जागा जिंकणार NDA? अमित शाह यांनी सेट केलं टार्गेट; राहुल-तेजस्वी यांच्यावरही बरसले
14
“आई कृपा कर, सरकारला बुद्धी दे!”; बाळासाहेब थोरातांचे मोहटादेवी चरणी साकडे, नुकसानीची पाहणी
15
“सोनू सूद पंजाबच्या मदतीला धावला, मराठी कलावंतांनी मराठवाड्याला मदत करावी”: अमोल मिटकरी
16
“भाजपाला प्रशासन चालवता येत नाही, CM सहायता फंडाबाबत फडणवीसांनी बोलू नये”; ठाकरेंचा पलटवार
17
महाराष्ट्रावर प्रचंड मोठे संकट असताना पंतप्रधान का फिरकले नाहीत? काँग्रेसचा सवाल
18
कंटाळा आला म्हणून मुलींनी मागवले ऑनलाइन जेवण; मद्यधुंद आईला राग अनावर, लेकींना बेदम मारहाण
19
३० सेकंदात रुग्णवाहिका तिथून निघून गेली; आरोपी गगनप्रीत कौरला जामीन मंजूर, कोर्टाने काय म्हटले?
20
१ ऑक्टोबरपासून लागू होणार ट्रेन तिकीट बुकींगचा नवा नियम, झटपट आटोपून घ्या हे काम, अन्यथा...

बँकांची सर्वोच्च न्यायालयात याचिका, मात्र विजय मल्ल्या अगोदरच देश सोडून रवाना

By admin | Updated: March 9, 2016 15:17 IST

उद्योगपती विजय मल्ल्या यांना देश सोडून जाण्यास मनाई करणारा आदेश द्यावा याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात याचिका करण्यात आली आहे

ऑनलाइन लोकमत - 
नवी दिल्ली, दि. ९ - उद्योगपती विजय मल्ल्या यांना देश सोडून जाण्यास मनाई करणारा आदेश द्यावा याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात याचिका करण्यात आली आहे. मात्र बँकांनी याचिका करण्यास उशीर केला आहे कारण विजय मल्ल्या काही दिवसांपूर्वीच देश सोडून गेले आहेत. 
 
१७ सार्वजनिक बँकांच्या कन्सोर्टियमने मंगळवारी सर्वोच्च न्यायालयात ही याचिका केली आहे. न्यायालयानेदेखील बुधवारी या याचिकेवर सुनावणीला सहमती दर्शविली आहे. मात्र विजय मल्ल्या देश सोडून गेल्याची कल्पनाच बँकांना नाही आहे. विजय मल्ल्या यांच्या प्रवक्त्याने मलाही ते कुठे आहेत याची माहिती नाही, मी फक्त मेलद्वारे त्यांच्या संपर्कात असल्याचं सांगितलं आहे.
 
सार्वजनिक बँकांच्यावतीने अटर्नी जनरल मुकुल रोहतगी यांनी याचिका सादर करताना तातडीने सुनावणीची विनंती केली होती. मल्ल्यांच्या विविध कंपन्यांनी कर्ज उचलले असल्यामुळे स्टेट बँक ऑफ इंडियासह १७ सार्वजनिक बँकांनी त्यांच्याविरुद्ध न्यायालयात धाव घेतली आहे. ही थकित रक्कम हजारो कोटी रुपयांच्या घरात असल्याचे रोहतगी यांनी सांगितले आहे. दियाजियोकडून ५१५ कोटींची डील झाल्यानंतर विजय माल्या यांनी लंडनमध्ये स्थायिक होण्याचे संकेत दिल्याने बँकांनी ही याचिका केली होती. या याचिकेत विजय मल्ल्या यांचा पासपोर्ट जप्त करण्याची तसंच त्यांची संपत्ती जाहीर करण्याची मागणीदेखील करण्यात आली आहे.
 
दरम्यान सर्वोच्च न्यायालयाने मल्ल्या यांना नोटीस बजावली असून येत्या दोन आठवड्यांत उत्तर देण्याचे आदेश दिले आहेत. लंडनमधील भारतीय दूतावासाकडून मल्ल्या यांना त्यांच्या अधिकृत ई-मेल आयडीवर नोटीस बाजवण्यात येणार आहे.