शहरं
Join us  
Trending Stories
1
"कतारवर हल्ला म्हणजे अमेरिकेवर हल्ला, पुन्हा असं घडलं तर..."; ट्रम्प यांचा इस्रायलला इशारा
2
महाराष्ट्रात 'जम्बो'भरती! ४ ऑक्टोबरला एकाचवेळी तब्बल १०,३०९ उमेदवार शासकीय सेवेत होणार दाखल
3
"माझ्या पतीची बिनशर्त सुटका करा..."; सोनम वांगचुक यांच्या पत्नीचे थेट राष्ट्रपतींना पत्र
4
भिवंडीतील मानकोली येथे वह्या बनवणाऱ्या कंपनीच्या गोदामाला आग; सुदैवाने जीवितहानी नाही
5
महाराष्ट्रातील हॉटेल, दुकाने आता २४ तास सुरू राहणार; पण 'या' आस्थापनांवर मात्र निर्बंध कायम
6
“मराठा समाजाला आरक्षणाची अत्यंत गरज, पण सरकारने...”; खासदार शाहू महाराजांनी व्यक्त केली खंत
7
ठाणे महापालिकेच्या अतिक्रमण विभागप्रमुखाला २५ लाखांची लाच घेताना अटक; अगोदर घेतलेले १० लाख
8
मंत्रालयातील लूटीला चाप बसणार! सल्लागारांच्या नियुक्त्यांमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी निर्णय
9
GST घटला, पण सरकारचा खजिना भरला, सप्टेंबर महिन्यात झाली विक्रमी कमाई   
10
ICC Womens World Cup : 'लेडी मॅक्सवेल'ची विक्रमी सेंच्युरी; असा पराक्रम करणारी ठरली पहिली बॅटर
11
मुंबई मनपा निवडणुकीपूर्वी उद्धवसेनेला मोठा धक्का; ‘या’ गटाचे प्रमुख, पदाधिकारी शिवसेनेत
12
VIDEO: परंपरा.. प्रतिष्ठा.. अनुशासन.. 'या' ठिकाणी पुरूष साडी नेसून करतात गरबा, कारण...
13
“वाट कसली पाहता? शेतकरी भाजपात आल्यावर कर्जमुक्ती करणार का?”; उद्धव ठाकरेंचा थेट सवाल
14
संविधान सत्याग्रह पदयात्रेदरम्यान पोलिसांकडून पाळत, काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांचे सरकारला आव्हान, म्हणाले...
15
NHIDCL: एनएचआयडीसीएलमध्ये नोकरी, 'या' पदांसाठी भरती; १ लाख ५० हजारांपर्यंत पगार!
16
वय वर्ष ३१, संपत्ती ₹२१,१९० कोटी! कोण आहे भारतातील सर्वात तरुण अब्जाधीश? काय काम करतो?
17
लोकसंख्येतील बदल घुसखोरीपेक्षाही घातक...! असं का म्हणाले पंतप्रधान मोदी? देशाला दिला गंभीर इशारा
18
'ओला दुष्काळ जाहीर करा', उद्धव ठाकरेंनी दाखवले CM फडणवीसांचे पत्र, म्हणाले, "मलाही वेदना झाल्या.."
19
CM फडणवीसांचा ‘तो’ Video विरोधकांनी दाखवला; म्हणाले, “गांभीर्याने विचार करा, असले राजकारण...”
20
शौक बड़ी चीज है! १७ व्या वर्षी iPhone 4, iPad 2 साठी विकली किडनी, आता आयुष्यभराचं दुखणं

हरयाणात साक्षर उमेदवारच लढवणार पंचायत निवडणूक

By admin | Updated: December 10, 2015 12:27 IST

हरयाणामध्ये पंचायत निवडणूक लढवणारा उमेदवार किमान १० वी उत्तीर्ण असलाच पाहिजे, असा आदेश सुप्रीम कोर्टाने दिला आहे.

ऑनलाइन लोकमत 

नवी दिल्ली, दि. १० -  ग्रामपंचायत निवडणूक लढवणारा उमेदवार किमान दहावी पास असलाच पाहिजे यासाठी हरयाणा सरकारने केलेला कायदा सर्वोच्च न्यायालयाने वैध ठरवला आहे. पंचायत निवडणूक लढवणा-या उमेदवारांसाठी ७ सप्टेंबरला हरयाणा सरकारने विधानसभेत एक कायदा मंजूर केला. त्यानुसार खुल्या वर्गातील उमेदवार हा दहावी उत्तीर्ण असला पाहिजे तर, महिला व दलित उमेदवार हा किमान ८ वी पास आणि दलित महिला पाचवी पास असली पाहिजे.

तसेच या कायद्यानुसार, उमेदवाराची कोणतीही गुन्हेगारी पार्श्वभूमी नसावी, वीज बिल, कर्जाचे हप्ते थकलेले नसावेत व सगळ्यात महत्वाचेे म्हणजे घरात शौचालय असले पाहिजे, अशा अटी या कायद्याद्वारे घालण्यात आल्या आहेत.

या कायद्यामुळे उमेदवाराच्या निवडणूक लढवण्याच्या अधिकाराचे उल्लंघन होते असा आक्षेप घेत ऑल इंडिया डेमोक्रॅटिक वुमेन्स असोशिएशनने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. सप्टेंबर महिन्यात सर्वोच्च न्यायालयाने या कायद्याला स्थगिती देत, हरयाणा सरकारला नोटीस बजावली होती.