शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकच्या दिंडोरी येथे जोरदार हादरा, २५ किमी परिसरात मोठा आवाज; नागरिक घाबरले, नेमकं काय घडले?
2
इथेनॉलनंतर आता डिझेलमध्ये बायोफ्युएल मिसळणार; गडकरींनी वादाच्या पार्श्वभूमीवर केली घोषणा
3
Independence Day 2025: काय योगायोग...! १९४७ ला तोच वार होता, जो उद्या १५ ऑगस्टला...; ७८ वर्षांनी...
4
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी गुडन्यूज! ८वा वेतन आयोग कधी लागू होणार? सरकारचा मोठा खुलासा!
5
इन्स्टाग्रामवर १.२ मिलियन फॉलोअर्स, मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी ईडीनं केली अटक; कोण आहे 'ही' मॉडेल?
6
बस बनवणाऱ्या कंपनीला ₹५९४ कोटींचा नफा; शेअर खरेदीसाठी उड्या, ₹१२१ वर आला भाव
7
८८१ किमी केवळ १२ तासांत; ‘ही’ देशातील सर्वांत लांब अंतराची वंदे भारत, किती स्पीडने जाते?
8
२० वर्षे पगार दिला, पण नोकरीवर काही काम करू दिले नाही! नाराज महिला कंपनीविरोधात गेली कोर्टात, म्हणाली...
9
नीरज चोप्राची पत्नी हिमानी मोरचा मोठा निर्णय! टेनिसला कायमचा रामराम, 'या' व्यवसायात घेतली उडी
10
कोणत्या धर्माचं पालन करते सचिन तेंडुलकरची होणारी सून सानिया चांडोक? किती शिकलीये? जाणून घ्या
11
कबुतरखाना वाद: मध्यस्थीचा प्रस्ताव देणाऱ्या जैन मुनींना राज ठाकरेंचं थेट उत्तर; म्हणाले...
12
प्राध्यापकानेच रचला विभागप्रमुखाच्या हत्येचा कट, माजी विद्यार्थ्यांना दिली सुपारी, विमानाने बोलावले शूटर, अखेर...  
13
Gulabjamun Recipe: ना मावा, ना मिल्कपावडर; घरच्या साहित्यात १५ मिनिटांत करा फर्स्ट क्लास गुलाबजाम 
14
आसिफ अली झरदारींनी काश्मीरबाबत ओकली गरळ; पाकिस्तानी स्वातंत्र्यदिनी भारताला तोडण्याची भाषा
15
“नाल्यांमुळे RSS गंगा प्रदुषित झाली”; भाजपात आयाराम संस्कृतीवर स्वामी गोविंददेवगिरींची टीका
16
नवऱ्यापासून सुटका झाली, पण घटस्फोटानंतर थायरॉइड कॅन्सरने जखडलं; अभिनेत्रीने सांगितला कठीण काळ
17
पाकिस्तानने चीनसारखीच रॉकेट फोर्स उभारली; स्वातंत्र्यदिनी घोषणाही करून टाकली, पण...
18
मध्यरात्री प्रियकरासोबत गुपचूप पळून चालली होती पत्नी, आवाज झाला अन् पती उठला! पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण... 
19
शिवसेना कुणाची? अखेर तारीख ठरली; सुप्रीम कोर्टात 'या' दिवशी होणार अंतिम सुनावणी
20
युपीतील निवडणुकीत भाजपा ५ व्या क्रमांकावर, अपक्षांनाही जास्त मते; सपाचा दणदणीत विजय

अतिरेकी हल्ल्यानंतर पाकची ‘शरीफ’गिरी!

By admin | Updated: January 6, 2016 02:20 IST

अतिरेक्यांविरुद्ध सुरू असलेल्या कारवाईमुळे चार दिवसांपासून धुमसत असलेल्या पठाणकोट एअरबेसवर बंदुका शांत झाल्या असल्या तरी अद्यापही ‘आॅपरेशन पठाणकोट’ सुरू आहे.

