शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना कधी मध्यस्थी स्वीकारली आणि भविष्यातही स्वीकारणार नाही'; पंतप्रधान मोदींचा ट्रम्प यांना कॉल, काश्मीर मुद्द्यावर स्पष्ट मेसेज
2
"फडणवीसांनी पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या आणि माय मराठीच्या छातीत सुरा भोसकून..."; हिंदी सक्तीवरून काँग्रेस प्रदेशाध्यक्षांची जहरी टीका
3
Israel Iran War : "युद्धाला सुरुवात झालीय, आता कोणतीही दया नाही"; खामेनींनी इस्रायलविरुद्ध केली युद्धाची घोषणा
4
तुकोबांच्या पालखीचे आज प्रस्थान, कोणत्या ठिकाणी कधी पोहोचणार? A टू Z माहिती
5
Technology: SMS ओपन न करताही ते फ्रॉड आहेत की महत्त्वाचे, हे ओळखणे सहज शक्य; वापरा 'ही' ट्रिक!
6
किती आहे तुमचा Cibil Score, लोन मिळवून देऊ शकतो का? समजून घ्या निरनिराळ्या रेंजचा अर्थ
7
अमेरिकेने पाठवली ३० लढाऊ विमाने, ट्रम्प यांनी इराणला दिला बिनशर्त शरणागतीचा प्रस्ताव, खामेनी खवळले, म्हणाले...
8
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! पीएम किसानचा २० वा हप्ता 'या' तारखेला येणार? असे तपासा तुमचे नाव!
9
अमेरिकेनं टॅरिफ लावावा किंवा नाही, चीनवर फरक नाही.., जगासमोर उभं केलं हे मोठं संकट; भारताचं काय होणार?
10
ठाकरेंचा सुपुत्र बॉलिवूड गाजवणार, 'निशांची' सिनेमाचं पोस्टर रिलीज
11
AI Pandharpur Wari: आता पंढरीच्या वारीतही 'एआय दिंडी' पाहायला मिळणार!
12
Team India, IND vs ENG: इंग्लंडविरूद्धच्या पहिल्या कसोटीत 'या' तिघांचा Playing XI मधून होणार पत्ता कट, कॅप्टन गिल मोठा निर्णय घेणार
13
जयदीप अहलावतने दोन आठवड्यामध्ये अंधेरीत खरेदी केलं आणखी एक घर, किंमत आहे कोटींच्या घरात
14
Maharashtra Cabinet: आणीबाणीतील बंदीवानांचे मानधन दुप्पट
15
"हवे ते निर्बंध लादून दहशतवाद्यांना पाठिंबा देणाऱ्या देशांना बक्षीस देता, दुटप्पीपणा चालणार नाही"; PM मोदींचा इशारा
16
Air India Plane Crash: 'टेकऑफसाठी जास्त वेळ अन् ओव्हरलोडिंग', माजी वैमानिकाने दोन मुद्द्यांवर ठेवलं बोट
17
अनेक तर्कवितर्कांनंतर अखेर पंतप्रधान मोदी आणि कॅनडाच्या पंतप्रधानांची भेट, चर्चेत झाला मोठा निर्णय   
18
२५,३०,३५ किती वर्षांचे आहात तुम्ही; रिटायरमेंटवर ५ कोटी हवे असतील तर केव्हापासून, किती करावी लागेल गुंतवणूक?
19
Sant Tukaram Maharaj palkhi 2025: 'ज्ञानोबा तुकाराम'चा जयघोष; तुकोबांच्या पालखी प्रस्थानासाठी देहूनगरी सज्ज
20
सलग दुसऱ्या दिवशी शेअर बाजार 'धडाम'; Sensex २६९ अंकांच्या घसरणीसह उघडला, 'या' वृत्तानं दिलं टेन्शन

शांती, अहिंसा, त्याग हे विश्व कल्याणाचे प्रमुख मार्ग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2018 04:46 IST

सम्यकदर्शन, सम्यकज्ञान, सम्यकचारित्र्य ही तीन रत्ने जैन धर्माची ओळख असून, त्याचा नावलौकिक जगभर आहे. जैन धर्माची तत्त्वे असणा-या शांती, अहिंसा, त्याग हे विश्व कल्याणाचे प्रमुख मार्ग आहेत.

