शहरं
Join us  
Trending Stories
1
"आपल्याजवळ शक्ती असेल तर जग प्रेमाची भाषाही ऐकतं’’, सरसंघचालक मोहन भागवत यांचं मोठं विधान 
2
"पाकिस्तान म्हणजे मानवतेला धोका", ओवेसींचे रोखठोक विधान; म्हणाले- 'आता भारताने..."
3
बीसीसीआयकडून सचिन तेंडुलकरला मोठा सन्मान, मुंबई मुख्यालयात दिसणार 'एसआरटी १००' नावाचा बोर्ड रूम
4
INDvENG: श्रेयस अय्यरला टीम इंडियात न घेण्याचं BCCIने दिलं 'टुकार' कारण, ऐकून तुम्हालाही येईल राग
5
अनाथ मुलीला दत्तक घेऊन वाढवलं, तिनेच आईला संपवलं; इन्स्टाग्रामने उलगडलं हत्येचं गूढ
6
दिल्लीत 'आप'ला मोठा धक्का; १५ नगरसेवकांनी दिला राजीनामा, नवा पक्ष स्थापन करण्याची घोषणा
7
"कुठल्याही थेट युद्धातल्या विजयापेक्षा..."; एकनाथ शिंदेंनी केलं PM नरेंद्र मोदींचं कौतुक
8
Astro Tips: जे पुरुष घरात झाडूने साफसफाई करतात, ते झटपट श्रीमंत होतात; कसे ते पहा!
9
नालासोपाऱ्यात मेफेड्रोन ड्रग्सचा कारखाना उद्ध्वस्त, तुळींज पोलिसांची प्रगतीनगर परिसरात कारवाई
10
Virat Kohli: विराट कोहलीची जर्सी खरेदी करण्यासाठी चिन्नास्वामी स्टेडियमबाहेर चाहत्यांची झुंबड, व्हिडीओ होतोय व्हायरल!
11
पाकिस्तानविरुद्धच्या संघर्षादरम्यान या पिल्लांना सरकारने दिली झेड प्लस सुरक्षा, ७०० किमी दूर केली रवानगी
12
कॅन्सरसोबत झुंज ठरली अपयशी! ४४ वर्षीय प्रसिद्ध गायिकेचं निधन, चाहत्यांनी व्यक्त केली हळहळ
13
अरे बापरे! एका छोट्याशा चुकीमुळे होऊ शकतो प्रेशर कुकरचा भीषण स्फोट; सेफ्टीसाठी 'हे' करा
14
भारतीय सैन्याची मोठी तयारी!६ जण ठार, ११ जणांच्या खात्म्यासाठी ऑपरेशन; लष्कर -जैश'च्या दहशतवाद्यांचा शोध सुरू
15
Astro Tips: मुलांची दहावी, बारावी झाली की पालकांनी ग्रहदशा जाणून घेत मुलांचे करिअर ठरवणे उत्तम!
16
आयकर अधिकारी सांगून छगन भुजबळ यांच्याकडे मागितली एक कोटीची खंडणी; युवक अटकेत
17
पंख्याच्या हवेवरून वरातीत पेटला वाद, लाठ्या-काठ्या, दगड धोंडे घेऊन तुंबळ हाणामारी, एकाचा मृत्यू  
18
पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याचा आरोप, प्रसिद्ध युट्युबर ज्योती मल्होत्रा हिच्यासह सहा जण अटकेत
19
वेळीच व्हा सावध! टूथपेस्टमुळे होऊ शकतो कॅन्सर; 'हे' केमिकल बेतेल जीवावर, आताच घ्या काळजी
20
गुन्हेगारांना पकडण्यासाठी कालव्यात मारली उडी; तेव्हाच पडली विजेची तार, कॉन्स्टेबलचा मृत्यू

प. बंगाल नको, बंगालच म्हणा

By admin | Updated: August 3, 2016 05:09 IST

पश्चिम बंगाल या पूर्वेकडील राज्याचे नाव बदलून ते इंग्रजीत ‘बंगाल’ व बंगाली भाषेत ‘बांगला’ किंवा ‘बंग’ असे करण्याच्या प्रस्तावास ममता बॅनर्जीच्या मंत्रिमंडळाने मंगळवारी मंजुरी दिली.

