शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

हरयाणात साक्षर उमेदवारच लढवणार पंचायत निवडणूक

By admin | Updated: December 10, 2015 12:27 IST

हरयाणामध्ये पंचायत निवडणूक लढवणारा उमेदवार किमान १० वी उत्तीर्ण असलाच पाहिजे, असा आदेश सुप्रीम कोर्टाने दिला आहे.

ऑनलाइन लोकमत 

नवी दिल्ली, दि. १० -  ग्रामपंचायत निवडणूक लढवणारा उमेदवार किमान दहावी पास असलाच पाहिजे यासाठी हरयाणा सरकारने केलेला कायदा सर्वोच्च न्यायालयाने वैध ठरवला आहे. पंचायत निवडणूक लढवणा-या उमेदवारांसाठी ७ सप्टेंबरला हरयाणा सरकारने विधानसभेत एक कायदा मंजूर केला. त्यानुसार खुल्या वर्गातील उमेदवार हा दहावी उत्तीर्ण असला पाहिजे तर, महिला व दलित उमेदवार हा किमान ८ वी पास आणि दलित महिला पाचवी पास असली पाहिजे.

तसेच या कायद्यानुसार, उमेदवाराची कोणतीही गुन्हेगारी पार्श्वभूमी नसावी, वीज बिल, कर्जाचे हप्ते थकलेले नसावेत व सगळ्यात महत्वाचेे म्हणजे घरात शौचालय असले पाहिजे, अशा अटी या कायद्याद्वारे घालण्यात आल्या आहेत.

या कायद्यामुळे उमेदवाराच्या निवडणूक लढवण्याच्या अधिकाराचे उल्लंघन होते असा आक्षेप घेत ऑल इंडिया डेमोक्रॅटिक वुमेन्स असोशिएशनने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. सप्टेंबर महिन्यात सर्वोच्च न्यायालयाने या कायद्याला स्थगिती देत, हरयाणा सरकारला नोटीस बजावली होती.