शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्नाटकात उडाला काँग्रेसच्या 'लाडकी बहीण' योजनेचा बोजवारा? दोन महिन्यांचे मानधन रखडले, खुद्द मंत्र्यांचीच कबुली!
2
लग्न होत नसेल, नोकरी मिळत नसेल तर 'राम' नामाचा जप करा; भाजपा खासदारानं संसदेत सांगितला उपाय
3
काश्मीर खोऱ्यात सैन्याला मिळाले १२ हत्तींचे बळ! मिलिटरी ट्रेनने रणगाडे, अवजड शस्त्रास्त्रे नेण्यात यश...
4
प्रसिद्ध माजी क्रिकेटपटू अन् दुबई एअरलाइन्सच्या माजी मालकाची पत्नी स्टेशवर सापडली; भीषण अवस्था, व्हिडीओ व्हायरल, नेमकं सत्य काय?
5
उत्तराखंडच्या राज्यपालांचा धामींना धक्का ! UCC दुरुस्ती व धर्मांतर विरोधी सुधारणा विधेयक परत पाठविले
6
Rakhi Sawant : Video - "माफी मागा, मी तुमचं धोतर खेचलं तर...", नितीश कुमारांवर भडकली राखी सावंत
7
म्युच्युअल फंड गुंतवणूकदारांसाठी मोठी बातमी! सेबीने एक्सपेन्स रेशोचे नियम बदलले, कमाईवर थेट परिणाम
8
खळबळजनक! घर मालकिणीने भाडं मागितलं, कपलने तिलाच संपवलं; मृतदेहाचे तुकडे केले अन्...
9
परदेश दौऱ्यावर जाताय? ट्रॅव्हल इन्शुरन्स घेताना 'या' चुका टाळा; अन्यथा खिशाला बसू शकतो मोठा फटका
10
Bomb Threat: न्यायाधीशांना ई-मेल पाठवून नागपूर जिल्हा न्यायालयात बॉम्बस्फोट करण्याची धमकी
11
सुरक्षा दलांची मोठी कामगिरी; छत्तीसगडच्या सुकमा जिल्ह्यात 3 नक्षलवादी ठार, शस्त्रसाठा जप्त
12
माजी आमदार प्रज्ञा सातव यांचा भाजपमध्ये प्रवेश! काँग्रेसचं काय चुकतंय विचारताच, म्हणाल्या...
13
५ राजयोगात मार्गशीर्ष अमावास्या २०२५: ९ राशींवर लक्ष्मी कुबेर कृपा, कल्पनेपलीकडे यश-पैसा-लाभ!
14
Creta ला टक्कर देण्यासाठी येतेय Mahindra ची नवी 'मिड-साईज' SUV; असे असेल डिझाईन अन् खासियत
15
मार्गशीर्ष अमावस्या २०२५: वर्षातली शेवटची आणि प्रभावशाली रात्र; आठवणीने करा 'हे' ५ उपाय!
16
‘मला उमेदवारी द्या, अन्यथा माझ्या जीवाचं काही बरंवाईट झाल्यास पक्ष जबाबदार राहील’, भाजपाच्या निष्ठावंत कार्यकर्त्याची धमकी
17
चांदीची 'पांढरी' लाट! सोन्याला मागे टाकत गाठला २ लाखांचा ऐतिहासिक टप्पा; काय आहेत भाववाढीची कारणे?
18
डोनाल्ड ट्रम्प यांनी अचानक का वापरलं 'भारत मॉडेल'?; मिड टर्म निवडणुकीपूर्वी अमेरिकेत मोफत खैरात
19
'पुढे दरोडा पडलाय, दागिने काढून ठेवा'; पोलिसांच्या वेशातील टोळीचा पर्दाफाश, लोकांना घाबरवून लुटायचे
20
"विश्वविख्यात बोलले म्हणजे त्यांचे २९ महापालिकांत पराभव पक्के", भाजपाने संजय राऊतांना डिवचलं
Daily Top 2Weekly Top 5

पाकिस्तानचे पुन्हा हात वर!

