शहरं
Join us  
Trending Stories
1
दुबे यांनी मुंबईत येऊन दाखवावे, समुद्रात बुडवून बुडवून मारू; राज ठाकरेंचे भाजप खासदाराला प्रत्यूत्तर 
2
आजचे राशीभविष्य, १९ जुलै २०२५: यश प्राप्तीसाठी कठोर परिश्रम करावे लागतील
3
मुख्यमंत्री संतापले : लाेक म्हणतात आमदार माजले, आपण लाथाबुक्क्यांतून संदेश देणार आहोत का?
4
मराठा आरक्षण : अंतिम सुनावणीस सुरुवात, अंतरिम स्थगिती देण्याची याचिकाकर्त्यांची मागणी
5
आयपीएस सुपेकरांवर कारवाई का नाही? वैशाली हगवणे आत्महत्या, पोलिसांवर कडक ताशेरे
6
मंत्र्यांच्या आईच्या नावावर डान्सबार; अनिल परब यांचा आरोप
7
कर्जमाफीचे आश्वासन पूर्ण करूच, शेतकऱ्यांसाठी कधी हात आखडता घेतला नाही : मुख्यमंत्री
8
मी तसे बोलायला नको होते; सभागृहात आणि बाहेर केलेल्या विधानांवरून आमदारांचा माफीनामा
9
‘विधिमंडळ प्रवेश पास ५ ते १० हजारांत विकले जातात’; आमदारांच्या आरोपाने खळबळ
10
पडळकरांकडून दिलगिरी व्यक्त; जे घडले ते वाईटच : आव्हाड
11
शेतकऱ्यांसाठी अलर्ट : टॅरिफमुळे अमेरिकेची कृषी उत्पादने भारतात आल्यास गंभीर परिणाम 
12
ऑटो ट्रान्सलेशनमुळे गोंधळ!; ‘मेटा’च्या अनुवाद तंत्राने मुख्यमंत्री सिद्धरामय्यांनाच ठरवले ‘मृत’
13
माजी मुख्यमंत्र्यांच्या मुलाला मद्य घोटाळ्यात ईडीची अटक; छत्तीसगडमध्ये चैतन्य बघेल यांना कोठडी
14
आव्हाड घुसले पोलिस कारखाली, ओढून काढावे लागले बाहेर
15
महाराष्ट्र, केंद्र सरकारला सुप्रीम कोर्टाचे खडे बोल ; विशेष न्यायालय स्थापना प्रस्तावासाठी शेवटची संधी
16
ड्युक्स कंपनीने तपासणीसाठी कसोटी चेंडू परत मागितले; भारत-इंग्लंड कसोटी मालिकेत चर्चेचा विषय
17
बीसीसीआय मालमाल झाली! ₹ ९,६४१ कोटींची केली रेकॉर्ड ब्रेकिंग कमाई
18
भारतीय महिला संघ लॉर्ड्स वनडे जिंकण्यास सज्ज; इंग्लंडविरुद्ध दुसरा सामना आज
19
कॅनडामध्ये विमान हायजॅक! अधिकाऱ्यांमध्ये घबराट; मागून पाठवले F-35 लढाऊ विमान पण...
20
"CM फडणवीसांनी ४० फोन केले पण..."; ठाकरेंनी मतांची माती केली म्हणत एकनाथ शिंदेंनी सगळचं काढलं

प. बंगाल, आसाममध्ये आज पहिला टप्पा

By admin | Updated: April 4, 2016 02:48 IST

प. बंगाल आणि आसाममधील विधानसभा निवडणुकीचा पहिला टप्पा सोमवारी पार पडत आहे. तृणमूल काँग्रेसच्या सर्वेसर्वा ममता बॅनर्जी यांना काँग्रेस-डाव्या आघाडीच्या तगड्या आव्हानांचा

गुवाहाटी/ कोलकाता : प. बंगाल आणि आसाममधील विधानसभा निवडणुकीचा पहिला टप्पा सोमवारी पार पडत आहे. तृणमूल काँग्रेसच्या सर्वेसर्वा ममता बॅनर्जी यांना काँग्रेस-डाव्या आघाडीच्या तगड्या आव्हानांचा मुकाबला करावा लागत असताना आसाममध्ये काँग्रेसच्या तरुण गोगाई यांना सत्ता कायम राखणे कसोटीचे ठरणार आहे. प. बंगालमधील माओवादग्रस्त भागात मतदान होत असल्यामुळे चोख सुरक्षा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.प. बंगाल, तामिळनाडू, आसाम, केरळ आणि पुडुचेरी या पाच राज्यांमध्ये नवी सरकारे निवडली जाणार असून महिन्यापूर्वीच निवडणूक आयोगाने कार्यक्रम घोषित केला आहे. पहिल्या टप्प्यात प. बंगालमधील १८, तर आसाममधील ६५ मतदारसंघांमध्ये निवडणूक होत आहे. प. बंगालमध्ये सहा टप्प्यांत मतदान होत असले तरी ११ एप्रिल रोजीही पहिल्या टप्प्यातील काही मतदारसंघ समाविष्ट केले जाणार असल्यामुळे मतदानाच्या ७ तारखा राहतील. आसाममध्ये मतदान दोन टप्प्यांत होत आहे. (वृत्तसंस्था)> समीकरण बदलले....२०११ च्या विधानसभा निवडणुकीत तृणमूल काँग्रेस आणि काँग्रेसने युती केल्यामुळे डाव्या आघाडीची ३४ वर्षांपासूनची सत्ता उलथविली गेली होती. त्यानंतर काँग्रेसने तृणमूलशी काडीमोड घेतला. आता काँग्रेस- डाव्या आघाडीने ममता बॅनर्जी यांच्यासमोर जबर आव्हान उभे केले आहे.> प. बंगालमध्ये सोमवारी प. मिदनापूर, पुरुलिया आणि बांकुरा या माओवादग्रस्त संवेदनशील भागात मतदान होत असून १३३ उमेदवार भवितव्य आजमावत आहेत. अप्पर आसाम, पर्वतीय जिल्हे, उत्तर आणि बराक खोऱ्यांमध्ये ४० हजारांवर सुरक्षा जवान तैनात आहेत. भाजप-आगप-बीपीएफच्या आघाडीने काँग्रेसच्या अडचणी वाढविल्या असताना एआययूडीएफने वेगळी चूल ठेवल्यामुळे तिरंगी लढती रंगणार आहेत.निवडणूक आयोगाने १८ पैकी १३ मतदारसंघांमध्ये डाव्या दहशतवादाचा प्रभाव आहे. सुरक्षेच्या कारणास्तव संध्याकाळी ४ वाजताच मतदान आटोपले जाईल. पुरुलिया जिल्ह्याचा काही भाग, मनबाजार, काशीपूर, पारा आणि रघुनाथपूरमध्ये संध्याकाळी ६ वाजेपर्यंत मतदान चालेल.