शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
3
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
4
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
5
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
6
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
7
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
8
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
9
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
10
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
11
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
12
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
13
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
14
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
15
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
16
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
17
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
18
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
19
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
20
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
Daily Top 2Weekly Top 5

राजकीय स्वार्थासाठी पंचकुला जळू दिले, हायकोर्टाने हरयाणा सरकारला फटकारले, केंद्र सरकारवरही ताशेरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2017 05:56 IST

डेरा सच्चा सौदाचा प्रमुख बाबा राम रहीमला बलात्काराच्या प्रकरणात न्यायालयाने शुक्रवारी दोषी ठरविल्यानंतर, त्याच्या समर्थकांनी जो धुडगूस घातला, त्याला हरयाणा सरकारच जबाबदार आहे, असे थेट ताशेरे पंजाब व हरयाणा उच्च न्यायालयाने शनिवारी ओढले.

चंदीगड/पंचकुला/नवी दिल्ली : डेरा सच्चा सौदाचा प्रमुख बाबा राम रहीमला बलात्काराच्या प्रकरणात न्यायालयाने शुक्रवारी दोषी ठरविल्यानंतर, त्याच्या समर्थकांनी जो धुडगूस घातला, त्याला हरयाणा सरकारच जबाबदार आहे, असे थेट ताशेरे पंजाब व हरयाणा उच्च न्यायालयाने शनिवारी ओढले. तुम्ही तुमच्या राजकीय स्वार्थासाठी पंचकुला शहर जळू दिले, अशा शब्दांत न्यायालयाने हरयाणा सरकारला व मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांना फटकारले.डेरा सच्चा सौदाचे सिरसासह राज्यभरात जितके आश्रम आहेत, ते रिकामे करण्याबाबतची तुमची पूर्ण योजना आमच्याकडे सादर करा, असे आदेश उच्च न्यायालयाने हरयाणा सरकारला दिले. बाबा राम रहीमला काल सीबीआय न्यायालयात आणण्यासाठीच्या ताफ्यात केवळ पाचच वाहने होती, अशी माहिती तुम्हाला कोणत्या अधिकाºयाने दिली? त्याचे नाव आम्हाला सांगा, असे आदेशही न्यायालयाने राज्याचे अ‍ॅडव्होकेट जनरल महाजन यांना दिले आहेत.हरयाणा देशाचा भाग नाही का?न्यायालयात केंद्र सरकारतर्फे अतिरिक्त सॉलिसिटर जनरल सत्यपाल जैन उपस्थित होते. त्यांनी कायदा व सुव्यवस्था हा राज्याचा विषय आहे, असे प्रतिपादन करताच, न्यायालयाने त्यांना हरयाणा हा देशाचा भाग आहे, असे तुम्हाला वाटत नाही का? असा थेट सवाल केला, तसेच पंतप्रधान हे भारताचे आहेत, भारतीय जनता पक्षाचे नाहीत, असेही त्यांना सुनावले.तुम्ही निर्णय अमलात येऊ दिले नाहीतप्रशासकीय व राजकीय निर्णयांमध्ये खूपच फरक होता. प्रशासनाने घेतलेले निर्णय राजकीय नेतृत्वाने अमलात येऊ दिले नाहीत, तुम्ही आमची दिशाभूल केलीत, अशी भाषा न्यायालयाने हरयाणा सरकारच्या बाबतीत वापरली. आता तुम्ही पंचकुलाच्या पोलीस उपायुक्तांना निलंबित केले आहे, पण काल जे घडले, त्याला केवळ तो अधिकारीच जबाबदार होता की काय? असा सवालही न्यायालयाने सरकारला विचारला.न्यायालयाने केला संताप व्यक्तपंचकुलामध्ये राम रहीम समर्थकांनी काल केलेली दगडफेक, जाळपोळ व हिंसाचार याबद्दल न्यायालयाने राज्य सरकारलाच जबाबदार धरले. या प्रकारानंतर पंचकुलामधील गोळीबारात २८ मरण पावले होते.या समर्थकांनी शेकडो वाहने जाळली, रेल्वे स्टेशन, बसेस, सरकारी कार्यालये, पेट्रोल पंप यांनाही आगी लावण्यात आल्या.या समर्थकांना पंचकुलाच्या बाहेर काढा, असे आदेश न्यायालयाने सरकारला दोनदा दिले होते. तरीही समर्थकांना हटविण्यात आले नाही आणि इतकी जाळपोळ झाली. त्यामुळे न्यायालयाने आपला संताप व्यक्त केला.डेराच्या सर्व मालमत्तांची यादी सादर करापंजाब व हरयाणात डेरा सच्चा सौदाच्या स्थावर व जंगम किती मालमत्ता आहेत, याची यादी आम्हाला सादर करा व पुढील सूचना मिळेपर्यंत यातील एकही मालमत्तेबाबत डेरातर्फे कोणताही व्यवहार होता कामा नये, असेही उच्च न्यायालयाने पंजाब व हरयाणा सरकारांना सांगितले आहे.थेट मुख्यमंत्र्यांवर टीकाराज्याच्या मुख्यमंत्र्यांकडेच गृहखातेही आहे. गेले सात दिवस तुम्ही इतक्या लोकांना (पंचकुलामध्ये) येऊ का दिले, असा प्रश्न विचारत, मुख्यमंत्री त्यांना संरक्षण देत आहेत, अशी टीकाच न्यायालयाने मनोहरलाल खट्टर यांच्यावर केली.

टॅग्स :High Courtउच्च न्यायालय