शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
2
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
3
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
4
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
5
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
6
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
7
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
8
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
9
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
10
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
11
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
12
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
13
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
14
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
15
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
16
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
17
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
18
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
19
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
20
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
Daily Top 2Weekly Top 5

पुणे जिल्‘ातील ६६ गावांमधील पीक कर्ज वसुलीस स्थगिती शिरूर, पुरंदर, जुन्नर, आंबेगाव तालुके : नव्याने पीक कर्जही मिळणार

By admin | Updated: April 26, 2016 00:16 IST

पुणे : पन्नास पेक्षा कमी पैसेवारी असलेल्या गावांमधील शेतकर्‍यांकडून पीक कर्ज वसुली करण्यास राज्यशासनाने स्थगिती दिली आहे. त्याचा फायदा पुणे जिल्हयातील ६६ गावांना मिळणार आहे. या गावांमधील शेतकर्‍यांकडून पीक कर्जाची वसुली करण्यात येणार नाही आणि या शेतकर्‍यांना नव्यानेही पीक कर्ज मिळणार आहे.

पुणे : पन्नास पेक्षा कमी पैसेवारी असलेल्या गावांमधील शेतकर्‍यांकडून पीक कर्ज वसुली करण्यास राज्यशासनाने स्थगिती दिली आहे. त्याचा फायदा पुणे जिल्हयातील ६६ गावांना मिळणार आहे. या गावांमधील शेतकर्‍यांकडून पीक कर्जाची वसुली करण्यात येणार नाही आणि या शेतकर्‍यांना नव्यानेही पीक कर्ज मिळणार आहे.
ही ६६ गावे शिरूर, पुरंदर, जुन्नर, आंबेगाव तालुक्यांमधील आहेत. शेतकर्‍यांना देण्यात येणार्‍या पीक कर्जाचा कालावधी एकाच वर्षांचा असतो. मात्र गेल्या दोन वर्षांपासून राज्यात सातत्याने दुष्काळ आहे. गतवर्षी पावसाचे प्रमाण खूपच कमी राहिल्याने दुष्काळाची तीव्रता वाढली होती. पीक कर्ज घेऊन खरीपाची केलेली पेरणी पावसाअभावी जळून गेली आणि शेतकर्‍यांच्या हातात काहीच आले नाही. त्यामुळे पीक कर्जाची परतफेडक कशी करायची, असा प्रश्न शेतकर्‍यांसमोर होता. त्यामुळे या वसुलीला स्थगिती द्यावी, अशी मागणी होत होती.
त्यानुसार गतवर्षीच्या खरीप हंगामात ५० पेक्षा कमी पैसेवारी जाहीर केलेल्या गावांमधील शेतकर्‍यांकडील शेतीशी निगडीत कर्जाच्या वसूलीस शासनाने स्थगिती देण्याचा निर्णय गेल्या आठवडयात घेतला होता.
पुणे जिल्‘ातील शिरूर, पुरंदर, जुन्नर व आंबेगाव या तालुक्यातील ६६ गावांमधील गतवर्षीच्या खरीप हंगामातील पैसेवारी ही ५० पैशांपेक्षा कमी आली होती. त्यामुळे या ६६ गावांमध्ये पीक कर्ज वसुलीला शासनाच्या या आदेशानुसार स्थगिती मिळाली आहे.
या शेतकर्‍यांकडील पीक कजार्चे पुनर्गठण किंवा रूपांतर बॅंकांनी किंवा संस्थांनी करावे, अशा सूचना सहकार विभागाकडून देण्यात आलेल्या आहेत. थकीत पीक कर्जाचे पुनर्गठण व्याजासह करण्यात येणार असून त्याचा कालावधी ५ वर्षांचा ठेवण्यात येणार आहे. यंदाच्या खरीप पीक कर्जाच्या पुनर्गठणाची कार्यवाही बॅंकांनी ३० एप्रिल २०१६ पयंर्त तसेच रब्बी पीक कर्जाच्या पुनर्गठणाची कार्यवाही ३० जुलै २०१६ पयंर्त पूर्ण करायची आहे. पुनर्गठणाची सुविधा उपलब्ध करून दिलेल्या शेतकर्‍यांना बॅंकांनी पुढील खरीप हंगामासाठी कर्ज उपलब्ध करुन द्यावयाचे आहे, अशी माहिती ग्रामिण जिल्हा उपनिबंधक आनंद कटके यांनी दिली आहे.
पुणे जिल्‘ातील सर्व कर्जदार शेतकर्‍यांनी त्यांच्या कजार्चे पुनर्गठण करून नव्याने कर्ज उपलब्ध करून घेण्याकरिता संमतीपत्रासह संबंधीत बॅंकेशी अथवा संस्थेशी संपर्क साधावा, असे आवाहन कटके यांनी केले आहे.