कोलकाता : भारतीय संघराज्यातील पश्चिम बंगाल या पूर्वेकडील राज्याचे नाव बदलून ते इंग्रजीत ‘बंगाल’ व बंगाली भाषेत ‘बांगला’ किंवा ‘बंग’ असे करण्याच्या प्रस्तावास ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखालील राज्य मंत्रिमंडळाने मंगळवारी मंजुरी दिली.राज्य विधानसभेत हा प्रस्ताव मंजूर करून घेऊन तो केंद्र सरकारकडे पाठविला जाईल. विधानसभेतील तृणमूल काँग्रेसचे बहुमत पाहता तेथे हा प्रस्ताव मंजूर होण्यात काही अडचण येण्याचे कारण नाही. केंद्र सरकारला मात्र राष्ट्रपतींची पूर्वसंमती घेऊन या नावबदलासाठी संसदेत घटनादुरुस्ती मंजूर करून घ्यावी लागेल. ब्रिटिशांच्या गुलामगिरीच्या कालखंडाचा ठसा पुसून टाकण्याचा एक भाग म्हणून राज्याच्या नावात असा बदल करण्याची फार दिवसांची मागणी आहे. बंगाली अस्मितेशीही हा विषय निगडित आहे. यानुसारच ब्रिटिशांनी केलेले ‘कलकत्ता’ पुन्हा ‘कोलकाता’ झाले आहे.राज्याच्या नावातून ‘पश्चिम’ हा शब्द वगळण्याचा आग्रह धरणाऱ्यांचे म्हणणे असे की, ब्रिटिशांनी त्यांच्या फूटपाडू राजकारणासाठी धर्माच्या आधारावर बंगालची फाळणी केली आणि मुस्लीम बहुसंख्य असलेला बंगालचा पूर्व भाग ‘पूर्व बंगाल’ आणि हिंदू बहुसंख्य पश्चिम भाग ‘पश्चिम बंगाल’ झाला. मात्र आता भारतातील एक संघराज्य असलेल्या बंगालच्या नावामागे ‘पश्चिम’ कायम ठेवण्याचे कोणतेही समर्थनीय कारण नाही. कारण पूर्वीचे पूर्व बंगाल भारताच्या फाळणीनंतर पूर्व पाकिस्तान झाले आणि त्या भागाचा आता तर बांगलादेश हा स्वतंत्र देश स्थापन झाला आहे. केवळ एकच बंगाल आता शिल्लक आहे. त्यामुळे पूर्वी वेगळेपण दाखविण्यासाठी नावामागे लावलेला ‘पश्चिम’ हा शब्द कायम ठेवण्यात काहीच हाशील नाही.यासंदर्भात पंजाबचेही उदाहरण दिले जाते. पूर्वी एकसंघ असलेल्या पंजाबचे फाळणीने दोन तुकडे झाले. पूर्व पंजाब भारतात राहिला तर पश्चिम पंजाब पाकिस्तानात गेला. असे असले तरी हे प्रदेश ‘पूर्व’ किंवा ‘पश्चिम’ म्हणून नव्हे, तर दोन्ही देशांमध्ये फक्त पंजाब एवढ्याच नावाने ओळखले जातात. (वृत्तसंस्था)>घटनादुरुस्ती आवश्यकभारतीय संघराज्यातील कोणत्याही घटक राज्याच्या नावात फेरबदल करायचा असेल, तर त्यासाठी राज्यघटनेत दुरुस्ती करणे गरजेचे आहे. राज्यघटनेच्या अनुच्छेद २मध्ये संघराज्यातील राज्ये व केंद्रशासित प्रदेशांचा उल्लेख आहे व त्यांची सूची परिशिष्ठ १मध्ये दिलेली आहे. त्यामुळे अनुच्छेद २ व परिशिष्ठ १मध्ये दुरुस्ती करून राज्याच्या जुन्या नावाऐवजी नवे नाव नमूद करावे लागेल.बंगालबाबत नावात हा बदल आणखीही एका दृष्टीने लाभदायी ठरणार आहे. इंग्रजी आद्याक्षरांनुसार राज्यांची क्रमवारी लावल्यास सध्या पश्चिम बंगालचे नाव १४व्या क्रमांकावर येते. नुसते ‘बंगाल’ असे नाव झाल्यावर ते इंग्रजी आद्याक्षरांनुसार आसामनंतर लगेच दुसऱ्या क्रमांकावर येईल.