शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतासारख्या कणखर सहकाऱ्यासोबतचे संबंध खराब करू नका"; ट्रम्प यांना निकी हेली यांनी सुनावले
2
खेड प्रेम प्रकरण: "मठाच्या नावाखाली अनेक..."; प्राजक्ताच्या वडिलांचे विश्वनाथ गोसावीवर गंभीर आरोप
3
Video: "आता मी हिंदीत बोलू????"; मराठीत बोलत असतानाच काजोल भडकली, बघा काय घडलं?
4
Palghar Video : कामगारांनी कार अडवली, संतापलेल्या मालकिणीने थेट अंगावरच घातली; प्रकरण का चिघळलं? 
5
हीरक महोत्सवी महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार प्रदान, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी
6
खूशखबर... नागपूर-पुणे वंदे भारत एक्स्प्रेसचा लवकरच शुभारंभ; PM मोदी दाखविणार हिरवा झेंडा 
7
Ceasefire Violation: पाकिस्तानने खरंच सीमेवर गोळीबार केला का?; लष्कराने दिली महत्त्वाची माहिती
8
Aarti Sathe Judge: "काँग्रेसवाल्यांनो आणि रोहित पवार आता याचे उत्तर द्या"; भाजपचे विरोधकांना आव्हान
9
गझल हेच व्रत हाच ध्यास! पंडित भीमराव पांचाळे यांना गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार प्रदान
10
ढगफुटीत हॅलिपॅड वाहून गेला, हर्षिलमधील लष्कराच्या तळालाही फटका, अनेक जवान बेपत्ता...  
11
एका कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करणारे संघ, भारताने मोडला ९६ वर्षांचा जुना विक्रम!
12
अजितदादांचा शरद पवारांना धक्का, तानाजी सावंतांचंही टेन्शन वाढवलं, माजी आमदार राहुल मोटे अजित पवार गटात
13
"मी अजून करिअरमध्ये मध्यंतरापर्यंतही पोहोचलेलो नाही", जीवनगौरव पुरस्कारानंतर अनुपम खेर यांची प्रतिक्रिया
14
Joe Root: जो रूट सुसाट! सचिन तेंडुलकरचा 'हा' विश्वविक्रमही धोक्यात, फक्त 'इतक्या' धावा दूर
15
रोहित शर्मा, विराट कोहली २०२७च्या वनडे विश्वचषकाचा भाग नसणार? समोर आली मोठी अपडेट
16
छ. शिवरायांच्या किल्ल्यांना जागतिक दर्जा मिळवून देण्यात योगदान देणाऱ्या विशाल शर्मांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मान
17
Dharali floods: ताशी 43 किमी वेग... 1230 फूट उंचावरून आले पाणी अन् गाळ; कशी उद्ध्वस्त झाली धराली?
18
अभिनेत्री काजोलला राज कपूर विशेष योगदान पुरस्कार प्रदान, म्हणाली, "आज माझा वाढदिवस..."
19
VVPAT शिवाय होणार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, निवडणूक आयोगाने केलं स्पष्ट 
20
"पुढील २४ तासांत मी भारतावर आणखी..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा थयथयाट; नवीन इशारा काय?

पाकिस्तानला चोख उत्तर

By admin | Updated: May 24, 2017 03:30 IST

भारताच्या दोन जवानांचे शिर धडावेगळे केल्याचा बदला ९ दिवसांतच घेत भारतीय लष्कराने पाकिस्तानच्या चौक्यांवर हल्लाबोल केला

लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : भारताच्या दोन जवानांचे शिर धडावेगळे केल्याचा बदला ९ दिवसांतच घेत भारतीय लष्कराने पाकिस्तानच्या चौक्यांवर हल्लाबोल केला असून, या गोळीबारात चौक्यांचे मोठे नुकसान झाले आहे. सैन्याने याबाबतचा एक व्हिडीओही रीलीज केला आहे. केंद्र सरकारने भारतीय लष्कराच्या या कारवाईचे जोरदार समर्थन केले आहे.भारतीय जवानांनी केलेल्या हल्ल्यात रॉकेट लाँचर, अँटी टँक गाईडेड मिसाईल, स्वयंचलित ग्रेनेड लाँचर आणि बंदुका यांचा उपयोग करण्यात आला. या हल्ल्यात १५ ते २५ पाकिस्तानी सैनिक ठार झाले असावेत, असा अंदाज आहे. नौशेरा भागातील या प्रतिहल्ल्याबाबत सैन्याने तपशील दिला नाही. नौशेरा हा भाग जम्मू येथील सीमेला लागून आहे. माहिती व संपर्क विभागाचे अतिरिक्त महासंचालक मेजर जनरल ए.के. नरुला यांनी सांगितले की, दहशतवाद्यांच्या घुसखोरीला मदत करणाऱ्या पाकिस्तानच्या चौक्यांवर भारतीय जवानांनी हल्ला केला.हा हल्ला म्हणजे पाकिस्तानला संदेश होता की, सीमेपलीकडून होणाऱ्या घुसखोरीच्या प्रयत्नांना सैन्य हाणून पाडेल. संरक्षणमंत्री अरुण जेटली यांनी टिष्ट्वटद्वारे या कारवाईचे सरकार समर्थन करीत असल्याचे स्पष्ट केले. जम्मू-काश्मिरात शांतता प्रस्थापित करण्यास अशी कारवाई आवश्यक आहे. अन्य एका टिष्ट्वटमध्ये त्यांनी म्हटले की, घुसखोरीचे समर्थन करणाऱ्या नियंत्रणरेषेपलीकडील पाकिस्तानी चौक्यांना लक्ष्य करण्यात आले आहे. २४ सेकंदांचा व्हिडीओ सैन्याने या कारवाईचा २४ सेकंदांचा व्हिडीओ जारी केला आहे. जंगलाच्या भागात एका डोलाऱ्यावर सतत केल्या जाणाऱ्या गोळीबारामुळे तो कोसळत आहे. हा व्हिडीओ नेमक्या कोणत्या भागातील आहे ते मात्र समजत नाही. घुसखोरी वाढल्याने...भारतीय लष्करातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दहशतवादविरोधी मोहिमेचा भाग म्हणून नियंत्रणरेषेच्या पलीकडून घुसखोरीला मदत करणाऱ्यांवरच कारवाई करण्यात आली आहे. मेजर जनरल नरुला म्हणाले की, पाकिस्तानी सैन्य या घुसखोरांना शस्त्रास्त्रे पुरवीत आहे. हे घुसखोर नियंत्रणरेषेजवळच्या गावांना लक्ष्य करीत आहेत. बर्फ वितळण्यास सुरुवात झाल्यानंतर घुसखोरी वाढण्याची शक्यता व्यक्त करून नौगाम भागात २०-२१ मे रोजी चार अतिरेक्यांना मारल्याच्या घटनेची त्यांनी आठवण करून दिली. त्या कारवाईत भारताचे तीन जवान शहीद झाले होते.नौशेरा भागात भारताने हल्ला करीत चौक्या उद्ध्वस्त केल्याचा दावा पाकिस्तानने फेटाळला आहे. मेजर जनरल आसिफ गफूर यांनी टिष्ट्वट केले आहे की, पाकिस्तानी चौक्या नष्ट केल्याचा भारताचा दावा खोटा आहे, तसेच नियंत्रणरेषेजवळ सामान्य नागरिकांवर पाकिस्तानी सैन्याकडून गोळीबार करण्यात आल्याचा दावाही चुकीचा आहे.