शहरं
Join us  
Trending Stories
1
यवत हिंसाचारात कोणाचं किती नुकसान, सध्याची परिस्थिती कशी? जाणून घ्या ताजी अपडेट्स!
2
४० वर्षाच्या लढ्याला यश, कोल्हापूरला सर्किट बेंच मंजूर; मुंबई हायकोर्टाचे नोटिफिकेशन प्रसिद्ध
3
IND vs ENG : सिराजसह प्रसिद्ध कृष्णानं मारला 'चौकार'! यजमान इंग्लंडचा पहिला डाव अल्प आघाडीसह संपला
4
ऐसे लोग *** होते है! महबूब मुजावर यांचं नाव घेताच अरविंद सांवत संतापले!
5
IND vs ENG : मियाँ मॅजिक! ओव्हलच्या मैदानात DSP सिराजनं साजरं केलं 'द्विशतक'
6
National Film Awards: 'श्यामची आई' मराठी चित्रपटानं जिंकला राष्ट्रीय पुरस्कार, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी…
7
IND vs ENG : जो रुट अन् प्रसिद्ध कृष्णा यांच्यात राडा; भांडण सोडवायला आलेल्या पंचावर KL राहुल चिडला
8
Video: रागावलेल्या सिंहीणपुढे सिंहाचीच झाली 'शेळी'... जंगलच्या राजाची अवस्था पाहून तुम्हालाही येईल हसू
9
आव्वाज कुणाचा... मराठीचा !! 'या' मराठी चित्रपटांना मिळाला राष्ट्रीय पुरस्कार; पाहा विजेत्यांची यादी
10
शेतकऱ्यांसाठी मिळालेली रक्कम अधिकाऱ्यांनी कार खरेदीसाठी उडवली, कृषिमंत्री म्हणाले...   
11
तुर्भ्यात एनएमएमटीच्या भरधाव बसनं ६ जणांना उडवलं, चालकाविरोधात गुन्हा दाखल
12
शेतकऱ्यांच्या हिताशी तडजोड नाही, दबावाखाली करार करणार नाही, २५% टॅरिफबाबत भारताची स्पष्ट भूमिका
13
'किंग' खानच्या राजमुकुटाला राष्ट्रीय पुरस्काराचं 'कोंदण'; विक्रांत मेस्सी, राणी मुखर्जी यांचाही सर्वोच्च सन्मान
14
"पाकिस्तान एक दिवस भारताला तेल विकेल" म्हणत डोनाल्ड ट्रम्प यांनी डिवचलं, भारताची भूमिका काय?
15
Daya Nayak: थर्टी फर्स्टची रात्र अन् छोटा राजन गँगचे दोन शूटर; दया नायक यांच्या पहिल्या एन्काऊंटरची गोष्ट
16
Vivo T4R 5G: अवघ्या १७,४९९ रुपयांत विवोनं आणलाय जबरदस्त फोन, बघताच आवडेल!
17
'भारत-रशिया वेळोवेळी एकमेकांच्या बाजूने उभे', डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीकेनंतर भारताचे प्रत्युत्तर
18
'फुटबॉलसम्राट' मेस्सी भारतात येणार.. रोहित, विराट, सचिनसोबत वानखेडेवर क्रिकेट मॅच खेळणार!
19
"माझ्याकडे मुस्लीम कामगार, कुणीतरी ओरडलं ही बेकरी..."; यवतमध्ये जमावाने जाळलेल्या बेकरीचं सत्य समोर
20
IND vs ENG : आता कसं वाटतंय...! डकेटचा वचपा काढल्यावर आकाशदीपनं त्याच्या खांद्यावर हात टाकला अन्... (VIDEO)

वचने न पाळणाऱ्या पक्षांना जनतेने जबाबदार धरावे!

By admin | Updated: April 9, 2017 04:56 IST

निवडणुकीतील आश्वासने पाळली जात नाहीत आणि जाहीरनामे कागदाचे चिटोरे बनले आहेत. त्यासाठी जनतेने राजकीय पक्षांनाच जबाबदार धरायला हवे, असे प्रतिपादन

नवी दिल्ली : निवडणुकीतील आश्वासने पाळली जात नाहीत आणि जाहीरनामे कागदाचे चिटोरे बनले आहेत. त्यासाठी जनतेने राजकीय पक्षांनाच जबाबदार धरायला हवे, असे प्रतिपादन भारताचे सरन्यायाधीश जे. एस. खेहर यांनी केले.‘निवडणुकीच्या संदर्भात आर्थिक सुधारणा’ या विषयावर ते बोलत होते. राष्ट्रपती प्रणव मुखर्जी हेही या वेळी उपस्थित होते. न्या. खेहर यांनी म्हणाले की, निवडणुकीतील आश्वासने न पाळण्यासाठी राजकीय पक्षांकडून अनेक कारणे दिली जातात, पण दिलेली आश्वासने पूर्ण करण्याबाबत त्या पक्षांमध्ये व त्यांच्या नेत्यांमध्ये एकमत नसणे, हे त्यातील एक मुख्य कारण आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)मोहाला बळी पडू नकाज्येष्ठ न्यायमूर्ती दीपक मिश्रा यांचेही या प्रसंगी भाषण झाले. त्यांनी सांगितले की, निवडणूक सुधारणांची देशाला गरज आहे. निवडणुकांतील पैशांचा वापर थांबला पाहिजे. निवडणूक लढवणे ही गुंतवणूक नाही, हे उमेदवारांनी समजून घेतले पाहिजे. तसेच मतदारांनीही मोहाला बळी न पडता मतदान केले पाहिजे. ज्या दिवशी मतदार कुठल्याही मोहाला बळी न पडता मतदान करतील, तो दिवस भारतीय लोकशाहीसाठी वैभवशाली असेल.निवडणूक सुधारणा आणि आर्थिक-समाजिक न्याय यांचा थेट संबंध आहे. तथापि, २0१४ च्या निवडणूक जाहीरनाम्यांत एकाही राजकीय पक्षाने याचा उल्लेख केलेला नाही. निवडणुकीतील ‘मोफत’ वितरणाप्रकरणी मार्गदर्शक सूचना तयार करण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक आयोगाला दिले आहेत. त्याचा पाठपुरावाही केला जात आहे. राजकीय पक्षांविरुद्ध आचारसंहिता भंगाबद्दल कारवाई केली जात असल्याचे आयोगाने यावर म्हटले आहे. - जे. एस. खेहर, सरन्यायाधीश