शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई सेंट्रल स्टेशनचे नाव बदलले जाणार, नवे नाव काय असणार? CM देवेंद्र फडणवीस म्हणाले...
2
हरयाणा,गोव्यासह लडाखला मिळाले नवे राज्यपाल; घोष, गुप्ता आणि गजपती राजू यांची राष्ट्रपतींकडून नियुक्ती
3
"तुला पक्षात यावं लागेल"; उद्धव ठाकरेंच्या ऑफरवर प्रवीण दरेकर म्हणाले, "मी बाळासाहेबांचा शिवसैनिक"
4
IND vs ENG : जड्डू -ब्रायडन कार्स यांच्यात टक्कर! मग वातावरण चांगलेच तापलं! नेमकं काय घडलं?
5
अस्तित्वातच नसलेला माणूस बनला जगातील बारावी सर्वात श्रीमंत व्यक्ती, कोण आहे तो? एवढी आहे एकूण संपत्ती
6
जिममध्ये चोरी करणं महागात पडलं, ट्रेनरनं अशी शिक्षा दिली की...; आता चोर कधी मनात चोरीचा विचारही आणणार नाही!
7
IND vs ENG : गौतम गंभीरने Live सामन्यात दिली शिवी; अपशब्द उच्चारतानाचा Video झाला व्हायरल
8
पाकिस्तान जय श्रीरामच्या घोषणेने दुमदुमले; कराचीत मुस्लिम कलाकारांकडून रामलीलेचे सादरीकरण
9
काव्या मारनचा अजब निर्णय ! ५० विकेट्सही न घेता आलेल्या गोलंदाजाला केलं SRH 'बॉलिंग कोच'
10
"सरकार आणि उद्योगपतींच्या फायद्यासाठी जनसुरक्षा कायदा, काँग्रेस त्याची प्रत्येक जिल्ह्यात होळी करणार”, हर्षवर्धन सपकाळ यांची घोषणा
11
नो टॅक्स, नो टेन्शन! 'या' देशांमध्ये श्रीमंत लोकही भरत नाहीत एक रुपयाही कर, मग पैसा कुठून येतो?
12
खऱ्या आयुष्यातही सचिवजी अन् रिंकी प्रेमात? सानविकाच्या 'त्या' उत्तरावर जितेंद्र लाजला
13
टी लव्हर्ससाठी धोक्याची घंटा! चहा जास्त उकळणं आरोग्यासाठी हानिकारक, कारण...
14
वैभव सूर्यवंशीची स्फोटक फलंदाजीनंतर आता गोलंदाजीत कमाल! युवा टीम इंडियाकडून कसोटीत रचला इतिहास
15
"नाव घ्यायला भीती वाटते तर बोलू नका" ; आदित्य ठाकरेंनी चड्डी बनियन गॅँगचा उल्लेख करताच राणे संतापले
16
घरभाडं, वीजबिल भरायला पैसे नव्हते, राष्ट्रीय खेळाडू बनले चोर, व्यापाऱ्याचं अपहरण करून लुटले, त्यानंतर... 
17
भाच्याच्या प्रेमात वेडी झालेली बायको पळाली, घरी आणण्यासाठी गेलेल्या नवऱ्याचा हार्ट अटॅकने मृत्यू
18
भारताच्या शेअर बाजारात घसरण, पण पाकिस्तानच्या स्टॉक मार्केटमध्ये तुफान तेजी; १,३५,००० अंकांच्या पार, कारण काय?
19
"पहाटे ४ वाजता उठतो, रात्री ८ ला झोपतो", लेकाची शिस्त पाहून आर माधवनही होतो दंग; म्हणाला...
20
IND vs ENG :दुखापतग्रस्त पंत 'डिफेन्स' करताना फसला! जोफ्रा आर्चरची 'वेदनादायी' गोलंदाजी

प. बंगाल नको, बंगालच म्हणा

By admin | Updated: August 3, 2016 05:09 IST

पश्चिम बंगाल या पूर्वेकडील राज्याचे नाव बदलून ते इंग्रजीत ‘बंगाल’ व बंगाली भाषेत ‘बांगला’ किंवा ‘बंग’ असे करण्याच्या प्रस्तावास ममता बॅनर्जीच्या मंत्रिमंडळाने मंगळवारी मंजुरी दिली.

