शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
2
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
3
बाजारात जोरदार उसळी! गुंतवणूकदारांनी कमावले ३.५ लाख कोटी रुपये; 'ही' ६ कारणे ठरली गेमचेंजर
4
ख्रिसमस धमाका! अवघ्या १ रुपयात महिनाभर 'अनलिमिटेड' कॉलिंग आणि डेटा; BSNL ची खास ऑफर
5
Jara Hatke: कचरा फेकू नका, विकून पैसे मिळवा! 'या' ॲपची देशभर चर्चा; नेमका प्रकार काय?
6
४ दिवसांपासून सातत्यानं 'या' शेअरला अपर सर्किट; ७४% नं वाढला स्टॉक, तुमच्याकडे आहे का?
7
मस्तच! हात लावताच समजणार संत्र गोड की आंबट? आई-आजीलाही माहीत नसेल ही सुपर ट्रिक
8
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
9
Flashback 2025: वर्षभरात ८ लढती! टीम इंडियाचा 'षटकार' अन् पाकिस्तानला 'ट्रॉफी चोर'चा टॅग
10
बापाचं काळीज! "मॅडम, माझ्या मुलीला मारू नका, हिला आई नाही"; Video पाहून पाणावतील डोळे
11
स्टेट बँक ऑफ इंडियाचं जुनं नाव माहीत आहे? ३४० वर्षांपूर्वी एका ब्रिटीश बँकेपासून झाली होती सुरुवात
12
'भाभीजी घर पर है' मालिकेत परतली शिल्पा शिंदे, भावुक प्रतिक्रिया देत म्हणाली, "मी कधीच चुकीचं..."
13
Staff Gift: कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्यांना दितेय मोठे मोठे फ्लॅट, किंमतही कोट्यवधींमध्ये
14
Travel : ठंडा-ठंडा, कूल-कूल! भारतातील सर्वात गारेगार ठिकाणं, तापमान इतकं कमी की तलावही गोठतो
15
'जर तरची गोष्ट' नाटकाचा तरुण दिग्दर्शक काळाच्या पडद्याआड; ४२व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन
16
बांगलादेशात उस्मान हादीनंतर आता NCP नेत्याची हत्या; अज्ञात हल्लेखोराने डोक्यात झाडली गोळी
17
आयटी ते शेती... भारत-न्यूझीलंड मुक्त व्यापार कराराचे नेमके फायदे काय? 'या' गोष्टी होणार स्वस्त
18
"कुटुंबाच्या प्रतिमेसाठी गप्प होतो, पण आता..."; नितेश राणेंच्या पोस्टने महायुतीत धडकी, कणकवलीतील धक्का जिव्हारी?
19
हातावर मेहेंदी, हिरवा चुडा अन् मुंडावळ्या; प्रियदर्शिनी इंदलकरची लगीनघाई? 'तो' फोटो व्हायरल
20
नको असलेला पसारा २०२५ मध्येच सोडा, नवीन वर्षात 'मिनिमलायझेशन'ची सवय लावा
Daily Top 2Weekly Top 5

लोका म्हणे खर्च दमाने, पण स्वत:च्या लग्नात विमानाने

By admin | Updated: February 18, 2017 14:34 IST

विवाहसोहळ्यांमधील उधळपट्टीला चाप बसवण्याची मागणी करणा-या लोकसभा काँग्रेस खासदार रंजीत रंजन यांनी मात्र स्वत:च्या लग्नात पाण्यासारखा पैसा वाहिला होता

ऑनलाइन लोकमत 
नवी दिल्ली, दि. 18 - विवाहसोहळ्यांमधील उधळपट्टीला चाप बसवण्याची मागणी करणा-या लोकसभा काँग्रेस खासदार रंजीत रंजन यांनी मात्र स्वत:च्या लग्नात पाण्यासारखा पैसा वाहिला होता. लग्नाला पोहोचण्यासाठी रंजीत रंजन यांनी चार्टर्ड विमान वापरलं होतं. इतकंच नाही तर त्यांच्या लग्नात रिसेप्शनसाठी एक लाख पाहुणे आले होते. न्यूज 18  ने दिलेल्या वृत्तानुसार खासदार रंजीत रंजन यांनी आपल्या संपुर्ण कुटुंबासोबत जालंधर ते विवाहस्थळापर्यंत विमानाने प्रवास केला होता. 1994 साली त्यांचं लग्न झालेलं आहे. त्यांच्या या शाही विवाहसोहळ्यासाठी 200 एकरात पसरलेलं मैदान बूक करण्यात आलं होतं. दिमतीला घोडे आणि हत्ती होते ते वेगळंच. 
 
 
आता रंजीत रंजन यांचा हा शाही विवाहसोहळा पाहिला तर त्यांच्या बोलण्यात आणि वागण्यात किती फरक आहे हे समोर आलं आहे. रंजीत रंजन या पप्पू यादव यांच्या पत्नी आहेत. 6 फेब्रुवारी 1994 रोजी दोघांचा विवाह झाला. या लग्नाला उपस्थित राहिलेल्या उप-महापौर संतोष यादव यांनी गेल्या 48 वर्षात असं लग्न पाहिलं नसल्याचं सांगितलं आहे. या लग्नात लालू प्रसाद यांच्यापासून ते राज बब्बर यांच्यापर्यत अनेक दिग्गज सामील झाले होते. आता आपल्या या दुटप्पी भूमिकेमुळे रंजीत रंजन यांना टिकेचा सामना करावा लागत आहे. 
 
काय आहे विधेयकात - 
विवाहसोहळ्यांमध्ये आपलं आर्थिक आणि सामाजिक स्थान दाखवण्यासाठी पाण्यासारखा पैसा वाहत करण्यात येणा-या उधळपट्टीवर नियंत्रण आणण्यासाठी लोकसभेत विधेयक मांडण्यात येणार आहे. पैशांच्या उधळपट्टीसोबतच विवाहसोहळ्यासाठी निमंत्रित करण्यात येणा-या अमर्यादित पाहुणे आणि जेवणावर बंधन आणण्यासंबंधीही विधेयकात नमूद करण्यात आलं आहे. जे लोक विवाहसोहळ्यात पाच लाखाहून अधिक खर्च करतात त्यांनी गरिब कुटुंबातील मुलींच्या लग्नात हातभार लावावा अशी तरतूद या विधेयकात करण्यात आली आहे. 
 
'जर एखादं कुटुंब विवाहसोहळ्यात पाच लाखांहून अधिक रक्कम खर्च करत असेल, तर त्यांनी खर्चाच्या 10 टक्के रक्कम गरिब कुटुंबातील मुलींच्या लग्नात मदत म्हणून दिली पाहिजे', असं रंजीत रंजन यांनी विधेयकात म्हटलं आहे.
 
 लोकसभेच्या आगामी अधिवेशनात विवाह विधेयक 2016 हे खासगी विधेयकाच्या स्वरुपात मांडलं जाणार आहे. 'उधळपट्टी थांबवावी आणि साध्या विवाहपद्धतीला प्रोत्साहन मिळावं हा या विधेयकामागचा उद्देश असल्याचं', रंजीत रंजन यांनी सांगितलं . 'लग्न दोन लोकांच्या पवित्र नात्याची सुरुवात असते. अशावेळी साधेपणाला महत्व दिलं गेलं पाहिजे. पण आपल्याकडे विवाहसोहळ्यांमध्ये देखावा आणि उधळपट्टी वाढली आहे', असं रंजीत रंजन यांनी म्हटलं होतं.