शहरं
Join us  
Trending Stories
1
आंतरराष्ट्रीय सीमेवर संशयित ड्रोन दिसले, अनेक ठिकाणी ब्लॅकआऊट केले; ‘त्या’ ४ तासांत काय घडले?
2
डोनाल्ड ट्रम्प यांचा ‘तो’ दावा फेटाळला; भारताने स्पष्टच सांगितले, “चर्चेत ते मुद्दे नव्हते”
3
“भारत-पाकने युद्धविराम केला नाही, तर व्यापार नाही, आम्ही अण्वस्त्रांचे युद्ध रोखले”: ट्रम्प
4
आयपीएलचं सुधारित वेळापत्रक आलं; कधी, कुठं रंगणार उर्वरीत सामने? A टू Z माहिती
5
Operation Sindoor: 'पाकिस्तानला जर जगायचं असेल, तर...'; PM मोदींनी दिला स्पष्ट मेसेज, जगालाही ठणकावले
6
दहशतवाद्यांचा 'आका' पाकिस्तानला भारताची 'लास्ट वॉर्निंग! वाचा PM मोदींच्या भाषणातील १० मोठे मुद्दे
7
"ऑपरेशन सिंदूर केवळ 'स्थगित' केलंय, संपलेलं नाही"; PM मोदींचा पाकिस्तानला सज्जड दम
8
Nagpur: धक्कादायक! नागपुरात पाण्याने भरलेल्या खड्ड्यात बुडून पाच जणांचा मृत्यू
9
'माता-भगिनींचं कुंकू पुसण्याचा परिणाम आता दहशतवाद्यांना कळलाय', PM मोदींचा पुन्हा इशारा
10
Operation Sindoor Live Updates: इंडिगो कंपनीकडून जम्मू, अमृतसर, चंडीगड, लेह, श्रीनगर आणि राजकोटला जाणारी विमाने रद्द
11
Narendra Modi : "भारत दहशतवादी हल्ल्यांना चोख प्रत्युत्तर देईल, न्यूक्लियर ब्लॅकमेलिंग सहन करणार नाही"
12
Pakistan Nuclear facilities: भारताने पाकिस्तानच्या अण्वस्त्र ठिकाणावर हल्ला केलाय का? एअर मार्शल भारती म्हणाले...
13
'सिंदूर' केवळ नाव नाही, ती एक भावना...; 'या' जिल्ह्यात आतापर्यंत १७ मुलांची नावे ठेवली 'सिंदूर'
14
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये अदानी समूहाच्या ड्रोन्सचाही वापर, काय आहे स्काय स्ट्रायकर कामीकेज? 
15
"मला माझ्या वडिलांचा अभिमान, देशासाठी बलिदान देणाऱ्या..."; शहीद वडिलांना लेकाचा सलाम
16
Nalasopara: कपडे वाळवण्यासाठी गेला अन्...; नालासोपाऱ्यात बाल्कनीतून पडून तरुणाचा मृत्यू
17
"तुझ्यामुळे विराट कोहलीला रिटायर व्हावं लागलं", ट्रोलर्सच्या निशाण्यावर आली अवनीत कौर
18
पाकिस्तानच्या हल्ल्याने कुटुंब उद्ध्वस्त; १२ वर्षांच्या जुळ्या मुलांचा मृत्यू, वडील ICU मध्ये दाखल
19
Pune: भररस्त्यात १८ वर्षीय तरुणीची हत्या, शेजारीच निघाला आरोपी; तपासातून समोर आलं हत्येचं कारण
20
Operation Sindoor BJP: भाजप देशभर काढणार तिरंगा यात्रा; 'ऑपरेशन सिंदूर'चे यश देशवासीयांना सांगणार

वचने न पाळणाऱ्या पक्षांना जनतेने जबाबदार धरावे!

By admin | Updated: April 9, 2017 04:56 IST

निवडणुकीतील आश्वासने पाळली जात नाहीत आणि जाहीरनामे कागदाचे चिटोरे बनले आहेत. त्यासाठी जनतेने राजकीय पक्षांनाच जबाबदार धरायला हवे, असे प्रतिपादन

नवी दिल्ली : निवडणुकीतील आश्वासने पाळली जात नाहीत आणि जाहीरनामे कागदाचे चिटोरे बनले आहेत. त्यासाठी जनतेने राजकीय पक्षांनाच जबाबदार धरायला हवे, असे प्रतिपादन भारताचे सरन्यायाधीश जे. एस. खेहर यांनी केले.‘निवडणुकीच्या संदर्भात आर्थिक सुधारणा’ या विषयावर ते बोलत होते. राष्ट्रपती प्रणव मुखर्जी हेही या वेळी उपस्थित होते. न्या. खेहर यांनी म्हणाले की, निवडणुकीतील आश्वासने न पाळण्यासाठी राजकीय पक्षांकडून अनेक कारणे दिली जातात, पण दिलेली आश्वासने पूर्ण करण्याबाबत त्या पक्षांमध्ये व त्यांच्या नेत्यांमध्ये एकमत नसणे, हे त्यातील एक मुख्य कारण आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)मोहाला बळी पडू नकाज्येष्ठ न्यायमूर्ती दीपक मिश्रा यांचेही या प्रसंगी भाषण झाले. त्यांनी सांगितले की, निवडणूक सुधारणांची देशाला गरज आहे. निवडणुकांतील पैशांचा वापर थांबला पाहिजे. निवडणूक लढवणे ही गुंतवणूक नाही, हे उमेदवारांनी समजून घेतले पाहिजे. तसेच मतदारांनीही मोहाला बळी न पडता मतदान केले पाहिजे. ज्या दिवशी मतदार कुठल्याही मोहाला बळी न पडता मतदान करतील, तो दिवस भारतीय लोकशाहीसाठी वैभवशाली असेल.निवडणूक सुधारणा आणि आर्थिक-समाजिक न्याय यांचा थेट संबंध आहे. तथापि, २0१४ च्या निवडणूक जाहीरनाम्यांत एकाही राजकीय पक्षाने याचा उल्लेख केलेला नाही. निवडणुकीतील ‘मोफत’ वितरणाप्रकरणी मार्गदर्शक सूचना तयार करण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक आयोगाला दिले आहेत. त्याचा पाठपुरावाही केला जात आहे. राजकीय पक्षांविरुद्ध आचारसंहिता भंगाबद्दल कारवाई केली जात असल्याचे आयोगाने यावर म्हटले आहे. - जे. एस. खेहर, सरन्यायाधीश