शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; दहा वाजता मतमोजणीस होणार सुरुवात
2
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
3
बांगलादेशात उग्र आंदोलन! जमावाने ७ वर्षाच्या मुलीलाही जिवंत जाळलं; हिंसाचारात माणुसकी मेली
4
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
5
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
6
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
7
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
8
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
9
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
10
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
11
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
12
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
13
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
14
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
15
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
16
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
17
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
18
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
19
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
20
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

प. बंगालमध्ये डाव्यांच्या अस्तित्वाबद्दल प्रश्न

By admin | Updated: May 23, 2016 04:07 IST

पश्चिम बंगाल विधानसभेसाठी अलीकडेच झालेल्या विधानसभा निवडणुकीत डाव्या पक्षांचा दारुण पराभव झाला. पक्षाने निवडणुकीत काँग्रेस पक्षाशी युती केली होती.

कोलकाता : पश्चिम बंगाल विधानसभेसाठी अलीकडेच झालेल्या विधानसभा निवडणुकीत डाव्या पक्षांचा दारुण पराभव झाला. पक्षाने निवडणुकीत काँग्रेस पक्षाशी युती केली होती. ती मतदारांनी नाकारली. आता यापुढेही मतांची फूट टाळण्यास पक्षाला अपयश आल्यास राज्यात पक्षाच्या अस्तित्वाबद्दल गंभीर प्रश्न उभे राहतील, अशी कबुली माकपच्या एका पॉलिट ब्युरो सदस्याने दिली आहे.एकेकाळी पश्चिम बंगाल हा डाव्या पक्षांचा गट मानला जात होता. या राज्याला लालगढ म्हणूनही ओळखले जात होते; मात्र विधानसभा निवडणुकीत या पक्षाची सदस्यसंख्या ६२वरून (२०११) एकदम ३२वर आली. काँग्रेस हा डाव्या आघाडीचा राजकीय शत्रू समजला जातो; पण आपले वैचारिक मतभेद दूर करीत पक्षाने निवडणुकीत या राजकीय शत्रूशी आघाडी केली. तसे करूनही डाव्या आघाडीला आपल्या आणखी ३० जागा गमवाव्या लागल्या.चूक कोठे झाली शोधावे लागेलयापुढे आम्ही आमची मते आणि जनाधार गमावण्याची प्रक्रिया थांबली नाही, तर आमच्या पक्षाच्या अस्तित्वावरच गंभीर प्रश्नचिन्ह उभे राहणार आहे. आम्ही केवळ जनतेच्या मनात काय चालले आहे, ते समजू शकलो नाही, तर गेल्या पाच वर्षांत गमावलेली शक्तीही पुन्हा प्राप्त करू शकलो नाही. काँग्रेससोबत केलेली युती जनतेला आवडली नाही. तृणमूल विरोधी मतांची फाटाफूट टाळण्यासाठी आम्ही काँग्रेसशी युती केली; पण ती आमच्या विरोधात गेली. लोकांना ही युती पसंत पडली नाही. बेरोजगारी, भ्रष्टाचार, औद्योगिकीकरण आदी मुद्दे उपस्थित करूनही जनतेने ममता बॅनर्जी आणि तृणमूल काँग्रेस यांना मते दिली हे आम्ही नाकारू शकत नाही. आमची नेमकी चूक कोठे झाली हे शोधावे लागेल. आमची निवडणुकीतील दिशा बरोबर होती की नाही, की जनतेपासून आम्ही दुरावलो आहोत, हे पाहावे लागेल.- माजी खासदार हन्नान मुल्ला, माकप पॉलिट ब्युरो सदस्य (वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत )डाव्या पक्षांच्या मतदारांची काँग्रेसला मते पडली; पण काँग्रेसची मते डाव्या पक्षांना पडली नाहीत, असे दिसते. - मोहम्मद सलीम, माकपा पॉलिट ब्युरो सदस्य