कोलकाता : भारतीय संघराज्यातील पश्चिम बंगाल या पूर्वेकडील राज्याचे नाव बदलून ते इंग्रजीत ‘बंगाल’ व बंगाली भाषेत ‘बांगला’ किंवा ‘बंग’ असे करण्याच्या प्रस्तावास ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखालील राज्य मंत्रिमंडळाने मंगळवारी मंजुरी दिली.राज्य विधानसभेत हा प्रस्ताव मंजूर करून घेऊन तो केंद्र सरकारकडे पाठविला जाईल. विधानसभेतील तृणमूल काँग्रेसचे बहुमत पाहता तेथे हा प्रस्ताव मंजूर होण्यात काही अडचण येण्याचे कारण नाही. केंद्र सरकारला मात्र राष्ट्रपतींची पूर्वसंमती घेऊन या नावबदलासाठी संसदेत घटनादुरुस्ती मंजूर करून घ्यावी लागेल. ब्रिटिशांच्या गुलामगिरीच्या कालखंडाचा ठसा पुसून टाकण्याचा एक भाग म्हणून राज्याच्या नावात असा बदल करण्याची फार दिवसांची मागणी आहे. बंगाली अस्मितेशीही हा विषय निगडित आहे. यानुसारच ब्रिटिशांनी केलेले ‘कलकत्ता’ पुन्हा ‘कोलकाता’ झाले आहे.राज्याच्या नावातून ‘पश्चिम’ हा शब्द वगळण्याचा आग्रह धरणाऱ्यांचे म्हणणे असे की, ब्रिटिशांनी त्यांच्या फूटपाडू राजकारणासाठी धर्माच्या आधारावर बंगालची फाळणी केली आणि मुस्लीम बहुसंख्य असलेला बंगालचा पूर्व भाग ‘पूर्व बंगाल’ आणि हिंदू बहुसंख्य पश्चिम भाग ‘पश्चिम बंगाल’ झाला. मात्र आता भारतातील एक संघराज्य असलेल्या बंगालच्या नावामागे ‘पश्चिम’ कायम ठेवण्याचे कोणतेही समर्थनीय कारण नाही. कारण पूर्वीचे पूर्व बंगाल भारताच्या फाळणीनंतर पूर्व पाकिस्तान झाले आणि त्या भागाचा आता तर बांगलादेश हा स्वतंत्र देश स्थापन झाला आहे. केवळ एकच बंगाल आता शिल्लक आहे. त्यामुळे पूर्वी वेगळेपण दाखविण्यासाठी नावामागे लावलेला ‘पश्चिम’ हा शब्द कायम ठेवण्यात काहीच हाशील नाही.यासंदर्भात पंजाबचेही उदाहरण दिले जाते. पूर्वी एकसंघ असलेल्या पंजाबचे फाळणीने दोन तुकडे झाले. पूर्व पंजाब भारतात राहिला तर पश्चिम पंजाब पाकिस्तानात गेला. असे असले तरी हे प्रदेश ‘पूर्व’ किंवा ‘पश्चिम’ म्हणून नव्हे, तर दोन्ही देशांमध्ये फक्त पंजाब एवढ्याच नावाने ओळखले जातात. (वृत्तसंस्था)>घटनादुरुस्ती आवश्यकभारतीय संघराज्यातील कोणत्याही घटक राज्याच्या नावात फेरबदल करायचा असेल, तर त्यासाठी राज्यघटनेत दुरुस्ती करणे गरजेचे आहे. राज्यघटनेच्या अनुच्छेद २मध्ये संघराज्यातील राज्ये व केंद्रशासित प्रदेशांचा उल्लेख आहे व त्यांची सूची परिशिष्ठ १मध्ये दिलेली आहे. त्यामुळे अनुच्छेद २ व परिशिष्ठ १मध्ये दुरुस्ती करून राज्याच्या जुन्या नावाऐवजी नवे नाव नमूद करावे लागेल.बंगालबाबत नावात हा बदल आणखीही एका दृष्टीने लाभदायी ठरणार आहे. इंग्रजी आद्याक्षरांनुसार राज्यांची क्रमवारी लावल्यास सध्या पश्चिम बंगालचे नाव १४व्या क्रमांकावर येते. नुसते ‘बंगाल’ असे नाव झाल्यावर ते इंग्रजी आद्याक्षरांनुसार आसामनंतर लगेच दुसऱ्या क्रमांकावर येईल.