शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
2
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
3
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
4
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
5
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
6
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
7
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
8
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
9
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
10
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
11
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
12
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
13
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
14
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
15
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
16
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
17
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार
18
पीएम किसान योजनेच्या २०व्या हप्त्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा, असा तपासा स्टेटस
19
"अरुण जेटलींनी मला धमकावलं होतं"; राहुल गांधींच्या आरोपावर जेटलींच्या मुलाचे प्रत्युत्तर, "पर्रिकरांसोबतही तुम्ही..."
20
मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले

भारताच्या बेकायदा राजवटीत अरुणाचलमधील जनता त्रस्त - चीन

By admin | Updated: April 12, 2017 16:58 IST

तिबेटी धर्मगुरु दलाई लामा यांच्या अरुणाचल प्रदेश दौ-याला परवानगी दिल्यापासून सातत्याने चीनकडून भारतावर आगपाखड सुरु आहे.

 ऑनलाइन लोकमत 

बिजींग, दि. 12 - तिबेटी धर्मगुरु दलाई लामा यांच्या अरुणाचल प्रदेश दौ-याला परवानगी दिल्यापासून सातत्याने चीनकडून भारतावर आगपाखड सुरु आहे. भारताने अरुणाचल प्रदेशवर अतिक्रमण केले असून, भारताच्या बेकायदा राज्यात अरुणाचलमधील जनतेचे जगणे मुश्कील झाले आहे असे चीनी वर्तमानपत्राने आपल्या लेखात म्हटले आहे. 
 
दलाई लामा यांच्या अरुणाचल दौ-यात प्रामुख्याने तवांग भेटीला चीनचा प्रखर विरोधत होता. तवांगचा प्रदेश दक्षिण तिबेटचा भाग असल्याचा चीनचा दावा आहे. भारताच्या बेकायदा राज्यात दक्षिण तिबेटमधील लोकांचे जगणे मुश्कील झाले आहे. तेथील जनतेला भेदभावपूर्ण वागणूक दिली जात असून, तेथील लोकांना चीनमध्ये परतायचे आहे अशी चिथावणीखोर भाषा अग्रलेखात वापरण्यात आली आहे. 
 
चीनच्या अत्याचारी राजवटीविरोधात वेळोवेळी तिबेटमध्ये निदर्शने सुरु असतात. आतापर्यंत 120 जणांनी चीनच्या कम्युनिस्ट राजवटीविरोधात आपल्या प्राणांचे बलिदान दिले आहे मात्र याकडे अग्रलेखात दुर्लक्ष करण्यात आले आहे. दलाई लामा यांच्या अरुणाचल भेटीवरुन चीनने आतापर्यंत भारताला अनेक इशारे दिले आहेत. भारत-चीन व्दिपक्षीय संबंध खराब होतील असेही चीनने म्हटले आहे. 
 
तवांगवरुन चीनचा मुख्य आक्षेप आहे. तवांग सहाव्या दलाई लामांचे जन्मस्थान आहे. दरम्यान चीनने माझ्या भविष्याची चिंता करु नये असे दलाई लामा यांनी म्हटले आहे. आपल्या भविष्याचा निर्णय अनुयायी करतील चीन नाही असं स्पष्ट केलं आहे. दलाई लामा यांनी चीनचं नाव न घेता आपल्यानंतर आपलं पद कायम राहणार की नाही हे माझे अनुयायी ठरवतील दुसरं कोणी नाही असं म्हटलं आहे. दलाई लामा यांनी चीनवर निशाणा साधला असून दलाई लामांच्या मृत्यूनंतर त्यांचा उत्तराधिकारी निवडण्याचा अधिकार आपल्याकडे असल्याचा दावा केला होता. दलाई लामांनी चीनच्या दाव्याला फेटाळत खडे बोल सुनावले आहेत.