शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! पालघरमधील मेलोडी फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
2
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
3
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
4
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
5
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
6
Shreyas Iyer : बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
7
नागपुरात आई अन् मुलानेच सुरू केलं सेक्स रॅकेट, व्हॉट्सअ‍ॅपवर फोटो पाठवायचे; रात्री...
8
पाकिस्तानात मोठी घडामोड! इम्रान खान तुरुंगातून बाहेर येणार? एकाचवेळी आठ प्रकरणांत मिळाला जामीन 
9
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!
10
स्वतःच्याच जाळ्यात अडकले डोनाल्ड ट्रम्प...! अमेरिकेत याच वर्षात 446 कंपन्या झाल्या दिवाळखोर!
11
राजनाथ सिंह आणि फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना फोन करून पाठिंबा मागितला; संजय राऊतांचा दावा
12
मोदी सरकारच्या टार्गेटवर कोण?; दोषी PM, CM, मंत्र्यांना पदावरून हटवणाऱ्या विधेयकाची इनसाइड स्टोरी
13
Asia Cup 2025 : टीम इंडिया आशिया कप स्पर्धेत पाकविरुद्ध खेळणार का? मोठी माहिती आली समोर
14
'मुघल आणि ब्रिटिशांनंतर जे काही उरले, काँग्रेस-सपाने लुटले', योगी आदित्यनाथांची बोचरी टीका
15
Nashik House Collapses: नाशकात दुमजली घर कोसळलं, आठ महिलांसह नऊ जण जखमी
16
भारताच्या सीमेवर 'चिनी' पकड मजबूत होतेय? जिनपिंग यांनी तिबेटला दिले 'हे' नवे निर्देश!
17
१ लाखाचे केले १० कोटी रुपये, अनेकदा लागलं अपर सर्किट; एकेकाळी एका रुपयांपेक्षाही कमी होती किंमत
18
सप्टेंबरनंतर देशात अन् राज्यात मोठ्या राजकीय घडामोडी घडतील; अंजली दमानियांचा दावा, म्हणाल्या...
19
रिलायन्समुळे मिळाला आधार; निफ्टी-सेन्सेक्स विक्रमी उच्चांकावर बंद; कोणत्या क्षेत्रात सर्वाधिक वाढ?
20
नजर खाली, काकाचा हातात हात...लग्नासाठी आलेली ५ स्थळे नाकारणारी अर्चना तिवारी घरी कशी पोहचली?

(संसद अधिवेशन/ दिल्ली प्रतिनिधीची बातमी) सरकारला केवळ जीएसटीची चिंता; काँग्रेसने ठेवल्या अटी

By admin | Updated: August 2, 2015 22:55 IST

जयशंकर गुप्त/ नवी दिल्ली: सरकारने संसदेतील कोंडी सोडविण्यासाठी सोमवारी सर्वपक्षीय बैठक बोलावली असली तरी सहभागासाठी काँग्रेसने ठेवलेल्या अटी पाहता ती निष्फळ ठरणार असल्याची अटकळबाजी सुरू झाली आहे. भूसंपादन विधेयकाचे भवितव्य आधीच अधांतरी असताना सरकारला वस्तू आणि सेवा कर(जीएसटी) आणि अन्य दोन महत्त्वाची विधेयके पारित करवून घेण्यातच स्वारस्य उरले आहे. त्यामुळे उर्वरित सत्र जीएसटी विधेयकापुरते सिमित राहण्याची शक्यता आहे.

जयशंकर गुप्त/ नवी दिल्ली: सरकारने संसदेतील कोंडी सोडविण्यासाठी सोमवारी सर्वपक्षीय बैठक बोलावली असली तरी सहभागासाठी काँग्रेसने ठेवलेल्या अटी पाहता ती निष्फळ ठरणार असल्याची अटकळबाजी सुरू झाली आहे. भूसंपादन विधेयकाचे भवितव्य आधीच अधांतरी असताना सरकारला वस्तू आणि सेवा कर(जीएसटी) आणि अन्य दोन महत्त्वाची विधेयके पारित करवून घेण्यातच स्वारस्य उरले आहे. त्यामुळे उर्वरित सत्र जीएसटी विधेयकापुरते सिमित राहण्याची शक्यता आहे.
जीएसटी आणि अन्य दोन विधेयके पारित करण्यावर सरकार भर देणार असल्याचे केंद्रीय वाणिज्य मंत्री निर्मला सीतारामन यांनी भाजप मुख्यालयात बोलताना स्पष्ट केले. अधिवेशनाचा तिसरा आठवडाही गदारोळातच संपू शकतो. चौथ्या आणि अंतिम आठवड्यात सरकारला चार दिवसांत जीएसटी आणि काही महत्त्वाची विधेयके पारित करण्यात विरोधकांकडून सहकार्य लाभू शकते. अर्थमंत्री अरुण जेटली यांनी जीएसटी विधेयक पारित करणे किती आवश्यक आहे ते एका लेखातून स्पष्ट केले आहे. संसदेचे कामकाज बंद पाडण्यासाठीच काँग्रेसकडून गदारोळ सुरू आहे काय? हे विधेयक पारित करण्यात काँग्रेसकडून विरोध होणार की नाही, हे जाणून घेण्याची त्यांची इच्छा आहे. जीएसटी विधेयकाला लोकसभेने आधीच मंजुरी दिली आहे तर राज्यसभेच्या निवड समितीने आपला अहवाल सादर केला आहे. ५ वर्षे राज्यांच्या महसूलाची भरपाई करण्याची शिफारस या समितीने मान्य केली आहे.
---------------------
कोणते असणार डावपेच ?
जीएसटी विधेयकावर सरकारने सर्वपक्षीय बैठक बोलावली असली तरी बाहेरूनही काँग्रेस आणि अन्य विरोधी पक्षांशी संपर्क चालविला आहे. काँग्रेसने दाद न दिल्यास अन्य महत्त्वपूर्ण मुद्यांवरील चर्चेच्या नावावर काँग्रेसला वेगळे पाडण्याची व्यूहरचना आखली जाऊ शकते. वादग्रस्त मंत्र्यांचे राजीनामे येईपर्यंत संसद चालू न देण्याच्या काँग्रेसच्या भूमिकेबाबत समाजवादी पक्ष, तृणमूल काँग्रेस, बिजद, अण्णा द्रमुकसारखे पक्ष फारसे उत्साहित नाहीत. जनता परिवारातील पक्षांना जातीनिहाय जनगणनेची आकडेवारी, गुरुदासपूरमधील हल्ल्यासारख्या मुद्यांवर चर्चा व्हावी असे वाटते. काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी अलीकडेच पुण्याच्या एफटीआयआयला भेट देऊन संपकरी विद्यार्थ्यांशी चर्चा केली आहे, हा मुद्दाही काँग्रेसकडून उपस्थित केला जाऊ शकतो.