शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
3
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
4
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
5
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
6
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
7
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
8
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
9
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
10
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
11
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
12
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
13
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
14
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
15
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
16
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
17
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
18
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
19
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
20
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली

पाकशी सामोपचार की वार?; सरकारची खलबते, मोदींची सहकाऱ्यांशी चर्चा सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 28, 2019 06:06 IST

हरिश गुप्ता । लोकमत न्यूज नेटवर्क नवी दिल्ली : भारताच्या हवाई हद्दीत पाकिस्तानच्या लढावू विमानांनी घुसखोरी केल्याचा संदेश हाती ...

हरिश गुप्ता ।लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : भारताच्या हवाई हद्दीत पाकिस्तानच्या लढावू विमानांनी घुसखोरी केल्याचा संदेश हाती पडताच पंतप्रधान नरेंद्र मोदीधीरगंभीर चेहऱ्याने विज्ञान भवन येथील नियोजित कार्यक्रम मध्येच सोडून कार्यालयाकडे रवाना झाले. जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेच्या पाकिस्तानस्थित प्रशिक्षण तळावर आदल्या दिवशी भारताने केलेल्या हवाई हल्ल्यानंतर बुधवारी घडलेल्या ताज्या घडामोडींवर तसेच पाकिस्तानच्या या दु:साहसावर पुढे कशी पावले उचलवीत, या महत्त्वाच्या मुद्यावर सुरक्षा सल्लागार अजित डोवल, भारतीय लष्कर, नौदल आणि वायुदलाचे वरिष्ठ अधिकारी तसेच अन्य सुरक्षा दलाचे अधिकाऱ्यांनी मंथन केले. त्यानंतर पंतप्रधानांना ताज्या घडामोडींची माहिती देण्यात आली.

सध्याच्या परिस्थितीत मोदी सरकार विविध पर्यायांवर विचार करत आहे. पाकिस्तानच्या ताब्यातील पायलटला परत आणणे आणि पुलवामा हल्ल्याला जबाबदार असलेल्या अझहर मसूदला भारत ताब्यात घेणे ही भारताची सध्याची प्राथमिकता आहे. भारत आता जगाकडे अशी मागणी करू शकेल की, पुलवामा हल्ल्याची जबाबदारी घेणारा अझहर मसूद हा कुठे आहे हे प्रथम निश्चित करा आणि तो आमच्या ताब्यात द्या. पण, चर्चेच्या पर्यायावर मोदी सरकार तयार नसल्याचे समजते. त्यामुळे त्यांनी सैन्यदलांना पूर्ण स्वातंत्र्य दिले आहे. हीच स्थिती राहिल्यास दोन्ही देशांतील तणाव कायम असेल.