शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
2
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
3
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
4
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
5
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
6
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
7
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
8
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
9
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
10
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
11
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
12
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
13
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
14
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
15
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
16
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
17
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
18
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
19
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
20
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 

प. बंगाल, आसाममध्ये आज पहिला टप्पा

By admin | Updated: April 4, 2016 02:48 IST

प. बंगाल आणि आसाममधील विधानसभा निवडणुकीचा पहिला टप्पा सोमवारी पार पडत आहे. तृणमूल काँग्रेसच्या सर्वेसर्वा ममता बॅनर्जी यांना काँग्रेस-डाव्या आघाडीच्या तगड्या आव्हानांचा

गुवाहाटी/ कोलकाता : प. बंगाल आणि आसाममधील विधानसभा निवडणुकीचा पहिला टप्पा सोमवारी पार पडत आहे. तृणमूल काँग्रेसच्या सर्वेसर्वा ममता बॅनर्जी यांना काँग्रेस-डाव्या आघाडीच्या तगड्या आव्हानांचा मुकाबला करावा लागत असताना आसाममध्ये काँग्रेसच्या तरुण गोगाई यांना सत्ता कायम राखणे कसोटीचे ठरणार आहे. प. बंगालमधील माओवादग्रस्त भागात मतदान होत असल्यामुळे चोख सुरक्षा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.प. बंगाल, तामिळनाडू, आसाम, केरळ आणि पुडुचेरी या पाच राज्यांमध्ये नवी सरकारे निवडली जाणार असून महिन्यापूर्वीच निवडणूक आयोगाने कार्यक्रम घोषित केला आहे. पहिल्या टप्प्यात प. बंगालमधील १८, तर आसाममधील ६५ मतदारसंघांमध्ये निवडणूक होत आहे. प. बंगालमध्ये सहा टप्प्यांत मतदान होत असले तरी ११ एप्रिल रोजीही पहिल्या टप्प्यातील काही मतदारसंघ समाविष्ट केले जाणार असल्यामुळे मतदानाच्या ७ तारखा राहतील. आसाममध्ये मतदान दोन टप्प्यांत होत आहे. (वृत्तसंस्था)> समीकरण बदलले....२०११ च्या विधानसभा निवडणुकीत तृणमूल काँग्रेस आणि काँग्रेसने युती केल्यामुळे डाव्या आघाडीची ३४ वर्षांपासूनची सत्ता उलथविली गेली होती. त्यानंतर काँग्रेसने तृणमूलशी काडीमोड घेतला. आता काँग्रेस- डाव्या आघाडीने ममता बॅनर्जी यांच्यासमोर जबर आव्हान उभे केले आहे.> प. बंगालमध्ये सोमवारी प. मिदनापूर, पुरुलिया आणि बांकुरा या माओवादग्रस्त संवेदनशील भागात मतदान होत असून १३३ उमेदवार भवितव्य आजमावत आहेत. अप्पर आसाम, पर्वतीय जिल्हे, उत्तर आणि बराक खोऱ्यांमध्ये ४० हजारांवर सुरक्षा जवान तैनात आहेत. भाजप-आगप-बीपीएफच्या आघाडीने काँग्रेसच्या अडचणी वाढविल्या असताना एआययूडीएफने वेगळी चूल ठेवल्यामुळे तिरंगी लढती रंगणार आहेत.निवडणूक आयोगाने १८ पैकी १३ मतदारसंघांमध्ये डाव्या दहशतवादाचा प्रभाव आहे. सुरक्षेच्या कारणास्तव संध्याकाळी ४ वाजताच मतदान आटोपले जाईल. पुरुलिया जिल्ह्याचा काही भाग, मनबाजार, काशीपूर, पारा आणि रघुनाथपूरमध्ये संध्याकाळी ६ वाजेपर्यंत मतदान चालेल.