शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानची तिसऱ्या देशाच्या मदतीने भारतात माल निर्यात करण्याची तयारी; सरकारने घेतली दखल
2
"भाजपाशी अनैतिक संबंध तोडावेत, जसं 'वर्षा'वर हक्कानं जाता, तसं 'मातोश्री'वर यावं" 
3
मराठा आरक्षण सुनावणी होणार जलद; हायकोर्टात विशेष पूर्णपीठ स्थापन; SCच्या आदेशानंतर पाऊल
4
आयुष्याचं ‘सुरक्षा चक्र' आहेत या ३ स्कीम्स, कठीण काळात साथ; कमी कमाई असणारेही करू शकतात गुंतवणूक
5
भारताच्या हल्ल्यात नूर खानसह अनेक एअरबेस उद्ध्वस्त; पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांचा कबुलीनामा
6
अफगाणिस्तानला भारताचा मदतीचा हात! अटारी मार्गे केली विशेष मदत; पाकिस्तानला दाखवून दिले
7
आजचे राशीभविष्य १७ मे २०२५ : नोकरदारांना नोकरीत लाभ होईल, जाणून घ्या, कसा असेल आजचा दिवस
8
सुटीत गावी आलेल्या न्यायाधीशांनी स्वत: कापले गावातील मुलांचे केस; नेमकं घडलं काय?
9
भारताला हवेत हाफिज सईद, मसूद अझहर, दाऊद इब्राहिम; मोस्ट वाँटेडची यादी पाकला सोपवणार
10
‘सेलेबी’ला काम नको; आयबीचा होता इशारा, सुरक्षेविषयी नवीन प्रश्न निर्माण होण्याची भीती
11
भारत आता पाकिस्तानवर ‘डिप्लोमॅटिक स्ट्राइक’ करणार; ‘ऑपरेशन सिंदूर’ची माहिती जगात पोहोचवणार
12
आगळीक करू नका, ‘ऑपरेशन सिंदूर’ हा फक्त ट्रेलर, गरज पडल्यास पूर्ण ‘पिक्चर’ दाखवू: राजनाथ सिंह
13
अफगाणिस्तानातून पाकची जलकोंडी होण्याची शक्यता; शाहतूत धरणास भारताचे आर्थिक, तांत्रिक सहकार्य
14
‘८६४७’ म्हणजे थेट डोनाल्ड ट्रम्प यांच्या हत्येचा संदेश? जेम्स कॉमी यांच्या पोस्टमुळे खळबळ
15
मध्य प्रदेशच्या मंत्र्यानंतर आता उपमुख्यमंत्र्यांचेही विधान चर्चेत; काँग्रेसची भाजपावर टीका
16
पाक समर्थक तुर्की, अझरबैजानशी  कोणताही व्यापार, पर्यटन नाही; भारतीय व्यापाऱ्यांचा बहिष्कार
17
“तणावाच्या पार्श्वभूमीवर तुर्की, अझरबैजानसोबत करार करू नका”; याआधीचे करार रद्द करायचा निर्णय
18
मुंबईत तळ ठोकून असणाऱ्या २५० बांगलादेशींना घरचा रस्ता; २ दिवसांत पोलिसांची मोठी धडक कारवाई
19
राजकीय नेत्यांना चढला महापालिका निवडणुकीचा ज्वर! स्थानिक प्रश्नांकडे लक्ष, भेटीगाठी सुरू
20
...आता सहपोलिस आयुक्त गुप्तवार्ता; आयपीएस डॉ. आरती सिंह यांच्याकडे जबाबदारी

लोका म्हणे खर्च दमाने, पण स्वत:च्या लग्नात विमानाने

By admin | Updated: February 18, 2017 14:34 IST

विवाहसोहळ्यांमधील उधळपट्टीला चाप बसवण्याची मागणी करणा-या लोकसभा काँग्रेस खासदार रंजीत रंजन यांनी मात्र स्वत:च्या लग्नात पाण्यासारखा पैसा वाहिला होता

