शहरं
Join us  
Trending Stories
1
कॉकपिटमध्ये घुसण्याचा प्रयत्न; नऊ प्रवासी ताब्यात, एअर इंडियाच्या विमानात नेमकं काय घडलं?
2
मराठवाड्यातील अतिवृष्टीचा एकनाथ शिंदेंनी घेतला आढावा; जिल्हाधिकाऱ्यांशी फोनवरून संवाद
3
पाकिस्तानात निसर्गाचा हाहाकार; मुसळधार पाऊस अन् पुरामुळे 1 हजारहून अधिक जणांचा मृत्यू
4
काँग्रेसचे नेते आणि हिमाचलमधील मंत्री विक्रमादित्य सिंह यांनी केलं दुसरं लग्न, कोण आहे त्यांची दुसरी पत्नी?
5
“युद्धाची गरजच भासणार नाही, एक दिवस POKतील जनता म्हणेल की आम्ही भारतवासी आहोत”: राजनाथ सिंह
6
जुगाराच्या व्यसनामुळे बनला 'चोर'; वडिलांशी खोटं बोलून मित्रांच्या नावाने घेतलं ३३ लाखांचं कर्ज
7
टाटा-महिंद्राच्या कंपनीचे शेअर आपटले! पण अदानींचा 'हा' स्टॉक ठरला टॉप गेनर; IT क्षेत्राला सर्वाधिक फटका
8
मेट्रोचे सर्व टप्पे २०२६च्या अखेरपर्यंत प्रवाशांकरता खुले होतील- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
9
“आता रिकामे ठेवू नका, काहीतरी जबाबदारी द्या, चुकलो असेन तर...”; धनंजय मुंडेंची भरसभेत विनंती
10
Air India Plane Crash : अहमदाबाद विमान अपघातावर मोठी अपडेट; सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारला नोटीस पाठवली, AAIB अहवालाबाबत सांगितली ही बाब
11
VIDEO: आईची माया! सिंहीणने रेडकूवर घातली झडप, म्हशीने शिंगाने लावलं उडवून अन् पुढे...
12
बगरम हवाई तळावर अमेरिकेचा 'डोळा'; ट्रम्प यांना आता का हवंय अफगाणिस्तानचं 'एअरफील्ड'?
13
ज्या सुटकेसवर बसून रील बनवलं, त्यातच तिला भरून नदीत फेकलं; लव्हस्टोरीचा भयंकर शेवट
14
कहो ना कहो...! इमरान हाश्मीसमोर गाताना राघव जुयालच्या डोळ्यात आलेलं पाणी, म्हणाला...
15
आजपासून स्वस्त झालं Rail Neer; जीएसटी रिव्हिजननंतर रेल्वेनं कमी केली MRP
16
नेपाळ, फ्रान्सनंतर आता फिलिपिन्समध्येही भडका! लोक रस्त्यावर; धुमश्चक्रीत ९५ पोलीस जखमी, २१६ जणांना अटक
17
स्टार क्रिकेटपटूने निवृत्ती घेतली मागे, आता आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये करणार पुनरागमन  
18
५ कपन्यांमधील हिस्सा विकण्याच्या विचारात मोदी सरकार! लिस्ट मध्ये आहेत या सरकारी कंपन्यांची नावं
19
"५० हजार देतो, शरीरसंबंध ठेव", मुलाच्या वयाच्या निर्मात्याने अभिनेत्रीकडे केलेली धक्कादायक मागणी
20
अशी धुलाई कधीच पाहिली नव्हती...; अभिषेक शर्माच्या फटकेबाजीनंतर पाकिस्तानी पत्रकाराची कबुली

देशाची जनता नरेंद्र मोदींच्या पाठीशी - पोल

By admin | Updated: January 27, 2016 14:41 IST

देशात आजही नरेंद्र मोदींची लाट कायम असून जनतेची त्यांनाच साथ अाहे, असे एका सर्व्हेतून समोर आलं आहे.

ऑनलाइन लोकमत

नवी दिल्ली, दि. २७ - असहिष्णूतेच्या मुद्यावरून देशातील वातावरण तापलेले आहे. केंद्रातील मोदी सरकारलाही त्याचा फटका बसल्याचे वाटत असतानाच सरकारसाठी दिलासदायक बातमी समोर आली आहे. देशात आजही नरेंद्र मोदींची लाट कायम असून जनतेची त्यांनाच साथ अाहे, असे 'एबीपी न्यूज-निल्सन'च्या सर्व्हेतून समोर आलं आहे. गेल्या २० महिन्यांतील मोदी सरकारचं काम समाधानकारक असल्याचे सांगत मोदींनी दाखवलेले अच्छे दिनांचं स्वप्न पूर्ण झाल्याचं ब-याचशा (४२ टक्के) लोकांचं मत आहे. तसेच आजच्या घडीला पुन्हा निवडणुका झाल्यास एनडीए सरकारच बहुमताने निवडून पुन्हा सत्तेवर येईल असा विश्वास अनेकांनी वर्तवल्याचे या पोलमध्ये नमूद करण्यात आले आहे. 
देशातील ४६ टक्के लोकांनी मोदी सरकारची कामगिरी चांगली असल्याचे म्हटले असून सरकारपेक्षाही नरेंद्र मोदी यांची वैयक्तिक कामगिरी वरचढ असल्याचे अनेकांना वाटते. सुमारे ५४ टक्के लोकांनी पंतप्रधान मोदींची कामगिरी चांगली वा खूप चांगली असल्याचे म्हटले आहे. गेल्या दीड वर्षात सरकारचा कारभार चांगला वा खूप चांगला असल्याबाबत अंदाजे ४६ टक्के लोकांनी मान्यता दिली. 
 
सर्वात लोकप्रिय नेता कोण?
देशाच्या जनतेवर नरेंद्र मोदींचा करिष्मा अद्यापही कायम असल्याचे या सर्व्हेत दिसून आले. देशातील सर्वात लोकप्रिय नेता कोण असा प्रश्न विचारला असता ५८ टक्के लोकांनी मोदींचे नाव घेतले तर त्यांच्यापाठोपाठ ११ टक्के सहभागींनी काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांचे नाव घेतले. तर काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी व दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या नावाला ४ टक्के लोकांनी पसंती दिली. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे मात्र अवघ्या १ टक्के नागरिकांना लोकप्रिय नेते वाटतात. 
वादग्रस्त मुद्यांवर जनतेचं मत काय?
दादरी प्रकरण, पठाणकोट हल्ला, पाकिस्तानबाबतचे सरकारचे धोरण या आणि अशा अनेक वादग्रस्त मुद्यांवर जनतेने परखडपणे मत नोंदवले आहे. सरकारनं थेट लष्करी कारवाई करून पाकिस्तानला धडा शिकवावा असे ६५ टक्के जनतेचे मत आहे. तर पंजाबच्या पठाणकोट हवाई दलाच्या तळावर झालेला हल्ला सरकारला आणखी योग्य पद्धतीने हाताळता आला असता असे ३६ टक्के लोकांचे म्हणणे आहे. तर सरकारला हा हल्ला योग्य रितीने हाताळता आला नसल्याची टीका १५ टक्के सहभागींनी केली आहे. बीफच्या मुद्यावरून दादरी येथे झालेल्या हत्याकांडाप्रकरणी मोदींनी मौन न बाळगता वक्तव्य करणे गरजेचे होते असे ५० टक्के जनतेचे मत आहे. हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्यांना आवरण्यात मोदी अपयशी ठरल्याचे ३८ टक्के लोकांचे नमूद केले आहे.