शहरं
Join us  
Trending Stories
1
Two-Wheeler New Rules : नवीन सर्व दुचाकींना 'एबीएस आणि दोन हेल्मेट' सक्तीचे; केंद्रीय परिवहन मंत्रालयाचा मोठा निर्णय
2
एअर इंडियानं रद्द केली ८ उड्डाणं, आता काय घडलं? पुणे, मुंबई, दिल्लीसह अनेक मोठ्या शहरांतील प्रवाशांची अडचण
3
इराण-इस्त्रायल युद्ध आता ट्रम्प विरुद्ध पुतिन; चीन, नॉर्थ कोरियाचा हुकुमशाह उघडपणे पुढे आले
4
'वर्षभरापूर्वीच एअर इंडियाच्या बोईंगमधील खराबीची माहिती दिलेली'; अहमदाबाद विमान अपघातावर खळबळजनक दावा
5
“पप्पा, आम्हाला भारतात बोलवा अन् फोन कट”; इराणमध्ये अडकली लेक, वडिलांना सतावतेय भीती
6
अभिषेक-करिश्मा कपूरचा झालेला साखरपुडा, पण लग्न का मोडलं? बिग बींनी केलेला खुलासा
7
बँकेत जाताय? थांबा! जुलैमध्ये १३ दिवस बँका बंद राहणार; पहा तुमच्या शहरातील सुट्ट्यांची यादी
8
मुंबई महापालिकेची निवडणूक मविआ एकत्र लढणार की नाही? शरद पवार म्हणाले, "उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची..."
9
Ashadhi Wari 2025: वारी म्हणजे केवळ पंढरपूरला चालत जाणं नव्हे, तर वारी म्हणजे सदेह वैकुंठाची वाट चालणं!
10
प्रियकरासोबत मिळून पतीची केली हत्या, लग्नाआधीपासून सुरू होते अफेअर; हत्येनंतर रचला बनाव
11
Corona Virus : बापरे! कोरोनाने वाढवलं टेन्शन, अवघ्या ४ दिवसांच्या बाळाला आणि एका महिन्यांच्या मुलीला लागण
12
मारन कुटुंबाचा वाद आला समोर, SunTV मधील हिस्स्यावरून दोन भाऊ आमने-सामने
13
Maharashtra Rain: आषाढीपुर्वीच पंढपुरात पुराचा धोका! भीमा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
14
भारताचा उल्लेख करत पाकिस्तानी संसदेत 'गजवा ए हिंद'चा नारा; खासदाराचं चिथावणीखोर भाषण
15
१ लाखाचे झाले १४ लाख! 'या' ५ मिडकॅप म्युच्युअल फंडांचा बंपर नफा, SIP मधूनही गुंतवणूकदार कोट्यधीश!
16
"६०-७० वर्षांच्या महिलांनाही रोमान्स हवा असतो, पण...", नीना गुप्तांचं बोल्ड वक्तव्य
17
HDB Financial Services IPO चा प्राईज बँड ठरला; 'या' तारखेपासून लावता येणार बोली, पाहा डिटेल्स
18
SNB report: स्विस बँकेंत भारतीयांचा पैसा वाढला तिप्पट, आकडा ऐकून चक्रावून जाल!
19
'दक्षिणायन' ही देवांची रात्र का समजली जाते? या काळात कोणत्या गोष्टी टाळायला हव्या? वाचा!
20
Sonam Raghuvanshi : "सोनम रघुवंशी समलैंगिक, तिला..."; ज्योतिषाचा खळबळजनक दावा, भविष्यवाणी ठरलीय खरी

जनता मोदींना इंदिराजींप्रमाणे धूळ चारेल

By admin | Updated: February 1, 2016 02:13 IST

नरेंद्र मोदी यांचीही गत इंदिरा गांधी यांच्याप्रमाणेच होईल, केवळ एका निवडणुकीची प्रतीक्षा आहे. जनता त्यांना धूळ चारेल, अशी शापवाणी करीत खळबळ उडवून

