शहरं
Join us  
Trending Stories
1
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
2
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
3
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
4
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
5
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
6
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
7
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
8
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश
9
उन्हाचा कहर; सातारा ४०.७ अंशावर स्थिर! झळा असह्य, पूर्व भागात नागरिकांना घामाच्या धारा 
10
अवघ्या १२०० रुपयांत दिली पतीला अद्दल घडविण्याची सुपारी! पत्नीनेच रचला पतीला लुटण्याचा 'प्लॅन'
11
सामाजिक समता प्रस्थापित करण्याच्या दिशेने जातिनिहाय जनगणनेचा निर्णय महत्त्वाचा: अजित पवार
12
वेळ वाया घालवू नका, थेट कारवाई करा; पहलगाम हल्याबाबत राहुल गांधींची सरकारला मागणी
13
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
14
जातनिहाय जनगणना; अमित शाह म्हणाले ऐतिहासिक निर्णय, ओवेसी म्हणाले भाजपनं दलित मुस्लिमांसाठी...'
15
“सर्वच प्रश्न सुटतील, योग्य न्याय मिळेल”; जातिनिहाय जनगणना निर्णयाचे छगन भुजबळांकडून स्वागत
16
पुढच्या हंगामात खेळणार का? MS धोनीनं प्रश्न विचारणाऱ्या डॅनी मॉरिसनचीच घेतली फिरकी (VIDEO)
17
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
18
दुकानदाराच्या डोळ्यात मिरची पूड टाकून ५० हजार रुपये लुटले, संपूर्ण प्रकार कॅमेऱ्यात कैद!
19
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
20
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच

पवारांना ‘मध्यावधी’ची दिवास्वप्ने

By admin | Updated: June 8, 2017 00:19 IST

महाराष्ट्राची वाटचाल मध्यावधी निवडणुकीकडे होत असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे मत भाजपला मान्य नाही

हरीश गुप्ता । लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : महाराष्ट्राची वाटचाल मध्यावधी निवडणुकीकडे होत असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे मत भाजपला मान्य नाही. ‘‘पवार साहेबांना दिवसा स्वप्न पडत आहेत. त्यांचा पक्ष महाराष्ट्रात आणि केंद्रात भूमिका बजावता येईल का हे पाहतोय. शिवसेना भाजपचा हात सोडून देईल व आपल्या पक्षाला राजकीय भूमिका मिळेल, असा त्यांचा विचार आहे. परंतु यापैकी काहीही घडणार नाही,’’ असे भाजपच्या वरिष्ठ सरचिटणीसाने नाव न सांगण्याच्या अटींवर सांगितले. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राज्याला अतिशय योग्यरित्या हाताळत आहेत. जर त्यांनी आॅक्टोबरमध्ये पॅकेज घोषित करण्याचा निर्णय घेतला असेल तर त्यावेळी मान्सून जवळपास संपलेला असतो हे विचारात घेऊन. शेतकऱ्यांचे जे तातडीचे प्रश्न आहेत ते सुटतील अशी अपेक्षा आहे आणि त्यांना नुकसान भरपाई मिळण्यासाठी मान्सूननंतर योग्य मूल्यमापन होईल, असेही हा नेता म्हणाला. भ्रष्टाचाराच्या प्रकरणांचा तपास यंत्रणांकडून सतत पाठपुरावा होत असल्यामुळे शरद पवार काळजीत पडले आहेत. सक्त वसुली संचालनालयाने (ईडी) आधीच अजित पवारांची चौकशी केली असून संयुक्त पुरोगामी आघाडी (युपीए) सरकारच्या कारकिर्दीतील विमान खरेदीसंदर्भात केंद्रीय गुप्तचर खात्याने (सीबीआय) प्रथम माहिती अहवाल (एफआयआर) दाखल केला आहे, असे हा नेता म्हणाला. >राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत सेनेची साथशिवसेनेशी सलोख्याचे संबंध असल्याचे भाजपाचे अध्यक्ष अमित शाह यांनी गेल्या आठवड्यात पत्रकारांच्या छोट्या गटाशी बोलताना सांगितले होते. राष्ट्रपतीपदासाठी होणाऱ्या निवडणुकीत भाजपाच्या उमेदवाराला शिवसेना मत देईल, याची भाजपाच्या नेतृत्वाला खात्री आहे. याआधी राष्ट्रपतीपदासाठी झालेल्या दोन निवडणुकांत शिवसेनेने भाजपाच्या उमेदवाराला मत दिले नव्हते, हे येथे नमूद करायला हवे; परंतु मोदी-अमित शाह यांच्या टीमला शिवसेना भाजपाच्या उमेदवाराला मत देईल, याची खात्री आहे.