शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीतील स्फोटाचं पुलवामा कनेक्शन समोर, सलमानने काश्मीरमधील तारिकला विकली होती ती कार
2
दिल्लीतील स्फोट हा आत्मघाती हल्ला? समोर येतेय अशी माहिती, पोलिसांकडून गुन्हा दाखल
3
ना स्फोटाच्या ठिकाणी खड्डा, ना मृतांच्या शरीरात सापडले तारा आणि खिळे, या कारणांनी गुढ वाढवलं
4
दिल्लीत लाल किल्ला मेट्रो स्टेशनजवळ झालेल्या स्फोटातील जखमी आणि मृतांची यादी समोर
5
लाल किल्ल्याजवळ कारचा भीषण स्फोट, ८ ठार; 'प्रत्येक अँगलने तपास करा', गृहमंत्री अमित शाह यांचे तातडीचे आदेश!
6
दिल्लीतील ‘ब्लास्ट’, मागील पाच वर्षांतील केरळनंतरचा ठरला सर्वात मोठा स्फोट
7
लाल किल्ल्याजवळ स्फोट, दुर्घटनेनंतर देश हादरला! राहुल गांधी ते शरद पवार... कोण काय म्हणाले?
8
लाल किल्याजवळील स्फोटाने देश हादरला; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा अमित शाह यांना फोन, पोस्ट करत म्हणाले-
9
Red Fort Blast Video: अनेकांच्या उडाल्या चिंधड्या! स्फोटानंतरची दृश्ये बघून होईल थरकाप, नेमकी कुठे घडली घटना?
10
Prem Chopra : दिग्गज अभिनेते प्रेम चोप्रा यांच्या प्रकृतीत सुधारणा; लीलावती रुग्णालयात दाखल
11
Red Fort Blast:  कार हळूहळू सिग्नलजवळ येऊन थांबली अन् झाला स्फोट; पोलीस आयुक्तांनी सांगितली घटना
12
लाल किल्ल्याजवळील स्फोटानंतर महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेशमध्ये हाय अलर्ट! तपास यंत्रणा सतर्क
13
Delhi Red Fort Blast: मोठी बातमी! दिल्लीत लाल किल्ल्याजवळ भीषण स्फोट, 8 जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
14
कुणाचा हात तुटून पडला, कुणाचा कोथळा बाहेर आला; प्रत्यक्षदर्शीने सांगितली दिल्ली स्फोटाची हादरवून टाकणारी घटना
15
'त्या' जमीन गैरव्यवहार प्रकरणात पार्थ पवार, शीतल तेजवानींना पोलिसांकडून क्लीन चिट
16
भयानक कोसळणार ...! मी १९७१ पासून सोने खरेदी करतोय, पण...; रॉबर्ट कियोसाकी यांच्या दाव्याने खळबळ 
17
दहशतवाद्यांच्या टोळीत महिला डॉक्टरही सामील, थेट पाकिस्तानशी कनेक्शन; कारमध्ये घेऊन फिरत होती एके ४७!
18
जडेजाला संघाबाहेर काढण्यात धोनी सगळ्यात पुढे असेल! माजी क्रिकेटरनं त्यामागचं कारणही सांगून टाकलं
19
ताजमहालसमोर साखरपुडा...! दोनवेळा ऑस्ट्रेलियाला वर्ल्डकप जिंकविणारी भारताची सून होणार; कोण आहे ती...
20
अभिनेते धर्मेंद्र व्हेंटिलेटरवर? आयसीयूत सुरु आहेत उपचार; टीमने दिली हेल्थ अपडेट, म्हणाले...