श्रवणबेळगोळ (जि. हासन) : सम्यकदर्शन, सम्यकज्ञान, सम्यकचारित्र्य ही तीन रत्ने जैन धर्माची ओळख असून, त्याचा नावलौकिक जगभर आहे. जैन धर्माची तत्त्वे असणा-या शांती, अहिंसा, त्याग हे विश्व कल्याणाचे प्रमुख मार्ग आहेत. गोमटेश्वर बाहुबली भगवंतांनी सर्व त्याग करून तपश्चर्येचा, त्यागाचा मार्ग अवलंबला. संघर्षाने शांती मिळत नाही हे भगवान बाहुबली यांनी राजत्यागातून सांगितले आहे, असे प्रतिपादन राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी केले.कर्नाटकातील श्रवणबेळगोळ येथे बुधवारी (दि. ७) गोमटेश्वर भगवान बाहुबली मूर्तीच्या ८८ व्या महामस्तकाभिषेक सोहळ्याच्या पंचकल्याण महोत्सवाचे उद्घाटन केल्यानंतर ते बोलत होते. कर्नाटकचे राज्यपाल वजुभाई वाला, मुख्यमंत्री सिद्धरामय्या, माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा, महामस्तकाभिषेक समितीचे अध्यक्ष, कृषिमंत्री ए. मंजू, धर्मस्थळाचे प्रमुख वीरेंद्र हेगडे, भट्टारक पट्टाचार्य चारूकीर्ती स्वामीजी, आचार्य श्री १०८ वर्धमानसागर महाराज, त्यागीगण, महोत्सव समितीचे राष्ट्रीय सचिव सुरेश पाटील उपस्थित होते.श्रवणबेळगोळ येथे महामस्तकाभिषेकसाठी आल्यानंतर एक प्रेरित शक्ती मिळाली. चंद्रगिरी पर्वतावर चंद्रगुप्त मौर्य यांनी सल्लेखना घेतली व आपल्या तपश्चर्येतून जीवन त्याग केला. आजचा महोत्सव हा जैन धर्मीयांचा कुंभमेळा आहे ,असे राष्ट्रपती कोविंद यांनी त्यागींचा, आर्यिकांचा नमस्कार करून आशीर्वाद घेतला. जिनेन्द्र भगवंतांचे पूजनही केले. राज्यपाल वजुभाई वाला म्हणाले, सत्य, अहिंसा, त्याग, अपरिग्रह, ब्रह्मचर्य या सिद्धांताचा अवलंब करून जीवनाचे सार्थक करावे. त्यातूनच खरा सिद्धांत आपल्या जीवनात येईल.मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी भगवान बाहुबली यांनी दिलेला अहिंसेचा संदेश येथून सर्वांनी घेऊन जावा आणि तो अंगीकारावा, असे आवाहन केले.आचार्य वर्धमानसागर यांनी ‘तं गोमटेशं पणमानी णिच्चं’ या प्राकृत भाषेतील वचनाचा दाखल देत सांगितले की, महोत्सवाचे साक्षीदार होण्याचा खूप आनंद होतोय. राज साम्राज्याचा त्याग करून भगवान बाहुबली यांनी दीक्षा घेतली आणि ध्यान साधनेतून मोक्ष प्राप्त केला. या त्यागाच्या संदेशाची आज समाजाला गरज आहे. यावेळी दक्षिण भारत जैन सभेचे सागर चौगुले, अरविंद मजलेकर, बाबा हुपरे, वीर सेवा दल, पदाधिकारी, प्रतिनिधी, श्रावक-श्राविका उपस्थित होते.>उद्घाटनाचा मान राष्ट्रपतींनास्वस्तिश्री चारूकीर्ती भट्टारक स्वामी म्हणाले, कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या व माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा यांनी या महोत्सवासाठी मोठे योगदान दिले आहे. महामस्तकाभिषेक उद्घाटनाचा मान राष्ट्रपतींनाच आहे. १९९३ मध्ये राष्ट्रपती शंकर दयाल शर्मा, २००६ मध्ये डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम आणि यंदाही राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते उद्घाटन झाले आहे.

टॅग्स :Ramnath Kovindरामनाथ कोविंद