शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानला घरात घुसून मारले! १०० हून अधिक दहशतवादी ठार; पहलगाम हल्ल्याचा घेतला बदला
2
रात्री उशिरा पाकिस्तानी पंतप्रधानांनी त्यांच्या देशाला संबोधित केले; भारताला दिली धमकी...
3
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी निवडले ‘सिंदूर’ नाव; दडले आहेत कोणते पाच अर्थ? 
4
भारताच्या हल्ल्याला प्रत्युत्तरासाठी पाकची लष्कराला परवानगी
5
अर्ध्या तासात दहशतवादी भुईसपाट; ९ तळ उद्ध्वस्त; लष्करातील नारीशक्तीचे जगाला दर्शन
6
संपादकीय: याद राखा, हिशेब चुकता होईल! पाकिस्तान काय करेल आणि काय नाही...
7
पाकला धडा शिकवलाच, कायदेही मोडले नाहीत! एलओसी पार न करताच शत्रूवर मारा... 
8
सिंदूर, सोफिया अन् व्योमिका... नावात काय नाही, नावातच सारे दडलेले होते...
9
पाकिस्तान प्रतिहल्ला करेल?-शक्यता नाकारता येत नाही!
10
मुत्सद्देगिरी आणि सैन्यदलांचं निर्विवाद यश!
11
प्रवाशांना ‘बेस्ट’ची रिअल-टाइम सुविधा; मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते उपक्रमाचे उद्घाटन 
12
१८ विमानतळांवरील कामकाज तात्पुरते बंद; एकट्या इंडिगोने सुमारे १६० उड्डाणे रद्द केली
13
सीमावर्ती जिल्ह्यांमधील १४ जिल्ह्यांत सर्व शाळा बंद; ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर पंजाब, राजस्थान आणि जम्मूत सूचना जारी  
14
विनाअपघात एसटी बस चालकांना बक्षीस देणार; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती
15
चंद्रावर उमटणार भारतीय अंतराळवीराचे पदचिन्ह
16
राज्यात गारपिटीची, तर मुंबईत मुसळधारेची शक्यता; मध्य महाराष्ट्र व मराठवाड्याला इशारा
17
रोहितने ‘तो’ निर्णय तेव्हाच घेतलेला? गंभीर आलेला, पण रोहित शर्मा अनुपस्थित होता... 
18
रोहित शर्माने घेतली कसोटीतून तडकाफडकी निवृत्ती; इंग्लंड दौऱ्यात मिळणार होता डच्चू...
19
गोष्ट मिठी नदीच्या न उपसलेल्या गाळाची..., गाळाने भरले भ्रष्ट अभियंत्याचे खिसे; चौकशीतून स्पष्ट 
20
उद्धव ठाकरे ‘धनुष्यबाणा’साठी पुन्हा सक्रिय; याचिकेवर सुनावणी घेण्याची मागणी

पठाणकोट हल्ला - उच्चस्तरीय चौकशी नेमण्याची नवाझ शरीफ यांची घोषणा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 11, 2016 16:10 IST

पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांनी पठाणकोट हल्ल्याच्या चौकशीसाठी उच्चस्तरीय चौकशी समिती नेमण्याची घोषणा केली आहे

ऑनलाइन लोकमत
इस्लामाबाद, दि. ११ - पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांनी पठाणकोट हल्ल्याच्या चौकशीसाठी उच्चस्तरीय चौकशी समिती नेमण्याची घोषणा केली आहे. पाकिस्तानने पठाणकोट हल्ल्यामध्ये असलेल्या पाकिस्तानी नागरिकांच्या सहभागासंदर्भात कारवाई करावी अशी मागणी भारताने केली त्याची सांगड १५ जानेवारी रोजी प्रस्तावित असलेल्या सचिवस्तरीय चर्चेशी जोडली, त्यामुळे हा निर्णय घेण्यात आल्याची शक्यता व्यक्त होत आहे.
जर पाकिस्तानने पठाणकोट हल्ल्यामागे असलेल्या दहशतवाद्यांवर कारवाई केली नाही तर भारत पाकिस्तानमध्ये सचिवस्तरीय बोलणी होणार नाहीत असा इशारा राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी दिला होता.
पठाणकोट हल्ल्याशी सबंधित असल्यावरुन पाकिस्तानमध्ये काही संशयितांना ताब्यात घेण्यात आल्याचेही वृत्त आहे.
या हल्ल्याच्या मूळाशी जाण्याचा शरीफ यांचा प्रयत्न असल्याचे पाकिस्तानमधल्या एका वृत्तपत्राने म्हटले आहे. 
२ जानेवारी रोजी हवाई दलाच्या तळावर झालेल्या या हल्ल्यामागे पाकिस्तानस्थित जैश ए मोहम्मद या दहशतवादी संघटनेचा हात असल्याचा संशय भारतीय सुरक्षा यंत्रणांनी व्यक्त केला आहे.