शहरं
Join us  
Trending Stories
1
संन्यस्त खड्ग नाटकावरुन पुण्यात वंचितच्या कार्यकर्त्यांचा राडा; यशवंत नाट्यगृहात घोषणाबाजी, पोलिसांचा फौजफाटा तैनात
2
अखेर ज्वालामुखी फुटलाच...! सत्य ठरली नव्या बाबा वेंगाची भविष्यवाणी! जपानमध्येही इतर भयावह भाकितं ठरतायत खरी!
3
IND vs ENG 3rd Test: नो आघाडी...नो पिछाडी; लॉर्ड्सच्या मैदानातील टेस्ट मॅचमध्ये पहिल्यांदाच 'टाय'चा ट्विस्ट!
4
समाज कंटकांनी कावड यात्रा मार्गावर टाकले काचेचे तुकडे; भाजप नेत्याचा दावा
5
अनैतिक संबंधांचा संशय, पतीनं अभिनेत्री पत्नीवर आधी 'पेर स्प्रे' मारला, मग चाकूनं सपासप वार केले अन्...
6
IND vs ENG : इंग्लंडच्या सलामीवीरांची 'नौटंकी'! टीम इंडियाचा 'सेनापती' गिलनं असा काढला राग (VIDEO)
7
'फ्यूल कंट्रोल स्विच'संदर्भात ही एक गोष्ट ऐकली असती तर अहमदाबाद विमान अपघात टळला असता? FAA नं 2018 मध्येच दिला होता इशारा
8
इगा स्वियातेक विम्बल्डनची नवी सम्राज्ञी! तिनं अमांडा अनिसिमोव्हाला रडवलं! १९८८ नंतर पहिल्यांदाच असं घडलं
9
"एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्याने वाईट वाटलं आणि घरी निघून गेलो,पण पुन्हा..."; रवींद्र चव्हाणांचा गौप्यस्फोट
10
मायक्रोसॉफ्टने AI वापरून वाचवले ४,२०० कोटी; पण १५,००० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं
11
शेवटच्या 3 सेकंदांत 'RUN' वरून 'CUTOFF' झालं 'फ्यूल कंट्रोल स्विच' अ्न...; एअर इंडिया प्लेन क्रॅशवेळी शेवटच्या क्षणाला नेमकं काय घडलं?
12
४०० प्लस धावांसह इंग्लंडच्या मैदानात रिषभ पंतचा 'भीम पराक्रम'! MS धोनीलाही जमलं नाही ते करून दाखवलं
13
"माझा नातेवाईक का असेना, टायरमध्ये घालून झोडायला सांगणार"; बारामतीत अजित पवारांचा कडक इशारा
14
मुलगी म्हणतेय, 'माझ्यावर हॉस्टेलमध्ये अत्याचार झाला'; वडील म्हणाले, 'ती कारमधून पडली'
15
KL राहुलची विक्रमी सेंच्युरी; लॉर्ड्सच्या मैदानात अशी कामगिरी करणारा ठरला दुसरा भारतीय
16
भारतातील रस्त्यावरही टेस्लाच्या कार धावणार; या दिवशी पहिलं शोरूम सुरू होणार, लवकरच डिलिव्हरी सुरू होईल
17
Air India Plane Crash :'रिपोर्ट लीक कसा झाला?' अहमदाबाद विमान अपघाताच्या अहवालावर पायलट असोसिएशनने आक्षेप घेतला
18
पंतची मोठी चूक! चोरटी धाव घेण्याच्या नादात फुकटात फेकली विकेट! बेन स्टोक्सचा डायरेक्ट थ्रो अन्...
19
नरेंद्र मोदींनंतर PM म्हणून काँग्रेसकडून राहुल गांधींचा पर्याय? शं‍कराचार्यांचे मोठे विधान
20
“७५ वर्षांचा नियम RSSला लागू करायचा असेल, म्हणून मोहन भागवत तसे म्हणाले असतील”: शंकराचार्य

पाकिस्तान हा दहशतवाद्यांचा अड्डा- भारत

By admin | Updated: March 2, 2017 07:31 IST

भारतानं पुन्हा एकदा पाकिस्तानला संयुक्त राष्ट्रात खडे बोल सुनावले आहेत.

ऑनलाइन लोकमतजेनेव्हा, दि. 2 - भारतानं पुन्हा एकदा पाकिस्तानला संयुक्त राष्ट्रात खडे बोल सुनावले आहेत. संयुक्त राष्ट्रसंघात भारताचं प्रतिनिधित्व करत असलेले भारतीय राजदूत अजित कुमार यांनी पाकिस्तानवर जोरदार हल्लाबोल केला आहे. ते म्हणाले, पाकिस्तान हा दहशतवाद्यांचा अड्डा बनला असून, भारताविरोधात कुरघोडी करण्यासाठी दहशतवादी संघटनांना जन्म देतो आहे. त्यामागे भारतातली शांती भंग होऊन देशाचं विकासावरचं लक्ष्य हटवण्याचा पाकिस्तानचा प्रयत्न आहे. गेल्या दोन दशकांपासून पाकिस्तान सर्वाधिक खरतनाक दहशतवाद्यांना आश्रय देऊन त्यांना पोसतो आहे. पाकिस्तानमध्ये सद्य स्थितीत दहशतवाद्यांना निर्माण करणा-या संघटनांच्या म्होरक्याचाच हे दहशतवादी खात्मा करत आहेत. पाकिस्ताननं भारतासोबत काश्मीर मुद्द्यावर बोलण्याआधी पाकव्याप्त काश्मीरवरचा ताबा सोडावा, त्यानंतरच चर्चेला यावं, असंही अजित कुमार म्हणाले आहेत. पाकिस्तान पाकव्याप्त काश्मीरमध्ये मानवाधिकारांचं उल्लंघन करत लोकांवर मोठ्या प्रमाणात अत्याचार करत आहे. तसेच पाकिस्ताननं लवकरात लवकर पाकव्याप्त काश्मीर खाली केलं पाहिजे. काश्मीरमध्ये उसळणा-या हिंसाचाराला सर्वस्वी सीमेपलीकडेचा दहशतवाद आणि पाकिस्तानचं जबाबदार असल्याचंही ते म्हणाले आहेत. पाकिस्तान निर्दयीपणे मानवाधिकारांचं उल्लंघन करत आहे. विशेष म्हणजे पाकिस्तान स्वतःच्या प्रांतातील बलुचिस्तान, सिंध, खैबर पख्तूनख्वासह उत्तर पश्चिम भागातील लोकांवर संकोच न करता दहशतवादी कारवाया करत असून, हवाई हल्लेही करत आहे. स्वतःच्याच देशात धार्मिक आणि सांप्रदायिक दंगे घडवत असल्यानं पाकिस्तान या देशाचं रुपांतर आता जागतिक दहशतवादी देशामध्ये झालं आहे. उरी हल्ल्याचा बदला घेण्यासाठी भारतानं सर्जिकल स्ट्राइक केलं होतं. पाकिस्ताननं 2016 या वर्षांत जवळपास 151 वेळा शस्त्रसंधीचं उल्लंघन केलं आहे, अशी माहिती त्यांनी संयुक्त राष्ट्रात दिली आहे.