शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

भारताच्या बेकायदा राजवटीत अरुणाचलमधील जनता त्रस्त - चीन

By admin | Updated: April 12, 2017 16:58 IST

तिबेटी धर्मगुरु दलाई लामा यांच्या अरुणाचल प्रदेश दौ-याला परवानगी दिल्यापासून सातत्याने चीनकडून भारतावर आगपाखड सुरु आहे.

 ऑनलाइन लोकमत 

बिजींग, दि. 12 - तिबेटी धर्मगुरु दलाई लामा यांच्या अरुणाचल प्रदेश दौ-याला परवानगी दिल्यापासून सातत्याने चीनकडून भारतावर आगपाखड सुरु आहे. भारताने अरुणाचल प्रदेशवर अतिक्रमण केले असून, भारताच्या बेकायदा राज्यात अरुणाचलमधील जनतेचे जगणे मुश्कील झाले आहे असे चीनी वर्तमानपत्राने आपल्या लेखात म्हटले आहे. 
 
दलाई लामा यांच्या अरुणाचल दौ-यात प्रामुख्याने तवांग भेटीला चीनचा प्रखर विरोधत होता. तवांगचा प्रदेश दक्षिण तिबेटचा भाग असल्याचा चीनचा दावा आहे. भारताच्या बेकायदा राज्यात दक्षिण तिबेटमधील लोकांचे जगणे मुश्कील झाले आहे. तेथील जनतेला भेदभावपूर्ण वागणूक दिली जात असून, तेथील लोकांना चीनमध्ये परतायचे आहे अशी चिथावणीखोर भाषा अग्रलेखात वापरण्यात आली आहे. 
 
चीनच्या अत्याचारी राजवटीविरोधात वेळोवेळी तिबेटमध्ये निदर्शने सुरु असतात. आतापर्यंत 120 जणांनी चीनच्या कम्युनिस्ट राजवटीविरोधात आपल्या प्राणांचे बलिदान दिले आहे मात्र याकडे अग्रलेखात दुर्लक्ष करण्यात आले आहे. दलाई लामा यांच्या अरुणाचल भेटीवरुन चीनने आतापर्यंत भारताला अनेक इशारे दिले आहेत. भारत-चीन व्दिपक्षीय संबंध खराब होतील असेही चीनने म्हटले आहे. 
 
तवांगवरुन चीनचा मुख्य आक्षेप आहे. तवांग सहाव्या दलाई लामांचे जन्मस्थान आहे. दरम्यान चीनने माझ्या भविष्याची चिंता करु नये असे दलाई लामा यांनी म्हटले आहे. आपल्या भविष्याचा निर्णय अनुयायी करतील चीन नाही असं स्पष्ट केलं आहे. दलाई लामा यांनी चीनचं नाव न घेता आपल्यानंतर आपलं पद कायम राहणार की नाही हे माझे अनुयायी ठरवतील दुसरं कोणी नाही असं म्हटलं आहे. दलाई लामा यांनी चीनवर निशाणा साधला असून दलाई लामांच्या मृत्यूनंतर त्यांचा उत्तराधिकारी निवडण्याचा अधिकार आपल्याकडे असल्याचा दावा केला होता. दलाई लामांनी चीनच्या दाव्याला फेटाळत खडे बोल सुनावले आहेत.