शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
2
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
3
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
4
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
5
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
6
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
7
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
8
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
9
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
10
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
11
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
12
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
13
'धुरंधर'मुळे पालटले या टीव्ही कलाकारांचे नशीब; कोणी आयटम साँगने गाजवले, तर कोणी अभिनयाने जिंकली मने!
14
भाजपचा यू-टर्न! आमदार देवयानी फरांदेंच्या नियुक्तीनंतर नाराजीची लाट, भाजपने आमदार ढिकलेंबद्दल केला खुलासा
15
३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
16
बॉक्स ऑफिस मॉन्स्टर 'धुरंधर'सोबत 'उत्तर' रिलीज झाला अन्.., क्षितिज पटवर्धनची लक्षवेधी पोस्ट
17
सरकारच्या तिजोरीत लोकांनी भरले १७ लाख कोटी; कॉर्पोरेट, वैयक्तिक करात मोठी वाढ
18
'धुरंधर'मध्ये अक्षय खन्नाचंच होतंय कौतुक, आर माधवनचा जळफळाट? म्हणाला, "तो नव्या घरात..."
19
BMC निवडणुकीपूर्वी महायुतीत ट्विस्ट! भाजपा-राष्ट्रवादी नेत्यांची बैठक, शिंदेसेनेला डच्चू?
20
“सावकारांचे रॅकेट विदर्भ-मराठवाड्यात सक्रिय, महायुती सरकार शेतकरी विरोधी”: विजय वडेट्टीवार
Daily Top 2Weekly Top 5

अतिरेकी हल्ल्यानंतर पाकची ‘शरीफ’गिरी!

By admin | Updated: January 6, 2016 02:20 IST

अतिरेक्यांविरुद्ध सुरू असलेल्या कारवाईमुळे चार दिवसांपासून धुमसत असलेल्या पठाणकोट एअरबेसवर बंदुका शांत झाल्या असल्या तरी अद्यापही ‘आॅपरेशन पठाणकोट’ सुरू आहे.

पठाणकोट : अतिरेक्यांविरुद्ध सुरू असलेल्या कारवाईमुळे चार दिवसांपासून धुमसत असलेल्या पठाणकोट एअरबेसवर बंदुका शांत झाल्या असल्या तरी अद्यापही ‘आॅपरेशन पठाणकोट’ सुरू आहे. एअरबेसवर हल्ला करणारे सर्व सहा अतिरेकी ठार झाले आहेत. मात्र आॅपरेशन अद्यापही संपलेले नाही, असे संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांनी मंगळवारी जाहीर केले. विस्तीर्ण एअरबेसवर अभियान राबविणाऱ्या आणि मोठी हानी टाळणाऱ्या सुरक्षा दलांची पर्रीकर यांनी या वेळी प्रशंसा केली. मात्र याचवेळी काही ‘त्रुटी’ निश्चितपणे नडल्या, अशी प्रांजळ कबुलीही दिली. पंजाबच्या पठाणकोटमधील हवाईदल तळावरील दहशतवादी हल्ल्याची पाकिस्तानचे लष्करप्रमुख राहील शरीफ यांना पूर्वकल्पना होती, असा दावा भारतीय गुप्तचर संस्थांनी केला आहे. या पार्श्वभूमीवर पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना फोन करून अतिरेक्यांविरुद्धच्या कारवाईचे आश्वासन दिले. त्याचवेळी अमेरिकेनेही पाकिस्तानला शब्द पाळण्याबाबत बजावले आहे. अतिरेकी हल्ला घडवून आणणाऱ्यांनी ज्या लोकांशी संपर्क केला, त्यांची ओळख पटल्यानंतर राष्ट्रीय तपास संस्था (एनआयए) या प्रकरणाच्या तपासात पाकिस्तानची मदत घेणार आहे, असे एनआयएचे प्रमुख शरद कुमार यांनी मंगळवारी स्पष्ट केले. पठाणकोट हल्ल्याच्या कटकारस्थानाचा छडा लावणे हे मोठे आव्हान आहे. यात दीर्घ तपासाची गरज आहे. त्यामुळे मी अद्याप कुठलीही कालमर्यादा निश्चित केलेली नाही. पण हा तपास लवकरात लवकर पूर्ण करण्याचे आमचे प्रयत्न असतील, असे ते म्हणाले.काही त्रुटी नडल्या, हे मी मान्य करतो. परंतु सुरक्षेसोबत कुठल्याही प्रकारची तडजोड केली गेली, असे मला अजिबात वाटत नाही. तपास पूर्ण झाल्यानंतर सर्व बाबी स्पष्ट होतीलच. सुरक्षेच्या प्रत्येक बाबीची तपशीलवार चर्चा होऊ शकत नाही. काही गोष्टी तपासासाठीही सोडा. - मनोहर पर्रीकर, संरक्षणमंत्रीआता धोरण कसे बदलले ? - काँग्रेस काँग्रेस आज सत्तेवर असती तर पाकवर हल्ले करीत जवानांच्या मृत्यूचा बदला घेण्याची मागणी झाली असती. पठाणकोटवर हल्ल्यानंतरतसे काहीही होत नाहीय. टिष्ट्वटरवर शहिदांच्या मृत्यूबद्दल शोक व्यक्त करण्याचे एकमेव काम केले जात आहे, असा हल्ला काँग्रेसने केला.‘त्या’ जवानांना शहिदांचा दर्जाहल्ल्यादरम्यान प्राण गमावलेल्या सात सुरक्षा जवानांना शहिदाचा दर्जा मिळेल. युद्धात प्राण गमावलेल्यांना मिळणारे सर्व लाभ या सुरक्षा कर्मचाऱ्यांना मिळतील, असेही पर्रीकर यांनी सांगितले.२४ तासांत अहवाल द्यापोलीस अधीक्षकाच्या अपहरणानंतर घातपाताचे संकेत मिळूनही योग्य ती पावले का उचलली गेली नाहीत, याबाबत २४ तासांत स्पष्टीकरण द्या, असे केंद्रीय गृहमंत्रालयाने पंजाब पोलिसांना बजावले आहे.निर्णायक कारवाई करण्याचे आश्वासनपठाणकोट हल्ल्यानंतर भारत-पाक द्विपक्षीय चर्चेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असतानाच मंगळवारी पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दूरध्वनी करून या हल्ल्याचा तीव्र निषेध केला. हल्ल्यातील अतिरेक्यांविरुद्ध त्वरित आणि निर्णायक कारवाई करण्याचे आश्वासनही त्यांनी या वेळी दिले. भारताने दिलेल्या ‘विशेष व कारवाईयोग्य’ पुरावे आणि माहितीच्या आधारावर पाकिस्तानने पठाणकोट हल्ल्यातील अतिरेक्यांविरुद्ध त्वरित पावले उचलावीत, यावर मोदींनी भर दिला.