शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
5
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
6
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
7
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
8
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
9
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
10
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
11
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
12
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
13
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
14
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
15
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
18
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
19
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
20
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
Daily Top 2Weekly Top 5

देशाची जनता नरेंद्र मोदींच्या पाठीशी - पोल

By admin | Updated: January 27, 2016 14:41 IST

देशात आजही नरेंद्र मोदींची लाट कायम असून जनतेची त्यांनाच साथ अाहे, असे एका सर्व्हेतून समोर आलं आहे.

ऑनलाइन लोकमत

नवी दिल्ली, दि. २७ - असहिष्णूतेच्या मुद्यावरून देशातील वातावरण तापलेले आहे. केंद्रातील मोदी सरकारलाही त्याचा फटका बसल्याचे वाटत असतानाच सरकारसाठी दिलासदायक बातमी समोर आली आहे. देशात आजही नरेंद्र मोदींची लाट कायम असून जनतेची त्यांनाच साथ अाहे, असे 'एबीपी न्यूज-निल्सन'च्या सर्व्हेतून समोर आलं आहे. गेल्या २० महिन्यांतील मोदी सरकारचं काम समाधानकारक असल्याचे सांगत मोदींनी दाखवलेले अच्छे दिनांचं स्वप्न पूर्ण झाल्याचं ब-याचशा (४२ टक्के) लोकांचं मत आहे. तसेच आजच्या घडीला पुन्हा निवडणुका झाल्यास एनडीए सरकारच बहुमताने निवडून पुन्हा सत्तेवर येईल असा विश्वास अनेकांनी वर्तवल्याचे या पोलमध्ये नमूद करण्यात आले आहे. 
देशातील ४६ टक्के लोकांनी मोदी सरकारची कामगिरी चांगली असल्याचे म्हटले असून सरकारपेक्षाही नरेंद्र मोदी यांची वैयक्तिक कामगिरी वरचढ असल्याचे अनेकांना वाटते. सुमारे ५४ टक्के लोकांनी पंतप्रधान मोदींची कामगिरी चांगली वा खूप चांगली असल्याचे म्हटले आहे. गेल्या दीड वर्षात सरकारचा कारभार चांगला वा खूप चांगला असल्याबाबत अंदाजे ४६ टक्के लोकांनी मान्यता दिली. 
 
सर्वात लोकप्रिय नेता कोण?
देशाच्या जनतेवर नरेंद्र मोदींचा करिष्मा अद्यापही कायम असल्याचे या सर्व्हेत दिसून आले. देशातील सर्वात लोकप्रिय नेता कोण असा प्रश्न विचारला असता ५८ टक्के लोकांनी मोदींचे नाव घेतले तर त्यांच्यापाठोपाठ ११ टक्के सहभागींनी काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांचे नाव घेतले. तर काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी व दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या नावाला ४ टक्के लोकांनी पसंती दिली. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे मात्र अवघ्या १ टक्के नागरिकांना लोकप्रिय नेते वाटतात. 
वादग्रस्त मुद्यांवर जनतेचं मत काय?
दादरी प्रकरण, पठाणकोट हल्ला, पाकिस्तानबाबतचे सरकारचे धोरण या आणि अशा अनेक वादग्रस्त मुद्यांवर जनतेने परखडपणे मत नोंदवले आहे. सरकारनं थेट लष्करी कारवाई करून पाकिस्तानला धडा शिकवावा असे ६५ टक्के जनतेचे मत आहे. तर पंजाबच्या पठाणकोट हवाई दलाच्या तळावर झालेला हल्ला सरकारला आणखी योग्य पद्धतीने हाताळता आला असता असे ३६ टक्के लोकांचे म्हणणे आहे. तर सरकारला हा हल्ला योग्य रितीने हाताळता आला नसल्याची टीका १५ टक्के सहभागींनी केली आहे. बीफच्या मुद्यावरून दादरी येथे झालेल्या हत्याकांडाप्रकरणी मोदींनी मौन न बाळगता वक्तव्य करणे गरजेचे होते असे ५० टक्के जनतेचे मत आहे. हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्यांना आवरण्यात मोदी अपयशी ठरल्याचे ३८ टक्के लोकांचे नमूद केले आहे.