शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: भगूर नगरपरिषदेत शिवसेनेची २५ वर्षांची सत्ता अजितदादांच्या राष्ट्रवादीने उलथवली; पहा लेटेस्ट अपडेट
2
अमेरिका, ऑस्ट्रेलियानंतर आता दक्षिण आफ्रिका...! गोळीबारात १० जणांचा मृत्यू, १० जखमी
3
Akkalkot Nagar Parishad Election Result 2025: फटाक्यांची आतषबाजी, विजयाची घोषणा; मतमोजणीआधीच भाजपा कार्यकर्त्यांचा जल्लोष सुरू
4
Maharashtra Local Body Election Results 2025: 'या' तीन नगर परिषदा भाजपने जिंकल्या! निकालाआधीच उधळला गुलाल
5
घर खरेदीचे स्वप्न होणार साकार! 'ही' बँक देतेय स्वस्त होम लोन; ५० लाखांच्या कर्जासाठी किती हवी सॅलरी?
6
नात्याला काळीमा! विम्याच्या पैशांसाठी पोटच्या पोरांनीच रचला बापाच्या हत्येचा कट; 'असा' झाला पर्दाफाश
7
"भाजपचे आमदार इतके माजोरडे झालेत की..."; आमदार पराग शाह यांच्यावर वर्षा गायकवाड भडकल्या
8
Nora Fatehi : "मी जिवंत आहे, माझं डोकं दारावर..."; कार अपघातानंतर कशी आहे नोरा फतेहीची प्रकृती?
9
घर घेणे सामान्यांच्या आवाक्याबाहेर? पगार वाढला, पण घर खरेदी का कठीण झाली...
10
भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक
11
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
12
भारती सिंग आता करतेय तिसऱ्या बाळाचा विचार; व्हिडीओ शेअर करत म्हणाली- "मला मुलीची आशा..."
13
बांगलादेशात उग्र आंदोलन! जमावाने ७ वर्षाच्या मुलीलाही जिवंत जाळलं; हिंसाचारात माणुसकी मेली
14
चांगले संस्कार दिले नाहीत! अल्पवीयन मुलीला छेडणाऱ्या ४ आरोपींच्या आईलाच पोलिसांनी केली अटक
15
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
16
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
17
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
18
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
19
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
20
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
Daily Top 2Weekly Top 5

‘पीक विमा’ हे मोदी सरकारचे हुकमाचे पान

By admin | Updated: February 9, 2016 03:48 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जाहीर सभा देशाला नव्या नाहीत; पण केंद्र सरकारने जाहीर केलेल्या पीक विमा योजनेचे लाभ लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी, खुद्द पंतप्रधानच आता मैदानात उतरत आहेत

- सुरेश भटेवरा,  नवी दिल्लीपंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जाहीर सभा देशाला नव्या नाहीत; पण केंद्र सरकारने जाहीर केलेल्या पीक विमा योजनेचे लाभ लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी, खुद्द पंतप्रधानच आता मैदानात उतरत आहेत. याच विषयाला केंद्रबिंदू बनवून फेब्रुवारीमध्ये त्यांच्या ४ राज्यांत ४ सभा आयोजित करण्यात येणार आहेत. दहा कोटींपेक्षा अधिक सदस्य, योजनांच्या प्रसिद्धीसाठी सरकारचे प्रभावी नेटवर्क, ‘मन की बात’चे देशभर थेट प्रसारण या साऱ्या गोष्टी असताना जाहीर सभांची इतकी मेहनत खुद्द पंतप्रधान कशासाठी करीत आहेत, अशी चर्चा सध्या राजधानीत सुरू आहे.मोदी सरकारची पीक विमा योजना युपीएच्या मनरेगाइतकीच प्रभावी आहे. ग्रामीण जनतेच्या ती दीर्घकाळ लक्षात राहू शकते. पीक विम्याच्या क्रांतिकारी निर्णयाचे सारे श्रेय भाजपलाच मिळायला हवे, असे भाजप नेत्यांना वाटते. पंतप्रधानांच्या ४ सभांमुळे ही योजना ग्रामीण शेतकऱ्यांच्या मनात देशभर ठसवली जाऊ शकते; मात्र पंतप्रधानांच्या सभा जागोजागी आयोजित करण्यामागे केवळ तितकेच कारण नाही. मोदी सरकार सत्तेवर येऊ न २0 महिने उलटले. भाजप आणि केंद्र सरकारने जनतेशी जोडणाऱ्या अनेक योजनांच्या घोषणा या काळात केल्या. त्यापैकी अनेक योजनांची कार्यवाहीही सुरू झाली आहे. तरीही सर्वसामान्य जनतेत मोदी सरकारची प्रतिमा जशी हवी तितकी उंचावली नाही. उलट विरोधकांच्या आरोपांमुळे सरकारच्या विरोधातल्या नकारात्मक प्रचारालाच अधिक महत्त्व मिळत आहे. भू संपादन विधेयकाचे बुमरँग सरकारवर उलटले. केंद्र सरकार फक्त उद्योगपतींचे हितसंबंध सांभाळत असून, ते शेतकऱ्यांच्या विरोधात आहे, असा संदेश त्यातून पोहोचला. दादरीत अखलाकच्या हत्येनंतर भाजप आणि सरकारच्या विरोधात असहिष्णुतेच्या आरोपांचे वातावरण तापत गेले. जनतेच्या मनात साचलेली सरकारविरोधी ही नकारात्मक भावना दूर करण्यासाठी पंतप्रधानांनी पीक विम्याचे निमित्त साधून ग्रामीण जनतेला नव्याने साद घालण्याचे ठरवले आहे.यंदा ५, तर पुढील वर्षी ६ राज्यांत विधानसभेच्या निवडणुका आहेत. यापैकी बहुतांश राज्यांत शेतीचे क्षेत्र मोठे आहे. या राज्यांमधे अपेक्षित यश न मिळाल्यास केंद्राच्या विरोधातील नकारात्मक वातावरण वाढतच जाईल, अशी भीती भाजपला वाटत आहे. त्यापूर्वी विरोधकांचे आरोप खोडून काढण्यासाठी भाजपने पीक विमा योजनेला हुकमाचे पान बनवले असून पंतप्रधानांच्या सभांद्वारे त्याचा प्रभावी प्रचार करण्याचे ठरवले आहे.