शहरं
Join us  
Trending Stories
1
जगदीप धनखड यांचा उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा; प्रकृतीच्या कारणास्तव निर्णय
2
आजचे राशीभविष्य, २२ जुलै २०२५: 'या' २ राशींसाठी लाभदायी दिवस, अचानक धनलाभ होईल
3
'आम्ही अणुकार्यक्रम सुरूच ठेवणार', युरोपीय देशांशी चर्चेपूर्वी इराणचा अमेरिकेला संदेश
4
पहिला दिवस गोंधळाचा; विरोधक झाले आक्रमक; पहलगाम हल्ला ते बिहार मतदारयादीवरून गोंधळ 
5
शाळेवर विमान कोसळून २० ठार; बांगलादेशात अहमदाबादची पुनरावृत्ती!
6
एअर इंडिया विमानाचे तीन टायर फुटले; विमानतळावर लँडिंगच्या वेळी पावसामुळे विमानाने धावपट्टी सोडली
7
मुख्यमंत्र्यांनी कोकाटेंना सुनावले; जे काही घडले ते भूषणावह नाही!
8
अंधेरी मेट्रो स्थानकात गळती; पाणी गोळा करण्यासाठी बादल्यांचा वापर
9
भाजपचा नवा फॉर्म्युला; प्रत्येक आमदाराची पाच कामे होणार! पालिका निवडणुकीसाठी रणनीती
10
परिचारिकांच्या संपामुळे पाच दिवसांपासून रुग्णांचे हाल; नियमित शस्त्रक्रियाही पूर्णपणे बंद
11
विधवा महिलेस १.२० लाखात गुजरातेत विकले, दोन वर्षांनी पुत्रप्राप्तीनंतर आणून गावात सोडले!
12
शेअर ट्रेडिंगच्या बहाण्याने वृद्धेसह पायलटला १० कोटींचा गंडा; बनावट ॲपचा वापर करून लावला चुना
13
६३ खासदार म्हणतात, न्या. वर्मांना पदावरून हटवा! कारण काय?
14
संपादकीय : नामुष्कीचा बॉम्ब, १९ वर्षांनंतरही पोलिसांच्या तपासावर प्रश्नचिन्ह
15
विशेष लेख : कुणी काय खावे, याच्याशी सरकारचा काय संबंध?
16
महाराष्ट्रातील ४ लाख शेतकरी लाभार्थी यादीतून झाले गायब; लाभार्थी १०.२ लाखांवरून केवळ १५ हजारांवर
17
स्थानके चकाचक, डेपो मात्र घाण; एस.टी.च्या स्वच्छता अभियानात १४९ बसस्थानके नापास
18
धनखड यांचा राजीनामा, आता पद कोण सांभाळणार, नव्या उपराष्ट्रपतींची निवड कशी होणार? अशी आहे संपूर्ण प्रक्रिया
19
सूरज चव्हाण यांची अखेर हकालपट्टी; छावा कार्यकर्त्यांना मारहाण भोवली
20
आम्हाला तोंड उघडण्यास भाग पाडू नका; ईडी.. तुमचा राजकीय वापर का हाेतोय?

पगारी भिकारी गाणार मोदी सरकारचे गुणगान!

By admin | Updated: August 10, 2015 01:23 IST

कायम कुचेष्टेचा विषय ठरणाऱ्या भिकाऱ्यांना मोदी सरकारने ‘अच्छे दिन’ आणण्याचे ठरविले आहे. माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने तीन हजार भिकाऱ्यांची रोजगार भरती

नवी दिल्ली : कायम कुचेष्टेचा विषय ठरणाऱ्या भिकाऱ्यांना मोदी सरकारने ‘अच्छे दिन’ आणण्याचे ठरविले आहे. माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने तीन हजार भिकाऱ्यांची रोजगार भरती करताना त्यांच्याकडे सरकारी योजनांची माहिती जनतेपर्यंत सोपविण्याची मोठी जबाबदारीची योजना आखली आहे.तर सावधान! तुमच्या शहरात आता आगळेवेगळे भिकारी येऊ लागतील. त्यांच्या अंगावर चिंध्या असतील किंवा सिल्कचे झबले असतील. त्यांच्या तोंडी नर्सरी गीत, भजने, भावगीते यापैकी काहीही नसेल असेल ते मोदी सरकारचे यशोगान. मोदी सरकारच्या उपलब्धींकडे लक्ष वेधण्याची ही अभिनव कल्पना अर्थमंत्री अरुण जेटली यांच्या अखत्यारीतील माहिती आणि प्रसारण मंत्रालय प्रत्यक्षात उतरवणार आहे. धावत्या रेल्वेतही हे भिकारी मोदीगीत गाताना दिसतील. ‘स्वच्छ भारत’ ते ‘मेक इन इंडिया’प्रमाणे भिकाऱ्यांच्या रोजगार भरतीची योजनाही अनोखी ठरणार आहे.मोदी सरकारने सुरू केलेल्या विविध उपक्रमांची माहिती लक्षवेधी गाण्यातून गाताना सरकारची प्रशंसा करण्यासाठी भिकाऱ्यांना दरमहा वेतन दिले जाईल. रेल्वे प्रवाशांची भिकाऱ्यांकडून होणारी करमणूक हे दैनंदिन चित्र आता बदलून जाईल. भिकाऱ्यांच्या तोंडून हमखास ऐकू येणाऱ्या ‘आवारा हूँ’ आणि ‘चलती का नाम गाडी’ यांसारख्या जुन्या चित्रपट गीतांची जागा नव्या गाण्यांनी घेतलेली असेल. स्किल इंडिया, बेटी बचाओ, बेटी पढाओ यांसारख्या सरकारी योजनांची गाणी ऐकायला येतील. मध्ययुगीन युरोपमध्ये किंवा बंगालमध्ये भिकाऱ्यांचा वापर केला जायचा. त्याच धर्तीवर उपयोगात आणल्या जाणाऱ्या भिकाऱ्यांना मोफत प्रवासाचा आनंद घेता येईल. मोदी सरकारच्या महत्त्वांकाक्षी योजनांची माहिती मौखिक आणि लेखी स्वरूपात दिली जाईल. व्यापक जनजागृतीसाठी तळागाळात मोहीम राबविताना सरकार पथनाट्ये आणि रस्त्याच्या कडेला भरविल्या जाणाऱ्या जादूच्या प्रयोगांसारख्या कार्यक्रमांचाही वापर करू शकते. (लोकमत न्यूज नेटवर्क)