शहरं
Join us  
Trending Stories
1
कैमूरमध्ये मतमोजणीदरम्यान मोठा हिंसाचार; पोलिसांचा लाठीचार्ज, दगडफेकीत ३ पोलीस जखमी, स्कॉर्पिओ जाळली
2
कोपरगावजवळ भीषण अपघात; लक्झरी बसच्या धडकेत कार जळून खाक, चालकाचा जागीच मृत्यू
3
बिहारचा निकाल खरोखरच धक्कादायक; पराभवाची सखोल समीक्षा करणार: राहुल गांधी
4
२०१५ ते २०२५.... संघ सक्रियतेनंतर बिहारमध्ये भाजपचा ‘ग्राफ’ वर!
5
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
6
कर्ज फेडण्यासाठी इंजिनिअरच्या मुलानेच रचले स्वतःच्या अपहरणाचे नाटक; ५० लाखांची खंडणी मागितली अन्... 
7
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
8
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
9
Travel : भारताचे १०००० रुपये घेऊन जा आणि मनसोक्त फिरा 'हा' देश! संस्कृती, शॉपिंग सगळ्यासाठी बेस्ट
10
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
11
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
12
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
13
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
14
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
15
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
16
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
17
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
18
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
19
बिबट्याने घेतला नरडीचा घोट; पाच वर्षाच्या रियांकाचा शाळेच्या पाठीमागे मिळाला मृतदेह
20
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
Daily Top 2Weekly Top 5

पटनाईक, जयललिता NDA ला पाठिंबा देणार?

By admin | Updated: May 14, 2014 13:00 IST

भाजपा प्रणित एनडीए बहुमताच्या जवळ जाणार हे निश्चित झाले असताना बिजू जनता दल व जयललिता यांचा एआयडीमेके हे पक्षही एनडीएमध्ये सामील होण्याचे संकेत मिळाले आहेत.

ऑनलाइन टीम
भुवनेश्वर, दि. १४ - भाजपा प्रणित एनडीए बहुमताच्या जवळ जाणार हे निश्चित झाले असताना बिजू जनता दल व जयललिता यांचा एआयडीमेके हे पक्षही एनडीएमध्ये सामील होण्याचे संकेत मिळाले आहेत. तसे झाले तर एनडीएला सरकार स्थापन करण्यात कोणतीही अडचण येणार नाही असे राजकीय निरीक्षकांचे मत आहे. बीजेडीला या निवडणुकीत १५ जागा तर जयललितांच्या एआयडीएमकेला २५ जागा मिळण्याची शक्यता एग्झिट पोल्समध्ये व्यक्त झाली आहे. त्यामुळे रालोआला किमान अंदाजित असलेल्या २५० जागा जिंकता आल्या तरी बीजेडी व एआयएडीमेकेच्या एकूण ४० जागांच्या आधारे २७२चा पल्ला आरामात पार पाडता येणार आहे.
बिजू जनता दलाचे प्रमुख नवीन पटनाईक यांनी आपला पक्ष काँग्रेस व भाजपा या दोघांशीही समान अंतर राखून असल्याचे सांगितले. याआधी नरेंदर मोदी हे पंतप्रधान बनण्यायोग्य नसल्याचे विधान पटनाईक यांनी केले होते, त्याचप्रमाणे तिस-या आघाडीची चाचपणीही पटनाईक यांनी केली होती. परंतु आता मात्र बीजेडीतील एका ज्येष्ठ नेत्याने ओडिशाला विशेष राज्याचा दर्जा देण्याची मागणी असल्याचे सांगितले. तसेच नवीन सरकारला विशिष्ट अटीवर पाठिंबा दर्शवण्याची आपली तयारी असल्याचे त्यांनी सुचित केले. त्यामुळे ओडिशाला विशेष राज्याचा दर्जा देण्याची माणी मान्य केली तर भाजपा प्रणित रालोआला बीजेडी पाठिंबा देऊ शकते असे दिसत आहे.
दरम्यान, जयललिता व नरेंद्र मोदी यांचे परस्पर संबंध अत्यंत चांगले असून एआयडीएमके हा पक्ष रालोआला पाठिंबा देऊ शकतो असे त्यांनी सुचित केले. मोदी यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ ग्रहण केली त्यावेळी जयललिता उपस्थित होत्या. याशिवायही या दोघांमध्ये चांगले संबंध असल्याचे अनेकवेळा समोर आले आहे. त्यामुळे मजबूत स्थितीत असलेल्या रालोआला एआयडीएमके पाठिंबा देऊ शकतो अशी शक्यता राजकीय तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. जर बीजेडी व एआयडीएमके रालोआमध्ये सामील झाले तर २७२ चा आकडा आरामात पार होईल असा कयास असून, नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील सरकार स्थापन होईल असे स्पष्ट दिसत आहे.