शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

संसद कोंडी कायम राहण्याची चिन्हे!

By admin | Updated: August 2, 2015 00:15 IST

सोमवारी होणाऱ्या सर्वपक्षीय बैठकीपूर्वी केंद्र सरकार आणि काँग्रेस दोघेही आपापल्या भूमिकेवर कायम असल्याने संसदेतील कोंडी लगेच फुटण्याची शक्यता कमी आहे.

नवी दिल्ली : सोमवारी होणाऱ्या सर्वपक्षीय बैठकीपूर्वी केंद्र सरकार आणि काँग्रेस दोघेही आपापल्या भूमिकेवर कायम असल्याने संसदेतील कोंडी लगेच फुटण्याची शक्यता कमी आहे.संसदेचे कामकाज सुरळीत सुरू करायचे असल्यास भाजपच्या तीन ज्येष्ठ नेत्यांविरुद्ध कारवाईचा मुद्दा बैठकीच्या अजेंड्यात असला पाहिजे, या मागणीवर काँग्रेसकडून शनिवारी जोर देण्यात आल्यावरही सरकार मात्र विरोधकांची ही मागणी मान्य करण्यास कुठल्याही परिस्थितीत तयार नाही. केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांनी सरकारच्या यापूर्वीच्या भूमिकेचा पुनरुच्चार करताना परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज निवेदन देण्यास तयार आहेत आणि राज्यांच्या मुद्यांवर संसदेत चर्चा होऊ शकत नाही, असे सांगितले. मुख्य विरोधी पक्षाने ललित मोदी प्रकरणात सुषमा स्वराज आणि राजस्थानच्या मुख्यमंत्री वसुंधरा राजे; तसेच व्यापमं घोटाळ्यात मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंग चौहान यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. संसदेतील कोंडी फोडण्यासाठी सरकारने सर्वतोपरी प्रयत्न केले असल्याचा दावा भाजप सूत्रांनी केला. तत्पूर्वी सुषमा स्वराज, राजे व चौहान यांच्याबाबत सरकार काय कारवाई करते हा सर्वपक्षीय बैठकीत मुख्य मुद्दा असला पाहिजे,असे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद यांनी स्पष्ट केले. भाजपकडूनच कामकाजात अडथळा - माकपादरम्यान, भाजपच्या नेतृत्वातील केंद्र सरकारतर्फेच संसदेच्या कामकाजात अडथळा निर्माण करण्यात येत असल्याचा आरोप मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टीने शनिवारी केला. सरकार आपल्या जबाबदारीपासून दूर पळण्याचा प्रयत्न करीत आहे, असे माकपचे सरचिटणीस सीताराम येचुरी यांनी सांगितले.(लोकमत न्यूज नेटवर्क)