शहरं
Join us  
Trending Stories
1
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
2
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
3
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
4
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
5
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
6
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
7
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
8
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
9
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
10
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
11
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
12
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
13
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
14
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
15
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
16
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
17
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
18
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
19
"…तर तुला कोणीच संघाबाहेर काढू शकणार नाही!" १९८३ च्या वर्ल्ड चॅम्पियनकडून संजू सॅमसनला सल्ला
20
बाजारात जोरदार उसळी! गुंतवणूकदारांनी कमावले ३.५ लाख कोटी रुपये; 'ही' ६ कारणे ठरली गेमचेंजर
Daily Top 2Weekly Top 5

प. बंगालमध्ये डाव्यांच्या अस्तित्वाबद्दल प्रश्न

By admin | Updated: May 23, 2016 04:07 IST

पश्चिम बंगाल विधानसभेसाठी अलीकडेच झालेल्या विधानसभा निवडणुकीत डाव्या पक्षांचा दारुण पराभव झाला. पक्षाने निवडणुकीत काँग्रेस पक्षाशी युती केली होती.

कोलकाता : पश्चिम बंगाल विधानसभेसाठी अलीकडेच झालेल्या विधानसभा निवडणुकीत डाव्या पक्षांचा दारुण पराभव झाला. पक्षाने निवडणुकीत काँग्रेस पक्षाशी युती केली होती. ती मतदारांनी नाकारली. आता यापुढेही मतांची फूट टाळण्यास पक्षाला अपयश आल्यास राज्यात पक्षाच्या अस्तित्वाबद्दल गंभीर प्रश्न उभे राहतील, अशी कबुली माकपच्या एका पॉलिट ब्युरो सदस्याने दिली आहे.एकेकाळी पश्चिम बंगाल हा डाव्या पक्षांचा गट मानला जात होता. या राज्याला लालगढ म्हणूनही ओळखले जात होते; मात्र विधानसभा निवडणुकीत या पक्षाची सदस्यसंख्या ६२वरून (२०११) एकदम ३२वर आली. काँग्रेस हा डाव्या आघाडीचा राजकीय शत्रू समजला जातो; पण आपले वैचारिक मतभेद दूर करीत पक्षाने निवडणुकीत या राजकीय शत्रूशी आघाडी केली. तसे करूनही डाव्या आघाडीला आपल्या आणखी ३० जागा गमवाव्या लागल्या.चूक कोठे झाली शोधावे लागेलयापुढे आम्ही आमची मते आणि जनाधार गमावण्याची प्रक्रिया थांबली नाही, तर आमच्या पक्षाच्या अस्तित्वावरच गंभीर प्रश्नचिन्ह उभे राहणार आहे. आम्ही केवळ जनतेच्या मनात काय चालले आहे, ते समजू शकलो नाही, तर गेल्या पाच वर्षांत गमावलेली शक्तीही पुन्हा प्राप्त करू शकलो नाही. काँग्रेससोबत केलेली युती जनतेला आवडली नाही. तृणमूल विरोधी मतांची फाटाफूट टाळण्यासाठी आम्ही काँग्रेसशी युती केली; पण ती आमच्या विरोधात गेली. लोकांना ही युती पसंत पडली नाही. बेरोजगारी, भ्रष्टाचार, औद्योगिकीकरण आदी मुद्दे उपस्थित करूनही जनतेने ममता बॅनर्जी आणि तृणमूल काँग्रेस यांना मते दिली हे आम्ही नाकारू शकत नाही. आमची नेमकी चूक कोठे झाली हे शोधावे लागेल. आमची निवडणुकीतील दिशा बरोबर होती की नाही, की जनतेपासून आम्ही दुरावलो आहोत, हे पाहावे लागेल.- माजी खासदार हन्नान मुल्ला, माकप पॉलिट ब्युरो सदस्य (वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत )डाव्या पक्षांच्या मतदारांची काँग्रेसला मते पडली; पण काँग्रेसची मते डाव्या पक्षांना पडली नाहीत, असे दिसते. - मोहम्मद सलीम, माकपा पॉलिट ब्युरो सदस्य