शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
2
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
3
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
4
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
5
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
6
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
7
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
8
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
9
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
10
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
11
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
12
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
13
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
14
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
15
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
16
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
17
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
18
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
19
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
20
प्यारवाली लव्हस्टोरी! ब्रेकअपनंतर शोधला डिजिटल पार्टनर; चक्क AI बॉयफ्रेंडसोबत बांधली लग्नगाठ
Daily Top 2Weekly Top 5

कारगिल युद्धातील शहिद सैनिकाच्या मुलीचा शांततेचा संदेश

By admin | Updated: May 2, 2016 13:15 IST

कारगिल युद्धातील शहिद कॅप्टन मनदीप सिंग यांची मुलगी गुरमेहर कौरने फेसबुकवर 4 मिनिटांचा व्हिडिओ शेअर केला आहे ज्यामधून तिने शांततेचा संदेश दिला आहे

ऑनलाइन लोकमत - 
नवी दिल्ली, दि. 02 - कारगिल युद्धात अनेक सैनिकांना देशासाठी लढतना वीरमरण आलं. पाकिस्तानसोबत झालेल्या या युद्धानंतर अनेकजण पाकिस्तानचा तिरस्कार करु लागले. मात्र कारगिल युद्धात शहिद झालेल्या जवानांच्या कुटुंबियांना काय वाटत असेल ? त्यांच्या नेमक्या काय भावना असतील ? असा विचार कधी कोणी केला असेल का ?. नेमकी हीच गोष्ट सांगण्याचा प्रयत्न कारगिल युद्धातील शहिद कॅप्टन मनदीप सिंग यांची मुलगी गुरमेहर कौरने केला आहे. गुरमेहरने फेसबुकवर 4 मिनिटांचा व्हिडिओ शेअर केला आहे ज्यामधून तिने शांततेचा संदेश दिला आहे. महत्वाचं म्हणजे गुरमेहरने एकही शब्द न बोलता आपला संदेश दिला आहे.
 
1999मध्ये झालेल्या कारगिल युद्धात कॅप्टन मनदीप सिंग शहीद झाले होते. त्यावेळी गुरमेहर फक्त 2 वर्षांची होती. आपल्या मनात त्यावेळी पाकिस्तान आणि मुस्लिमांविरोधात निर्माण झालेला द्वेष आणि त्यामुळे एका मुस्लिम महिलेवर केलेला हल्ला या आठवणी गुरमेहरने शेअर केल्या आहेत. माझ्या वडिलांच्या मृत्यूला मी पाकिस्तान आणि मुस्लिमांना जबाबदार मानत होते. पण माझ्या आईने माझी समजूत काढली आणि सांगितलं की याला फक्त युद्ध जबाबदार आहे इतर कोणी नाही असं गुरमेहरने सांगितलं आहे.
गुरमेहरने काहीही न बोलता फलकाच्या आधारे आपला संदेश दिला आहे. 30 फलकांचा वापर करुन तिने आपला शांततेचा संदेश पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे.
 
वडील असण्यापेक्षा वडील नसल्याच्या जास्त आठवणी माझ्यासोबत असल्याचं दुख:देखील गुरमेहरने व्यक्त केले आहे. पण तरीही मी माझ्या वडिलांप्रमाणे सैनिक असून दोन्ही देशांतील शांततेसाठी मी लढणार आहे. दोन्ही देशातील सरकारने फक्त आव आणण्याऐवजी समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न करावा असं आवाहन गुरमेहरने केले आहे.