शहरं
Join us  
Trending Stories
1
Donald Trump Tariffs: 'चीनवरील टॅरिफ कमी करण्यास तयार, कारण...'; डोनाल्ड ट्रम्प यांची अचानक नरमाईची भूमिका
2
Video: चीनी फॅक्टरीत रोबोट अचानक झाला हिंसक; कर्मचाऱ्यांवर केला जीवघेणा हल्ला, मग...
3
मिचमिच डोळे, रडारचे कान...! एमजी अ‍ॅस्टरमधून पुण्यात आणि गावखेड्यात भटकंती, कशी वाटली एसयुव्ही...
4
"२ वर्ष अख्खं जग थांबलं होतं तेव्हा माझं घर यांच्यामुळे चाललं", प्रसाद ओकने कोणाला दिलं श्रेय?
5
FD द्वारे रक्कम होऊ शकते तिप्पट, अनेकांना माहितही नाही; ₹५ लाख जमा करा, ₹१५ लाखांपेक्षा जास्त मिळतील
6
'पाकिस्तान भारताविरुद्ध ४ दिवसही टीकू शकत नाही, कराची अन् लाहोरमध्ये गुरुकुल उघडणार'; बाबा रामदेव यांनी सुनावले
7
बारावीचा आज निकाल; या संकेतस्थळांवर पाहता येणार..., कुठे आणि कसा पहावा...
8
अनैतिक संबंधातून वाद, जळगावात भररस्त्यात घडला थरार; पाठलाग करत युवकाला कायमचं संपवलं
9
...म्हणून बाबिलने अर्जुन कपूर, अनन्या पांडेचं नाव घेतलं; अभिनेत्याच्या 'त्या' व्हिडिओनंतर टीमकडून स्पष्टीकरण
10
दूत पाठवले म्हणून अजितदादांची शिंदेंवर नाराजी, पुढे काय?
11
India Pakistan: युद्धाचे ढग गडद होताच मध्यस्थीसाठी मुस्लिम देश आला पुढे, 'हा' नेता येणार भारत दौऱ्यावर
12
कानपूरमध्ये ६ मजली इमारतीला भीषण आग; एकाच कुटुंबातील ५ जणांचा होरपळून मृत्यू
13
जातीनिहाय जनगणनेची फार वर्षे वाट पाहिली, अखेर निर्णय झाला!
14
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: या व्यक्तींची लग्न जुळू शकतात; लाभदायक बातम्या प्राप्त होतील!
15
तंदूरी रोटी बनली मृत्यूचं कारण! लग्न समारंभात भिडले २ युवक; हाणामारीत दोघांचा जीव गेला
16
संपादकीय: ...शिक्षा शेतकरी भावाला! घोटाळा सरकारनेच मान्य केला हे बरे झाले...
17
छोटा दत्तू आला! 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम अभिनेता झाला बाबा, लग्नानंतर २ वर्षांनी दिली गुडन्यूज
18
भारताने रोखले चिनाबचे पाणी, लवकरच झेलमचेही थांबवणार
19
राज्यातील २,९९७ प्रकल्पांत ३३ टक्के पाणी शिल्लक; पातळी आणखी खालावणार
20
‘भारताबरोबर युद्ध झाले तर मी इंग्लंडला पळून जाईन’; पाकिस्तानी खासदार शेर मारवत यांचे अजब विधान 

पाकिस्तान हा दहशतवाद्यांचा अड्डा- भारत

By admin | Updated: March 2, 2017 07:31 IST

भारतानं पुन्हा एकदा पाकिस्तानला संयुक्त राष्ट्रात खडे बोल सुनावले आहेत.

ऑनलाइन लोकमतजेनेव्हा, दि. 2 - भारतानं पुन्हा एकदा पाकिस्तानला संयुक्त राष्ट्रात खडे बोल सुनावले आहेत. संयुक्त राष्ट्रसंघात भारताचं प्रतिनिधित्व करत असलेले भारतीय राजदूत अजित कुमार यांनी पाकिस्तानवर जोरदार हल्लाबोल केला आहे. ते म्हणाले, पाकिस्तान हा दहशतवाद्यांचा अड्डा बनला असून, भारताविरोधात कुरघोडी करण्यासाठी दहशतवादी संघटनांना जन्म देतो आहे. त्यामागे भारतातली शांती भंग होऊन देशाचं विकासावरचं लक्ष्य हटवण्याचा पाकिस्तानचा प्रयत्न आहे. गेल्या दोन दशकांपासून पाकिस्तान सर्वाधिक खरतनाक दहशतवाद्यांना आश्रय देऊन त्यांना पोसतो आहे. पाकिस्तानमध्ये सद्य स्थितीत दहशतवाद्यांना निर्माण करणा-या संघटनांच्या म्होरक्याचाच हे दहशतवादी खात्मा करत आहेत. पाकिस्ताननं भारतासोबत काश्मीर मुद्द्यावर बोलण्याआधी पाकव्याप्त काश्मीरवरचा ताबा सोडावा, त्यानंतरच चर्चेला यावं, असंही अजित कुमार म्हणाले आहेत. पाकिस्तान पाकव्याप्त काश्मीरमध्ये मानवाधिकारांचं उल्लंघन करत लोकांवर मोठ्या प्रमाणात अत्याचार करत आहे. तसेच पाकिस्ताननं लवकरात लवकर पाकव्याप्त काश्मीर खाली केलं पाहिजे. काश्मीरमध्ये उसळणा-या हिंसाचाराला सर्वस्वी सीमेपलीकडेचा दहशतवाद आणि पाकिस्तानचं जबाबदार असल्याचंही ते म्हणाले आहेत. पाकिस्तान निर्दयीपणे मानवाधिकारांचं उल्लंघन करत आहे. विशेष म्हणजे पाकिस्तान स्वतःच्या प्रांतातील बलुचिस्तान, सिंध, खैबर पख्तूनख्वासह उत्तर पश्चिम भागातील लोकांवर संकोच न करता दहशतवादी कारवाया करत असून, हवाई हल्लेही करत आहे. स्वतःच्याच देशात धार्मिक आणि सांप्रदायिक दंगे घडवत असल्यानं पाकिस्तान या देशाचं रुपांतर आता जागतिक दहशतवादी देशामध्ये झालं आहे. उरी हल्ल्याचा बदला घेण्यासाठी भारतानं सर्जिकल स्ट्राइक केलं होतं. पाकिस्ताननं 2016 या वर्षांत जवळपास 151 वेळा शस्त्रसंधीचं उल्लंघन केलं आहे, अशी माहिती त्यांनी संयुक्त राष्ट्रात दिली आहे.