शहरं
Join us  
Trending Stories
1
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
2
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
3
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
4
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
5
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
6
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
7
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
8
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
9
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
10
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
11
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
12
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
13
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
14
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
15
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
16
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?
17
Dewald Brevis: बेबी एबीनं इतिहासच बदलून टाकला, ऑस्ट्रेलियाविरुद्ध 'अशी' कामगिरी करणारा एकटाच!
18
१४ लाखांचं पॅकेज असलेला तरुण भररस्त्यात मॉडेलसमोर अचानक उभा राहिला, पॅन्टची चेन उघडली अन्...
19
E10 च्या वाहनांमध्ये E20 पेट्रोल वापरू नका, नाहीतर...; टोयोटाचा वाहन मालकांना इशारा...
20
अहो आश्चर्यम्...! ६५० किमी पर्यंतची रेंज असलेल्या या २ कारला जुलै महिन्यात एकही ग्राहक मिळाला नाही! जाणून घ्या किंमत

जनता मोदींना इंदिराजींप्रमाणे धूळ चारेल

By admin | Updated: February 1, 2016 02:13 IST

नरेंद्र मोदी यांचीही गत इंदिरा गांधी यांच्याप्रमाणेच होईल, केवळ एका निवडणुकीची प्रतीक्षा आहे. जनता त्यांना धूळ चारेल, अशी शापवाणी करीत खळबळ उडवून

नवी दिल्ली : नरेंद्र मोदी यांचीही गत इंदिरा गांधी यांच्याप्रमाणेच होईल, केवळ एका निवडणुकीची प्रतीक्षा आहे. जनता त्यांना धूळ चारेल, अशी शापवाणी करीत खळबळ उडवून दिल्यानंतर भाजपचे ज्येष्ठ नेते यशवंत सिन्हा यांनी लगेच घूमजाव केले आहे. मोदी सरकारमध्ये देशाशी संवाद साधण्याचा अभाव असल्याकडे लक्ष वेधत सिन्हा यांनी केलेल्या या विधानामुळे भाजपचे अंतर्गत राजकारण ढवळून निघाले असून, सिन्हा यांच्या हकालपट्टीची मागणी जोर धरू लागली आहे. सिन्हा यांनी माझ्या वक्तव्याचा विपर्यास करण्यात आल्याचे सांगत रविवारी सारवासारव चालविली होती.गोव्यातील डोना पौला येथे शनिवारी ‘डिफिकल्ट डायलॉग्ज’ या परिषदेत गट चर्चेत सहभागी होताना सिन्हा म्हणाले की, भारतीय जनता मोदींना धूळ चारेल. त्यासाठी तुम्हाला केवळ एका निवडणुकीची प्रतीक्षा करावी लागेल. दरम्यान, खुलासा करताना सिन्हा यांनी मोदींसंदर्भात विधान केल्याचा इन्कार केला आहे. ज्यांनी कुणी हे वृत्त दिले त्यांनी चुकीचा अर्थ काढला. सध्या मी, माझे आणि माझ्यासाठी ही संस्कृती आली असून, अशावेळी संवाद साधण्यात काय अर्थ, असा सवालही त्यांनी केला होता. लोकप्रतिनिधींनी सातत्याने जनतेकडे जाऊन संवाद साधायला हवा, असे सांगत त्यांनी १९७५ च्या आणीबाणीचे स्मरण करवून दिले. असंतोषाचा आवाज दडपण्यासाठी आणीबाणी लागू करण्यात आली असता देशात काय घडले, भारतातील जनतेने कसे उत्तर दिले ते सर्वांना माहीत आहे. पथभ्रष्टता येथे तेथे दिसून येत आहे. ज्या पद्धतीने काही बाबी घडत आहेत, ते पाहता सध्याच्या परिस्थितीबद्दल आपण गंभीर असायलाच हवे. थोर भारतीय समुदाय त्याची काळजी घेईल. संवाद साधण्यावर ज्यांचा विश्वास नाही त्यांना जनता धूळ चारेल. त्यासाठी केवळ पुढील निवडणुकीपर्यंतच वाट बघावी लागेल, असा इशाराही सिन्हा यांनी दिला. करवून दिले आणीबाणीचे स्मरणकाही लोक असहिष्णुतेबाबत बोलतात तेव्हा मी त्यांना इंदिरा गांधी यांनी लादलेल्या आणीबाणीचे स्मरण करवून देतो. १९७७ मध्ये जनतेने इंदिराजींना धडा शिकवला होता. कारण चर्चा दडपणे किंवा असहिष्णुता आपल्या रक्तात नाही. त्यामुळेच लोकशाही आणि संवाद दोन्ही जिवंत राहिले आहेत, असेही सिन्हा म्हणाले. आणीबाणीचा काळ १९ महिन्यांचा होता. त्यानंतर जनतेने काँग्रेसचे सरकार उलथवून लावले होते. सध्या मोदी सरकारलाही तेवढाच काळ झाला आहे, असा संदर्भही त्यांनी दिला.मंत्रिपद न मिळाल्यामुळे यशवंत सिन्हा आणि शत्रुघ्न सिन्हा निराधार वक्तव्ये करीत आहेत. या दोन्ही नेत्यांची पक्षातून हकालपट्टी करा, अशी मागणी भाजपचे खा. रवींद्र कुशवाह यांनी रविवारी केली. पुत्र जयंत सिन्हा हे केंद्रीय अर्थ राज्यमंत्री आहेत. मात्र, तेवढ्यावर यशवंत सिन्हा यांचे समाधान झालेले नाही. बिहारच्या निवडणुकीनंतर शत्रुघ्न सिन्हा हेही आत्मघातकी विधाने करीत आहेत, याकडे त्यांनी लक्ष वेधले.