शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प प्रशासनाचा नवा नियम! नवीन व्हिसा ऑर्डरनुसार, लठ्ठपणा किंवा मधुमेहामुळे अमेरिकेत प्रवेश मिळणार नाही; इतर आजारांचाही उल्लेख
2
धक्कादायक! ऑनलाइन क्रीम खरेदी केली, महिलेच्या शरीरावर सापासारखे व्रण; १० वर्षांत १२ लाख रुपये खर्च
3
हिवाळी अधिवेशन ८ डिसेंबरपासूनच, दोन आठवड्यांचे कामकाज; २८ नोव्हेंबरपासून सचिवालय नागपुरात, पत्र आले
4
अधिकाऱ्यांना वाचवण्याच्या नादात दोघांचा मृत्यू; सॅण्डहर्स्ट रेल्वे अपघातामध्ये मुलीचा मृत्यू; आई जखमी
5
सरकार कुणालाही पाठीशी घालणार नाही, अहवालात जो दोषी आढळेल त्याच्यावर कारवाई, जमीन घोटाळ्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांची स्पष्टोक्ती
6
Women's World Cup : भारताच्या लेकींसह प्रेक्षकांनीही रचला इतिहास; ते पाहून ICC चा ऐतिहासिक निर्णय!
7
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
8
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
9
पाकिस्तानला बेकायदेशीर अणु कारवायांचा इतिहास, आम्ही ट्रम्प यांच्या विधानाची दखल घेतली: भारत सरकार
10
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
11
माझ्या नवऱ्याला महिन्यापासून दारु पाजून जरांगेविरुद्ध षडयंत्र रचलं; अमोल खुणेंच्या कुटुंबीयांनी सगळंच सांगितलं
12
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
13
IPL 2026 : डेफिनेटली! MS धोनी पुन्हा मैदानात उतरण्यास तयार; CSK च्या ताफ्यातील आतली गोष्ट आली समोर
14
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
15
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
16
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान
17
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक
18
Maharashtra Crime: तुकाराम स्वत:च लपून बसला आणि अपहरणाचा बनाव केला; पण असं का केलं?
19
"धन्या, तू आता पक्का अडकला"; धनंजय मुंडेंचा एकेरी उल्लेख, मनोज जरांगेंनी थेट ऑडिओ क्लिपच ऐकवली
20
AI Industry: 'एआय'चा फुगा फुटू लागला? अमेरिकेमध्ये १.५ लाख लोकांनी नोकऱ्या गमावल्या; गुंतवणूकदारही झाले अलर्ट

शांती, अहिंसा, त्याग हे विश्व कल्याणाचे प्रमुख मार्ग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2018 04:46 IST

सम्यकदर्शन, सम्यकज्ञान, सम्यकचारित्र्य ही तीन रत्ने जैन धर्माची ओळख असून, त्याचा नावलौकिक जगभर आहे. जैन धर्माची तत्त्वे असणा-या शांती, अहिंसा, त्याग हे विश्व कल्याणाचे प्रमुख मार्ग आहेत.

श्रवणबेळगोळ (जि. हासन) : सम्यकदर्शन, सम्यकज्ञान, सम्यकचारित्र्य ही तीन रत्ने जैन धर्माची ओळख असून, त्याचा नावलौकिक जगभर आहे. जैन धर्माची तत्त्वे असणा-या शांती, अहिंसा, त्याग हे विश्व कल्याणाचे प्रमुख मार्ग आहेत. गोमटेश्वर बाहुबली भगवंतांनी सर्व त्याग करून तपश्चर्येचा, त्यागाचा मार्ग अवलंबला. संघर्षाने शांती मिळत नाही हे भगवान बाहुबली यांनी राजत्यागातून सांगितले आहे, असे प्रतिपादन राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी केले.कर्नाटकातील श्रवणबेळगोळ येथे बुधवारी (दि. ७) गोमटेश्वर भगवान बाहुबली मूर्तीच्या ८८ व्या महामस्तकाभिषेक सोहळ्याच्या पंचकल्याण महोत्सवाचे उद्घाटन केल्यानंतर ते बोलत होते. कर्नाटकचे राज्यपाल वजुभाई वाला, मुख्यमंत्री सिद्धरामय्या, माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा, महामस्तकाभिषेक समितीचे अध्यक्ष, कृषिमंत्री ए. मंजू, धर्मस्थळाचे प्रमुख वीरेंद्र हेगडे, भट्टारक पट्टाचार्य चारूकीर्ती स्वामीजी, आचार्य श्री १०८ वर्धमानसागर महाराज, त्यागीगण, महोत्सव समितीचे राष्ट्रीय सचिव सुरेश पाटील उपस्थित होते.श्रवणबेळगोळ येथे महामस्तकाभिषेकसाठी आल्यानंतर एक प्रेरित शक्ती मिळाली. चंद्रगिरी पर्वतावर चंद्रगुप्त मौर्य यांनी सल्लेखना घेतली व आपल्या तपश्चर्येतून जीवन त्याग केला. आजचा महोत्सव हा जैन धर्मीयांचा कुंभमेळा आहे ,असे राष्ट्रपती कोविंद यांनी त्यागींचा, आर्यिकांचा नमस्कार करून आशीर्वाद घेतला. जिनेन्द्र भगवंतांचे पूजनही केले. राज्यपाल वजुभाई वाला म्हणाले, सत्य, अहिंसा, त्याग, अपरिग्रह, ब्रह्मचर्य या सिद्धांताचा अवलंब करून जीवनाचे सार्थक करावे. त्यातूनच खरा सिद्धांत आपल्या जीवनात येईल.मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी भगवान बाहुबली यांनी दिलेला अहिंसेचा संदेश येथून सर्वांनी घेऊन जावा आणि तो अंगीकारावा, असे आवाहन केले.आचार्य वर्धमानसागर यांनी ‘तं गोमटेशं पणमानी णिच्चं’ या प्राकृत भाषेतील वचनाचा दाखल देत सांगितले की, महोत्सवाचे साक्षीदार होण्याचा खूप आनंद होतोय. राज साम्राज्याचा त्याग करून भगवान बाहुबली यांनी दीक्षा घेतली आणि ध्यान साधनेतून मोक्ष प्राप्त केला. या त्यागाच्या संदेशाची आज समाजाला गरज आहे. यावेळी दक्षिण भारत जैन सभेचे सागर चौगुले, अरविंद मजलेकर, बाबा हुपरे, वीर सेवा दल, पदाधिकारी, प्रतिनिधी, श्रावक-श्राविका उपस्थित होते.>उद्घाटनाचा मान राष्ट्रपतींनास्वस्तिश्री चारूकीर्ती भट्टारक स्वामी म्हणाले, कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या व माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा यांनी या महोत्सवासाठी मोठे योगदान दिले आहे. महामस्तकाभिषेक उद्घाटनाचा मान राष्ट्रपतींनाच आहे. १९९३ मध्ये राष्ट्रपती शंकर दयाल शर्मा, २००६ मध्ये डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम आणि यंदाही राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते उद्घाटन झाले आहे.

टॅग्स :Ramnath Kovindरामनाथ कोविंद