शहरं
Join us  
Trending Stories
1
CA नगराध्यक्ष सगळ्यांचा हिशेब ठेवतील अन् काहींचा 'हिशोब करतील'...; फडणवीसांचे सूचक विधान
2
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
3
U19 Asia Cup 2025 : ...तर आशिया कप जेतेपदासाठी भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
4
महागाईचा ‘रॉकेट’ वेग! चांदी २ लाखांच्या पार, तर सोने १.३७ लाखांवर... आतापर्यंत सर्व विक्रम मोडले
5
Lokmat Parliamentary Award 2025: सुधा मूर्ती ते दिग्विजय सिंह... 'लोकमत पार्लिमेंटरी अवार्ड २०२५'ने ८ प्रतिभावान खासदारांचा गौरव
6
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
7
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
8
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
9
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
10
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
11
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
12
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
13
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
14
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
15
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
16
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
17
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
18
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
19
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
20
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
Daily Top 2Weekly Top 5

संसद हा लढाईचा आखाडा झालाय - राष्ट्रपतींनी टोचले कान

By admin | Updated: August 14, 2015 19:27 IST

सध्या संसदेमध्ये लढाई असल्याचं चित्र असून ते बदलायला हवं संसदेमध्ये चांगल्या चर्चा वादविवाद व्हायला हवेत असं सांगताना राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांनी या अंगानं गंभीर विचार व्हायला हवा

ऑनलाइन लोकमत

 नवी दिल्ली, दि. १४ - सध्या संसदेमध्ये लढाई असल्याचं चित्र असून ते बदलायला हवं संसदेमध्ये चांगल्या चर्चा वादविवाद व्हायला हवेत असं सांगताना राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांनी या अंगानं गंभीर विचार व्हायला हवा असं सांगत खासदारांचे कान टोचले आहे. ६९व्या स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला देशाला संबोधित करताना मुखर्जी यांनी सगळ्या देशवासियांना शुभेच्छा दिल्या तसेच, लष्कराच्या जवानांसह नोबेल पदक विजेते कैलाश सत्यार्थी यांचे अभिनंदन केले.

लोकशाही व्यवस्था सध्या तणावाखाली असल्याचे सांगत त्यादृष्टीने विचार व्हायला हवे असा सल्ला राष्ट्रपतींनी दिला. भारताच्या गुरुशिष्य परंपरेचा उल्लेख करत सध्या शिक्षणक्षेत्रात असलेल्या समस्यांचं मुखर्जींनी सुतोवाच केलं. शिक्षकांना या देशात मान होता, विद्वत्तेचा सन्मान होता, आज अशी स्थिती आहे का यावर शिक्षणक्षेत्राशी संबंधितांनी विचार करावा असे ते म्हणाले. शिक्षणसंस्था प्रचंड वाढल्या असल्या तरी गुणवत्तेचा विचार केला तर काय स्थिती आहे असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

दहशतवादाचा मुकाबला कठोरपणे करण्यात येईल असे सांगतानाच, शेजारी राष्ट्रांनी त्यांच्या भूमीचा वापर भारताशी शत्रूत्व बाळगणा-यांना करायला द्यायला नको असा इशाराही त्यांनी पाकिस्तानला नाव न घेता दिला आहे. 

बांग्लादेशाशी झालेल्या सीमा कराराबाबत मुखर्जी यांनी आनंद व्यक्त केला. भारत हा विविधतेने नटलेला देश असून ते विविधता जपायला हवी असंही ते म्हणाले. मानवता हा परमधर्म असल्याचं सांगत शांती, मैत्री व सहयोगाचे महत्त्व त्यांनी अधोरेखीत केले.

भारतीय अर्थव्यवस्था चांगल्या गतीने वाढत असून आर्थिक सुधारणाही होऊ घातल्या असल्याचे मुखर्जी म्हणाले.