By admin | Updated: August 7, 2015 01:54 IST

उधमपूर येथे बुधवारी पकडण्यात आलेला लष्कर-ए-तोयबाचा दहशतवादी नावेद उर्फ उस्मान हा पाक नागरिक असल्याचा भारताचा दावा पाकिस्तानने फेटाळला असून,

इस्लामाबाद/ नवी दिल्ली : उधमपूर येथे बुधवारी पकडण्यात आलेला लष्कर-ए-तोयबाचा दहशतवादी नावेद उर्फ उस्मान हा पाक नागरिक असल्याचा भारताचा दावा पाकिस्तानने फेटाळला असून, भारताने पाकवर आरोप करताना संयम पाळावा असेही म्हटले आहे. भारताने पाकिस्तानचे हे म्हणणे अमान्य करीत मुंबईवरील २६/११च्या हल्ल्यात पकडलेला मोहम्मद अजमल कसाब हाही आमचा नागरिक नाही, असे म्हणणाऱ्या पाकिस्तानला नंतर ते मान्य करावे लागले होते, याचे स्मरण दिले आहे. दरम्यान, पाकमधील आघाडीची इंग्रजी दैनिके ‘डॉन’ व ‘द नेशन’ यांनी मात्र आपल्या बातम्यांमध्ये नावेद हा पाकिस्तानीच असल्याचा स्पष्ट उल्लेख केला आहे. पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते सय्यद काझी खलिलुल्ला यांनी यासंदर्भाततील टिपणी केली आहे. आम्ही प्रसारमाध्यमातील बातम्या पाहिल्या आहेत. त्यावर मी काही बोलणार नाही. भारतीय अधिकाऱ्यांनी पाकवर कोणताही आरोप करताना, त्याबरोबर पुरावेही सादर करावेत अशी आमची मागणी आहे. भारतात कोणतीही घटना घडली की तत्काळ पाकिस्तानवर आरोप केला जातो, हे अयोग्य आहे. भारताने आरोप करताना पुरावेही द्यावेत; तरच वस्तुस्थितीवर आरोप खरे ठरतील, असे खलिलुल्ला यांनी सांगितले. पाकिस्तानचे म्हणणे असे की, आमच्याकडे नागरिकांची नोंद ‘नॅशनल डेटाबेस’मध्ये आहे व त्यात नावेदचे नाव नाही. परंतु भारत सरकार म्हणते की, पाकिस्तानची लोकसंख्या १८ कोटी अहे व डेटाबेस जेमतेम ९ कोटी नागरिकांचा आहे. त्यामुळे त्याआधारे केलेला दावा अजिबात विश्वासार्ह नाही. उधमपूर हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर प्रस्तावित भारत-पाक राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची बैठक रद्द करा, अशी मागणी सेनेने गुरुवारी लोकसभेत केली. पाकसोबत कोणतीही चर्चा केली जाऊ नये. २३-२४ आॅगस्ट रोजी होणारी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार स्तरावरील बैठकही रद्द करावी, असे खासदार चंद्रकांत खैरे यांनी म्हटले. पाकिस्तानने भारतात अतिरेकी पाठविणे थांबवावे तसेच अलीकडील गुरुदासपूर हल्ल्याबाबत तपासात मदत केल्याखेरीज या देशांसोबत कुठल्याही स्तरावर द्विपक्षीय चर्चा केली जाऊ नये, असे ते गृहमंत्र्यांना उद्देशून म्हणाले. दक्षिण काश्मीरच्या पुलवामा जिल्ह्यात गुरुवारी सुरक्षा दलांसोबतच्या चकमकीत लष्कर-ए-तोयबाचा तालीब हुसैन नामक संशयित अतिरेकी ठार झाला.पुन्हा अतिरेकी हल्ला : जम्मू-काश्मीरमधील उधमपूर जिल्ह्यात अतिरेक्यांनी गुरुवारी रात्री पुन्हा पोलीस चौकीवर हल्ला चढवला. यात २ विशेष पोलीस अधिकारी जखमी झाले. कालच येथे झालेल्या हल्ल्याच्या वेळी पाक अतिरेक्याला जिवंत पकडण्यात आले होते. रात्री उशिरापर्यंत चकमक सुरूच होती. आपण पाठविलेला दहशतवादी काश्मीरमध्ये जिवंत पकडला गेला व मुंबईवरील हल्ला पाकिस्तानच्याच भूमीतून केला गेल्याच्या माजी तपास प्रमुखाच्या कबुलीने पितळ उघडे पडले तरी पाकिस्तानच्या वतीने भारतात दहशतवाद पसरविणाऱ्या आयएसआयची खुमखुमी अजून जिरलेली नाही. पाकच्या या गुप्तहेर संघटनेचे माजी प्रमुख जनर हमीद गुल यांनी आता अणुबॉम्ब टाकून दिल्ली व मुंबई बेचिराख करण्याची दर्पोक्ती केली आहे. कोण नरेंद्र मोदी, आमच्यासमोर तो कोणी नाही, आमच्याकडे सर्व साधने आहेत, योजना, तंत्रज्ञान तयार आहे. आम्ही भारताचे तुकडे-तुकडे करू शकतो आणि करून दाखवू, असे त्याने म्हटले.(वृत्तसंस्था)