शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाक तणावावर मोठी अपडेट; देशभरातील आयुध निर्माणीतील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द
2
पाकिस्तानमधून आयातीवर भारताची संपूर्ण बंदी; टपाल, पार्सल सेवा केल्या स्थगित 
3
समृद्धीच्या अंतिम टप्प्यास मुहूर्त कधी? १ मे रोजीचा मुहूर्त हुकला
4
पर्यटकच टार्गेटवर... गुप्तचरांचा होता इशारा; शोधमोहीम थांबविली त्याच दिवशी झाला हल्ला 
5
आज देशभर ‘नीट-यूजी’ परीक्षा : गैरप्रकार कराल तर कायदेशीर कारवाईसह तीन वर्षे बंदी
6
तीन मुलींची हत्या करून आईने घेतला गळफास ; भिवंडीतील हृदयद्रावक घटना, कारण अस्पष्ट 
7
पुरंदर विमानतळाला विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांवर लाठीमार; अनेक जखमी
8
नव्या डम्पिंगसाठी लागतील दोन वर्षे; सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा किंवा पर्यायी जागेसाठी मुदतवाढ हाच महापालिकेकडे पर्याय 
9
७२ तासांच्या ‘त्या’ शपथेनंतर मजबूत राज्याची मुहूर्तमेढ : देवेंद्र फडणवीस
10
विमानांना पक्षी धडकण्याची शक्यता, उघड्यावरील प्राण्यांची कत्तल थांबवा; नवी मुंबई विमानतळ कंपनीला ‘डीजीसीए’चे आदेश
11
सात वर्षांची असताना आला बहिरेपणा, आता  २८ वर्षांनंतर ती पहिल्यांदाच ऐकणार आवाज
12
गोव्यात लईराईच्या जत्रेत चेंगराचेंगरी, ६ भाविक ठार
13
Romario Shepherd: ३७९ चा स्ट्राईक रेट, १४ चेंडूत अर्धशतक, चेन्नईविरुद्ध रोमारियो शेफर्डची वादळी खेळी
14
सोन्याचा भाव 6658 रुपयांनी घसरला, आता खरेदी करणं योग्य की अयोग्य? जाणून घ्या काय सांगतायत एक्सपर्ट्स?
15
मुंबईतील विवाहित जोडप्याकडून खंडणी उकळणारे ठाण्यातील तीन पोलीस कर्मचारी निलंबित
16
IPL 2025 : किंग कोहलीचे षटकारांचे 'त्रिशतक'; असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
17
लातुरच्या माहेश्वरी पतसंस्थेत झाला सव्वा आठ काेटींचा अपहार; फरार राेखपालाला पोलिसांनी पकडले!
18
Virat Kohli: विराट कोहलीचा आणखी एक पराक्रम, आयपीएलमध्ये सर्वाधिक वेळा ५००+ धावा करणारा पहिलाच
19
पहलगाम हल्ल्यानंतर पहिल्यांदाच पंतप्रधान मोदींना भेटले मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला, 30 मिनिटे चालली चर्चा
20
मामाच्या गावी आलेले तिघे तलावात बुडाले; दोघांचा मृत्यू, एकास जिगरबाज तरुणीने वाचवलं

जनता परिवारात फूट,सपाची 'सायकल' स्वबळावर धावणार

By admin | Updated: September 3, 2015 12:51 IST

गाजावाजा करत एकत्र आलेला जनता परिवार अवघ्या काही महिन्यांमध्ये दुभंगला असून समाजवादी पक्षाने जनता परिवारातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे.

ऑनलाइन लोकमत

नवी दिल्ली, दि. ३ - गाजावाजा करत एकत्र आलेला जनता परिवार अवघ्या काही महिन्यांमध्ये दुभंगला असून समाजवादी पक्षाने जनता परिवारातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. बिहार विधानसभा निवडणूक समाजवादी पक्ष स्वबळावर लढणार असल्याने बिहारमधील महाआघाडीही विस्कटली आहे. 

मोदी सरकारला आव्हान देण्यासाठी विखुरलेल्या जनता दलाने एप्रिलमध्ये गाजावाजा करत एकत्र येण्याचा निर्णय जाहीर केला होता. काँग्रेस व भाजपासमोर तिस-या आघाडीचा पर्याय निर्माण करण्याचा जनता परिवाराचा प्रयत्न होता. मात्र बिहार विधानसभेतील पहिल्या परीक्षेतच जनता परिवारात फूट पडली. जागावाटपावरुन नितीश कुमार व लालूप्रसाद यादव यांनी आमचे विचारच जाणून घेतली नाही असा आरोप सपाचे नेते रामगोपाल यादव यांनी केला आहे. समाजवादी पक्षाचा मित्रपक्षांनी अपमान केला असेही त्यांनी म्हटले आहे. गुरुवारी दिल्लीत समाजवादी पक्षाच्या संसदीय समितीची बैठक पार पडली. या बैठकीत सपाने बिहारमधील निवडणूक स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतल्याचे यादव यांनी सांगितले. आम्ही बिहारमधील काही पक्षांसोबत चर्चा करत आहोत असे सूचक विधानही त्यांनी केले आहे. 

बिहारमधील विधानसभा निवडणुकीत जनता दल (संयुक्त), राष्ट्रीय जनता दल, काँग्रेस व समाजवादी पक्ष यांची महाआघाडी झाली होती. मात्र आता या महाआघाडीतून समाजवादी पक्ष बाहेर पडल्याने महाआघाडीला धक्का बसला आहे.