शहरं
Join us  
Trending Stories
1
विदर्भाला पावसाचा तडाखा! नागपूरमध्ये घरांमध्ये पाणी, शाळांना सुट्टी; पुरामुळे अनेक ठिकाणी संपर्क तुटला
2
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये भारतानं पाकिस्तानला मूर्ख बनवलं अन् त्यांना कळलंही नाही! 'त्या'वेळी नेमकं काय झालेलं?
3
टेस्ट पासून का रे दूरावा? किंग कोहली म्हणाला; दाढी पिकली रे भावा!
4
"साहेब, बायको पळाली"; ४ मुलांची आई बॉयफ्रेंडसोबत फरार; पतीची पोलिसांकडे धाव! म्हणाला... 
5
'या' आयपीओचं तुफान लिस्टिंग, पहिल्याच दिवशी गुंतवणूकदार मालामाल; शेअर्स खरेदीची लूट
6
"फडणवीसजी, तुमच्या राज्यात गरीब आणि दुर्बलांचे असे हाल आहेत", संजय राऊतांनी व्हिडीओ दाखवला
7
खळबळजनक! प्रायव्हेट व्हिडीओ दाखवून ३ कोटी उकळले अन् धमकावलं, CA ने आयुष्य संपवलं
8
आरारा....खतरनाक; कमी किमतीत स्मार्ट फीचर्स; Mahindra ने लॉन्च केली सर्वात SUV
9
जगातील सर्वात श्रीमंत देश बनू शकतो पाकिस्तान? 'या' नैसर्गिक खजिन्यापुढे चीन-अमेरिकाही काहीच नाही
10
'धुरंधर'मध्ये दिसलं पाकिस्तान, कुठे शूट झाले हे सीन्स? रणवीर सिंहच्या सिनेमाची चर्चा
11
Gambhira Bridge Collapse : भयानक Video! गुजरातमध्ये गंभीरा पूल कोसळला, अनेक वाहने पाण्यात पडली; तिघांचा मृत्यू, शोध सुरु 
12
लेकीला वाचवण्यासाठी आईने घरही विकलं, तरीही...; कोण आहे निमिषा प्रिया? येमेनमध्ये होणार फाशीची शिक्षा
13
Video: प्रसिद्ध गायकाविरोधात पोलिसांची कारवाई, बांद्रा वरळी सी-लिंकवर केला जीवघेणा स्टंट
14
भयंकर! ३२ वर्षीय प्रसिद्ध अभिनेत्रीचा मृत्यू; दोन आठवड्यानंतर घरात आढळला मृतदेह, चाहत्यांना धक्का
15
Trump Tariff: धमक्यांवर धमक्या, ट्रम्प यांची आता औषध कंपन्यांना धमकी; "अमेरिकेतच औषधं बनवा, अन्यथा..."
16
'चीन, पाकिस्तान आणि बांगलादेशची एकी भारतासाठी धोकादायक', CDS प्रमुख चौहान यांचं मुद्द्यावर बोट
17
मेट्रो प्रकल्पाला गती देण्यासाठी २५० परप्रांतीय मजूर मुंबईत दाखल; काहींना विमानाने मुंबईत आणले
18
ही तर सोनमपेक्षा एक पाऊल पुढे! बॉयफ्रेंडसाठी पतीला विष दिलं अन् कुणालाही कळण्याआधी केला खेळ खल्लास!
19
Stock Market Today: ७६ अंकांनी घसरून उघडला सेन्सेक्स; ३ सेक्टर्समध्ये तेजी, का अस्थिर आहे मार्केट?
20
Pension Scheme: वृद्धापकाळात दरमहा ₹२०,५०० चं पेन्शन देईल ही स्कीम; पाहा याचे जबरदस्त ५ फायदे

प. बंगालमध्ये डाव्यांच्या अस्तित्वाबद्दल प्रश्न

By admin | Updated: May 23, 2016 04:07 IST

पश्चिम बंगाल विधानसभेसाठी अलीकडेच झालेल्या विधानसभा निवडणुकीत डाव्या पक्षांचा दारुण पराभव झाला. पक्षाने निवडणुकीत काँग्रेस पक्षाशी युती केली होती.

कोलकाता : पश्चिम बंगाल विधानसभेसाठी अलीकडेच झालेल्या विधानसभा निवडणुकीत डाव्या पक्षांचा दारुण पराभव झाला. पक्षाने निवडणुकीत काँग्रेस पक्षाशी युती केली होती. ती मतदारांनी नाकारली. आता यापुढेही मतांची फूट टाळण्यास पक्षाला अपयश आल्यास राज्यात पक्षाच्या अस्तित्वाबद्दल गंभीर प्रश्न उभे राहतील, अशी कबुली माकपच्या एका पॉलिट ब्युरो सदस्याने दिली आहे.एकेकाळी पश्चिम बंगाल हा डाव्या पक्षांचा गट मानला जात होता. या राज्याला लालगढ म्हणूनही ओळखले जात होते; मात्र विधानसभा निवडणुकीत या पक्षाची सदस्यसंख्या ६२वरून (२०११) एकदम ३२वर आली. काँग्रेस हा डाव्या आघाडीचा राजकीय शत्रू समजला जातो; पण आपले वैचारिक मतभेद दूर करीत पक्षाने निवडणुकीत या राजकीय शत्रूशी आघाडी केली. तसे करूनही डाव्या आघाडीला आपल्या आणखी ३० जागा गमवाव्या लागल्या.चूक कोठे झाली शोधावे लागेलयापुढे आम्ही आमची मते आणि जनाधार गमावण्याची प्रक्रिया थांबली नाही, तर आमच्या पक्षाच्या अस्तित्वावरच गंभीर प्रश्नचिन्ह उभे राहणार आहे. आम्ही केवळ जनतेच्या मनात काय चालले आहे, ते समजू शकलो नाही, तर गेल्या पाच वर्षांत गमावलेली शक्तीही पुन्हा प्राप्त करू शकलो नाही. काँग्रेससोबत केलेली युती जनतेला आवडली नाही. तृणमूल विरोधी मतांची फाटाफूट टाळण्यासाठी आम्ही काँग्रेसशी युती केली; पण ती आमच्या विरोधात गेली. लोकांना ही युती पसंत पडली नाही. बेरोजगारी, भ्रष्टाचार, औद्योगिकीकरण आदी मुद्दे उपस्थित करूनही जनतेने ममता बॅनर्जी आणि तृणमूल काँग्रेस यांना मते दिली हे आम्ही नाकारू शकत नाही. आमची नेमकी चूक कोठे झाली हे शोधावे लागेल. आमची निवडणुकीतील दिशा बरोबर होती की नाही, की जनतेपासून आम्ही दुरावलो आहोत, हे पाहावे लागेल.- माजी खासदार हन्नान मुल्ला, माकप पॉलिट ब्युरो सदस्य (वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत )डाव्या पक्षांच्या मतदारांची काँग्रेसला मते पडली; पण काँग्रेसची मते डाव्या पक्षांना पडली नाहीत, असे दिसते. - मोहम्मद सलीम, माकपा पॉलिट ब्युरो सदस्य