पाकिस्तानला चोख उत्तर

By admin | Updated: May 24, 2017 03:30 IST

भारताच्या दोन जवानांचे शिर धडावेगळे केल्याचा बदला ९ दिवसांतच घेत भारतीय लष्कराने पाकिस्तानच्या चौक्यांवर हल्लाबोल केला

लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : भारताच्या दोन जवानांचे शिर धडावेगळे केल्याचा बदला ९ दिवसांतच घेत भारतीय लष्कराने पाकिस्तानच्या चौक्यांवर हल्लाबोल केला असून, या गोळीबारात चौक्यांचे मोठे नुकसान झाले आहे. सैन्याने याबाबतचा एक व्हिडीओही रीलीज केला आहे. केंद्र सरकारने भारतीय लष्कराच्या या कारवाईचे जोरदार समर्थन केले आहे.भारतीय जवानांनी केलेल्या हल्ल्यात रॉकेट लाँचर, अँटी टँक गाईडेड मिसाईल, स्वयंचलित ग्रेनेड लाँचर आणि बंदुका यांचा उपयोग करण्यात आला. या हल्ल्यात १५ ते २५ पाकिस्तानी सैनिक ठार झाले असावेत, असा अंदाज आहे. नौशेरा भागातील या प्रतिहल्ल्याबाबत सैन्याने तपशील दिला नाही. नौशेरा हा भाग जम्मू येथील सीमेला लागून आहे. माहिती व संपर्क विभागाचे अतिरिक्त महासंचालक मेजर जनरल ए.के. नरुला यांनी सांगितले की, दहशतवाद्यांच्या घुसखोरीला मदत करणाऱ्या पाकिस्तानच्या चौक्यांवर भारतीय जवानांनी हल्ला केला.हा हल्ला म्हणजे पाकिस्तानला संदेश होता की, सीमेपलीकडून होणाऱ्या घुसखोरीच्या प्रयत्नांना सैन्य हाणून पाडेल. संरक्षणमंत्री अरुण जेटली यांनी टिष्ट्वटद्वारे या कारवाईचे सरकार समर्थन करीत असल्याचे स्पष्ट केले. जम्मू-काश्मिरात शांतता प्रस्थापित करण्यास अशी कारवाई आवश्यक आहे. अन्य एका टिष्ट्वटमध्ये त्यांनी म्हटले की, घुसखोरीचे समर्थन करणाऱ्या नियंत्रणरेषेपलीकडील पाकिस्तानी चौक्यांना लक्ष्य करण्यात आले आहे. २४ सेकंदांचा व्हिडीओ सैन्याने या कारवाईचा २४ सेकंदांचा व्हिडीओ जारी केला आहे. जंगलाच्या भागात एका डोलाऱ्यावर सतत केल्या जाणाऱ्या गोळीबारामुळे तो कोसळत आहे. हा व्हिडीओ नेमक्या कोणत्या भागातील आहे ते मात्र समजत नाही. घुसखोरी वाढल्याने...भारतीय लष्करातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दहशतवादविरोधी मोहिमेचा भाग म्हणून नियंत्रणरेषेच्या पलीकडून घुसखोरीला मदत करणाऱ्यांवरच कारवाई करण्यात आली आहे. मेजर जनरल नरुला म्हणाले की, पाकिस्तानी सैन्य या घुसखोरांना शस्त्रास्त्रे पुरवीत आहे. हे घुसखोर नियंत्रणरेषेजवळच्या गावांना लक्ष्य करीत आहेत. बर्फ वितळण्यास सुरुवात झाल्यानंतर घुसखोरी वाढण्याची शक्यता व्यक्त करून नौगाम भागात २०-२१ मे रोजी चार अतिरेक्यांना मारल्याच्या घटनेची त्यांनी आठवण करून दिली. त्या कारवाईत भारताचे तीन जवान शहीद झाले होते.नौशेरा भागात भारताने हल्ला करीत चौक्या उद्ध्वस्त केल्याचा दावा पाकिस्तानने फेटाळला आहे. मेजर जनरल आसिफ गफूर यांनी टिष्ट्वट केले आहे की, पाकिस्तानी चौक्या नष्ट केल्याचा भारताचा दावा खोटा आहे, तसेच नियंत्रणरेषेजवळ सामान्य नागरिकांवर पाकिस्तानी सैन्याकडून गोळीबार करण्यात आल्याचा दावाही चुकीचा आहे.