ऑनलाइन लोकमत 
नवी दिल्ली, दि. 18 - विवाहसोहळ्यांमधील उधळपट्टीला चाप बसवण्याची मागणी करणा-या लोकसभा काँग्रेस खासदार रंजीत रंजन यांनी मात्र स्वत:च्या लग्नात पाण्यासारखा पैसा वाहिला होता. लग्नाला पोहोचण्यासाठी रंजीत रंजन यांनी चार्टर्ड विमान वापरलं होतं. इतकंच नाही तर त्यांच्या लग्नात रिसेप्शनसाठी एक लाख पाहुणे आले होते. न्यूज 18  ने दिलेल्या वृत्तानुसार खासदार रंजीत रंजन यांनी आपल्या संपुर्ण कुटुंबासोबत जालंधर ते विवाहस्थळापर्यंत विमानाने प्रवास केला होता. 1994 साली त्यांचं लग्न झालेलं आहे. त्यांच्या या शाही विवाहसोहळ्यासाठी 200 एकरात पसरलेलं मैदान बूक करण्यात आलं होतं. दिमतीला घोडे आणि हत्ती होते ते वेगळंच. 
 
 
आता रंजीत रंजन यांचा हा शाही विवाहसोहळा पाहिला तर त्यांच्या बोलण्यात आणि वागण्यात किती फरक आहे हे समोर आलं आहे. रंजीत रंजन या पप्पू यादव यांच्या पत्नी आहेत. 6 फेब्रुवारी 1994 रोजी दोघांचा विवाह झाला. या लग्नाला उपस्थित राहिलेल्या उप-महापौर संतोष यादव यांनी गेल्या 48 वर्षात असं लग्न पाहिलं नसल्याचं सांगितलं आहे. या लग्नात लालू प्रसाद यांच्यापासून ते राज बब्बर यांच्यापर्यत अनेक दिग्गज सामील झाले होते. आता आपल्या या दुटप्पी भूमिकेमुळे रंजीत रंजन यांना टिकेचा सामना करावा लागत आहे. 
 
काय आहे विधेयकात - 
विवाहसोहळ्यांमध्ये आपलं आर्थिक आणि सामाजिक स्थान दाखवण्यासाठी पाण्यासारखा पैसा वाहत करण्यात येणा-या उधळपट्टीवर नियंत्रण आणण्यासाठी लोकसभेत विधेयक मांडण्यात येणार आहे. पैशांच्या उधळपट्टीसोबतच विवाहसोहळ्यासाठी निमंत्रित करण्यात येणा-या अमर्यादित पाहुणे आणि जेवणावर बंधन आणण्यासंबंधीही विधेयकात नमूद करण्यात आलं आहे. जे लोक विवाहसोहळ्यात पाच लाखाहून अधिक खर्च करतात त्यांनी गरिब कुटुंबातील मुलींच्या लग्नात हातभार लावावा अशी तरतूद या विधेयकात करण्यात आली आहे. 
 
'जर एखादं कुटुंब विवाहसोहळ्यात पाच लाखांहून अधिक रक्कम खर्च करत असेल, तर त्यांनी खर्चाच्या 10 टक्के रक्कम गरिब कुटुंबातील मुलींच्या लग्नात मदत म्हणून दिली पाहिजे', असं रंजीत रंजन यांनी विधेयकात म्हटलं आहे.
 
 लोकसभेच्या आगामी अधिवेशनात विवाह विधेयक 2016 हे खासगी विधेयकाच्या स्वरुपात मांडलं जाणार आहे. 'उधळपट्टी थांबवावी आणि साध्या विवाहपद्धतीला प्रोत्साहन मिळावं हा या विधेयकामागचा उद्देश असल्याचं', रंजीत रंजन यांनी सांगितलं . 'लग्न दोन लोकांच्या पवित्र नात्याची सुरुवात असते. अशावेळी साधेपणाला महत्व दिलं गेलं पाहिजे. पण आपल्याकडे विवाहसोहळ्यांमध्ये देखावा आणि उधळपट्टी वाढली आहे', असं रंजीत रंजन यांनी म्हटलं होतं.