शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण हल्ल्याचा तीव्र शब्दांत निषेध; कतारने क्षेपणास्त्रे हवेतच रोखली, जीवितहानी झाली नसल्याचा दावा
2
आखाती देशांत तणाव वाढण्याची चिन्हे, अनेक ठिकाणी एअरस्पेस बंद; एअर इंडिया, इंडिगोकडून सूचना जारी
3
इराणचा पलटवार...! कतारमधील अमेरिकेच्या सर्वात मोठ्या एअरबेसवर डागली 6 क्षेपणास्त्रे
4
IND vs ENG मालिके दरम्यान दु:खद बातमी! भारताच्या दिग्गज फिरकीपटूचं निधन; लंडनमध्ये घेतला अखेरचा श्वास
5
“त्रिभाषा सूत्रावर सर्व संबंधितांशी बोलूनच अंतिम निर्णय घेणार”; CM फडणवीसांनी केले स्पष्ट
6
ENG vs IND : फलंदाजांनी आपलं काम केलं! टीम इंडियानं हा मंत्र जपला तर विजय पक्का, पण...
7
“स्वसंरक्षणाचा इराणला पूर्ण अधिकार”; रशियाने स्पष्टच सांगितले, तणाव वाढण्याची चिन्हे
8
ठरले! महादेव बाबर NCPमध्ये करणार प्रवेश; DCM अजित पवार राहणार उपस्थित, पुण्यात ताकद वाढणार
9
कुर्ला-सायनदरम्यान ओव्हरहेड वायर तुटली; मध्य रेल्वेच्या जलद फेऱ्या ठप्प, प्रवाशांचे हाल
10
"...तेलाच्या किमती कमी ठेवा, मी बघतोय!" इराण-इस्रायल युद्धादरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांचं मोठं विधान
11
ENG vs IND: KL राहुल-पंतच्या सेंच्युरीनंतर जड्डूची उपयुक्त खेळी! इंग्लंडसमोर ३७१ धावांचे टार्गेट
12
इस्रायलचा इराणवर मोठा हल्ला, ५० हून अधिक लढाऊ विमानांचा कहर; महत्त्वाच्या लष्करी तळांवर तुफान बॉम्बिंग
13
"२०२२ मध्ये केवळ वादळ होतं, २०२७ मध्ये....", पोटनिवडणुकीच्या निकालानं केजरीवाल खूश, केली मोठी भविष्यवाणी
14
खामेनेई पळून जाण्याच्या तयारीत! इराणच्या माजी युवराजांचा दावा, 'सुप्रीम लीडर'बद्दल काय म्हणाले?
15
२८ जुलैचा दावा खरा होणार? तिसरे महायुद्ध अटळ? बाबा वेंगा-नास्त्रेदमस यांची मोठी भविष्यवाणी
16
"तमीज से खेलने के चक्कर में..." कडक खेळी शिवाय पंतची 'मन की बात' चर्चेत (VIDEO)
17
राजाच्या पैशानेच बनली त्याच्या मृत्यूची योजना! लग्नाआधीच सुरू केलेलं नवं खातं, सोनमनं तेच पैसे वापरले अन्... 
18
रिषभ पंतला तोड नाय! सेंच्युरीसह रचला इतिहास; स्टेडियम स्टँडमधून गावसकरांचा 'कोलांटी उडी' मार असा इशारा
19
७६ लाख रहस्यमय मतांबाबतच्या याचिकेवर हायकोर्टात सुनावणी पूर्ण; प्रकाश आंबेडकरांनी मांडली बाजू
20
आषाढी वारीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ सहभागी होणार; दिवसभर दिंडीसोबत चालणार

छुप्या युद्धास पाकचे अभय

By admin | Updated: January 14, 2015 02:09 IST

दहशतवादामुळे आपल्याच लोकांचे बळी जात असूनही, पाकिस्तान जम्मू-काश्मिरातील छुप्या युद्धाला अभय देत असल्याचा आरोप लष्करप्रमुख जनरल दलबीरसिंग सुहाग यांनी केला आहे

नवी दिल्ली : दहशतवादामुळे आपल्याच लोकांचे बळी जात असूनही, पाकिस्तान जम्मू-काश्मिरातील छुप्या युद्धाला अभय देत असल्याचा आरोप लष्करप्रमुख जनरल दलबीरसिंग सुहाग यांनी केला आहे. सीमेवर सतत सुरू असलेला गोळीबार आणि घुसखोरीच्या घटनांबाबत त्यांनी धोक्याचा इशारा दिला़मंगळवारी वार्षिक पत्रपरिषदेत बोलताना, त्यांनी पाकिस्तानला खडे बोल सुनावले़ गत महिन्यात पाकच्या पेशावरमधील एका लष्करी शाळेवर अतिरेक्यांनी केलेल्या हल्ल्यात अनेक निष्पाप मुलांचा मृत्यू झाला होता़ या हल्ल्याचा उल्लेख करीत लष्करप्रमुख म्हणाले की, या हल्ल्यानंतर पाकिस्तानी लष्कराचे मन बदलले की नाही, याची प्रतीक्षा करावी लागेल़ स्वत:च्या नागरिकांचे जीव जात असूनही छुप्या अतिरेकी कारवायांना पाकिस्तान अभय देत आहे़सीमेपलीकडून सुरू असलेल्या सततच्या गोळीबाराबाबत विचारले असता ते म्हणाले की, सीमेवरील कडक पहाऱ्यामुळे अतिरेक्यांना भारतात घुसखोरी करणे अशक्य झाले आहे़ नियंत्रण रेषेऐवजी आता आंतरराष्ट्रीय सीमेवर शस्त्रसंधीचा भंग सुरू आहे़ नियंत्रण रेषेवरील आपला कडक पहारा आणि घुसखोरीविरोधी व्यूहरचनेमुळे कदाचित यामुळे घुसखोरांनी आपला मोर्चा आंतरराष्ट्रीय सीमेकडे वळवला असावा़ आंतरराष्ट्रीय सीमेवरील खुली गटारे आणि नाल्यामुळे घुसखोरांना मदत मिळते़ मात्र भारतीय लष्कर घुसखोरीची समस्या निपटण्यासाठी पूर्णत: सज्ज आहे़ भारतीय सुरक्षा दलाची प्रशंसा करताना ते म्हणाले की, जम्मू काश्मिरात सन २०१४ दरम्यान सुरक्षा दलाने राज्यात सर्वाधिक संख्येत अतिरेक्यांना निष्क्रिय केले़ ११० अतिरेक्यांपैकी १०४ अतिरेक्यांना सुरक्षा दलाने ठार केले़ गतवर्षी ६५ अतिरेकी ठार झाले होते़ (लोकमत न्यूज नेटवर्क)