शहरं
Join us  
Trending Stories
1
पावसामुळे लोकल ठप्प, स्टेशनवर प्रवाशांची गर्दी; मुंबईकरांचे प्रचंड हाल, घरी परतण्यासाठी तारांबळ
2
India Cotton Imports: केंद्र सरकारने कापूस आयातीवरील सीमा शुल्क हटवले; कुणाला फायदा?
3
Monorail: मोठी बातमी! मुंबईत प्रवाशांनी भरलेली मोनो रेल्वे मध्येच बंद पडली, प्रवासी अडकले; काच ब्रेक करण्याचे प्रयत्न सुरू (Video)
4
मुंबईसह राज्यात २० ऑगस्टपासून पावसाचा जोर ओसरणार; हवामान खात्याचा अंदाज, १२ तासांसाठी रेड अलर्ट
5
महिंद्राच्या कर्मचाऱ्याने महिला खासदाराला दिली अत्याचार, मारण्याची धमकी; कंपनी म्हणते...
6
Mumbai Rain Mithi River: दोरी फेकली, पण अंदाज चुकला; मिठी नदीच्या पुरात तरुण गेला वाहून
7
सुदर्शन रेड्डींमुळे चंद्राबाबू-जगन मोहन यांच्यासमोर धर्म संकट; उपराष्ट्रपतिपदासाठी विरोधकांची खेळी
8
आता आणखी दोन नव्या कलर ऑप्शन्ससह आली Tata Punch EV, मिळणार फास्ट चार्जिंग स्पीड! असे आहेत सेफ्टी फीचर्स
9
राहुल गांधींच्या गाडीची पोलिसाला धडक, 'ही तर जनतेला चिरडणारी यात्रा', भाजपची बोचरी टीका
10
कुत्र्याला वाचवण्याच्या प्रयत्नात पोलीस अधिकाऱ्याचा जीव गेला; रस्त्यावर पडताच कारने चिरडले
11
"मी सुरक्षित आहे..." १३ दिवसांनी अर्चना तिवारीचा आईला फोन; बेपत्ता होण्यामागचं रहस्य उलगडणार?
12
निमिषा प्रियासाठी सरकार जनतेकडून ८ कोटी मागत आहे? परराष्ट्र मंत्रालयाने सत्य सांगितले
13
याला म्हणतात शेअर...! 24 तासांत 1 लाखाचे केले 88 लाख, एवढी तेजी आली की ट्रेडिगच थांबवावी लागली! नेमकं काय घडलं?
14
जिओने खिसा कापला...! १ जीबी, २८ दिवसांचा प्लॅन बंद केला; आता २९९ रुपये मोजावे लागणार
15
काँग्रेसने ज्या 'ट्विट'वरून निवडणूक आयोगाची गचांडी धरली, ती पोस्टच डिलीट; संजय कुमारांनी माफी का मागितली?
16
ऑनलाइन बेटिंग आता दंडनीय गुन्हा, केंद्रीय मंत्रिमंडळाचा गेमिंग विधेयकाला हिरवा कंदील
17
India Squad For Asia Cup 2025: संघ ठरला! सूर्याच्या नेतृत्वाखाली गिलकडेही आली मोठी जबाबदारी, कुणाला मिळाली संधी?
18
Viral Video : तरुणीने ट्रक चालकाशी बांधली लग्नगाठ; स्वतः सांगितलं भन्नाट कारण! व्हिडीओ होतोय व्हायरल
19
KBC च्या हॉट सीटवर अमिताभ बच्चन यांच्यासोबत खेळण्याची सुवर्णसंधी! BHIM App वर अशी करा नोंदणी
20
पत्नीचा संशयास्पद मृत्यू, अनेक महिलांशी संबंध...निळ्या ड्रम प्रकरणातील आरोपी प्रियकराचा 'कारनामा'

पवार यांनी बीसीसीआयची निवडणूक लढवावी

By admin | Updated: February 3, 2015 01:18 IST

बीसीसीआयचे माजी अध्यक्ष शरद पवार यांनी अध्यक्षपदासाठी पुन्हा निवडणूक लढवावी, अशी विनंती मान्यता नसलेल्या क्रिकेट असोसिएशन आॅफ बिहारचे सचिव आदित्य वर्मा यांनी केली आहे.