पठाणकोट : अतिरेक्यांविरुद्ध सुरू असलेल्या कारवाईमुळे चार दिवसांपासून धुमसत असलेल्या पठाणकोट एअरबेसवर बंदुका शांत झाल्या असल्या तरी अद्यापही ‘आॅपरेशन पठाणकोट’ सुरू आहे. एअरबेसवर हल्ला करणारे सर्व सहा अतिरेकी ठार झाले आहेत. मात्र आॅपरेशन अद्यापही संपलेले नाही, असे संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांनी मंगळवारी जाहीर केले. विस्तीर्ण एअरबेसवर अभियान राबविणाऱ्या आणि मोठी हानी टाळणाऱ्या सुरक्षा दलांची पर्रीकर यांनी या वेळी प्रशंसा केली. मात्र याचवेळी काही ‘त्रुटी’ निश्चितपणे नडल्या, अशी प्रांजळ कबुलीही दिली. पंजाबच्या पठाणकोटमधील हवाईदल तळावरील दहशतवादी हल्ल्याची पाकिस्तानचे लष्करप्रमुख राहील शरीफ यांना पूर्वकल्पना होती, असा दावा भारतीय गुप्तचर संस्थांनी केला आहे. या पार्श्वभूमीवर पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना फोन करून अतिरेक्यांविरुद्धच्या कारवाईचे आश्वासन दिले. त्याचवेळी अमेरिकेनेही पाकिस्तानला शब्द पाळण्याबाबत बजावले आहे. अतिरेकी हल्ला घडवून आणणाऱ्यांनी ज्या लोकांशी संपर्क केला, त्यांची ओळख पटल्यानंतर राष्ट्रीय तपास संस्था (एनआयए) या प्रकरणाच्या तपासात पाकिस्तानची मदत घेणार आहे, असे एनआयएचे प्रमुख शरद कुमार यांनी मंगळवारी स्पष्ट केले. पठाणकोट हल्ल्याच्या कटकारस्थानाचा छडा लावणे हे मोठे आव्हान आहे. यात दीर्घ तपासाची गरज आहे. त्यामुळे मी अद्याप कुठलीही कालमर्यादा निश्चित केलेली नाही. पण हा तपास लवकरात लवकर पूर्ण करण्याचे आमचे प्रयत्न असतील, असे ते म्हणाले.काही त्रुटी नडल्या, हे मी मान्य करतो. परंतु सुरक्षेसोबत कुठल्याही प्रकारची तडजोड केली गेली, असे मला अजिबात वाटत नाही. तपास पूर्ण झाल्यानंतर सर्व बाबी स्पष्ट होतीलच. सुरक्षेच्या प्रत्येक बाबीची तपशीलवार चर्चा होऊ शकत नाही. काही गोष्टी तपासासाठीही सोडा. - मनोहर पर्रीकर, संरक्षणमंत्रीआता धोरण कसे बदलले ? - काँग्रेस काँग्रेस आज सत्तेवर असती तर पाकवर हल्ले करीत जवानांच्या मृत्यूचा बदला घेण्याची मागणी झाली असती. पठाणकोटवर हल्ल्यानंतरतसे काहीही होत नाहीय. टिष्ट्वटरवर शहिदांच्या मृत्यूबद्दल शोक व्यक्त करण्याचे एकमेव काम केले जात आहे, असा हल्ला काँग्रेसने केला.‘त्या’ जवानांना शहिदांचा दर्जाहल्ल्यादरम्यान प्राण गमावलेल्या सात सुरक्षा जवानांना शहिदाचा दर्जा मिळेल. युद्धात प्राण गमावलेल्यांना मिळणारे सर्व लाभ या सुरक्षा कर्मचाऱ्यांना मिळतील, असेही पर्रीकर यांनी सांगितले.२४ तासांत अहवाल द्यापोलीस अधीक्षकाच्या अपहरणानंतर घातपाताचे संकेत मिळूनही योग्य ती पावले का उचलली गेली नाहीत, याबाबत २४ तासांत स्पष्टीकरण द्या, असे केंद्रीय गृहमंत्रालयाने पंजाब पोलिसांना बजावले आहे.निर्णायक कारवाई करण्याचे आश्वासनपठाणकोट हल्ल्यानंतर भारत-पाक द्विपक्षीय चर्चेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असतानाच मंगळवारी पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दूरध्वनी करून या हल्ल्याचा तीव्र निषेध केला. हल्ल्यातील अतिरेक्यांविरुद्ध त्वरित आणि निर्णायक कारवाई करण्याचे आश्वासनही त्यांनी या वेळी दिले. भारताने दिलेल्या ‘विशेष व कारवाईयोग्य’ पुरावे आणि माहितीच्या आधारावर पाकिस्तानने पठाणकोट हल्ल्यातील अतिरेक्यांविरुद्ध त्वरित पावले उचलावीत, यावर मोदींनी भर दिला.