शहरं
Join us  
Trending Stories
1
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
2
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
3
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
4
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
5
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
6
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
7
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
8
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
9
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
10
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
11
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
12
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...
13
अमरावतीची 'हवा'च न्यारी! देशात डंका, राष्ट्रीय स्तरावर पटकावला पहिला क्रमांक
14
उपराष्ट्रपती निवडणुकीत 'क्रॉस व्होटिंग'च्या संशयाची सुई; कोणत्या खासदारांनी ऐनवेळी पलटी मारली?
15
भरणी श्राद्ध २०२५: गुरुवारी भरणी श्राद्ध, एकदा करावे की दरवर्षी? अधिकार कोणाला आणि नियम काय?
16
भारतीय अर्थव्यवस्था सुसाट! टॅरिफचा धाक दाखवणाऱ्या अमेरिकेला 'फिच' रिपोर्टने धक्का! इतका वाढणार जीडीपी
17
भयंकर! नेपाळनंतर फ्रान्समध्ये सरकारविरुद्ध मोठं आंदोलन; रस्त्यावर जाळपोळ अन् तोडफोड
18
जिच्यासाठी माजी उपसरपंच गोविंद बर्गे यांनी आयुष्य संपवलं, ती पूजा गायकवाड कोण?
19
मस्तच! नवरात्रात कन्या पूजनानंतर मुलींना द्या 'ही' यूजफुल गिफ्ट्स; आनंदाने उजळतील चिमुकल्यांचे चेहरे
20
फुलांचा गजरा माळून गेली आणि फसली, ऑस्ट्रेलियात भारतीय अभिनेत्रीवर कारवाई, नेमकं कारण काय?  

अतिरेक्याच्या देशभक्त वडिलांचा देशाला अभिमान

By admin | Updated: March 10, 2017 06:32 IST

जो देशाचा झाला नाही, तो माझा कसा होईल? भारताच्या सुरक्षिततेवर हल्ला चढवणारा माझा मुलगा असूच शकत नाही. अशा गद्दाराशी माझे नातेच नाही. सैफुल्लाला अल्लाही माफ करणार

- सुरेश भटेवरा, नवी दिल्ली

जो देशाचा झाला नाही, तो माझा कसा होईल? भारताच्या सुरक्षिततेवर हल्ला चढवणारा माझा मुलगा असूच शकत नाही. अशा गद्दाराशी माझे नातेच नाही. सैफुल्लाला अल्लाही माफ करणार नाही. त्याच्या मृतदेहाचा चेहरा पाहण्याची आमची इच्छा नाही. त्याचा मृतदेह आम्हाला नको, असा निर्णय माझ्या कुटुंबाने घेतला आहे... हे उद्गार आहेत लखनौ येथे दहशतवादविरोधी पथकाच्या कारवाईत मारला गेलेल्या दहशतवादी मोहम्मद सैफुल्लाचे वडील सरताज यांचे. सैफुल्लाच्या वडिलांच्या वरील विधानांचा गृहमंत्री राजनाथसिंहांनी लोकसभेत गौरवपूर्ण उल्लेख केला. ते म्हणाले, सैफुल्लाच्या पित्याच्या देशभक्तीचा संसदेलाच नव्हे, तर साऱ्या देशाला अभिमान वाटतो. लखनऊ चकमकीची चौकशी एनआयए करेल. मात्र तत्पूर्वी सैफुल्लाचे वडील व कुटुंबीय यांना सभागृहाची सहानुभूती आहे. मध्य प्रदेशात रेल्वेमध्ये बॉम्बस्फोट झाला. १0 प्रवासी जखमी झाले असून, कोणीही चिंताजनक नाही.असे सांगून गृहमंत्री म्हणाले, मध्य प्रदेश व उत्तर प्रदेश पोलिसांतील समन्वयाुमळे मोठा संभाव्य घातपात टाळता आला. या प्रकरणाची चौकशी एनआयएकडे सोपवली आहे. आतापर्यंत ६ जणांना अटक करण्यात आली आहे. स्फोट घडवण्यासाठी आयईडी चा वापर केला गेला होता.मध्य प्रदेशातून चार व उत्तर प्रदेशातून तीन संशयितांना अटक केल्यानंतर सैफुल्लाची माहिती मिळाली. त्याआधारे तिथे दडून बसला होता त्या घराला वेढा घालण्यात आला. सैफुल्लाने आत्मसमर्पण करावे यासाठी प्रयत्न केल.े मात्र त्याने पोलिसांवर बेछूट गोळीबार सुरू केला. त्यानंतरच्या कारवाईत सैफुल्ला मारला गेला. सैफुल्लाचे पिता सरताज म्हणाले, मला तीन मुले असून सैफुल्ला हा सर्वात धाकटा. तो बीकॉम झाला आणि अकौंटन्सीचे काम शिकल्यानंतर हिशेबनीसाचे काम करीत होता. पण त्याचे कामात मन लागत नव्हते. सौदी अरबला जाण्याची त्याची इच्छा होती. माझा मुलगा देशाचा गद्दार निघाला. त्याच्या विचित्र उद्योगांविषयी मला जराशी जरी कल्पना असती, तर मी त्याला पोलिसांच्या हवाली केले असते. साऱ्या जगाने हा प्रकार पाहिला असता. सैफुल्लाच्या हातून चांगले कृ त्य घडले नाही, याचे मला तीव्र दु:ख आहे.मुस्लिमांना लक्ष्य बनवून दहशतवादी कृत्यांशी जोडणाऱ्यांच्या तोंडावर सरताज यांच्या निवेदनाने चपराक दिली आहे. गृहमंत्र्यांनी सरताजचा गौरवपूर्ण उल्लेख केला, हे योग्यच झाले अशी प्रतिक्रिया संसदेत सर्वपक्षीय सदस्यांनी व्यक्त केली.