नवी दिल्ली : नरेंद्र मोदी यांचीही गत इंदिरा गांधी यांच्याप्रमाणेच होईल, केवळ एका निवडणुकीची प्रतीक्षा आहे. जनता त्यांना धूळ चारेल, अशी शापवाणी करीत खळबळ उडवून दिल्यानंतर भाजपचे ज्येष्ठ नेते यशवंत सिन्हा यांनी लगेच घूमजाव केले आहे. मोदी सरकारमध्ये देशाशी संवाद साधण्याचा अभाव असल्याकडे लक्ष वेधत सिन्हा यांनी केलेल्या या विधानामुळे भाजपचे अंतर्गत राजकारण ढवळून निघाले असून, सिन्हा यांच्या हकालपट्टीची मागणी जोर धरू लागली आहे. सिन्हा यांनी माझ्या वक्तव्याचा विपर्यास करण्यात आल्याचे सांगत रविवारी सारवासारव चालविली होती.गोव्यातील डोना पौला येथे शनिवारी ‘डिफिकल्ट डायलॉग्ज’ या परिषदेत गट चर्चेत सहभागी होताना सिन्हा म्हणाले की, भारतीय जनता मोदींना धूळ चारेल. त्यासाठी तुम्हाला केवळ एका निवडणुकीची प्रतीक्षा करावी लागेल. दरम्यान, खुलासा करताना सिन्हा यांनी मोदींसंदर्भात विधान केल्याचा इन्कार केला आहे. ज्यांनी कुणी हे वृत्त दिले त्यांनी चुकीचा अर्थ काढला. सध्या मी, माझे आणि माझ्यासाठी ही संस्कृती आली असून, अशावेळी संवाद साधण्यात काय अर्थ, असा सवालही त्यांनी केला होता. लोकप्रतिनिधींनी सातत्याने जनतेकडे जाऊन संवाद साधायला हवा, असे सांगत त्यांनी १९७५ च्या आणीबाणीचे स्मरण करवून दिले. असंतोषाचा आवाज दडपण्यासाठी आणीबाणी लागू करण्यात आली असता देशात काय घडले, भारतातील जनतेने कसे उत्तर दिले ते सर्वांना माहीत आहे. पथभ्रष्टता येथे तेथे दिसून येत आहे. ज्या पद्धतीने काही बाबी घडत आहेत, ते पाहता सध्याच्या परिस्थितीबद्दल आपण गंभीर असायलाच हवे. थोर भारतीय समुदाय त्याची काळजी घेईल. संवाद साधण्यावर ज्यांचा विश्वास नाही त्यांना जनता धूळ चारेल. त्यासाठी केवळ पुढील निवडणुकीपर्यंतच वाट बघावी लागेल, असा इशाराही सिन्हा यांनी दिला. करवून दिले आणीबाणीचे स्मरणकाही लोक असहिष्णुतेबाबत बोलतात तेव्हा मी त्यांना इंदिरा गांधी यांनी लादलेल्या आणीबाणीचे स्मरण करवून देतो. १९७७ मध्ये जनतेने इंदिराजींना धडा शिकवला होता. कारण चर्चा दडपणे किंवा असहिष्णुता आपल्या रक्तात नाही. त्यामुळेच लोकशाही आणि संवाद दोन्ही जिवंत राहिले आहेत, असेही सिन्हा म्हणाले. आणीबाणीचा काळ १९ महिन्यांचा होता. त्यानंतर जनतेने काँग्रेसचे सरकार उलथवून लावले होते. सध्या मोदी सरकारलाही तेवढाच काळ झाला आहे, असा संदर्भही त्यांनी दिला.मंत्रिपद न मिळाल्यामुळे यशवंत सिन्हा आणि शत्रुघ्न सिन्हा निराधार वक्तव्ये करीत आहेत. या दोन्ही नेत्यांची पक्षातून हकालपट्टी करा, अशी मागणी भाजपचे खा. रवींद्र कुशवाह यांनी रविवारी केली. पुत्र जयंत सिन्हा हे केंद्रीय अर्थ राज्यमंत्री आहेत. मात्र, तेवढ्यावर यशवंत सिन्हा यांचे समाधान झालेले नाही. बिहारच्या निवडणुकीनंतर शत्रुघ्न सिन्हा हेही आत्मघातकी विधाने करीत आहेत, याकडे त्यांनी लक्ष वेधले.