शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

भारताच्या बेकायदा राजवटीत अरुणाचलमधील जनता त्रस्त - चीन

By admin | Updated: April 12, 2017 16:58 IST

तिबेटी धर्मगुरु दलाई लामा यांच्या अरुणाचल प्रदेश दौ-याला परवानगी दिल्यापासून सातत्याने चीनकडून भारतावर आगपाखड सुरु आहे.

 ऑनलाइन लोकमत 

बिजींग, दि. 12 - तिबेटी धर्मगुरु दलाई लामा यांच्या अरुणाचल प्रदेश दौ-याला परवानगी दिल्यापासून सातत्याने चीनकडून भारतावर आगपाखड सुरु आहे. भारताने अरुणाचल प्रदेशवर अतिक्रमण केले असून, भारताच्या बेकायदा राज्यात अरुणाचलमधील जनतेचे जगणे मुश्कील झाले आहे असे चीनी वर्तमानपत्राने आपल्या लेखात म्हटले आहे. 
 
दलाई लामा यांच्या अरुणाचल दौ-यात प्रामुख्याने तवांग भेटीला चीनचा प्रखर विरोधत होता. तवांगचा प्रदेश दक्षिण तिबेटचा भाग असल्याचा चीनचा दावा आहे. भारताच्या बेकायदा राज्यात दक्षिण तिबेटमधील लोकांचे जगणे मुश्कील झाले आहे. तेथील जनतेला भेदभावपूर्ण वागणूक दिली जात असून, तेथील लोकांना चीनमध्ये परतायचे आहे अशी चिथावणीखोर भाषा अग्रलेखात वापरण्यात आली आहे. 
 
चीनच्या अत्याचारी राजवटीविरोधात वेळोवेळी तिबेटमध्ये निदर्शने सुरु असतात. आतापर्यंत 120 जणांनी चीनच्या कम्युनिस्ट राजवटीविरोधात आपल्या प्राणांचे बलिदान दिले आहे मात्र याकडे अग्रलेखात दुर्लक्ष करण्यात आले आहे. दलाई लामा यांच्या अरुणाचल भेटीवरुन चीनने आतापर्यंत भारताला अनेक इशारे दिले आहेत. भारत-चीन व्दिपक्षीय संबंध खराब होतील असेही चीनने म्हटले आहे. 
 
तवांगवरुन चीनचा मुख्य आक्षेप आहे. तवांग सहाव्या दलाई लामांचे जन्मस्थान आहे. दरम्यान चीनने माझ्या भविष्याची चिंता करु नये असे दलाई लामा यांनी म्हटले आहे. आपल्या भविष्याचा निर्णय अनुयायी करतील चीन नाही असं स्पष्ट केलं आहे. दलाई लामा यांनी चीनचं नाव न घेता आपल्यानंतर आपलं पद कायम राहणार की नाही हे माझे अनुयायी ठरवतील दुसरं कोणी नाही असं म्हटलं आहे. दलाई लामा यांनी चीनवर निशाणा साधला असून दलाई लामांच्या मृत्यूनंतर त्यांचा उत्तराधिकारी निवडण्याचा अधिकार आपल्याकडे असल्याचा दावा केला होता. दलाई लामांनी चीनच्या दाव्याला फेटाळत खडे बोल सुनावले आहेत.