पान २- म्हादईप्रश्नी लवादाकडे याचिका दाखल करणार - राजेंद्र केरकर : १५ रोजीच्या सुनावणीस गोव्याची जय्यत तयारी
By admin | Updated: July 13, 2015 01:06 IST
डिचोली : म्हादईप्रश्नी १५ जुलै रोजी होणार्या सुनावणीसाठी गोवा सरकारने कर्नाटकशी दोन हात करण्यासाठी जय्यत तयारी केली आहे. दुसर्या बाजूने म्हादईचा लढा जिंकण्यासाठी हरित लवादाकडे याचिका दाखल करण्याची तयारी पर्यावरण कार्यकर्ते राजेंद्र केरकर यांनी केली असून वन्यजीव व पर्यावरणीय मु्द्यावर ही लढाई लढण्याचे ठरवले आहे.
पान २- म्हादईप्रश्नी लवादाकडे याचिका दाखल करणार - राजेंद्र केरकर : १५ रोजीच्या सुनावणीस गोव्याची जय्यत तयारी
डिचोली : म्हादईप्रश्नी १५ जुलै रोजी होणार्या सुनावणीसाठी गोवा सरकारने कर्नाटकशी दोन हात करण्यासाठी जय्यत तयारी केली आहे. दुसर्या बाजूने म्हादईचा लढा जिंकण्यासाठी हरित लवादाकडे याचिका दाखल करण्याची तयारी पर्यावरण कार्यकर्ते राजेंद्र केरकर यांनी केली असून वन्यजीव व पर्यावरणीय मु्द्यावर ही लढाई लढण्याचे ठरवले आहे.म्हादईचा लढा सफल करण्यासाठी गोवा सरकारने १५ रोजी होणार्या जललवादासमोरील सुनावणीसाठी सर्व प्रकारची व्यूहरचना करण्यासाठी प्राधान्य दिले आहे. गोवा सरकारने म्हादई नदीचे पाणी अन्यत्र वळवले तर गोव्याच्या पर्यावरण व लोकजीवनावर दुष्परिणाम होणार असल्याचे मुद्दे लवादासमोर ठेवण्याचे ठरवले आहे.त्यानुसार गोव्याचे ॲड. जनरल आत्माराम नाडकर्णी आणि वकिलांची फौज प्रयत्नशील आहे.पुण्याचे जलविवादासंदर्भातील तज्ज्ञ म्हणून चेतन पंडित यांची नियुक्ती गोवा सरकारने यापूर्वीच केली आहे. ॲड. नाडकर्णी यांनी गोव्याची बाजू प्रभावीपणे मांडण्यासाठी विविधप्रकारे सखोल अभ्यास, दस्तावेज तयार केले आहेत. कर्नाटक व महाराष्ट्राकडून म्हादईच्या उपनद्यांचे जे पाणी वळवल्यास त्याचा पहिला फटका म्हादई अभयारण्याला बसणार आहे. त्यामुळे वन्यजीव आणि पर्यावरण आदी मुद्यांवर भर देऊन राष्ट्रीय हरित लवादासमोर लवकरच याचिका दाखल करणार असल्याचे राजेंद्र केरकर यांनी सांगितले. (प्रतिनिधी)बॉक्स - राज्यपालांच्या उपस्थितीत चर्चाराज्यपाल मृदुला सिन्हा यांच्या उपस्थितीत गोवा राज्य पर्यावरण संरक्षण मंडळाच्या हल्लीच झालेल्या बैठकीत राजेंद्र केरकर यांनी म्हादईचा मुद्दा उपस्थित केला होता. त्यावेळी त्यांनी म्हादईचा लढा राष्ट्रीय हरित लवादाकडे नेणे गरजेचे असल्याचे सांगितले. यावेळी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी याप्रश्नी सरकारचे सर्व प्रकारचे सहकार्य करण्याची हमी दिली आहे. या पार्श्वभूमीवर हा विषय राष्ट्रीय हरित लवादाकडे नेण्यासाठी केरकर यांनी पूर्वतयारी आरंभली आहे.फोटो ओळी-म्हादईचा फास आवळणार्या कळसा कालव्याचे काम सुरूच आहे. (विशांत वझे)