शहरं
Join us  
Trending Stories
1
दक्षिण अमेरिकेत ७.४ रिश्टर स्केलचा भूकंप! चिली, अर्जेंटिना हादरले; घरातून बाहेर पडले लोक; त्सुनामीचा इशारा
2
"संसदेत विधेयक आणा, कोण रोखतय?"; असदुद्दीन ओवेसी यांचा मोदी सरकारवर निशाणा 
3
बेजबाबदार RTI कार्यकर्ते खोट्या तक्रारींद्वारे त्रास देण्याचा 'व्यवसाय' चालवतात- गोपाळ शेट्टी
4
Video: पाहुणचाराचा 'गोडवा'! श्रद्धा कपूरने घरच्या पुरणपोळीने केलं इन्स्टाग्रामच्या CEOचं स्वागत
5
'दोन महिन्यांचे राशन साठवून ठेवा', भारताच्या कारवाईने घाबरेल्या पाकिस्तानचे जनतेला आवाहन
6
पंतप्रधान मोदी अमरावतीत असं काय बोलले? की मुख्यमंत्री चंद्राबाबूंना रोखता आलं नाही आपलं हसू! बघा VIDEO
7
अनिल कपूरच्या आईचे निधन; वयाच्या 90व्या वर्षी निर्मला कपूर यांनी घेतला अखेरचा श्वास...
8
Heavy Rain In Jammu & Kashmir : जम्मू-कश्मिरात मुसळधार पाऊस, पाकिस्तानचं टेन्शन वाढवलं! ...तर पुराच्या पाण्यात वाहून जाईल PoK
9
Pahalgam Terror Attack : पाकिस्तानी क्रिकेटरनंतर आता पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्यावरही भारताचे डिजिटल स्ट्राइक
10
Waves Summit 2025 मध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत ८००० कोटींचे सामंजस्य करार
11
'पहलगाम हल्ल्याबाबत सरकारचे धोरण स्पष्ट नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा केंद्रावर निशाणा
12
भरधाव कंटेनरने दोन कारला उडविले; पुण्यातील तीन भाविकांचा मृत्यू
13
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
14
श्रीनगरमधील दल सरोवरात वेगवान वाऱ्यांमुळे बोट उलटली, पर्यटकांकडून मदतीसाठी आरडाओरडा
15
उल्हासनगरात बांगलादेशी नागरिक सापडण्याचे सत्र सुरूच, तीन दिवसात ९ बांगलादेशी नागरिकांना अटक 
16
नॅशनल हेराल्ड प्रकरण; राहुल आणि सोनिया गांधींच्या अडचणी वाढल्या, कोर्टाने बजावली नोटीस
17
शिखर धवनने दिली प्रेमाची कबुली..!! कोण आहे Sophie Shine? पहिली भेट कशी झाली?
18
एजाज खानचा 'हाऊस अरेस्ट' शो बंद होणार? महिला आयोगाचं थेट पोलीस महासंचालकांना पत्र
19
“भावाला न्याय मिळत नाही तोपर्यंत चप्पल घालणार नाही”; संतोष देशमुख यांच्या बहिणीचा निर्धार
20
लग्न ठरलं, साखरपुडा झाला, शरीरसंबंधही ठेवले, त्यानंतर... मुंबई इंडियन्सकडून खेळलेल्या खेळाडूवर गंभीर आरोप  

मध्यमवर्गीयांना अंशत: दिलासा! 5 लाखांपर्यंतच्या उत्पन्नावर 5 टक्केच प्राप्तिकर

By admin | Updated: February 1, 2017 15:39 IST

केंद्र सरकारकडून मध्यम वर्गीयांना दिलासा देण्यात आला आहे. मध्यमवर्गीयांना करात सवलत देण्यात आली आहे.

ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 1 - नोटाबंदीच्या निर्णयानंतर सादर होत असलेल्या अर्थसंकल्पात  प्राप्तिकर भरणाऱ्यांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती. मात्र वित्तमंत्री अरुण जेटली यांनी अर्थसंकल्पामधून प्राप्तिकर भरणाऱ्यांना हातचे राखून दिलासा दिला आहे. अर्थसंकल्पातून टॅक्स स्लॅबमध्ये कोणतेही फेरबदल न करता जेटली यांनी  अडीच ते पाच लाख रुपयांपर्यंत उत्पन्न  असलेल्या वर्गाकडून आता 10 ऐवजी 5 टक्केच प्राप्तिकर आकारण्यात येणार असल्याचे जाहीर केले. त्यामुळे प्राप्तिकराच्या चौकटीत मोठे फेरबदल होण्याची अपेक्षा बाळगून असलेल्यांना अंशत: दिलासा मिळाला आहे. 
 
जेटली यांनी प्राप्तिकराच्या चौकटीत फेरबदल जाहीर केले नाहीत. मात्र अडीच ते पाच लाख रुपयांपर्यंत उत्पन्न असणा-यांकडून आता 10 ऐवजी 5 टक्केच कर आकारण्याची घोषणा करण्यात आली आहे. त्याबरोबरच  5 ते 10 लाख रुपये उत्पन्न गट व 10 लाख रुपयांवरील उत्पन्न असणा-या गटासाठीची कररचना जैसे थेच ठेवण्यात आली आहे.  ही कररचना आधीप्रमाणेच अनुक्रमे 20 व 30 टक्केच आकारण्यात आली आहे. त्याबरोबरच 50 लाख ते एक कोटी रुपये उत्पन्न असलेल्यांच्या उत्पन्नावर 10 टक्के सरचार्ज लावण्यात येणार आहे.  जास्तीत जास्त लोकांनी इन्कम टॅक्स भरावा यासाठी पहिल्यांदाच इन्कॅम रिर्टन फाईल करणा-यांची चौकशी होणार नाही, असे अरुण जेटली यांनी सांगितले.