शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rains: मुंबईकरांनो काळजी घ्या! पुढील २४ तासांसाठी पावसाचा रेडअलर्ट, हवामान खात्याचा इशारा
2
इराणनंतर लागणार पाकिस्तानचा नंबर...! इस्रायल हल्ल्यानंतर काय म्हणाले पाकिस्तानी 'एक्सपर्ट्स'? बसलीय RAW ची दहशत
3
मुंबईतील प्रतिष्ठित कॉलेजमध्ये विद्यार्थिनीचा संशयास्पद मृत्यू, कुटुंबीयांचा गंभीर आरोप
4
इराणसाठी इस्लामिक देश बनले काळ, अमेरिकेने रचला चक्रव्यूह; ४० हजार जवान अलर्टवर
5
IND vs ENG : आम्ही बुमराहला घाबरत नाही! तो सर्वोत्तम गोलंदाज असला तरी... मॅच आधी काय म्हणाला बेन स्टोक्स?
6
यम' समोरून फक्त बघूनच गेले! बोलेरो गाडी हवेत ४ वेळा पलटी झाली; पाहा व्हायरल व्हिडीओ
7
IND vs ENG: पहिल्यांदाच कसोटी कर्णधार म्हणून खेळणाऱ्या शुबमन गिलला रवी शास्त्रींचा मोलाचा सल्ला, म्हणाले...
8
'देशात लवकरच इंग्रजीत बोलणाऱ्यांना लाज वाटायला लागेल'; अमित शाह यांचे विधान, काय म्हणाले?
9
इराणचे सर्वेसर्वा खामेनेई मुळचे भारतातील...; पणजोबा इराणला गेले, वडिलांनी क्रांती घडविली अन्...
10
अमेरिकेच्या एन्ट्रीची शक्यता! इराण-इस्रायल युद्धाने जगाची चिंता वाढवली, पेट्रोल-डिझेल महागणार?
11
सोन्याची झळाळी झाली कमी; चांदी एका झटक्यात ₹२०६९ नं स्वस्त, पाहा काय आहेत नवे दर
12
इस्रायलविरोधात एकही मुस्लिम देश इराणच्या बाजूने नाही; आता खमेनी सरकारपुढे कोणता मार्ग?
13
ज्येष्ठ योगिनी एकादशी: ‘असे’ करा व्रतपूजन, समस्यांतून व्हाल मुक्त; अपार यश-प्रगती लाभेल!
14
४० जणांच्या जमावाकडून घरावर हल्ला, दगडविटांचा केला वर्षाव, महिला, लहान मुले कुणालाच सोडलं नाही  
15
आता खामेनेईचा खात्मा करणारच..: हॉस्पिटलवरील हल्ल्यानंतर इस्त्रायलचे खुले चॅलेंज
16
इराणच्या हल्ल्यात इस्त्रायली एअर डिफेन्स फेल; मित्राची झाली आठवण, भारताला आला कॉल, आता...
17
जगाला हादरवणारी बातमी! इराणने इस्रायलचा शेअर बाजार उडवला; तुमच्या गुंतवणुकीवर काय परिणाम होणार?
18
Rain Update: रायगडमधील तीन नद्यांनी ओलांडली धोक्याची पातळी, तीन पर्यटन ठिकाणी जाण्यास बंदी
19
...तर अमेरिका किम जोंग उन यांच्या देशावर अणुबॉम्ब टाकेल; यांनी केला मोठा दावा
20
₹८,००० कोटींची गुंतवणूक... अंबानींनी केली Coca-Cola आणि Pepsi ला टक्कर देण्याची तयारी; काय आहे प्लान?

संसद कोंडी कायम राहण्याची चिन्हे!

By admin | Updated: August 2, 2015 00:15 IST

सोमवारी होणाऱ्या सर्वपक्षीय बैठकीपूर्वी केंद्र सरकार आणि काँग्रेस दोघेही आपापल्या भूमिकेवर कायम असल्याने संसदेतील कोंडी लगेच फुटण्याची शक्यता कमी आहे.

नवी दिल्ली : सोमवारी होणाऱ्या सर्वपक्षीय बैठकीपूर्वी केंद्र सरकार आणि काँग्रेस दोघेही आपापल्या भूमिकेवर कायम असल्याने संसदेतील कोंडी लगेच फुटण्याची शक्यता कमी आहे.संसदेचे कामकाज सुरळीत सुरू करायचे असल्यास भाजपच्या तीन ज्येष्ठ नेत्यांविरुद्ध कारवाईचा मुद्दा बैठकीच्या अजेंड्यात असला पाहिजे, या मागणीवर काँग्रेसकडून शनिवारी जोर देण्यात आल्यावरही सरकार मात्र विरोधकांची ही मागणी मान्य करण्यास कुठल्याही परिस्थितीत तयार नाही. केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांनी सरकारच्या यापूर्वीच्या भूमिकेचा पुनरुच्चार करताना परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज निवेदन देण्यास तयार आहेत आणि राज्यांच्या मुद्यांवर संसदेत चर्चा होऊ शकत नाही, असे सांगितले. मुख्य विरोधी पक्षाने ललित मोदी प्रकरणात सुषमा स्वराज आणि राजस्थानच्या मुख्यमंत्री वसुंधरा राजे; तसेच व्यापमं घोटाळ्यात मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंग चौहान यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. संसदेतील कोंडी फोडण्यासाठी सरकारने सर्वतोपरी प्रयत्न केले असल्याचा दावा भाजप सूत्रांनी केला. तत्पूर्वी सुषमा स्वराज, राजे व चौहान यांच्याबाबत सरकार काय कारवाई करते हा सर्वपक्षीय बैठकीत मुख्य मुद्दा असला पाहिजे,असे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद यांनी स्पष्ट केले. भाजपकडूनच कामकाजात अडथळा - माकपादरम्यान, भाजपच्या नेतृत्वातील केंद्र सरकारतर्फेच संसदेच्या कामकाजात अडथळा निर्माण करण्यात येत असल्याचा आरोप मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टीने शनिवारी केला. सरकार आपल्या जबाबदारीपासून दूर पळण्याचा प्रयत्न करीत आहे, असे माकपचे सरचिटणीस सीताराम येचुरी यांनी सांगितले.(लोकमत न्यूज नेटवर्क)