शहरं
Join us  
Trending Stories
1
Cheteshwar Pujara: भारतीय क्रिकेटमधील मोठ्या पर्वाचा अंत; 'मिस्टर डिपेंडेबल' आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त!
2
"वारकरी संप्रदायाची थट्टा चालविली... ऐका सुप्रिया ताई...!"; संत तुकाराम महाराजांचा अभंग सांगत भाजपचा हल्लाबोल
3
हृदयद्रावक! पुरामुळे आयुष्य उद्ध्वस्त... घरं, दुकानं गेली वाहून; अन्नाचा, औषधांचा मोठा तुटवडा
4
दे दणादण! मेट्रोमध्ये एकमेकींच्या झिंज्या उपटल्या तरी गप्प नाही बसल्या, Video तुफान व्हायरल
5
बँक एफडीपेक्षा जास्त व्याज! पोस्ट ऑफिसची या योजनेत १ लाख रुपयांवर मिळेल २३,५०८ रुपयांचा नफा
6
ये नया हिंदुस्तान है...! केवळ पुतिनच नाही, झेलेंस्कीसुद्धा भारतात येणार...; तिकडे अमेरिकेचा 'यू-टर्न', इकडे वेगळाच 'पिक्चर' दिसणार?
7
येस बँकेच्या भागधारकांसाठी मोठी बातमी! जपानी बँक २५% पर्यंत हिस्सा खरेदी करणार, काय होणार बदल?
8
"पप्पांनी टॉप मॉडेल स्कॉर्पिओ दिली, तरी निक्कीला जाळलं..."; बहिणीचा धक्कादायक खुलासा
9
'राहुल गांधी बोलायला लागले की त्यांचे खासदार घाबरतात कारण...'; किरेन रिजिजूंची विरोधी पक्षावर जोरदार टीका
10
Bigg Boss 19: 'बिग बॉस १९'च्या ग्रँड प्रीमिअरला काही तास शिल्लक, शो कधी-कुठे पाहता येईल?
11
कधी करावी गणेश स्थापना, ज्येष्ठा गौरींचे पूजन कधी? जाणून घ्या मुहुर्त आणि इतर माहिती
12
ठरलं तर! बॉलिवूडमधील 'या' प्रसिद्ध गायकाची Bigg Boss 19 मध्ये एन्ट्री, वडिलांच्या कमेंटने वेधलं लक्ष
13
AUS vs SA: टॉस जिंकून ऑस्ट्रेलियन कर्णधारानं पहिल्यांदाच घेतला 'असा' निर्णय!
14
तुमच्या नोकऱ्यांचा एआय शत्रू आहे का?
15
मुकेश किंवा नीता अंबानी नाही तर रिलायन्समध्ये सर्वात जास्त शेअर्स कोणाकडे आहेत?
16
गणेशभक्तांना घेऊन जाणारी बस कशेडी बोगद्याजवळ पेटली; प्रवासी झोपेत असतानाच उडाला आगीचा भडका
17
Video - राजस्थानमध्ये पुराचे थैमान; बचावकार्यासाठी येणाऱ्या NDRF जवानांच्या गाडीचा अपघात
18
ऑनलाइन गेमिंगच्या जाळ्यात तुमचाच ‘गेम’ तर होत नाही ना?
19
गणेशमूर्ती प्राणप्रतिष्ठेला ऐन वेळी धावाधाव नको, म्हणून 'ही' घ्या पूजासाहित्याची इत्थंभूत यादी आणि विधी! 
20
"या गोष्टी खेळाशी जोडू नयेत म्हणणारे लोक...";भारत-पाक सामन्यावरून गोंधळावरुन अजित पवारांचे स्पष्ट मत

पाकिस्तानचे ७ सैनिक ठार!

By admin | Updated: November 15, 2016 06:25 IST

पाकिस्तानच्या नियंत्रण रेषेवर भारतीय सैन्याच्या गोळीबारात आमचे ७ सैनिक मारले गेले असल्याचा दावा सोमवारी पाकिस्तानने केला आहे

इस्लामाबाद : पाकिस्तानच्या नियंत्रण रेषेवर भारतीय सैन्याच्या गोळीबारात आमचे ७ सैनिक मारले गेले असल्याचा दावा सोमवारी पाकिस्तानने केला आहे. भिम्बेर सेक्टरमध्ये रविवारी रात्री ७ सैनिक ठार झाल्याचे पाकिस्तानने म्हटले आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, नियंत्रण रेषेवर शस्त्रसंधीचे उल्लंघन करून, विनाकारण गोळीबार करणाऱ्या पाकी जवानांना धडा शिकविण्यासाठी रविवारी रात्री भारताने जोरदार प्रत्युत्तर दिले. या वेळी भारताने तोफगोळ्यांचाही तुफानी मारा केला आणि रणगाडेविरोधी क्षेपणास्त्रही वापरले, असे कळते. मात्र भारतानेच शस्त्रसंधीचे उल्लंघन केल्याचा उलट्या बोंबा मारणे पाकने सुरू केले आहे. प्रत्यक्षात भारतीय सीमेवर सातत्याने शस्त्रसंधीचे उल्लंघन करून, कुरापती काढणाऱ्या पाकिस्तानला भारतीय जवान आक्रमकपणे प्रत्युत्तर देत आहेत. पाकिस्तानच्या गोळीबारातही भारताचे काही जवान शहीद झाले आहेत.

भारताचेही मोठे नुकसान?-पाकिस्तानचे संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ म्हणाले की, आमच्या सैनिकांनी भारतीय गोळीबाराला तोडीस तोड उत्तर दिले. त्यात भारतीय जवान निश्चितपणे मरण पावले आहेत. मात्र भारत ही माहिती लपवून ठेवत आहे.

उच्चायुक्तांना केले पाचारण-या घटनेनंतर पाकिस्तानच्या परराष्ट्र सचिवांनी इस्लामाबादमधील भारतीय उच्चायुक्त गौतम बंबावाले यांना पाचारण करून, भारतीय कृतीचा निषेध केला. याचे गंभीर परिणाम होतील, असा इशाराही सचिव ऐझाज चौधरी यांनी बंबावाले  यांना दिला. पाकचे लष्करप्रमुख  राहील शरीफ यांनी आपल्या जवानांना भारताच्या गोळीबाराला जशास तसे  उत्तर देण्याचे आदेश दिले आहेत. मृत जवानांना श्रद्धांजली वाहण्यासाठी रावळपिंडीला आलेल्या शरीफ यांनी आपल्या अधिकाऱ्यांना सांगितले की, भारतीय सैन्याला अजिबात भीक घालू नका. देशाचे संरक्षण हे आपले पहिले कर्तव्य आहे. (वृत्तसंस्था)