शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

पाकशी सामोपचार की वार?; सरकारची खलबते, मोदींची सहकाऱ्यांशी चर्चा सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 28, 2019 06:06 IST

हरिश गुप्ता । लोकमत न्यूज नेटवर्क नवी दिल्ली : भारताच्या हवाई हद्दीत पाकिस्तानच्या लढावू विमानांनी घुसखोरी केल्याचा संदेश हाती ...

हरिश गुप्ता ।लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : भारताच्या हवाई हद्दीत पाकिस्तानच्या लढावू विमानांनी घुसखोरी केल्याचा संदेश हाती पडताच पंतप्रधान नरेंद्र मोदीधीरगंभीर चेहऱ्याने विज्ञान भवन येथील नियोजित कार्यक्रम मध्येच सोडून कार्यालयाकडे रवाना झाले. जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेच्या पाकिस्तानस्थित प्रशिक्षण तळावर आदल्या दिवशी भारताने केलेल्या हवाई हल्ल्यानंतर बुधवारी घडलेल्या ताज्या घडामोडींवर तसेच पाकिस्तानच्या या दु:साहसावर पुढे कशी पावले उचलवीत, या महत्त्वाच्या मुद्यावर सुरक्षा सल्लागार अजित डोवल, भारतीय लष्कर, नौदल आणि वायुदलाचे वरिष्ठ अधिकारी तसेच अन्य सुरक्षा दलाचे अधिकाऱ्यांनी मंथन केले. त्यानंतर पंतप्रधानांना ताज्या घडामोडींची माहिती देण्यात आली.

सध्याच्या परिस्थितीत मोदी सरकार विविध पर्यायांवर विचार करत आहे. पाकिस्तानच्या ताब्यातील पायलटला परत आणणे आणि पुलवामा हल्ल्याला जबाबदार असलेल्या अझहर मसूदला भारत ताब्यात घेणे ही भारताची सध्याची प्राथमिकता आहे. भारत आता जगाकडे अशी मागणी करू शकेल की, पुलवामा हल्ल्याची जबाबदारी घेणारा अझहर मसूद हा कुठे आहे हे प्रथम निश्चित करा आणि तो आमच्या ताब्यात द्या. पण, चर्चेच्या पर्यायावर मोदी सरकार तयार नसल्याचे समजते. त्यामुळे त्यांनी सैन्यदलांना पूर्ण स्वातंत्र्य दिले आहे. हीच स्थिती राहिल्यास दोन्ही देशांतील तणाव कायम असेल.