शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी दिला पदाचा राजीनामा
2
संविधानाचे कलम ६७(अ) काय सांगते? ज्याअंतर्गत जगदीप धनखड यांनी दिला उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा
3
गोव्याहून इंदूरला येणाऱ्या इंडिगो विमानाचे आपत्कालीन लँडिंग, १४० जण करत होते प्रवास
4
ऑनलाइन बेटिंग अ‍ॅपसंदर्भात ईडीची कारवाई, राणा दग्गुबाती अन् प्रकाश राजसह ४ कलाकारांना समन्स
5
'आखडू' पाकिस्तानची मस्ती भारत जिरवणार! BCCIच्या एका निर्णयाने पाकचे ११६ कोटी बुडणार...
6
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासह 'या' दोन विभूतींना भारतरत्न देण्यात यावा, राज्यसभेत मागणी
7
"स्पष्टीकरण दिलं तरी जे घडलं ते भूषणावह नाही"; कोकाटेंच्या व्हिडीओवर CM फडणवीस स्पष्टच बोलले
8
धक्कादायक! प्रफुल्ल लोढाविरोधात बलात्कार प्रकरणी बावधन पोलिस ठाण्यातही गुन्हा दाखल
9
मनोज जरांगेंनी घेतली महादेव मुंडे यांच्या कुटुंबाची भेट; बीडसह राज्यभर आंदोलनाचा दिला इशारा...
10
"...तर आम्ही तुम्हाला बरबाद करू’’, अमेरिकन सिनेटरची भारतासह या देशांना धमकी, कारण काय?  
11
अखेर वेळ ठरली; अधिवेशनात ऑपरेशन सिंदूरवर 25, तर आयकर विधेयकावर 12 तास चर्चा होणार
12
४१ वर्षांनंतर नवीन अवतारात येतेय Kinetic DX; याच महिन्यात होणार लॉन्च, किंमत...
13
१८९ लोकांचा बळी घेणाऱ्या मुंबई स्फोटातील आरोपींना सोडण्याचे आदेश; CM फडणवीस म्हणाले, "निकाल खूपच धक्कादायक"
14
केरळच्या महिलेनं शारजाहमध्ये स्वतःला संपवलं, हिंसक व्हिडिओ पाहून कंपनीने पतीला नोकरीवरून काढलं!
15
"महाराष्ट्र देशाच्या आणि जगाच्या क्रिएटर्स इकॉनॉमीचे केंद्र बनेल’’, देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला विश्वास
16
मुंबई ट्रेन बॉम्बस्फोट प्रकरण; सर्व आरोपींची निर्दोष सुटका, कुणावर काय आरोप? जाणून घ्या...
17
शिवसेना शिंदे गटाच्या गोवा राज्‍य संपर्कनेतेपदी अनुभवी नेते गजानन कीर्तिकर यांची नियुक्ती
18
दहीहंडी उत्सवात '१९१६' नंबरचे टी-शर्ट घालून १ हजार स्वयंसेवक तैनात करा- आशिष शेलार
19
भीषण! बांगलादेशच्या हवाई दलाचं लढाऊ विमान शाळेवर कोसळलं; १९ जणांचा मृत्यू, ७० जखमी
20
Pune: बीडचा तरुण पुण्यात मित्रांसोबत फिरायला गेला, पोहायला धरणात उतरला अन्...

आत्महत्येमुळे संसद हळहळली

By admin | Updated: April 24, 2015 02:24 IST

मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची सभा सुरू असताना शेतकऱ्याने झाडाला गळफास लावून आत्महत्या केल्यामुळे संसदेने गुरुवारी तीव्र दु:ख आणि संताप व्यक्त केला.

नवी दिल्ली : मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची सभा सुरू असताना शेतकऱ्याने झाडाला गळफास लावून आत्महत्या केल्यामुळे संसदेने गुरुवारी तीव्र दु:ख आणि संताप व्यक्त केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सरकार शेतकऱ्यांना मरू देणार नाही, अशी ग्वाही देत विरोधकांचा रोष कमी करण्याचा प्रयत्न केला. हा अतिशय खोलवर रुजलेला आणि व्यापक असा प्रश्न असून तो सोडविण्यासाठी सरकार कटिबद्ध आहे, असे ते म्हणाले.सभागृहात दोन तास चाललेल्या चर्चेत राजस्थानमधील शेतकरी गजेंद्रसिंग याने दिल्लीत झाडाला गळफास लावून आत्महत्या केल्याबद्दल सर्वच सदस्यांनी राजकीय भेद बाजूला सारत भावना व्यक्त केल्या. या प्रकरणी न्यायालयीन चौकशी करून जबाबदारी निश्चित करण्याची मागणीही त्यांनी केली. राज्यसभेत विरोधी पक्षाच्या सदस्यांनी सीबीआय चौकशीची मागणी लावून धरतानाच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याखेरीज अन्य कुणाचे निवेदन चालणार नाही अशी ठाम भूमिका घेतली. तत्पूर्वी शून्य तासाला मुद्दा उपस्थित करताना विरोधी पक्षनेते गुलाम नबी आझाद म्हणाले की, गजेंद्रसिंग याच्या आत्महत्येसाठी केंद्र आणि दिल्ली सरकार जबाबदार आहे. या घटनेने संपूर्ण देशाचे लक्ष वेधले असल्याने सभागृहाचे कामकाज थांबवून चर्चा करायला हवी. लोकसभेत गदारोळ लोकसभेत कामकाज सुरू होताच जोरदार नारेबाजी करीत विरोधी पक्षांनी या मुद्यावर चर्चेची मागणी केली. सरकारने नंतर ती मान्यही केली; मात्र गदारोळातच काही मिनिटांसाठी कामकाज तहकूब करण्यात आले. काँग्रेसच्या सदस्यांनी प्रश्नोत्तराचा तास निलंबित ठेवण्याची मागणी केली; मात्र अध्यक्षांनी ती फेटाळली. काँग्रेसच्या सदस्यांनी ‘किसानविरोधी सरकार नही चलेगी’ अशा घोषणा देत सभागृह दणाणून सोडले. (लोकमत न्यूज नेटवर्क)