शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

पाकचे सार्क संमेलन बारगळले

By admin | Updated: September 29, 2016 06:20 IST

भारतासह चार देशांनी सार्क संमेलनात सहभागी होण्यास नकार दिल्यानंतर हे संमेलनच आता बारगळल्यात जमा आहे. हे संमेलन रद्द होणार असल्याची माहिती नेपाळच्या राजकीय

नवी दिल्ली : भारतासह चार देशांनी सार्क संमेलनात सहभागी होण्यास नकार दिल्यानंतर हे संमेलनच आता बारगळल्यात जमा आहे. हे संमेलन रद्द होणार असल्याची माहिती नेपाळच्या राजकीय क्षेत्रातील उच्चस्तरीय सूत्रांनी दिली आहे. पाकिस्तानच्या विदेश मंत्रालयानेही तसे संकेत दिले आहेत.सार्क संमेलनाबाबत नेपाळच्या मीडियात येणाऱ्या वृत्ताला विशेष महत्त्व आहे. कारण, नेपाळ हा या आठ सदस्यीय समूहाचा वर्तमान अध्यक्ष आहे. भारताने आपला निर्णय यापूर्वीच नेपाळला कळविला आहे. या संमेलनाबाबत काही वाद असल्यास ते सोडविण्याची जबाबदारी वर्तमान अध्यक्ष म्हणून नेपाळकडे आहे; पण सद्य:परिस्थितीत असा कोणताही तोडगा दिसत नाही. काठमांडूतील या उच्चस्तरीय सूत्रांनी सांगितले की, यातील सदस्य देशांनी सहभागास नकार दिल्याने हे संमेलन रद्द केल्याचे स्पष्ट केले जाईल; पण याबाबतचा निर्णय मात्र नेपाळ घेणार नाही. भारतासह चार देश बांगलादेश, भूतान आणि अफगाणिस्तानने या संमेलनात सहभागी न होण्याचे जाहीर केले आहे. त्यामुळे तूर्तास ही परिस्थिती बदलता येणार नाही, असेही नेपाळच्या सूत्रांनी स्पष्ट केले आहे. या चारही देशांनी आपल्या निर्णयाची माहिती नेपाळला दिली आहे. उरीतील हल्ल्यानंतर पाकिस्तानवर जागतिक स्तरावरून दबाव वाढत असल्याचे यावरून मानले जात आहे. सीमेपलीकडून अतिरेकी हल्ले होत असल्याने यात सहभागी होत नसल्याचे कारण भारताने दिले असून, अन्य तीन देशांनीही याबाबत चिंता व्यक्त केली आहे. दरम्यान, सार्क संमेलन रद्द होणार असल्याची अधिकृत घोषणा लवकरच केली जाणार असल्याची माहिती बांगलादेशच्या उच्चस्तरीय सूत्रांनी दिली आहे. तथापि, एखादा देश या संमेलनात सहभागी न झाल्यास हे संमेलन आपोआपच रद्द होते, असे सार्कच्या घोषणापत्रात नमूद केलेले आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)पाकने दिले संमेलन रद्द होण्याचे संकेत भारताने सार्क संमेलनात सहभागी होण्यास नकार दिल्यानंतर सार्क संमेलन रद्द होण्याचे संकेत पाकिस्तानने बुधवारी दिले आहेत. विदेश विभागाचे सल्लागार सरताज अजीज म्हणाले की, सार्कच्या नियमानुसार एखादा देश जर संमेलनात सहभागी झाला नाही तर संमेलन होऊ शकत नाही.