शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठा-ओबीसी वाद तापला, मकरंद अनासपुरे यांची मोठी प्रतिक्रिया; सरकारले केले महत्त्वाचे आवाहन
2
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
3
मारुती व्हिक्टोरिसचं खरं माइलेज आलं समोर, 1L पेट्रोलमध्ये फक्त 'एवढंच' धावली; कंपनीनं केलाय 21Kmpl चा दावा!
4
IND vs Oman : टॉस वेळी सूर्याचा झाला 'गजनी'; मग त्याने रोहितच्या नावे फाडलं बिल! नेमकं काय घडलं?
5
जीएसटी कपातीनंतरही गाड्या स्वस्त होणार नाहीत? सणासुदीच्या काळातही डिस्काउंट नाही, 'हे' आहे कारण
6
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
7
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
8
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...
9
जीएसटी कपातीनंतर MRP चा गोंधळ: केंद्र सरकारचा मोठा निर्णय
10
आयटीआर भरताच आरबीआयचा मोठा निर्णय; क्रेडिट कार्डद्वारे करता येणार नाही हे काम...
11
"20 रुपयांच्या 6 ऐवजी फक्त 4 च पाणीपुरी दिल्या..."; गुजरातमध्ये भररस्त्यात महिलेनं सुरू केलं आंदोलन, अन् मग...!
12
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
13
'लवकरच व्यापार करार...', ट्रम्प टॅरिफबाबत परराष्ट्र मंत्रालयाने दिली महत्वाची माहिती
14
IND vs PAK: "जसप्रीत बुमराहला मैदानात.."; सुनील गावसकरांचा एक सल्ला, पाकिस्तानची निघाली लाज
15
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
16
"सकाळी उठा, व्होटर डिलीट करा अन् पुन्हा झोपी जा...", राहुल गांधींचा ECI वर पुन्हा हल्लाबोल; BJP चा पलटवार!
17
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
18
हायव्होल्टेज ड्रामा! २० रुपयांत ६ ऐवजी दिल्या ४ पाणीपुरी; 'ती' ढसाढसा रडली, रस्त्यामध्येच बसली अन्...
19
लवकरच नवी Thar लाँच करण्याच्या तयारीत महिंद्रा, आधीच्या तुलनेत मोठे बदल होणार; जाणून घ्या, किती असणार किंमत?
20
फिटनेस मंत्र! सरळ तर सर्वच चालतात, कधीतरी उलटं चालून पाहा; फक्त ५ मिनिटंही पुरेशी

शांती, अहिंसा, त्याग हे विश्व कल्याणाचे प्रमुख मार्ग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2018 04:46 IST

सम्यकदर्शन, सम्यकज्ञान, सम्यकचारित्र्य ही तीन रत्ने जैन धर्माची ओळख असून, त्याचा नावलौकिक जगभर आहे. जैन धर्माची तत्त्वे असणा-या शांती, अहिंसा, त्याग हे विश्व कल्याणाचे प्रमुख मार्ग आहेत.

श्रवणबेळगोळ (जि. हासन) : सम्यकदर्शन, सम्यकज्ञान, सम्यकचारित्र्य ही तीन रत्ने जैन धर्माची ओळख असून, त्याचा नावलौकिक जगभर आहे. जैन धर्माची तत्त्वे असणा-या शांती, अहिंसा, त्याग हे विश्व कल्याणाचे प्रमुख मार्ग आहेत. गोमटेश्वर बाहुबली भगवंतांनी सर्व त्याग करून तपश्चर्येचा, त्यागाचा मार्ग अवलंबला. संघर्षाने शांती मिळत नाही हे भगवान बाहुबली यांनी राजत्यागातून सांगितले आहे, असे प्रतिपादन राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी केले.कर्नाटकातील श्रवणबेळगोळ येथे बुधवारी (दि. ७) गोमटेश्वर भगवान बाहुबली मूर्तीच्या ८८ व्या महामस्तकाभिषेक सोहळ्याच्या पंचकल्याण महोत्सवाचे उद्घाटन केल्यानंतर ते बोलत होते. कर्नाटकचे राज्यपाल वजुभाई वाला, मुख्यमंत्री सिद्धरामय्या, माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा, महामस्तकाभिषेक समितीचे अध्यक्ष, कृषिमंत्री ए. मंजू, धर्मस्थळाचे प्रमुख वीरेंद्र हेगडे, भट्टारक पट्टाचार्य चारूकीर्ती स्वामीजी, आचार्य श्री १०८ वर्धमानसागर महाराज, त्यागीगण, महोत्सव समितीचे राष्ट्रीय सचिव सुरेश पाटील उपस्थित होते.श्रवणबेळगोळ येथे महामस्तकाभिषेकसाठी आल्यानंतर एक प्रेरित शक्ती मिळाली. चंद्रगिरी पर्वतावर चंद्रगुप्त मौर्य यांनी सल्लेखना घेतली व आपल्या तपश्चर्येतून जीवन त्याग केला. आजचा महोत्सव हा जैन धर्मीयांचा कुंभमेळा आहे ,असे राष्ट्रपती कोविंद यांनी त्यागींचा, आर्यिकांचा नमस्कार करून आशीर्वाद घेतला. जिनेन्द्र भगवंतांचे पूजनही केले. राज्यपाल वजुभाई वाला म्हणाले, सत्य, अहिंसा, त्याग, अपरिग्रह, ब्रह्मचर्य या सिद्धांताचा अवलंब करून जीवनाचे सार्थक करावे. त्यातूनच खरा सिद्धांत आपल्या जीवनात येईल.मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी भगवान बाहुबली यांनी दिलेला अहिंसेचा संदेश येथून सर्वांनी घेऊन जावा आणि तो अंगीकारावा, असे आवाहन केले.आचार्य वर्धमानसागर यांनी ‘तं गोमटेशं पणमानी णिच्चं’ या प्राकृत भाषेतील वचनाचा दाखल देत सांगितले की, महोत्सवाचे साक्षीदार होण्याचा खूप आनंद होतोय. राज साम्राज्याचा त्याग करून भगवान बाहुबली यांनी दीक्षा घेतली आणि ध्यान साधनेतून मोक्ष प्राप्त केला. या त्यागाच्या संदेशाची आज समाजाला गरज आहे. यावेळी दक्षिण भारत जैन सभेचे सागर चौगुले, अरविंद मजलेकर, बाबा हुपरे, वीर सेवा दल, पदाधिकारी, प्रतिनिधी, श्रावक-श्राविका उपस्थित होते.>उद्घाटनाचा मान राष्ट्रपतींनास्वस्तिश्री चारूकीर्ती भट्टारक स्वामी म्हणाले, कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या व माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा यांनी या महोत्सवासाठी मोठे योगदान दिले आहे. महामस्तकाभिषेक उद्घाटनाचा मान राष्ट्रपतींनाच आहे. १९९३ मध्ये राष्ट्रपती शंकर दयाल शर्मा, २००६ मध्ये डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम आणि यंदाही राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते उद्घाटन झाले आहे.

टॅग्स :Ramnath Kovindरामनाथ कोविंद