नवी दिल्ली : बीसीसीआयचे माजी अध्यक्ष शरद पवार यांनी अध्यक्षपदासाठी पुन्हा निवडणूक लढवावी, अशी विनंती मान्यता नसलेल्या क्रिकेट असोसिएशन आॅफ बिहारचे सचिव आदित्य वर्मा यांनी केली आहे. आयपीएल स्पॉट फिक्सिंग वादामध्ये याचिकाकर्ते असलेले वर्मा यांनी श्रीनिवासन गटाला न्यायालयात खेचले. त्यामुळे आयसीसीचे चेअरमन असलेल्या श्रीनिवासन यांना बीसीसीआयच्या निवडणुकीमध्ये सहभागी होण्यापासून रोखले. वर्मा म्हणाले,‘मी पवार यांना निवडणूक लढविण्याची विनंती केली. बीसीसीआय बुडणारे जहाज असून केवळ पवार हेच त्याला पुनर्जीवन देऊ शकतात. त्यांना प्रशासनाचा चांगला अनुभव असून अधिकारी म्हणून ते विश्वासपात्र आहेत.’बीसीसीआयचे निर्वासित अध्यक्ष एन. श्रीनिवासन यांनी मर्जीतील युनिट्सची गुरुवारी ( दि.५) चेन्नई येथे अनौपचारिक बैठक बोलविली आहे. या बैठकीत ते भविष्यातील वाटचालीचे डावपेच आखतील, अशी शक्यता आहे.अत्यंत विश्वासू संलग्न संघटनांच्या प्रतिनिधींची ही बैठक असल्याने या बैठकीला ‘कोअर कमिटी’ बैठक असेही संबोधले जात आहे. याच दिवशी आमसभेची तारीख आणि भविष्यातील डावपेच निश्चित केले जातील. श्रीनिवासन यांची बीसीसीआयमधील पुढील भूमिका देखील याच दिवशी समजून येईल, असे चेन्नईला जाणाऱ्या बीसीसीआयच्या एका वरिष्ठ पदाधिकाऱ्याने सांगितले.या बैठकीला सचिव संजय पटेल आणि अंतरिम अध्यक्ष शिवलाल यादव हे उपस्थित राहणार असले तरी संयुक्त सचिव अनुराग ठाकूर यांना उपस्थित राहण्यास कळविण्यात आलेले नाही. दिल्ली विधानसभेची ७ तारखेला निवडणूक असल्याने ठाकूर हे राजधानीत तळ ठोकून आहेत. पण श्रीनिवासन यांनी आपल्याला प्रस्तावित बैठकीची माहिती दिली नसल्याबद्दल त्यांनी आश्चर्य व्यक्त केले. अन्य पदाधिकाऱ्यांकडून त्यांना ही माहिती मिळाली. संयुक्त सचिव या नात्याने कार्यकारी मंडळात ठाकूर महत्त्वपूर्ण व्यक्ते आहेत. तरीही त्यांना डावलण्यात आले. स्पॉट फिक्सिंग वाद चव्हाट्याव आला आणि त्यात जावई गुरुनाथ मयप्पन याला अटक झाल्यानंतर ठाकूर यांनी श्रीनिवासन यांना पदावरून पायऊतार होण्याची सूचना केली होती. स्पष्टवक्ते असलेले ठाकूर यापुढे श्रीनिवासन यांच्या गटात राहू शकणार नाहीत, असे सूत्रांनी सांगितले. बीसीसीयच्या ज्येष्ठ पदाधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार उपाध्यक्ष राजीव शुक्ला आणि आसाम संघटनेचे सचिव बिकास बरुआ यांना श्रींनी आमंत्रित केले आहे. (वृत्तसंस्था)शुक्ला अध्यक्षपदाचे दावेदारराजीव शुक्लादेखील पुढील अध्यक्षपदाचे दावेदार मानले जातात, पण त्यासाठी पूर्व विभागाकडून त्यांना पाठिंबा हवा आहे. पण सोमवार सायंकाळपर्यंत क्रिकेट असोसिएशन आॅफ बंगालला चेन्नईच्या बैठकीचे निमंत्रण मिळाले नव्हते.अनुराग ठाकूर बाहेर पडणारअनुराग ठाकूर हे सध्याच्या कार्यकारिणीत बलाढ्य मानले जातात. श्रीनिवासन यांच्या कृतीमुळे डावलण्यात आलेले संयुक्त सचिव ठाकूर लवकरच श्रीनिवासन गटातून बाहेर पडतील, ही चर्चा ऐकायला मिळाली.